श्रीनगर, दि.१४ : पाकिस्तानने सलग दुसऱ्यांना युद्धबंदी कराराचे उल्लंघन करीत आज सीमेवर गोळीबार केला.
आज पहाटेच्या सुमारास आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी लष्कराने गोळीबाराला सुरुवात केली. प्रत्युत्तरादाखल भारतीय लष्करानेही गोळीबार केला. यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, पाकने विनाकारणच आज सीमेवर गोळीबार केला. हे तर थेट युद्धबंदी कराराचे उल्लंघनच आहे. या प्रकरणी लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज तातडीची बैठक बोलाविली आणि त्यात यावर चर्चा झाली. घुसखोरीविषयी पाकशी लवकरच चर्चा केली जाईल, असे वक्तव्य आज विदेश सचिवांनी दिल्याचे समजते.
एका आठवड्यात सलग दुसऱ्यांदा पाकिस्तानी लष्कराने युद्धबंदी कायद्याचे उल्लंघन केले आहे. यापूर्वी सांबा क्षेत्रातही पाकिस्तानी रेंजर्सनी विनाकारणच गोळीबार केला होता. त्याचवेळी अतिरेक्यांच्या एका मोठ्या जत्थ्याने भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतीय लष्कराने हा प्रयत्न हाणून पाडला होता.
Wednesday 14 May, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment