पुणे दि. २९ (प्रतिनिधी) - देशाच्या स्वातंत्र्यलढ्याबरोबरच गोवामुक्तीतही सक्रिय सहभाग घेतलेले, राजकारणाच्या रणधुमाळीतही ऋजुता आणि साधनसुचिता यांना आयुष्यभर विलक्षण महत्त्व देणारे प्रा. गणेश प्रभाकर उपाख्य ग. प्र. प्रधान यांचे आज पहाटे पाच वाजता हडपसर येथे साने गुरुजी रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८८ वर्षाचे होते.
बारा वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नी डॉ. मालविका प्रधान यांचे निधन झाल्यावर त्यांनी पुण्याच्या सदाशिव पेठेतील आपले घर साधना ट्रस्टला दिले व आपला मुक्काम संस्थेच्या हडपसर येथील सानेगुरुजी केंद्रात हलवला होता. तेव्हापासून ते तेथेच राहात होते. पुण्यातही क्वचित येत. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांनी अन्नत्याग करायाचा निर्णय घेतला होता; पण मित्रांच्या विनंतीवरून तो मागे घेतला. गेलेे महिनाभर त्यांना अशक्तपणा जाणवत होता. गेले तीन दिवस सतत त्यांना श्वास घेण्यात अडथळे येत होते. आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांचा पार्थिव देह अंत्यदर्शनासाठी हडपसर येथील सानेगुरुजी रुग्णालयात सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत ठेवण्यात आला होता. त्यांनी मरणोत्तर देहदान केले असल्याने पाच वाजता तो पार्थिव देह हडपसार आयुर्वेद महाविद्यालयाकडे सुपूर्त करण्यात आला. सायंकाळी त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी समाजातील सर्व स्तरांतील लोकांची रीघ लागली होती. दुपारी दोन वाजता महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी राज्यशासनाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
प्रतिभासंपन्न लेखक, साक्षेपी संपादक, मृदुमनाचे समाजसेवक, लढवय्ये राजकारणी व विद्यार्थीप्रीय प्राध्यापक असे त्यांचे वर्णन केले जायचे. ते वीस वर्षे म्हणजे १९४५ ते ६५ दरम्यान फर्गसन महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक होते पण आपला इंग्रजीचा क्लास संपला की, फर्गसन महाविद्यालयातून जाणाऱ्या पाण्याच्या पाटाभोवती तरुण पिढीला गोळा करून स्वातंत्र्यचळवळी अभ्यासवर्ग घेत. स्वातंत्र्यानंतर गोवामुक्ती व नंतर संयुक्त महाराष्ट्र आंदोलन या आंदोलनाचे धडे त्यांनी येथेच मुलांना दिले. १९६६ पासूनअठरा वर्षे ते तीन वेळा विधानपरिषदेवर पदवीधर प्रतिनिधी म्हणून निवडून आले. १९८५ मध्ये ते सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले; पण त्यांनंतर १९९८ ते "साधना' साप्ताहिकाचे मानद संपादक होते. त्याच काळात त्यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी आपले राहते घरही संस्थेला देऊन वानप्रस्थ जीवन स्वीकारले होते. लोकमान्य टिळक, जवाहरलाल नेहरु व गोपाळ गणेश आगरकर यांच्या जीवनावर त्यांनी चरित्रात्मक ग्रंथ निर्मिती केली आहे तर स्वातंत्र्यचळवळीवर त्यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे मराठीखेरीज हिंदी व कानडी भाषेतही भाषांतरे झाली आहेत. साठा उत्तराची कहाणी या त्यांच्या आत्मचरित्रात्मक ग्रंथाला भारतीय भाषा परिषदेचा पुरस्कार मिळाला होता.
Sunday, 30 May 2010
माधुरी गुप्ताच्या कोठडीत वाढ
नवी दिल्ली, दि. २९ - पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी पकडण्यात आलेल्या माधुरी गुप्ताच्या न्यायालयीन कोठडीत न्यायालयाने वाढ केली आहे. मुख्य शहर न्यायदंडाधिकारी कावेरी बावेजा यांनी माधुरीला १४ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे.
भारताच्या पाकमधील दुतावासात जनसंपर्क विभागात माधुरी कार्यरत होती. मात्र गेल्या काही महिन्यांपासून पैशांसाठी ती हेरगिरी करत होती. पाकिस्तानात आयएसआयच्या अधिकाऱ्यांना भारताची महत्त्वाची माहिती पुरवण्याचे काम ती करत होती. संशय आल्यामुळे माधुरीला एप्रिल महिन्यात भारतात बोलावण्यात आले आणि राहत्या घरातून अटक करण्यात आली होती.
भारताच्या पाकमधील दुतावासात जनसंपर्क विभागात माधुरी कार्यरत होती. मात्र गेल्या काही महिन्यांपासून पैशांसाठी ती हेरगिरी करत होती. पाकिस्तानात आयएसआयच्या अधिकाऱ्यांना भारताची महत्त्वाची माहिती पुरवण्याचे काम ती करत होती. संशय आल्यामुळे माधुरीला एप्रिल महिन्यात भारतात बोलावण्यात आले आणि राहत्या घरातून अटक करण्यात आली होती.
Saturday, 29 May 2010
नक्षल्यांनी 'ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस' उडवली
- ७५ ठार, २०० हून अधिक जखमी
- १३ डबे घसरले, मालगाडीचीही धडक
- पीसीपीएने जबाबदारी स्वीकारली
झारग्राम (प.बंगाल), दि. २८ : मुंबईच्या दिशेने निघालेल्या हावडा-कुर्ला ज्ञानेश्वरी एक्सप्रेसला माओवाद्यांनी काल मध्यरात्री झारग्रामजवळ रूळाखाली दडविलेल्या सुरूंगांचा स्फोट घडवून ७५ निष्पाप प्रवाशांचे प्राण घेतले. या स्फोटामुळे आठ डबे घसरून कलंडले. त्याचवेळी विरूद्ध दिशेने येणारी मालगाडी कलंडलेल्या डब्यांवर आदळल्याने पाच डबे अक्षरश: चक्काचूर झाले. त्यामुळे या अपघाताची भीषणता अधिकच वाढल्याने मृतकांचा आकडाही वाढला. या अपघातात २०० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. पीपल्स कमेटी अगेन्स्ट पोलिस ऍट्रॉसिटीज (पीसीपीए) या माओवादी समर्थित संघटनेने या घातपाताची जबाबदारी घेतली आहे. तशी पत्रकेही घटनास्थळी सापडली आहेत. पश्चिम बंगालच्या पश्चिम मिदनापूर जिल्ह्यात हा अपघात घडला. मध्यरात्रीनंतर दीड वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
ज्ञानेश्वरी एक्सप्रेस खेमासोली आणि सारदिया स्थानकादरम्यान धावत असताना नक्षल्यांनी हा स्फोट घडवून आणला. जखमींना विविध ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. सध्या पश्चिम बंगालमध्ये माओवाद्यांचा निषेध सप्ताह सुरू आहे. त्याच कालावधीत हा घातपात घडविण्यात आला आहे.
मध्यरात्री ही घटना घडल्यामुळे एकच हाहाकार माजला. रात्रीची वेळ असल्यामुळे मदत कार्यातही अडथळे येत होते. काही प्रवासी तर चक्काचूर झालेल्या डब्यांच्या खाली असे काही अडकले होते की, त्यांना बाहेर काढणे शक्य नव्हते. सकाळ उजाडल्यावरच डबे कापून त्यांना बाहेर काढण्यात आले.
लष्कराची मदत
घटनेची तीव्रता लक्षात घेता तातडीने लष्कराला पाचारण करण्यात आले. तसेच वायुदलाचे हेलिकॉप्टर्सही मदतीसाठी पाठविण्यात आले. गंभीर जखमींना उपचारासाठी हलविण्याचे काम या हेलिकॉप्टर्सनी केले. अपघाताचे वृत्त समजताच रेल्वेने वायुदलप्रमुखांशी संपर्क साधला आणि मदतीची विनंती केली. त्यांनी मदतकार्यासाठी तत्काळ होकार दिला. याशिवाय विशेष वैद्यकीय पथकेही रवाना करण्यात आली.
पीसीपीएने घेतली जबाबादारी
हा घातपात घडवून आणणाऱ्या पीसीपीए या संघटनेने म्हटले आहे की, आम्ही यापूर्वीही जंगलमहल परिसरातून संयुक्त सुरक्षा पथक हटविण्याची मागणी केली होती. पण, आमच्या मागण्यांचा विचार झाला नाही. त्याचा निषेध म्हणून आम्ही हे पाऊल उचलल्याचे पत्रकात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. तथापि, या संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी यामागे आमचा हात नसल्याचे म्हटले आहे.
मागील वर्षी २७ ऑक्टोबर रोजी पीसीपीएने "बंद'दरम्यान राजधानी एक्सप्रेस अडविली होती.
योजनाबद्ध कारवाई
ज्ञानेश्वरी एक्सप्रेस ज्या मार्गावरून जाणार, त्याचवेळी विरूद्ध दिशेने मालगाडी येण्याची वेळ हेरून नक्षल्यांनी हा घातपात घडवून आणला. अधिकाधिक संख्येत प्रवासी मारले जावेत, या निर्दयी उद्देशाने त्यांनी हे निर्घृण कृत्य केले. त्यांनी आधी ज्ञानेश्वरी जेथून जाणार, त्या ठिकाणी रूळाखाली बॉम्ब पेरून ठेवले आणि गाडी येताच त्याचा स्फोट घडवून आणला. यामुळे सुमारे दोन फुटाचा रूळ तुटून पडला आणि डबा त्यावरून जाताच तो उसळून अन्य आठ डबे रूळावरून घसरले आणि कलंडले. त्याचवेळी आलेल्या मालगाडीचे डबे या कलंडलेल्या डब्यांवर जाऊन आदळले आणि त्यात ७५ प्रवाशांचे प्राण गेले. स्फोटाची तीव्रता एवढी होती की, रूळ तीन फूट उंच उडून वाकले.
ममता बॅनर्जींची घटनास्थळी भेट
घटनेची माहिती मिळताच रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन स्थितीची पाहणी केली. यावेळी बोलताना रेल्वेमंत्री म्हणाल्या की, हावडा-कुर्ला गाडीचा घातपात स्फोटाने घडवून आणण्यात आला. घातपाताच्या ठिकाणी टीएनटी स्फोटके आणि जिलेटीनच्या कांड्याही सापडल्या आहेत. टीएनटी दारूगोळा हा रणगाड्यांमधून सोडण्यात येणाऱ्या बॉम्बसाठी वापरण्यात येतो, हे येथे उल्लेखनीय. माओवाद्यांच्या या घातपातामुळे अनेक निरपराधांना आपले प्राण गमवावे लागतात, ही अतिशय दु:खद बाब आहे. निष्पाप लोकांच्या जिवाशी असा खेळ व्हायला नको, अशा शब्दात ममता बॅनर्जी यांनी घटनेबाबत खेद व्यक्त केला.
मृतांच्या आप्तांना रेल्वेतर्फे
पाच लाखाची मदत, रोजगाराची हमी
या अपघातात दगावलेल्यांच्या कुटुंबीयांना रेल्वेतर्फे प्रत्येकी ५ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची घोषणा त्यांनी केली. तसेच जखमींना १ लाख रुपये दिले जाणार आहेत. शिवाय, मृतांच्या कुटुंबीयांपैकी एकाला रेल्वेतर्फे रोजगाराचेही आश्वासन ममता बॅनर्जी यांनी दिले आहे.
या घटनेनंतर सर्व रेल्वेमार्गांवर सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे.
- १३ डबे घसरले, मालगाडीचीही धडक
- पीसीपीएने जबाबदारी स्वीकारली
झारग्राम (प.बंगाल), दि. २८ : मुंबईच्या दिशेने निघालेल्या हावडा-कुर्ला ज्ञानेश्वरी एक्सप्रेसला माओवाद्यांनी काल मध्यरात्री झारग्रामजवळ रूळाखाली दडविलेल्या सुरूंगांचा स्फोट घडवून ७५ निष्पाप प्रवाशांचे प्राण घेतले. या स्फोटामुळे आठ डबे घसरून कलंडले. त्याचवेळी विरूद्ध दिशेने येणारी मालगाडी कलंडलेल्या डब्यांवर आदळल्याने पाच डबे अक्षरश: चक्काचूर झाले. त्यामुळे या अपघाताची भीषणता अधिकच वाढल्याने मृतकांचा आकडाही वाढला. या अपघातात २०० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. पीपल्स कमेटी अगेन्स्ट पोलिस ऍट्रॉसिटीज (पीसीपीए) या माओवादी समर्थित संघटनेने या घातपाताची जबाबदारी घेतली आहे. तशी पत्रकेही घटनास्थळी सापडली आहेत. पश्चिम बंगालच्या पश्चिम मिदनापूर जिल्ह्यात हा अपघात घडला. मध्यरात्रीनंतर दीड वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
ज्ञानेश्वरी एक्सप्रेस खेमासोली आणि सारदिया स्थानकादरम्यान धावत असताना नक्षल्यांनी हा स्फोट घडवून आणला. जखमींना विविध ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. सध्या पश्चिम बंगालमध्ये माओवाद्यांचा निषेध सप्ताह सुरू आहे. त्याच कालावधीत हा घातपात घडविण्यात आला आहे.
मध्यरात्री ही घटना घडल्यामुळे एकच हाहाकार माजला. रात्रीची वेळ असल्यामुळे मदत कार्यातही अडथळे येत होते. काही प्रवासी तर चक्काचूर झालेल्या डब्यांच्या खाली असे काही अडकले होते की, त्यांना बाहेर काढणे शक्य नव्हते. सकाळ उजाडल्यावरच डबे कापून त्यांना बाहेर काढण्यात आले.
लष्कराची मदत
घटनेची तीव्रता लक्षात घेता तातडीने लष्कराला पाचारण करण्यात आले. तसेच वायुदलाचे हेलिकॉप्टर्सही मदतीसाठी पाठविण्यात आले. गंभीर जखमींना उपचारासाठी हलविण्याचे काम या हेलिकॉप्टर्सनी केले. अपघाताचे वृत्त समजताच रेल्वेने वायुदलप्रमुखांशी संपर्क साधला आणि मदतीची विनंती केली. त्यांनी मदतकार्यासाठी तत्काळ होकार दिला. याशिवाय विशेष वैद्यकीय पथकेही रवाना करण्यात आली.
पीसीपीएने घेतली जबाबादारी
हा घातपात घडवून आणणाऱ्या पीसीपीए या संघटनेने म्हटले आहे की, आम्ही यापूर्वीही जंगलमहल परिसरातून संयुक्त सुरक्षा पथक हटविण्याची मागणी केली होती. पण, आमच्या मागण्यांचा विचार झाला नाही. त्याचा निषेध म्हणून आम्ही हे पाऊल उचलल्याचे पत्रकात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. तथापि, या संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी यामागे आमचा हात नसल्याचे म्हटले आहे.
मागील वर्षी २७ ऑक्टोबर रोजी पीसीपीएने "बंद'दरम्यान राजधानी एक्सप्रेस अडविली होती.
योजनाबद्ध कारवाई
ज्ञानेश्वरी एक्सप्रेस ज्या मार्गावरून जाणार, त्याचवेळी विरूद्ध दिशेने मालगाडी येण्याची वेळ हेरून नक्षल्यांनी हा घातपात घडवून आणला. अधिकाधिक संख्येत प्रवासी मारले जावेत, या निर्दयी उद्देशाने त्यांनी हे निर्घृण कृत्य केले. त्यांनी आधी ज्ञानेश्वरी जेथून जाणार, त्या ठिकाणी रूळाखाली बॉम्ब पेरून ठेवले आणि गाडी येताच त्याचा स्फोट घडवून आणला. यामुळे सुमारे दोन फुटाचा रूळ तुटून पडला आणि डबा त्यावरून जाताच तो उसळून अन्य आठ डबे रूळावरून घसरले आणि कलंडले. त्याचवेळी आलेल्या मालगाडीचे डबे या कलंडलेल्या डब्यांवर जाऊन आदळले आणि त्यात ७५ प्रवाशांचे प्राण गेले. स्फोटाची तीव्रता एवढी होती की, रूळ तीन फूट उंच उडून वाकले.
ममता बॅनर्जींची घटनास्थळी भेट
घटनेची माहिती मिळताच रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन स्थितीची पाहणी केली. यावेळी बोलताना रेल्वेमंत्री म्हणाल्या की, हावडा-कुर्ला गाडीचा घातपात स्फोटाने घडवून आणण्यात आला. घातपाताच्या ठिकाणी टीएनटी स्फोटके आणि जिलेटीनच्या कांड्याही सापडल्या आहेत. टीएनटी दारूगोळा हा रणगाड्यांमधून सोडण्यात येणाऱ्या बॉम्बसाठी वापरण्यात येतो, हे येथे उल्लेखनीय. माओवाद्यांच्या या घातपातामुळे अनेक निरपराधांना आपले प्राण गमवावे लागतात, ही अतिशय दु:खद बाब आहे. निष्पाप लोकांच्या जिवाशी असा खेळ व्हायला नको, अशा शब्दात ममता बॅनर्जी यांनी घटनेबाबत खेद व्यक्त केला.
मृतांच्या आप्तांना रेल्वेतर्फे
पाच लाखाची मदत, रोजगाराची हमी
या अपघातात दगावलेल्यांच्या कुटुंबीयांना रेल्वेतर्फे प्रत्येकी ५ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची घोषणा त्यांनी केली. तसेच जखमींना १ लाख रुपये दिले जाणार आहेत. शिवाय, मृतांच्या कुटुंबीयांपैकी एकाला रेल्वेतर्फे रोजगाराचेही आश्वासन ममता बॅनर्जी यांनी दिले आहे.
या घटनेनंतर सर्व रेल्वेमार्गांवर सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे.
लोगो-अमली पदार्थ प्रकरण सीबीआयकडे चौकशी देण्यास सरकार तयार नसल्याचे स्पष्ट
उच्च न्यायालयाची २ जूनपर्यंत मुदत
पणजी, दि. २८ (प्रतिनिधी): पोलिसांच्या ड्रग माफियांशी असलेल्या संबंधाचे तपासकाम अद्याप "सीबीआय'कडे देण्याचा कोणताही विचार नसल्याचे आज राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला कळवले. गरज भासल्यास आम्ही तपास अधिकारी बदलू, असेही सांगितले. मात्र न्यायालयाने यावर ठोस वक्तव्य करण्याची सूचना सरकारला केली असून त्यासाठी येत्या बुधवार म्हणजे २ जून पर्यत वेळ सरकारला दिला आहे. दरम्यान, आशिष शिरोडकर याने केलेल्या जामीन अर्जावरील युक्तिवाद पूर्ण झाला असून येत्या बुधवारी न्यायालय निवाडा जाहीर करण्याची शक्यता आहे.
सध्या या प्रकरणाची "सीआयडी' विभागाच्या पोलिस उपअधीक्षकांमार्फत चौकशी केली जात आहे. ज्या अधिकाऱ्यांमार्फत ही चौकशी केली जाते त्याच्या हाताखाली यापूर्वी या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निलंबित निरीक्षक आशिष शिरोडकर यांनी काम केले असल्याचेही निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. तसा प्रश्नही न्यायालयाने युक्तीवादाच्यावेळी सरकारी वकिलाला केला. यावेळी गरज भासल्यास सरकार तपास अधिकारी बदलून वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यास तयार असल्याचे उत्तर न्यायालयाला देण्यात आले.
हे प्रकरण सीबीआयला द्यावे की नाही हा निर्णय न्यायालयाला कळवण्यासाठी काल उशिरापर्यंत मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या निवासस्थानी गृहमंत्री रवी नाईक, मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकाची बैठक झाली होती. त्यात हे प्रकरण "सीबीआय'कडे सोपवण्यासाठी गृहखात्याने जोरदार विरोध केल्याची माहिती मिळाली आहे. पोलिस अधिकारीच या प्रकरणात गुंतलेले असल्याने त्याची गोवा पोलिसातर्फे चौकशी केली जात असल्याने न्यायालयाने तपासकामाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. आज सरकारने दिलेल्या उत्तराने न्यायालयाचे समाधान झाले नसल्याने येत्या बुधवारपर्यंत सरकारला न्यायालयात ठोस उत्तर देण्यास सांगितले आहे.
या प्रकरणात सात पोलिस सध्या तुरुंगात आहेत. दि. ८ फेब्रुवारी रोजी निलंबित निरीक्षक आशिष शिरोडकर आणि रामचंद्र काणकोणकर ऊर्फ "बिल्डर' या दोघांमध्ये मोबाईलवर झालेल्या संभाषणाची "केसडायरी' सादर करण्याचे आदेश आज पोलिसांना देण्यात आले आहेत. आशिष शिरोडकर हा "अटाला' आणि "दुदू' या ड्रग माफियांकडून हप्ते घेत होता, असा दावाही पोलिसांनी न्यायालयात केला आहे. त्यावर तुम्ही काय कारवाई त्याच्यावर केली आहे, असा प्रश्न न्यायालयाने केला. त्यावेळी याच प्रकरणात त्याला निलंबित करून त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली.
--------------------------------------------------------
कोण ही प्रीती वायंगणकर...
निलंबित निरीक्षक आशिष शिरोडकर वापरत असलेल्या मोबाईल क्रमांक ....९७५ हा प्रीती वायंगणकर या तरुणीच्या नावावर असल्याची माहिती उघडकीस आली आहे. मात्र ही तरुणी बेपत्ता असून तिचा शोध लागत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आशिष शिरोडकर हा बनावट नावाने घेतलेले 'सिम कार्ड' वापरत होता का, या दृष्टीने पोलिसांनी तपास काम सुरू केले आहे. तसेच, बरेच पोलिस अधिकारी बनावट नावाने किंवा भलत्याच व्यक्तीच्या नावावर घेतलेले 'सिमकार्ड' वापरत असल्याचे उघडकीस आले आहे.
पणजी, दि. २८ (प्रतिनिधी): पोलिसांच्या ड्रग माफियांशी असलेल्या संबंधाचे तपासकाम अद्याप "सीबीआय'कडे देण्याचा कोणताही विचार नसल्याचे आज राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला कळवले. गरज भासल्यास आम्ही तपास अधिकारी बदलू, असेही सांगितले. मात्र न्यायालयाने यावर ठोस वक्तव्य करण्याची सूचना सरकारला केली असून त्यासाठी येत्या बुधवार म्हणजे २ जून पर्यत वेळ सरकारला दिला आहे. दरम्यान, आशिष शिरोडकर याने केलेल्या जामीन अर्जावरील युक्तिवाद पूर्ण झाला असून येत्या बुधवारी न्यायालय निवाडा जाहीर करण्याची शक्यता आहे.
सध्या या प्रकरणाची "सीआयडी' विभागाच्या पोलिस उपअधीक्षकांमार्फत चौकशी केली जात आहे. ज्या अधिकाऱ्यांमार्फत ही चौकशी केली जाते त्याच्या हाताखाली यापूर्वी या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निलंबित निरीक्षक आशिष शिरोडकर यांनी काम केले असल्याचेही निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. तसा प्रश्नही न्यायालयाने युक्तीवादाच्यावेळी सरकारी वकिलाला केला. यावेळी गरज भासल्यास सरकार तपास अधिकारी बदलून वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यास तयार असल्याचे उत्तर न्यायालयाला देण्यात आले.
हे प्रकरण सीबीआयला द्यावे की नाही हा निर्णय न्यायालयाला कळवण्यासाठी काल उशिरापर्यंत मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या निवासस्थानी गृहमंत्री रवी नाईक, मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकाची बैठक झाली होती. त्यात हे प्रकरण "सीबीआय'कडे सोपवण्यासाठी गृहखात्याने जोरदार विरोध केल्याची माहिती मिळाली आहे. पोलिस अधिकारीच या प्रकरणात गुंतलेले असल्याने त्याची गोवा पोलिसातर्फे चौकशी केली जात असल्याने न्यायालयाने तपासकामाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. आज सरकारने दिलेल्या उत्तराने न्यायालयाचे समाधान झाले नसल्याने येत्या बुधवारपर्यंत सरकारला न्यायालयात ठोस उत्तर देण्यास सांगितले आहे.
या प्रकरणात सात पोलिस सध्या तुरुंगात आहेत. दि. ८ फेब्रुवारी रोजी निलंबित निरीक्षक आशिष शिरोडकर आणि रामचंद्र काणकोणकर ऊर्फ "बिल्डर' या दोघांमध्ये मोबाईलवर झालेल्या संभाषणाची "केसडायरी' सादर करण्याचे आदेश आज पोलिसांना देण्यात आले आहेत. आशिष शिरोडकर हा "अटाला' आणि "दुदू' या ड्रग माफियांकडून हप्ते घेत होता, असा दावाही पोलिसांनी न्यायालयात केला आहे. त्यावर तुम्ही काय कारवाई त्याच्यावर केली आहे, असा प्रश्न न्यायालयाने केला. त्यावेळी याच प्रकरणात त्याला निलंबित करून त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली.
--------------------------------------------------------
कोण ही प्रीती वायंगणकर...
निलंबित निरीक्षक आशिष शिरोडकर वापरत असलेल्या मोबाईल क्रमांक ....९७५ हा प्रीती वायंगणकर या तरुणीच्या नावावर असल्याची माहिती उघडकीस आली आहे. मात्र ही तरुणी बेपत्ता असून तिचा शोध लागत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आशिष शिरोडकर हा बनावट नावाने घेतलेले 'सिम कार्ड' वापरत होता का, या दृष्टीने पोलिसांनी तपास काम सुरू केले आहे. तसेच, बरेच पोलिस अधिकारी बनावट नावाने किंवा भलत्याच व्यक्तीच्या नावावर घेतलेले 'सिमकार्ड' वापरत असल्याचे उघडकीस आले आहे.
पाकमध्ये मशिदींवर हल्ल्यात ७० ठार
लाहोर, दि. २८ : पाकिस्तानमध्ये आत्मघाती अतिरेक्यांनी दोन मशिदींवर केलेल्या हल्ल्यात किमान ७० जण ठार झाले असून, अनेक जखमी झाले आहेत.
आज शुक्रवार असल्याने या दोन्ही मशिदींमध्ये दुपारचा नमाज अदा करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. नेमकी हीच बाब हेरून अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि ग्रेनेड असलेले अतिरेक्यांचे दोन गट आज दुपारी १.४५ च्या सुमारास दोन वेगवेगळ्या मशिदींमध्ये घुसले आणि अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. लाहोरच्या अतिशय गर्दीचा भाग असलेल्या गरही शाहू आणि मॉडेल टाऊन भागातील या मशिदींवर अतिरेक्यांनी हा हल्ला केला.
या अतिरेकी हल्ल्यात आतापर्यंत ७० जण ठार झाले असून, इतर अनेक जण जखमी झाले . जखमी झालेल्यांपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे, असे सरकारी मदत पथकाचे प्रवक्ते फहीम जहॉसाहेब यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. या दोन्ही मशिदी अहमदी समुदायाच्या असून, सुन्नी समुदायाच्या कट्टरपंथीयांनी यापूर्वीदेखील या मशिदींवर हल्ले केले आहेत. हल्ला झाल्यानंतर मशिदींमधून गोळीबार आणि स्फोटाचे आवाज ऐकू येत होते. या दोन्ही मशिदींना सुरक्षा दलांनी वेढा घातला आहे.
मॉडेल टाऊन परिसरातील मशिदीतील परिस्थिती आता बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात आली आहे. मात्र, गरही शाहू परिसरातील मशिदीत अनेक अतिरेकी लपून बसले असून, त्यांनी अनेक जणांना बंधक बनवले आहे, अशी माहिती पंजाब प्रांताचे पोलिस प्रमुख सलिम डोगर यांनी दिली आहे.
जिओ टीव्ही या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार सात सशस्त्र अतिरेक्यांनी मॉडेल टाऊन भागातील मशिदीवर हल्ला केला. त्यापैकी ५ जणांना सुरक्षा दलाच्या जवानांनी गोळ्या घालून ठार केले, तर एका जणाला जिवंत पकडले आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या २८ जणांना उपचारासाठी जिन्ना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी ३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, असेही वृत्तात पुढे म्हटले आहे.
हातात अत्याधुनिक बंदुका आणि शस्त्रास्त्रे आणि आत्मघाती हल्ल्यासाठी वापरण्यात येणारे कपडे घातलेले अनेक युवक गरही शाहू परिसरातील मशिदीत घुसताना पाहिल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. मशिदीत प्रवेश करताना त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला आणि ग्रेनेड्स फेकले, असेही सांगण्यात आले आहे.
आज शुक्रवार असल्याने या दोन्ही मशिदींमध्ये दुपारचा नमाज अदा करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. नेमकी हीच बाब हेरून अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि ग्रेनेड असलेले अतिरेक्यांचे दोन गट आज दुपारी १.४५ च्या सुमारास दोन वेगवेगळ्या मशिदींमध्ये घुसले आणि अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. लाहोरच्या अतिशय गर्दीचा भाग असलेल्या गरही शाहू आणि मॉडेल टाऊन भागातील या मशिदींवर अतिरेक्यांनी हा हल्ला केला.
या अतिरेकी हल्ल्यात आतापर्यंत ७० जण ठार झाले असून, इतर अनेक जण जखमी झाले . जखमी झालेल्यांपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे, असे सरकारी मदत पथकाचे प्रवक्ते फहीम जहॉसाहेब यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. या दोन्ही मशिदी अहमदी समुदायाच्या असून, सुन्नी समुदायाच्या कट्टरपंथीयांनी यापूर्वीदेखील या मशिदींवर हल्ले केले आहेत. हल्ला झाल्यानंतर मशिदींमधून गोळीबार आणि स्फोटाचे आवाज ऐकू येत होते. या दोन्ही मशिदींना सुरक्षा दलांनी वेढा घातला आहे.
मॉडेल टाऊन परिसरातील मशिदीतील परिस्थिती आता बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात आली आहे. मात्र, गरही शाहू परिसरातील मशिदीत अनेक अतिरेकी लपून बसले असून, त्यांनी अनेक जणांना बंधक बनवले आहे, अशी माहिती पंजाब प्रांताचे पोलिस प्रमुख सलिम डोगर यांनी दिली आहे.
जिओ टीव्ही या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार सात सशस्त्र अतिरेक्यांनी मॉडेल टाऊन भागातील मशिदीवर हल्ला केला. त्यापैकी ५ जणांना सुरक्षा दलाच्या जवानांनी गोळ्या घालून ठार केले, तर एका जणाला जिवंत पकडले आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या २८ जणांना उपचारासाठी जिन्ना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी ३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, असेही वृत्तात पुढे म्हटले आहे.
हातात अत्याधुनिक बंदुका आणि शस्त्रास्त्रे आणि आत्मघाती हल्ल्यासाठी वापरण्यात येणारे कपडे घातलेले अनेक युवक गरही शाहू परिसरातील मशिदीत घुसताना पाहिल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. मशिदीत प्रवेश करताना त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला आणि ग्रेनेड्स फेकले, असेही सांगण्यात आले आहे.
साहित्याद्वारेच भारतीय भाषांची ताकद सिद्ध करणे गरजेचेः डॉ. नूर
पुंडलिक नायक यांना 'गोमंत शारदा'पुरस्कार प्रदान
पणजी, दि.२८ (सांस्कृतिक प्रतिनिधी): इतर भाषांपेक्षा भारतीय भाषेत दर्जेदार चांगल्या प्रमाणात साहित्याची निर्मिती होत आहे. परंतु त्याचा अनुवाद जेवढ्या प्रमाणात व्हायला हवा, तेवढ्या प्रमाणात होत नसल्याने भारतीय साहित्याला जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळत नाही. जागतिक स्तरावर इंग्रजी भाषेचा दबदबा असल्याने त्या भाषेतील साहित्याला मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी मिळते, त्याकरिता भारतीय भाषांतून निर्माण होणाऱ्या साहित्याच्या जोरावर भारतीय भाषांची ताकद सिध्द करणे आवश्यक आहे, असे पंजाबी भाषेतील सुप्रसिध्द लेखक कवी आणि राष्ट्रीय साहित्यिक केंद्राचे उपाध्यक्ष डॉ.एस.एस. नूर यांनी सांगितले. कला अकादमीने आयोजित केलेल्या गोमंत शारदा पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावर्षीचे पुरस्काराचे मानकरी गोमंतकीय ज्येष्ठ लेखक नाटककार आणि कवी पुंडलिक नायक यांना यावेळी शारदा पुरस्कार प्रदान करण्यात आला. व्यासपीठावर अकादमीचे उपाध्यक्ष परेश जोशी, सदस्य सचिव डॉ. पांडुरंग फळदेसाई उपस्थित होते.
डॉ. नूर यांनी कला अकादमीतील वातावरण आणि निसर्गाची मुक्तकंठाने प्रशंसा करत पुढे सांगितले की, प्रत्येक भाषेमागे संस्कृती असते आणि त्यातूनच राष्ट्रीय संस्कृती तयार होत असते त्यामुळे कोणती भाषा किंवा संस्कृती नगण्य मानता येणार नाही. आज भारतातील जवळजवळ सर्वच विद्यापीठांतून इंग्रजी साहित्याचा तुलनात्मक साहित्य म्हणून वापर होत असतो, परंतु तसे न होता भारतीय साहित्याचा तुलनात्मक साहित्य म्हणून प्रत्येक विद्यापीठात अभ्यास होणे नितांत गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. आज जगात १५० कोटी लोक चिनी, ५१ कोटी इंग्रजी तर ४८ कोटी लोक हिंदी भाषा बोलतात तरीही जगात इंग्रजी भाषेचाच दबदबा जास्त आहे. दर्जेदार साहित्य आणि भाषेची ताकद सिध्द करण्याकरिता भाषेतील लिपी निश्चित होणे गरजेचे आहे. कारण कोणतेही साहित्य त्या भाषेतील लिपीत वाचल्यास त्याच प्रभाव चांगला पडतो म्हणूनच भाषेची लिपी जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत भाषेची ताकद निश्चित होत नाही, असेही ते म्हणाले. कुठल्याही लेखकाने कोणत्याही भाषेत लेखन करायला हरकत नाही, परंतु त्या भाषेतील लिपीत लिहिणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
पुरस्काराचा स्वीकार केल्यावर बोलताना पुंडलिक नायक यांनी कला अकादमीचे आभार मानले. लेखकाने कसे असावे हे सांगताना त्यांनी म्हटले की लेखकाने स्वतःला लेखक म्हणून स्वीकारणे गरजेचे आहे. तसे केल्यास त्याची संवेदना तीक्ष्ण होते. लेखकाकडे केवळ प्रतिभाच नसते तर प्रज्ञा असतेे कारण तो समाजाचा प्रतिनिधी असतो.कोणतीही घटना घटताना प्रत्येक माध्यम आपापले कार्य करत असतात परंतु लेखक म्हणून लेखकाने आपले कार्य करणे आवश्यक आहे. घटना घडून गेल्यावर त्यावर लिहून काहीच उपयोग नाही. घटना घडताना त्यात लेखकाचा भाग असणे गरजेच आहे. शेवटी त्यांनी या पुरस्काराप्रमाणे ललित कला आणि संगीत नाटक यांनाही असाच पुरस्कार जाहीर करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाची सुरुवात गोमंतकातील नामवंत गायिका प्रचला आमोणकर यांनी ईशस्तवन सादर करून केली. परेश जोशी यांनी मान्यवरांचे स्वागत केले, तर डॉ. फळदेसाई यांनी मानपत्राचे वाचन केले.
आपल्या निरंतर साहित्यसेवेद्वारे साहित्याच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान करून गोव्याच्या कीर्तीत बहुमूल्य भर घालणाऱ्या गोमंतकीय साहित्यिकांसाठी देण्यात येणारा हा पुरस्कार या अगोदर बा.द. सातोस्कर, रवींद्र केळेकर, डॉ. मनोहर सरदेसाई आणि मनोहर ह. सरदेसाई, शंकर रामाणी, चंद्रकांत केणी, लॅंबर्ट मास्कारेन्हस यांना देण्यात आला होता. शाल, श्रीफळ, मानपत्र, स्मृतिचिन्ह, मानचिन्ह आणि रू. एक लाखाचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रघुनाथ साकोर्डेकर यांनी केले तर डॉ. फळदेसाई यांनी आभार मानले. शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
पणजी, दि.२८ (सांस्कृतिक प्रतिनिधी): इतर भाषांपेक्षा भारतीय भाषेत दर्जेदार चांगल्या प्रमाणात साहित्याची निर्मिती होत आहे. परंतु त्याचा अनुवाद जेवढ्या प्रमाणात व्हायला हवा, तेवढ्या प्रमाणात होत नसल्याने भारतीय साहित्याला जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळत नाही. जागतिक स्तरावर इंग्रजी भाषेचा दबदबा असल्याने त्या भाषेतील साहित्याला मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी मिळते, त्याकरिता भारतीय भाषांतून निर्माण होणाऱ्या साहित्याच्या जोरावर भारतीय भाषांची ताकद सिध्द करणे आवश्यक आहे, असे पंजाबी भाषेतील सुप्रसिध्द लेखक कवी आणि राष्ट्रीय साहित्यिक केंद्राचे उपाध्यक्ष डॉ.एस.एस. नूर यांनी सांगितले. कला अकादमीने आयोजित केलेल्या गोमंत शारदा पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावर्षीचे पुरस्काराचे मानकरी गोमंतकीय ज्येष्ठ लेखक नाटककार आणि कवी पुंडलिक नायक यांना यावेळी शारदा पुरस्कार प्रदान करण्यात आला. व्यासपीठावर अकादमीचे उपाध्यक्ष परेश जोशी, सदस्य सचिव डॉ. पांडुरंग फळदेसाई उपस्थित होते.
डॉ. नूर यांनी कला अकादमीतील वातावरण आणि निसर्गाची मुक्तकंठाने प्रशंसा करत पुढे सांगितले की, प्रत्येक भाषेमागे संस्कृती असते आणि त्यातूनच राष्ट्रीय संस्कृती तयार होत असते त्यामुळे कोणती भाषा किंवा संस्कृती नगण्य मानता येणार नाही. आज भारतातील जवळजवळ सर्वच विद्यापीठांतून इंग्रजी साहित्याचा तुलनात्मक साहित्य म्हणून वापर होत असतो, परंतु तसे न होता भारतीय साहित्याचा तुलनात्मक साहित्य म्हणून प्रत्येक विद्यापीठात अभ्यास होणे नितांत गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. आज जगात १५० कोटी लोक चिनी, ५१ कोटी इंग्रजी तर ४८ कोटी लोक हिंदी भाषा बोलतात तरीही जगात इंग्रजी भाषेचाच दबदबा जास्त आहे. दर्जेदार साहित्य आणि भाषेची ताकद सिध्द करण्याकरिता भाषेतील लिपी निश्चित होणे गरजेचे आहे. कारण कोणतेही साहित्य त्या भाषेतील लिपीत वाचल्यास त्याच प्रभाव चांगला पडतो म्हणूनच भाषेची लिपी जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत भाषेची ताकद निश्चित होत नाही, असेही ते म्हणाले. कुठल्याही लेखकाने कोणत्याही भाषेत लेखन करायला हरकत नाही, परंतु त्या भाषेतील लिपीत लिहिणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
पुरस्काराचा स्वीकार केल्यावर बोलताना पुंडलिक नायक यांनी कला अकादमीचे आभार मानले. लेखकाने कसे असावे हे सांगताना त्यांनी म्हटले की लेखकाने स्वतःला लेखक म्हणून स्वीकारणे गरजेचे आहे. तसे केल्यास त्याची संवेदना तीक्ष्ण होते. लेखकाकडे केवळ प्रतिभाच नसते तर प्रज्ञा असतेे कारण तो समाजाचा प्रतिनिधी असतो.कोणतीही घटना घटताना प्रत्येक माध्यम आपापले कार्य करत असतात परंतु लेखक म्हणून लेखकाने आपले कार्य करणे आवश्यक आहे. घटना घडून गेल्यावर त्यावर लिहून काहीच उपयोग नाही. घटना घडताना त्यात लेखकाचा भाग असणे गरजेच आहे. शेवटी त्यांनी या पुरस्काराप्रमाणे ललित कला आणि संगीत नाटक यांनाही असाच पुरस्कार जाहीर करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाची सुरुवात गोमंतकातील नामवंत गायिका प्रचला आमोणकर यांनी ईशस्तवन सादर करून केली. परेश जोशी यांनी मान्यवरांचे स्वागत केले, तर डॉ. फळदेसाई यांनी मानपत्राचे वाचन केले.
आपल्या निरंतर साहित्यसेवेद्वारे साहित्याच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान करून गोव्याच्या कीर्तीत बहुमूल्य भर घालणाऱ्या गोमंतकीय साहित्यिकांसाठी देण्यात येणारा हा पुरस्कार या अगोदर बा.द. सातोस्कर, रवींद्र केळेकर, डॉ. मनोहर सरदेसाई आणि मनोहर ह. सरदेसाई, शंकर रामाणी, चंद्रकांत केणी, लॅंबर्ट मास्कारेन्हस यांना देण्यात आला होता. शाल, श्रीफळ, मानपत्र, स्मृतिचिन्ह, मानचिन्ह आणि रू. एक लाखाचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रघुनाथ साकोर्डेकर यांनी केले तर डॉ. फळदेसाई यांनी आभार मानले. शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
८४ 'ज्येष्ठ' शिक्षकांना प्रतिबंधात्मक अटक
उपोषणाचा सरकारला धसका
पणजी, दि. २८ (प्रतिनिधी): वंचित निवृत्त शिक्षकांनी आपल्या मागण्यांप्रीत्यर्थ आज पणजीत काढलेल्या मोर्चावेळी पोलिसांनी तात्काळ प्रतिबंधात्मक अटक करून या शिक्षकांचा बेत फोल ठरवला. चर्चचौकावरून थेट मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या सरकारी निवासस्थानी मोर्चा काढून नंतर तिथे साखळी उपोषणाला बसण्याचा त्यांचा इरादा होता. चर्चचौक ते मुख्यमंत्री निवासस्थान या भागांत १४४ कलम लागू करण्यात आले होते व त्यामुळेच ही अटक करण्यात आली अशी माहिती पोलिसांनी दिली.
वयाच्या ५८ व्या वर्षी निवृत्त झालेल्या सुमारे १०१६ शिक्षकांनी आपल्याला दोन वर्षांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सरकारकडे लावून धरली आहे. ते निवृत्त झाल्यानंतर लगेच सरकारने निवृत्ती वयोमर्यादा ६० वर्षे केल्याने दोन वर्षांच्या वेतनाला ते मुकले, अशी त्यांची तक्रार आहे. आपल्या मागण्यांबाबत त्यांनी कृती करण्यासाठी सरकारला पंधरा दिवसांची नोटीस जारी केली होती पण या काळात काहीही प्रतिसाद मिळाला नसल्याने त्यांनी आजपासून साखळी उपोषणाला सुरुवात करण्याची घोषणा केली होती. या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर काल रात्री जिल्हाधिकाऱ्यांनी या भागात १४४ कलम लागू करण्याचा आदेश जारी केला. सकाळी १० वाजता इथे शिक्षक मोर्चा काढण्यासाठी जमले असता त्यांना तात्काळ भा.दं.सं १५१ कलमाअंतर्गत प्रतिबंधात्मक अटक करण्यात आली. सुमारे ८४ शिक्षकांना ताब्यात घेऊन दुपारी त्यांची सुटका करण्यात आली. या परिसरात १४४ कलम ३ जूनपर्यंत कायम ठेवण्यात आल्याचीही माहिती मिळाली आहे.
अलीकडे मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानाबाहेर येऊन मोर्चा किंवा निषेध करण्याचे प्रकार वाढल्याने पहिल्यांदाच या परिसरात १४४ कलम लागू करण्याचा निर्णय सरकारी पातळीवर घेण्यात आला. दरम्यान, वंचित निवृत्त शिक्षक मंचतर्फे मात्र सरकारच्या या कृतीचा निषेध करण्यात आला. सरकारच्या चुकीमुळेच या शिक्षकांना रस्त्यावर येणे भाग पडले. बहुतांश सर्व शिक्षक हे ज्येष्ठ नागरिक असतानाही त्यांना अशा पद्धतीने अटक करण्याची ही कृती निषेधार्ह आहे,असा आरोपही यावेळी करण्यात आला.
पणजी, दि. २८ (प्रतिनिधी): वंचित निवृत्त शिक्षकांनी आपल्या मागण्यांप्रीत्यर्थ आज पणजीत काढलेल्या मोर्चावेळी पोलिसांनी तात्काळ प्रतिबंधात्मक अटक करून या शिक्षकांचा बेत फोल ठरवला. चर्चचौकावरून थेट मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या सरकारी निवासस्थानी मोर्चा काढून नंतर तिथे साखळी उपोषणाला बसण्याचा त्यांचा इरादा होता. चर्चचौक ते मुख्यमंत्री निवासस्थान या भागांत १४४ कलम लागू करण्यात आले होते व त्यामुळेच ही अटक करण्यात आली अशी माहिती पोलिसांनी दिली.
वयाच्या ५८ व्या वर्षी निवृत्त झालेल्या सुमारे १०१६ शिक्षकांनी आपल्याला दोन वर्षांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सरकारकडे लावून धरली आहे. ते निवृत्त झाल्यानंतर लगेच सरकारने निवृत्ती वयोमर्यादा ६० वर्षे केल्याने दोन वर्षांच्या वेतनाला ते मुकले, अशी त्यांची तक्रार आहे. आपल्या मागण्यांबाबत त्यांनी कृती करण्यासाठी सरकारला पंधरा दिवसांची नोटीस जारी केली होती पण या काळात काहीही प्रतिसाद मिळाला नसल्याने त्यांनी आजपासून साखळी उपोषणाला सुरुवात करण्याची घोषणा केली होती. या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर काल रात्री जिल्हाधिकाऱ्यांनी या भागात १४४ कलम लागू करण्याचा आदेश जारी केला. सकाळी १० वाजता इथे शिक्षक मोर्चा काढण्यासाठी जमले असता त्यांना तात्काळ भा.दं.सं १५१ कलमाअंतर्गत प्रतिबंधात्मक अटक करण्यात आली. सुमारे ८४ शिक्षकांना ताब्यात घेऊन दुपारी त्यांची सुटका करण्यात आली. या परिसरात १४४ कलम ३ जूनपर्यंत कायम ठेवण्यात आल्याचीही माहिती मिळाली आहे.
अलीकडे मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानाबाहेर येऊन मोर्चा किंवा निषेध करण्याचे प्रकार वाढल्याने पहिल्यांदाच या परिसरात १४४ कलम लागू करण्याचा निर्णय सरकारी पातळीवर घेण्यात आला. दरम्यान, वंचित निवृत्त शिक्षक मंचतर्फे मात्र सरकारच्या या कृतीचा निषेध करण्यात आला. सरकारच्या चुकीमुळेच या शिक्षकांना रस्त्यावर येणे भाग पडले. बहुतांश सर्व शिक्षक हे ज्येष्ठ नागरिक असतानाही त्यांना अशा पद्धतीने अटक करण्याची ही कृती निषेधार्ह आहे,असा आरोपही यावेळी करण्यात आला.
चिमुरडीने पार केली मांडवी!
५ वर्षीय नताशाचा पराक्रम
पणजी, दि. २८(क्रीडा प्रतिनिधी): मडगाव येथील मनोविकास विद्यालयात "के.जी.दोन'मध्ये शिकणाऱ्या नताशा फर्नांडिस या ५ वर्षाच्या चिमुकलीने बेती जेटी ते मांडवी जेटी हे जवळपास ७०० ते ८०० मीटर्सचे अंतर लीलया पार करत आपल्या क्षमतेचे दर्शन घडविले. इनास रापोस यांच्या मार्गदर्शनाखाली तीन महिने जलतरणाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर तिने हा पराक्रम केला आहे. तिला या कामगिरीसाठी केवळ २० मिनिटांचा कालावधी लागला. तिला प्रोत्साहन देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव खास उपस्थित होते. त्यांच्याच हस्ते तिला प्रशस्तिपत्र व करंडक देऊन गौरविण्यात आले. " नताशाचे भवितव्य उज्ज्वल आहे. इच्छाशक्ती प्रबळ असल्यास कोणतीही गोष्ट कठीण नाही याची शिकवण या चिमुरडीने समस्त गोव्यातील मुलांना घालून दिली आहे. दुधाचे दातही न पडलेल्या या मुलीने केलेली कामगिरी आणि तिच्या पालकांनी तिला केलेले साहाय्य हे कौतुकास्पद असल्याचे चर्चिल आलेमाव यांनी तिचे तोंडभरून कौतुक करताना सांगितले. ते पुढे म्हणाले की आमच्या वेळेस पालक आपल्या मुलांना व्हरांड्यातदेखील एकटे खेळायला सोडत नव्हते परंतु, अनिता व रुझारियो या फर्नांडिस दांपत्याने आपल्या चिमुरडीला जलतरणासारख्या धाडसी क्षेत्रात उतरण्यासाठी प्रोत्साहन दिले. या फर्नांडिस दांपत्याप्रमाणेच इतरांनी आपल्या मुलांना विविध क्रीडा क्षेत्रांत नाव कमावण्यासाठी व कारकीर्द घडविण्यासाठी सतत प्रोत्साहन दिल्यास गोवा राज्य कुठल्याही क्षेत्रात मागे राहणार नाही मग ते कला, क्रीडा असो वा अन्य कोणतेही, असेही श्री. आलेमाव यांनी यावेळी सांगितले.याच क्षेत्रात या मुलीचे भवितव्य उज्ज्वल असून तिने आपल्या शिक्षणा बरोबरच या क्रीडा प्रकाराचा सराव चालूच ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले. सततची मेहनत व सरावाच्या जोरावर तिने हे यश संपादन केल्याचे तिची आई अनिता यांनी आनंदाने सांगितले.
