Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 29 July, 2009

वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी १५ हजार पोलिसांची गरज - रवी

पणजी, दि. २८ (प्रतिनिधी) - राज्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी राज्य पोलिस दलाची क्षमता ४५०० हजारांवरून किमान पंधरा हजार करावी लागेल, असे प्रतिपादन गृहमंत्री रवी नाईक यांनी आज विधानसभेत केले. स्थलांतरीतांच्या वाढत्या लोंढ्यांबरोबर येथे गुन्हेगारीही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस दलाची विद्यमान ताकद कमी पडत असल्याचे ते यावेळी म्हणाले. फातोर्ड्याचे आमदार दामू नाईक यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला विचारलेल्या एका तारांकित प्रश्नाला रवी नाईक उत्तर देत होते. तत्पूर्वी कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांच्या एका लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना बिगर गोमंतकीयांचे वाढते लोंढे येथे गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होण्यास जबाबदार ठरल्याचे श्री. नाईक यांनी मान्य केले.
राज्यात गेल्या तीन वर्षांत सर्वच प्रकारच्या गुन्ह्यांचे प्रमाण जवळपास ५० टक्क्यांनी वाढले असल्याचे लेखी उत्तरात स्पष्ट झाल्याचे दामू यांनी सांगितले. २००६ साली गोव्यात ४९५ चोऱ्या, १७ घरफोड्या, ६ दरोडे, २१ बलात्कार, ३८ खून, १४ खूनाचे प्रयत्न व १६ अपहरणाचे प्रकार घडले होते. २००७ साली पुन्हा ४९५ चोऱ्या, २२ घरफोड्या, ७ दरोडे, २० बलात्कार, ३३ खून, २३ खूनाचे प्रयत्न व १२ अपहरणे झाली. २००८ साली यात वाढ होऊन ६०१ चोऱ्या, २३ घरफोड्या, ३ दरोडे, ३० बलात्कार, ४९ खून, २४ खूनाचे प्रयत्न व ३६ अपहरणे झाली, अशी माहिती आज सभागृहात उपलब्ध करण्यात आली.
दामू यांनी या माहितीचाच आधार घेत गृहमंत्री रवी नाईक यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. परंतु दरम्यानच्या काळात प्रश्नोत्तराचा तास संपल्याने "क्वेशन अवर इज ओव्हर' असे घड्याळाकडे पाहत म्हणत रवी नाईक यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
प्रश्नोत्तराच्या तासानंतरच्या कामकाजात आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी एका लक्षवेधी सूचनेद्वारे राज्यातील वाढत्या गुन्हेगारीकडे सभागृहाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. विशेषतः चार दिवसांपूर्वी चिखली वास्को येथील तरुणाचे झालेले अपहरण आणि तत्पूर्वी म्हापशातील व्हॅन चालकाचा झालेल्या खुनाच्या घटनेचा त्यांनी उल्लेख केला. त्यावर गोव्यात स्थलांतरीतांचे वाढते लोंढे ही राज्याची समस्या असून त्यातून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोकही येथे येऊ लागल्याचे त्यांनी सांगितले.
अनेक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये बिगर गोमंतकीयांचा मोठ्या प्रमाणात समावेश असून अशा लोकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस दलाचा आकार वाढवावाच लागेल असे श्री.नाईक म्हणाले. बीट पोलिसिंग वाढविणे, भाडेकरूंची सविस्तर यादी तयार करणे यासारख्या उपायांद्वारे गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

1 comment:

Unknown said...

nice information

Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making

Money Online Now!

Online Survey Website
Free Survey Website
Survey Websites in Canada
Survey Websites in India
Earn Money from Home
Free Online Surveys