नवी दिल्ली, दि. १४ : दहशतवाद ही एक जागतिक समस्या म्हणून समोर येत आहे, गेल्या अनेक दशकांपासून भारतही दहशतवादी कारवायांचे लक्ष्य ठरला आहे. त्याचबरोबर जगातील अनेक देशांनाही गेल्या काही काळात त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. दहशतवादाला तोंड देण्यासाठी सर्वांनी एकत्रित व्हायला हवे, असे आवाहन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाला उद्देशून केलेल्या भाषणात केले.
आपल्या भाषणात ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविलेल्या अभिनव बिंद्राचे श्रीमती पाटील यांनी अभिनंदन केले. देशातील समस्या आणि त्या सोडविण्यासाठी चालू असलेल्या प्रयत्नांचा उल्लेख करताना त्यांनी विकासकामांचा आढावा घेतला.
Thursday 14 August, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment