Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 8 October, 2008

बुद्धदेव हरले; मोदी जिंकले टाटांची 'नॅनो' गुजरातेत दाखल

अहमदाबाद, दि. ७ : टाटांच्या एक लाख रुपये किमतीच्या नॅनो कारच्या शर्यतीत प. बंगालचे मुख्यमंत्री बुद्धदेव हरले असून, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी मात्र ही शर्यत जिंकली आहे. नॅनो कारचा प्रकल्प गुजरातमधील साणंद येथे प्रारंभ करावयाचा निर्णय रतन टाटा यांनी घेतला व तशा आशयाच्या करारावर आज अहमदाबाद येथे मुख्यमंत्री मोदी व टाटा कंपनीचे अध्यक्ष रतन टाटा यांनी एका करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यासंदर्भातील घोषणा आज संध्याकाळी येथे एका संयुक्त पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री नरेंद्र मोदी व रतन टाटा यांनी केली.
प. बंगालमधील सिंगूर येथे टाटांच्या नॅनो प्रकल्पाला जोरदार विरोध होत होता. हा विरोध कमी व्हावा यासाठी टाटांनी तसेच मुख्यमंत्री बुद्धदेव यांनी बरेच प्रयत्न केले. परंतु, त्याला यश न आल्याने अखेर मागील आठवड्यात रतन टाटा यांनी नॅनो प्रकल्प सिंगूर येथून हटविण्याची घोषणा केली आणि मुख्यमंत्री बुद्धदेव एक लढाई हरले.
टाटांनी सिंगूरमधून माघार घेत असल्याची घोषणा करताच महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र व उत्तरांचल या राज्यांनी टाटांनी आपला नॅनो कारचा प्रकल्प आपल्या राज्यात सुरू करावा यासाठी त्यांना आमंत्रण दिले. टाटा कंपनीने यासाठी कर्नाटक व आंध्र प्रदेशची पाहणीही केली. परंतु अखेर गुजरात सरकारने दिलेला प्रस्ताव त्यांना मान्य झाला व अहमदाबादपासून २५ किमी अंतरावरील साणंद येथे नॅनो कारचा प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय टाटा कंपनीने घेतला.
विशेष म्हणजे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा आज सातवा वर्धापन दिन आहे. गुजरात सरकार अहमदाबादपासून २५ किमी अंतरावरील आणंद कृषी विद्यालयाच्या साणंद येथील २२०० एकर जमिनीपैकी ११०० एकर जमीन टाटा कंपनीला या प्रकल्पासाठी देणार असून इतरही आवश्यक त्या सोईसुविधा उपलब्ध करून देणार आहे. आपण गुजरातची निवड का केली असे संयुक्त पत्रकार परिषदेत टाटांना विचारले असता ते म्हणाले की, आमच्या या प्रकल्पासाठी आम्ही ज्या राज्यांशी बोलणी केली व आमच्या मागण्या समोर मांडल्या, त्यात गुजरात सरकारने सर्वप्रथम होकार दिला. आमच्याजवळ वेळही फार कमी होता. गुजरातने आम्हाला सर्वात आधी रुकारच दिला नाही, तर योेग्य स्थळ व जमीन उपलब्ध करून दिल्यानेच आम्ही गुजरातची निवड केली. मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारला आज सात वर्ष पूर्ण होत आहेत व अशाप्रसंगी हा करार होत आहे यामुळे मला आनंद होत आहे. गुजराती लोकांची व्यावसायिक प्रतिभा व येथील कामगारांचे अथक परिश्रम याचा लाभ आम्हाला होईल. या प्रकल्पांतर्गत १० हजार लोकांना रोजगार प्राप्त होईल.
नॅनो कार आता मार्चच्या अखेरपर्यंत रस्त्यावर धावू लागेल. पहिली खेप ही पुणे येथील प्रकल्पातून बाहेर पडणार असली तरी नंतर येथील प्रकल्प पूर्ण झाला की येथून प्रारंभी २.५ लाख कारची निर्मिती व होईल नंतर त्यात वाढ होत जाईल, असे टाटा यांनी सांगितले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की, टाटा कंपनीचे प्रमुख रतन टाटा यांच्या निर्णयामुळे गुजरात राज्याच्या विकासाला गती मिळेल. नॅनो कारचा प्रकल्प गुजरातमध्ये स्थापन करण्याच्या त्यांच्या निर्णयामुळे आपल्याला आनंद झाला आहे. मोदी पुढे म्हणाले की, सिंगूर येथील वाद सुरू असताना मला असे कळले की टाटांचा प्रकल्प विदेशातही जाऊ शकतो. हा प्रकल्प देशातील कोणत्याही राज्यात गेला असता तर मला वाईट वाटले नसते. परंतु तो विदेशात जाणार म्हणून आपण व्यथित झालो. त्याच वेळी आपण असा निर्णय घेतला की इतर कोणत्या देशात हा प्रकल्प आपण जाऊ द्यावयाचा नाही; जाऊ देणार नाही. माझे व माझ्या राज्यातील जनतेचे हे सौभाग्य आहे की हा प्रकल्प आता गुजरातमध्येे होणार आहे.

1 comment:

Unknown said...

nice information

Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making

Money Online Now!

Online Survey Website
Free Survey Website
Survey Websites in Canada
Survey Websites in India
Earn Money from Home
Free Online Surveys