जयपूर, दि. २४: राजस्थानात कोणत्याही पक्षाशी युती न करता भारतीय जनता पार्टी स्वबळावर निवडणुका लढविणार असल्याचे आज पक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले.
भाजपाचे उपाध्यक्ष एम.व्यंकय्या नायडू यांनी नुकतीच राजस्थानला भेट दिली. येथे या वर्षाअखेर विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर नायडू यांच्याकडे पक्षाने राजस्थानची जबाबदारी सोपविली आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या धोरणांची आखणी करण्यासाठी नुकतीच राज्याला भेट दिली. या राज्यात भाजपा बहुजन समाज पार्टीसोबत युती करणार असल्याची अफवा होती. मात्र, कोणाशीही युती न करता पक्ष येथे एकाकी लढा देणार असल्याचे नायडू यांनी आज स्पष्ट केले.
Friday 25 April, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment