Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 5 July, 2010

कितीही आंदोलने केली, तरी इंधन दरवाढ कायम

प्रणव मुखर्जींची दर्पोक्ती
कोलकाता, दि. ४ - महागाई आणि इंधन दरवाढीच्या विरोधात रालोआसह सर्व विरोधी पक्षांनी उद्या "बंद' चे आवाहन केले असतानाच केंद्र सरकारने मात्र आपला हेका कायम ठेवीत ही दरवाढ मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज पत्रकारांशी बोलताना सरकारची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, कोणी कितीही आंदोलन केले, तरी ही दरवाढ मागे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सरकारने सर्व विचार करून सामान्य जनतेवर कमीत-कमी भार पडावा आणि कंपन्यांनाही तोटा होऊ नये, इतकी दरवाढ केली. आता ती मागे घेणे शक्य नाही. कारण यामुळे कंपन्यांना झेलावा लागणारा तोटा वाढेल आणि त्यामुळे आणखी वेगळेच संकट उभे ठाकेल.
यावर मतभेदाला वाव राहू नये यासाठी मंत्रिगटाची स्थापना करण्यात आली होती. त्यांनीच सर्व बाबींचा विचार करून हा निर्णय घेतला असल्याचे मुखर्जी यांनी सांगितले.

No comments: