Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 8 August, 2009

रेती बंदीच्या निषेधार्थ पैंगीणला "रास्ता रोको'

तिघांना अटक
मडगाव-कारवार वाहतूक रोखली

काणकोण, दि.७ (प्रतिनिधी) - कारवारची रेती गोव्यात न्यायला घालण्यात आलेल्या बंदीच्या निषेधार्थ दक्षिण गोवा वाहतूक संघटनेने पोळेमार्गे आज गोव्यात कारवारची वाहने यायला बंदी घालून वाहने अडवायला सुरुवात केल्यानंतर रेती वाहतूक संघटनेचे मोहनदास लोलयेकर, मोती देसाई व रमेश कामत या तीन पदाधिकाऱ्यांना काणकोण पोलिसांना अटक केली .मात्र अटक केलेल्या तिन्ही पदाधिकाऱ्यांची बिनशर्त सुटका करण्यात यावी, अशी मागणी करुन आंदोलकांनी पैंगीणच्या गालजीबाग पुलाजवळ "रास्ता रोको' करुन मडगाव-कारवार मार्गावरील जवळजवळ दीड तास रोखून धरली, त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांची खूपच गैरसोय झाली. त्यावेळी काणकोणचे उपजिल्हाधिकारी प्रशांत शिरोडकर यांनी बोलणी करुन वाहतूक सुरळीत केली.
कारवारची रेती गोव्यात यायला बंद झाल्यामुळे केवळ कारवारची वाहने अडविण्याचा निर्णय घेण्यात आला होता, परंतु काणकोणचे पोलिस निरीक्षक सुरज हळर्णकर यांनी आंदोलन चिघळवतानाच दंडेलीचा वापर करून पदाधिकाऱ्यांना अटक केली.कारवारच्या लोकांचे हितसंबंध जपतानाच गोवा सरकारच्या धोरणापेक्षा स्वतःची बुध्दी वापरणाऱ्या सूरज हळर्णकर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी बिनशर्त सुटका केल्यानंतर पैंगीणला घेण्यात आलेल्या बैठकीच्या वेळी मोहनदास लोलयेकर यांनी केली.सकाळी सहा वाजल्यापासून पोळे ते पैंगीणपर्यत रेती वाहतूक संघटनेचे पदाधिकारी तसेच अन्य वाहतूकदारांनी गर्दी केली होती. यावेळी रास्ता रोको होऊ नये त्याचप्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी काणकोणचे उपजिल्हाधिकारी प्रशांत शिरोडकर, मामलेदार विनायक वळवईकर ,पोलिस निरीक्षक सूरज हळर्णकर, नीलेश राणे, त्याचप्रमाणे १०० पेक्षा अधिक शस्त्रधारी पोलिस या ठिकाणी तैनात करण्यात आले होते.
आंदोलकांची बिनशर्त सुटका
पैंगीणला रास्ता रोको केल्यानंतर जिल्हा पंचायत सदस्य दया पागी, युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष जनार्दन भंडारी, पंच संजू नाईक, अजय लोलयेकर, संजीव लोलयेकर, फ्रॅंकी पेरेरा, भूषण प्रभूगावकर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले व वाहने अडविली व अटक केलेल्यांची बिनशर्त सुटका करण्याची मागणी केली.पैगीणला उपजिल्हाधिकारी प्रशांत शिरोडकर यांनी दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी गोकुळदास नाईक यांच्याशी चर्चा करून मंगळवार दि .११ रोजी मुख्यमंत्र्याची भेट घेऊन यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. रेतीवाहतूक हा आमआदमीचा प्रश्न असून पोलिस गोव्यात नोकरी करून कारवारचे हित पाहतात, असा आरोप मोहनदास लोलयेकर यांनी केला.

1 comment:

Unknown said...

nice information

Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

Online Survey Website
Free Survey Website
Survey Websites in Canada
Survey Websites in India
Earn Money from Home
Free Online Surveys