Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 10 January, 2011

बोफोर्समुळे देशाची नाचक्की - अडवाणी

गुवाहाटी, दि. ९
बोङ्गोर्स व्यवहारामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या प्रतिमेला तडे जात असल्याने सर्वसामान्य माणसाला या व्यवहारातील सत्य समजलेच पाहिजे, असे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आज येथे सांगितले. बोङ्गोर्स तोङ्ग खरेदीत झालेल्या घोटाळ्यावर पांघरूण घालण्याचाच सरकारने प्रयत्न केला, हे आयकर लवादाने दिलेल्या निर्णयानंतर पुरेसे स्पष्ट झाले आहे, असेही अडवाणी यावेळी म्हणाले.
विदेशी बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात पडून असलेले काळे धन देशात परत आणण्यात संपुआ सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे, अशी घणाघाती टीका लालकृष्ण अडवाणी यांनी आज केली. काळा पैशांमध्ये सरकारच्या काही मंत्र्यांचा तर सहभाग नाही ना, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.
‘विदेशी बँकांमध्ये पडून असलेला काळा पैसा देशात परत का आणला जात नाही? विदेशी बँकांमध्ये काळे धन जमा करण्यात सरकारमधील काही लोक आणि त्यांचे काही मित्र सहभागी असल्यामुळे तर असे होत नाही ना?’ असा सवाल लालकृष्ण अडवाणी यांनी आज भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीची सांगता झाल्यानंतर आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना केला.
‘‘भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ३०० लाख कोटींपेक्षा जास्त काळा पैसा विदेशी बँकांमध्ये जमा करण्यात आला आहे. मी आणि अन्य भाजपा नेत्यांनी आमच्या स्वाक्षर्‍या असलेले पत्र पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना पाठवून, हा काळा पैसा देशात परत आणून त्याचा उपयोग देशाच्या विकासासाठी करण्याची विनंती केली होती,’’असेही अडवाणी यांनी यावेळी सांगितले.
‘‘देशातील नागरिकांना वीज, पिण्याचे स्वच्छ पाणी, रुग्णालये, शाळा व महाविद्यालये इत्यादी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारकडे मर्यादित स्त्रोत आहेत आणि म्हणूनच या क्षेत्राचा विकास करण्यासाठी काळा पैसा परत आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होण्याची गरज आहे. इच्छाशक्ती असल्यास मर्यादित स्त्रोतांमध्येही विकासाच्या अनेक गोष्टी करता येतात, हे भाजपाशासित मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिले आहे,’’असेही अडवाणी यावेळी म्हणाले.
देशभरात बोकाळलेला भ्रष्टाचार आणि गगनाला गवसणी घालत असलेली महागाई या मुद्यांवरही अडवाणी यांनी यावेळी संपुआ सरकारवर जोरदार टीका केली.
सोनियांचे क्वात्रोशीचे निकटचे संबंध
बोङ्गोर्स तोङ्ग खरेदी व्यवहारातील व्यापारी ओट्टाव्हिओ क्वात्रोची आणि कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे निकटचे संबंध होते आणि क्वात्रोची नियमितपणे सोनियांच्या निवासस्थानी भेट देत असे, असा आरोपही अडवाणी यांनी यावेळी केला. हे सांगत असताना मी कुणावरही आरोप करत नाही, असे ते म्हणाले.

No comments: