संशयास्पद वाहन, व्यक्तींची राज्यात कसून तपासणी
पणजी, दि. ५ (प्रतिनिधी): आसाम राज्यातील गुप्तहेर यंत्रणेने १४५ प्रशिक्षित दहशतवादी २६/११ सारखाच हल्ला करण्यासाठी भारतात घुसले असल्याची माहिती पुरवल्याने आज संपूर्ण गोव्यात तटरक्षक दलाने आणि पोलिसांनी एकत्रित नाकाबंदी करून संशयास्पद व्यक्तींची आणि वाहनांची कसून तपासणी केली.
१४५ पैकी १२ दहशतवादी हे महाराष्ट्रात घुसण्याच्या तयारीत असून ते समुद्रमार्गाने येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आज "किनारा कवच' नावाने ही शोध मोहीम हाती घेण्यात आली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र कोणत्याही प्रकारे नागरिकांत भीती पसरू नये यामुळे "मॉक ड्रिल' नावाने ही शोध मोहिम राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. परवा संपूर्ण दक्षिण गोव्यात अशीच शोध मोहीम हाती घेतली होती.
आज आपली किनारपट्टी किती सुरक्षित आहे याची चाचपणी करण्याच्या हेतूने सकाळपासूनच तटरक्षक दल आणि गोवा पोलिसांनी नाकाबंदी करून तपासणी सुरू केली होती. अमेरिकेतील गुप्तचर यंत्रणेने भारतावर मोठा हल्ला होणार असल्याची शक्यता व्यक्त केली असल्याने याला गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे सर्व यंत्रणा आपल्या क्षमता पडताळून पाहत आहेत.
Thursday 6 May, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment