नांदोस हत्याकांड
हरिश्चंद्र पवार
सावंतवाडी, दि. २६ (प्रतिनिधी)ः महाराष्ट्र राज्याला हादरवणाऱ्या नांदोस (मालवण) येथील दहा जणांच्या हत्याकांड प्रकरणी प्रमुख आरोपी संतोष मनोहर चव्हाण, अमित अशोक चव्हाण, योगेश मधुकर चव्हाण, महेश धनाजी शिंदे यांना सिंधुदुर्ग जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. एन. शानभाग यांनी दोषी ठरविले असून या हत्याकांडातील अन्य चार आरोपी तुकाराम श्रीधर गावडे, सूर्यकांत कोरगावकर, चंद्रकांत व तानाजी सीताराम गावडे, वसंत मसुरकर यांना पुराव्याअभावी दोष मुक्त केले आहे.
तब्बल तीन वर्षे सुरू असलेल्या या नांदोस हत्याकांडात प्रमुख आरोपी संतोष चव्हाण याने आपल्या साथीदाराच्या मदतीने पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून मुंबई वाई येथील तब्बल दहा जणाची नांदोस डोंगराच्या ठिकाणी आणून बंदूक, रिव्हॉल्वर तसेच लोखंडी रॉडच्या साहाय्याने निघृण हत्या केली. मालवण पोलिस अंमलदार माधवराव प्रभुखानोलकर यांच्या सहकाऱ्यांनी एका डायरी व ७ः१२ उताऱ्यावरून या हत्याकांडाचा तपास लावला.
या आरोपींपैकी प्रमुख आरोपी संतोष चव्हाण (रा. हुमरमळा, कुडाळ) अमित अशोक शिंदे (दहीसर, मुंबई) महेश धनाजी शिंदे (बोरिवली, मुंबई) व योगेश मधुकर चव्हाण (बोरिवली, मुंबई) या चौघांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. या प्रकरणाच्या खटल्यात सरकारी पक्षातर्फे विशेष वकील ऍड. अजित भणगे, साहाय्यक वकील ऍड. प्रेमानंद नार्वेकर व गौरव पडते यांनी काम पाहिले. नांदोस हत्याकांड प्रकरण हे अंधश्रद्धेतून घडले असून या प्रकरणात मुख्य आरोपी संतोष चव्हाण याने पैशाचा पाऊस पाडणारा संतोषबाबा नांदोस डोंगरावर असल्याचे सांगून सिंधुदुर्ग जिल्ह्याबाहेरील दहा जणांना नांदोस डोंगरावर आणून त्यांचा मुडदा पाडला व दुप्पट करण्यासाठी
प्रसार माध्यमावर न्यायालय नाराज
नांदोस हत्याकांड प्रकरणात आठपैकी सहा आरोपींना दोषी ठरविल्याचे वृत्तपत्रांनी ("गोवादूत'नव्हे) प्रसिध्द केल्याबद्दल न्यायाधीश शानभाग यांनी नाराजी व्यक्त केली. काल दिलेल्या निकालात आपण चार जणांना दोषी ठरविले होते, असे सांगून ते पत्रकारांवर भडकले.
Wednesday 27 May, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment