Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 8 May, 2008

अग्नि-3 क्षेपणास्त्राची
तिसरी चाचणी यशस्वी

नवी दिल्ली, दि.7 - अग्नि -3 या क्षेपणास्त्राची तिसरी चाचणीही यशस्वी ठरली आहे. आज ओरिसाजवळच्या व्हीलर बेटावरुन सकाळी 9 वाजून 56 मिनिटांनी अग्नि-3 चे यशस्वी उड्डाण झाले. त्यामुळे भारत "आयआरबीएम' क्षमता असणाऱ्या देशांच्या पंगतीत जाऊन बसला आहे. टप्पा आणि अचूकतेच्या बाबतीत हे उड्डाण काटेकोर आणि परिपूर्ण होते. अग्नि 3 ने आपले पूर्व निर्धारित लक्ष्य 350 किलोमीटर उंचीवरुन प्रति सेकंद 4000 मीटरच्या गतीने 800 सेकंदात गाठले. लक्ष्याजवळच्या भारतीय नौदलाच्या दोन नौकांनी क्षेपणास्त्राच्या अचूकतेवर शिक्कामोर्तब केले.
मोहिमेच्या संचालकांनी ही चाचणी यशस्वी झाल्याचे जाहीर करताच उड्डाण तळावर एकच जल्लोष झाला. या ऐतिहासिक प्रसंगी मोहिमेत सहभागी झालेल्या वैज्ञानिकांनी परस्परांना अलिंगन देऊन अभिनंदन केले. अग्नि-3 हे क्षेपणास्त्र 17 मीटर लांबीचे असून त्याचा व्यास 2 मीटर आणि वजन 50 टन आहे. अग्नि-3 रेल मोबाईल यंत्रणेवर आधारित असून भारतातील कोणत्याही ठिकाणाहून त्याचे प्रक्षेपण शक्य आहे. ही मोहीम अग्निचे कार्यक्रम अधिकारी अविनाश चंदर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

1 comment:

Anonymous said...

i think we are spending lot of rupees on such defence deals. instead of all this, if we go for the progress plans for our rural area, we can atleast manage to save those people who are waiting for basic amenities even after 50 years of independence.

mahesh