पणजी, दि. ९ (प्रतिनिधी)
केंद्र व राज्य सरकार कांद्याचे दर खाली येणार म्हणून कितीही आश्वासने देत असले तरी कांदे आपला दर कमी करून घ्यायला तयार नाहीत! हीच परिस्थिती सध्या बाजारातील कांद्यांचा दर पाहिल्यास जाणवते.
आज दि. ९ रोजी पणजी बाजारात कंादे ७० रु. प्रतिकिलो दराने विकले जात होते. इतर महाग भाज्यांच्या दरात कोणताही फरक नव्हता. त्यामुळे खायचे काय, असा प्रश्न लोकांना पडला आहे. तथापि, सरकारला त्याचे कसलेच सोयरसुतक नाही.
महामंडळाची भाजी, कांदे अपुरे
गोवा सरकारच्या फलोत्पादन महामंडळातर्फे राज्याच्या विविध भागांत गाड्यांवर बाजारदरापेक्षा कमी दरात भाजीविक्री केली जाते. मात्र या गाड्यावर महामंडळाकडून मर्यादित भाजीपुरवठा करण्यात येत असल्याने दुपारनंतर लोकांना भाजी मिळत नाही. त्यातच कांदे एक किंवा दोन किलोच दिले जातात. जास्त मिळत नाहीत. त्यामुळे लोकांना बाजारातील महाग भाजी खरेदी करण्यावाचून पर्याय उरलेला नाही. साहजिकच भाजी व कांद्याच्या या वाढलेल्या दरामुळे सामान्य माणूस संतापला आहे. बाजारातील भाज्यांचे दर कमी कधी होणार, असा प्रश्न लोक भाजीविक्रेत्यांना विचारताना दिसत आहेत.
Monday 10 January, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment