Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 12 January, 2010

पाक सीमेवर सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली, दि.११ : पाकिस्तानातून घुसखोरीचे वाढते प्रमाण आणि आगामी गणराज्य दिन या दोन्हींच्या पार्श्वभूमीवर भारताने सीमा सुरक्षा दलाला पश्चिम क्षेत्रात सतर्कतेचे आदेश दिले आहेत.
नुकत्याच शनिवारी आणि रविवारी अटारी सीमेजवळ गोळीबाराच्या तसेच रॉकेट हल्ल्याच्या घटना घडल्या. तसेच घूसखोरीचा प्रयत्नही सातत्याने सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानलगतच्या सीमेेवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. सीमा सुरक्षा दल सतर्क असून प्रत्येक हालचालीकडे लक्ष दिले जात आहे.
अर्थात, गृह मंत्रालयाने सीमेवरील कारवायांमध्ये राज्यातील उपद्रवी तत्वांचा हात असावा, अशी शक्यता व्यक्त केली आहे. कारण, पाकिस्तानी रेंजर्सनी या प्रकारांमध्ये आपला हात नसल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध उपद्रवी संघटनांच्या हालचालींकडेही लक्ष दिले जाणार असल्याचे गृह मंत्रालयाच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

No comments: