Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 9 January, 2011

‘जेपीसी’च्या मुद्यावर आडमुठेपणा कॉंग्रेसला फारच महागात पडेल

भाजपाध्यक्ष गडकरींचा
खणखणीत इशारा
गुवाहाटी, दि. ८
२-जी स्पेक्ट्रमच्या परवाना वाटपात झालेला महाघोटाळा हा इतर सर्व घोटाळ्यांची जननी आहे, असा घणाघाती आरोप भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केला असून, या घोटाळ्याची जेपीसीमार्ङ्गत चौकशी करण्याची विरोधी पक्षांची न्याय्य मागणी मान्य न करता आडमुठे धोरण स्वीकारले तर ते सरकारला महागात पडू शकते, असा इशारा दिला आहे.
‘या सगळ्या घोटाळ्यात आपण निर्दोष आहोत असा पंतप्रधानांना आत्मविश्‍वास असेल तर विरोधकांच्या जेपीसीच्या मागणीबाबत ते आडमुठी भूमिका का घेत आहेत. सरकारच्या या आडमुठेपणामुळे आम्हाला देशात आणिबाणी लागू करण्यापूर्वीच्या दिवसांची आठवण होत आहे. सरकारच्या या भूमिकेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो,’ असेही गडकरी म्हणाले. आजपासून येथे सुरू झालेल्या भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या दोन दिवसीय बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षीय भाषण करताना नितीन गडकरी बोलत होते. २-जी स्पेक्ट्रमच्या महाघोटाळ्यामुळे सरकारचा किती महसूल बुडाला हे कॅगने आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे. या घोटाळ्यामुळे झालेले नुकसान हे काही राज्यांच्या अंदाजपत्रकाएवढे आहे. त्यामुळे सरकारने याबाबतीत आपला आडमुठेपणा सोडला नाही तर संपुआ सरकारला त्याची जबर किंमत मोजावी लागेल, असा इशारा गडकरी यांनी यावेळी दिला.
भ्रष्टाचाराचा मुकाबला करण्यासाठी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी जाहीर केलेल्या पंचसूत्रीवरही गडकरी यांनी यावेळी प्रखर टीका केली. स्व:तच नियुक्त केलेल्या राजकीय नेत्यांना असे आवाहन केल्याने त्याचा काहीही परिणाम होणार नाही. बोकाळलेला भ्रष्टाचार ही आज देशासमोरील सगळ्यात मोठी समस्या असून, संपुआचे दुसरे सरकार म्हणजे ‘भ्रष्टाचार्‍यांचे राज्य’ आहे, असा आरोपही गडकरी यांनी यावेळी केला.
२-जी स्पेक्ट्रम घोटाळा उघडकीस आल्यानंतर भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची ही पहिलीच बैठक असल्याने भ्रष्टाचार हाच मुद्दा या बैठकीच्या केंद्रस्थानी असल्याचे गडकरींच्या भाषणावरून पुरते स्पष्ट झाले आहे. कॅगने काढलेला नुकसानीचा आकडा चुकीचा असल्याच्या केंद्रीय दूरसंचारमंत्री कपिल सिब्बल यांच्या विधानानंतर जेपीसीची आपली मागणी भाजपा आणखी जोरकसपणे लावून धरण्याची शक्यता आहे.
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या जीवनापासून प्रेरणा घेऊन व राष्ट्रीय पुनर्निर्माण करण्यासाठी एकजूट होऊन आम्हाला कार्य करायचे आहे, असा कानमंत्र गडकरी यांनी यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला. आज देशातील जनता भाजपा आणि रालोआकडे मोठ्या अपेक्षेने बघत आहे. अशा परिस्थितीत जनतेच्या अपेक्षांचे ओझे वाहण्याची जबाबदारी आम्हाला पार पाडायची आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी तीस वर्षांपूर्वी मुंबईच्या समुद्रकिनार्‍यावर उभे राहून अंधाराला दूर सारून प्रकाश आणण्याचा आणि कमळ ङ्गुलविण्याचा निर्धार केला होता. ‘अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा’ या अटलजींच्या प्रेरणादायी शब्दांची आठवण करत मार्गक्रमण करायचे आहे, असेही गडकरी यावेळी म्हणाले.
आसाममध्ये होणार्‍या आगामी विधानसभा निवडणुकीत भरघोस मतदान करून असे सरकार स्थापन करा की जेणेकरून आम्हा सगळ्यांना शपथग्रहण समारंभासाठी पुन्हा गुवाहाटीला यावे लागेल, असे आवाहनही गडकरी यांनी यावेळी केले. दोन दिवस चालणार्‍या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैैठकीला भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली, भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री, वरिष्ठ नेते एम. व्यंकय्या नायडू, नजमा हेपतुल्ला, महिल्या मोर्चाच्या अध्यक्षा स्मृती इराणी, युवा नेते वरुण गांधी यांच्यासह सुमारे ३५० पदाधिकारी उपस्थित आहेत.

1 comment:

cityspidey said...

CitySpidey is India's first and definitive platform for hyper local community news, RWA Management Solutions and Account Billing Software for Housing Societies. We also offer residential soceity news of Noida, Dwarka, Indirapuram, Gurgaon and Faridabad.
You can place advertisement for your business on city spidey.

CitySpidey
Noida Local News
Noida News
Dwarka News
Dwarka Local News
Gurgaon News
Gurgaon Local News
Ghaziabad News
Ghaziabad Local News
Faridabad News
Faridabad Local News
Neighbourhood News
Local News
Noida Society News
Dwarka Society News
Gurgaon Society News
Ghaziabad Society News
Faridabad Society News
Indirapuram Society News
Indirapuram News
Indirapuram Local News
Delhi Local News