Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 29 September, 2008

गोध्रा अग्निकांड हे कारस्थानच

गुजरात प्रदेश कॉंग्रेसाध्यक्षाचे प्रतिज्ञापत्र
रवींद्र दाणी
नवी दिल्ली , दि.२८ - गोध्रा अग्निकांड केवळ अपघात आहे असे कॉंगेे्रस पक्षाला वाटत असले, तरी गुजरात प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अमरसिंग चौधरी यांना तसे वाटत नाही. नानावटी चौकशी आयोगासमोर दाखल केलेल्या एका प्रतिज्ञापत्रात अमरसिंग चौधरी यांनी गोध्रा अग्निकांड कारस्थानाशिवाय होऊच शकत नाही, असे प्रतिपादन केले आहे.
गांधीनगरमधील एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, अमरसिंग चौधरी यांनी एक प्रतिज्ञापत्र दाखल करुन गोध्रा अग्निकांड एका मोठ्या कारस्थानातून घडले असे प्रतिपादन केले आहे. विशेष म्हणजे कॉंगे्रस व मित्र पक्षांनी गोध्रा अग्निकांड अपघातातून घडले अशी भूमिका घेतली असून, असाच निष्कर्ष लालू प्रसाद यादव यांनी नेमलेल्या यु. सी. बॅनर्जी चौकशी समितीने काढला होता. या निष्कर्षाला छेद देणारी भूमिका अमरसिंग चौधरी यांनी घेतली आहे.
आयोगासमोर का नाही
आज ज्या व्यक्ती व संघटना नानावटी आयोगाच्या अहवालावर टीकास्त्र सोडत आहेत त्यांनी कोणीही या आयोगासमोर आपली भूमिका मांडण्याचे कष्ट घेतलेले नाहीत असेही या सूत्राने सांगितले. राज्याचा मुख्यमंत्री, मंत्री, पोलिस यांच्याविरुध्द एकही प्रतिज्ञापत्र आयोगाला सादर करण्यात आलेले नाही अशी माहितीही या सूत्राने दिली. एका अतिमहत्वाच्या पदावर कार्यरत असलेले हे सूत्र म्हणाले, आज ज्या लोकांना नानावटी आयोगाच्या अहवालावर आक्षेप आहे, त्यांनी सहा वर्षे काय केले? आयोगाच्या कार्यालयात जाऊन आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न या लोकांनी का केला नाही, मुख्यमंत्र्यांविरुध्द, पोलिसांविरुध्द पुरावा का सादर केला नाही, आपल्या साक्षी का नोंदविल्या नाहीत, आयोगासमोर त्यांनी त्यांचे सत्य का सांगितले नाही, आता दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या स्टुडिओत जाऊन ते आयोगाच्या अहवालावर तोफा डागत आहेत. याला काय आणि कोणता अर्थ आहे?

No comments: