Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 2 June, 2008

भारताची धार्मिक सहिष्णूतासाऱ्या जगासाठी आदर्श : दलाई लामा
नवी दिल्ली, दि.१ - आपल्या धर्मनिरपेक्षतेकरिता प्रसिद्ध असणाऱ्या भारताची धार्मिक सहिष्णूता संपूर्ण जगासाठी आदर्श असल्याचे तिबेेटीयन धर्मगुरू दलाई लामा यांनी म्हटले आहे.
दहशतवादविरोधी आंतरराष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. या परिषदेला अनेक देशांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावली आहे. यावेळी बोलताना दलाई लामा म्हणाले की, भारतात आज हिंदू, मुस्लिम, बुद्ध, जैन, शीख असे साऱ्याच धर्माचे लोक गुण्या-गोविंदाने नांदताहेत. पाकिस्तान आणि इराकसारखे देश संपूर्ण मुस्लिम देश आहेत. पण, त्यांच्यात आपसातच एकाच धर्माचे असूनही शिया-सुन्नी असे वाद आहेत. ते इतके प्रचंड टोकाचे आहेत की, आतापर्यंत या संघर्षात हजारो लोक मारले गेले आहेत. पण, भारताने अनेक धर्म एकत्र नांदण्याबाबत जणू रेकॉर्डच केला आहे. इतक्या निरनिराळ्या जाती-धर्माचे लोक येथे इतक्या शातंतेने जगू शकतात, यातच या देशाचे महात्म्य दडले आहे.
आज दहशतवादासाठी अमूक एका धर्माकडे बोट दाखविले जाते. ते चूक आहे. शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वच धर्म, समुदायाच्या लोकांनी प्रयत्न केले पाहिजे, असेही दलाई लामा म्हणाले.

No comments: