विशाखापट्टणम, दि. २६ - भारताच्या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या आण्विक पाणबुडीचे उद्घाटन रविवारी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि त्यांच्या पत्नी गुरुशरण कौर यांच्या हस्ते विशाखापट्टणम बंदरात झाले. "ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी व्हेसल' या सांकेतिक नावाने ओळखल्या जाणाऱ्या या पाणबुडीचे आएनएस अरिहांत असे नामकरण आले आहे.
उद्घाटनानंतर ही ११२ मीटर लांबीची, सात हजार टन क्षमतेची पाणबुडी बंगालच्या उपसागराकडे रवाना झाली आहे. उपसागरात आएनएस अरिहांतच्या विविध चाचण्या होणार आहेत. दोन वर्षात ही पाणबुडी सगळ्या चाचण्या पूर्ण करुन नौदलात संरक्षणाचे काम करण्यासाठी दाखल होईल.
रविवारी नारळ वाढवून गुरुशरण कौर यांनी औपचारिक उद्घाटन केले आणि पाणबुडीला आएनएस अरिहांत असे नाव देण्यात आले. यानंतर केलेल्या छोटेखानी भाषणात स्वरक्षणासाठी भारत सक्षम होत असून त्यासाठी टाकलेले हे एक दमदार पाऊल असल्याचे पंतप्रधान मनमोहन सिंह म्हणाले. कोणाला धमकावणे हा ही पाणबुडी तयार करण्याचा उद्देश नसल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, आण्विक पाणबुडीच्या उद्घाटनानंतर भारत आण्विक पाणबुडी तयार करणाऱ्या अमेरिका , रशिया , फ्रान्स आणि चीन या देशांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे .
Monday 27 July, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment