Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 30 July, 2009

गोव्यात अजूनही १७९४३ घरे अंधारात


आमदार दामोदर नाईक यांची माहिती

पणजी, दि. २९ (प्रतिनिधी)- डिजिटल मीटर खरेदी प्रकरणात गौडबंगाल असून त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी करताना फातोर्ड्याचे आमदार दामोदर नाईक यांनी राज्यात अजूनही १७९४३ घरे अजूनही काळोखात असल्याची माहिती दिली. या घरांना अजूनही वीज जोडणी मिळालेली नसल्याचे त्यांनी सांगितले.
आज विधानसभेत वीज खात्याच्या पुरवणी मागणीवरील चर्चेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. सरकारने १,२१,३२५ जणांना डिजिटल मीटर दिले आहेत व याप्रकरणी एकूण ४,१२८ तक्रारी दाखल झाल्या आहेत. सामान्य वीज ग्राहकांना दिलासा देण्याच्या निमित्ताने काढलेली एकरकमी योजना ही निव्वळ तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार असल्याची टीकाही श्री. नाईक यांनी केली. सामान्य लोकांवर कारवाईचे आदेश व वीजभक्षकांच्या वसुलीसाठी मात्र काहीही नाही, हा काय प्रकार आहे, असा सवालही यावेळी श्री. नाईक यांनी केला.
वीज खंडीत होण्याच्या प्रकारांत दिवसेंदिवस वाढ होत आहे, हे कशाचे संकेत आहेत? सोनसड्यावरील कचऱ्यामुळे भूजलप्रदूषणाची समस्या निर्माण झाली असून प्रदूषण नियंत्रण मंडळाने अद्याप त्याचा तपास केला नाही. कचऱ्याचा विषय गंभीर बनत चालला असून पर्यावरण खात्याने तात्काळ दखल घेण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. किनारी भागातील घरांवरील किनारी नियमन विभाग कायद्याची टांगती तलवार हटवण्यासाठी एकत्रित प्रयत्न व्हायला हवेत, असे आमदार दयानंद मांद्रेकर म्हणाले. शिवोली मतदारसंघात विजेच्या लपंडावामुळे जनता हैराण झाली आहे. या मतदारसंघातील किनारी भागांत भूमिगत वाहिन्या टाकण्याचे काम कुठे पोहोचले, असा सवालही त्यांनी केला. रिलायन्स एनर्जी कंपनी आपला विस्तार करीत असून त्यांची महाग वीज यापुढे सरकारने विकत घेण्याची हमी देऊ नये, असे नार्वेकर म्हणाले. सुरळीत वीज पुरवण्यासाठी ५० टक्के वीज उपकरणे त्वरित बदलण्याची गरज आहे, असेही नार्वेकर म्हणाले. शिरोडा मतदारसंघात माणके, शिरशिरी, निरंकाल व बोरी भागांत लोकांना विजेच्या समस्येने ग्रासले आहे, असे आमदार महादेव नाईक म्हणाले. सरकारला हिंमत असेल तर त्यांनी उद्योगांसाठी असलेले विजेसाठीचे अनुदान रद्द करून दाखवावे, असे आव्हान उपसभापती मावीन गुदिन्हो यांनी केले. डिचोली येथील औद्योगिक वसाहतीत येथील उद्योगांना सक्तीने वीज कपात करण्याचे आदेश दिल्याचे आमदार राजेश पाटणेकर यांनी सांगितले. गणेश चतुर्थीचा सण जवळ येत असल्याने मंत्र्यांनी १५ दिवस अगोदरच विजेचे सामान द्यावे जेणेकरून ते वेळेत बसवणे शक्य होईल, अशी मागणी आमदार विजय पै खोत यांनी केली. याप्रसंगी व्हिक्टोरिया फर्नांडिस, दिलीप परूळेकर, वासुदेव मेंग गावकर, मिलिंद नाईक आदींनी चर्चेत भाग घेतला.

1 comment:

Unknown said...

nice information

Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

Online Survey Website
Free Survey Website
Survey Websites in Canada
Survey Websites in India
Earn Money from Home
Free Online Surveys