पणजी, दि. २८(क्रीडा प्रतिनिधी): मडगाव येथील मनोविकास विद्यालयात "के.जी.दोन'मध्ये शिकणाऱ्या नताशा फर्नांडिस या ५ वर्षाच्या चिमुकलीने बेती जेटी ते मांडवी जेटी हे जवळपास ७०० ते ८०० मीटर्सचे अंतर लीलया पार करत आपल्या क्षमतेचे दर्शन घडविले. इनास रापोस यांच्या मार्गदर्शनाखाली तीन महिने जलतरणाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर तिने हा पराक्रम केला आहे. तिला या कामगिरीसाठी केवळ २० मिनिटांचा कालावधी लागला. तिला प्रोत्साहन देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव खास उपस्थित होते. त्यांच्याच हस्ते तिला प्रशस्तिपत्र व करंडक देऊन गौरविण्यात आले. " नताशाचे भवितव्य उज्ज्वल आहे. इच्छाशक्ती प्रबळ असल्यास कोणतीही गोष्ट कठीण नाही याची शिकवण या चिमुरडीने समस्त गोव्यातील मुलांना घालून दिली आहे. दुधाचे दातही न पडलेल्या या मुलीने केलेली कामगिरी आणि तिच्या पालकांनी तिला केलेले साहाय्य हे कौतुकास्पद असल्याचे चर्चिल आलेमाव यांनी तिचे तोंडभरून कौतुक करताना सांगितले. ते पुढे म्हणाले की आमच्या वेळेस पालक आपल्या मुलांना व्हरांड्यातदेखील एकटे खेळायला सोडत नव्हते परंतु, अनिता व रुझारियो या फर्नांडिस दांपत्याने आपल्या चिमुरडीला जलतरणासारख्या धाडसी क्षेत्रात उतरण्यासाठी प्रोत्साहन दिले. या फर्नांडिस दांपत्याप्रमाणेच इतरांनी आपल्या मुलांना विविध क्रीडा क्षेत्रांत नाव कमावण्यासाठी व कारकीर्द घडविण्यासाठी सतत प्रोत्साहन दिल्यास गोवा राज्य कुठल्याही क्षेत्रात मागे राहणार नाही मग ते कला, क्रीडा असो वा अन्य कोणतेही, असेही श्री. आलेमाव यांनी यावेळी सांगितले.याच क्षेत्रात या मुलीचे भवितव्य उज्ज्वल असून तिने आपल्या शिक्षणा बरोबरच या क्रीडा प्रकाराचा सराव चालूच ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले. सततची मेहनत व सरावाच्या जोरावर तिने हे यश संपादन केल्याचे तिची आई अनिता यांनी आनंदाने सांगितले.
Friday, 28 May 2010
दहावीचा ८३.५० टक्के विक्रमी निकाल
नंदन पै काकोडे राज्यात पहिला
पणजी, दि. २७ (प्रतिनिधी): गोवा शालान्त आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च ते एप्रिल महिन्यात २३ केंद्रांतून घेतलेल्या दहावी परीक्षेचा निकाल यंदा ८३.५० टक्के लागला असून गेल्या सात वर्षाच्या तुलनेत ही सर्वांत जास्त टक्केवारी आहे. परीक्षेला बसलेल्या १५ हजार ८०८ विद्यार्थ्यांपैकी १३ हजार २०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात मुलांनी बाजी मारली असून ७९.४१ टक्के विद्यार्थी तर, ७८.२४ टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांचा निकाल जास्त लागला असला तरी विशेष श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्यांत मुलीच पुढे असल्याचे दिसून आले आहे. ९७९ मुली तर, ७१३ मुले विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
यावर्षी राज्यात पहिल्या क्रमांकावर नंदन नागेश पै काकोडे (९५.५० टक्के, महिला नुतन इंग्लिश विद्यालय, मडगाव), दुसऱ्या क्रमांकावर नेहा दरोचा (९५.१६ टक्के, दोना लियोनोर्र माध्य. विद्यालय, पर्वरी), तिसऱ्या क्रमांकावर ऐश्वर्या उगम उजगावकर (९४.६६ टक्के मुष्टिफंड माध्यमिक विद्यालय, पणजी) यांनी बाजी मारली आहे. २००४ साली ६३.५३ टक्के, २००५ मध्ये ५९ टक्के, २००६ साली ६९.५१ टक्के, २००७ मध्ये ७३.६३ टक्के, २००८ साली ६९.९४ टक्के तर, २००९ साली ७७.११ टक्के निकाल लागला होता. या परीक्षेत वीस विद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला, तर दोन विद्यालयांचा शून्य टक्के निकाल लागला आहे.
या परीक्षेला १५,८२४ विद्यार्थ्यांची नोंदणी झालेल्यांपैकी एकूण १५,८०८ विद्यार्थी बसले होते. त्यातील १३,२०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. परीक्षेला बसलेल्या ९ हजार ६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ८ हजार ७२६ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. फेरपरीक्षेला बसलेल्या १ हजार ९८४ विद्यार्थ्यांपैकी ८२६ जण उत्तीर्ण झाले आहेत. फेरपरीक्षेचा निकाल ४१.६३ टक्के लागला आहे.
उत्तर पत्रिकेच्या फोटो प्रतीसाठी शेवटची मुदत २४ जून आहे, तर फेरतपासणीसाठी लागणारा विनंती अर्ज शालान्त मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून विद्यार्थी तो तेथून डाऊनलोड करून घेऊ शकतात. मात्र तो अर्ज विद्यालयाच्या प्रमुखांच्या सहीसह पर्वरी येथील मंडळाच्या कार्यालयात द्यावा लागणार आहे, अशी माहिती शालान्त मंडळाचे अध्यक्ष मॅवरिन डिसोझा यांनी दिली.
दहावीची परीक्षा घेण्यात आलेल्या २३ केंद्रांमध्ये फोंडा केंद्राने बाजी मारली तर दुसऱ्या क्रमांकावर पर्वरी केंद्र आहे. फोंडा केंद्राचा ९१.६६ टक्के निकाल लागला आहे. तर, पर्वरी ९०.३२ टक्के निकाल लागला आहे. तसेच पणजी ८५.६३, मडगाव ८५.२३, म्हापसा ८६.६७, वास्को ८५.५०, डिचोली ८१.९१, काणकोण ७२,४, कुंकळ्ळी ७५.१४, कुडचडे ८१.९३, केपे ८३.६४, माशेल ८५.११, मंगेशी ८५.५५, पेडणे ६७.०९, पिलार ८०.८९, सांगे ७९.६७, साखळी ७६.८८, शिरोडा ७०.९०, शिवोली ७९.६२, तिस्क धारबांदोडा ७०.६६, वाळपई ७१.४७, नावेली ९३.०१, तर मांद्रे केंद्राचा ७८.९३ टक्के निकाल लागला.
-----------------------------------------------------------
या वर्षापासून श्रेणी पद्धती...
२०११ सालापासून दहावीच्या विद्यार्थ्यांना श्रेणी पद्धती लागू केली जाणार आहे. त्यामुळे "डिस्टिंक्शन',"फर्स्ट क्लास', "सेकंड क्लास' असे वर्ग नसतील. याविषयीची मान्यता राज्य सरकारने दिली असून दोन दिवसांपूर्वीच या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे श्री. डिसोझा यांनी सांगितले. "ए' ते "आय' पर्यंत ही श्रेणी असणार आहे. "ए' ते "जी' पर्यंत श्रेणी मिळवणारे विद्यार्थीच उत्तीर्ण होणार आहेत तर, उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयात ३० टक्के गूण मिळवणे गरजेचे आहे. यापूर्वी उत्तीर्ण होण्यासाठी ३५ टक्के गूण मिळणे महत्त्वाचे होते. तसेच, विद्यालयात होणाऱ्या परीक्षा विद्यार्थी गांभीर्याने घेत नसल्याचे लक्षात आल्यानेही त्या परीक्षांचे गुण तसेच, विविध प्रकल्प व उपक्रमाचे असे २० टक्के गूण अंतिम परीक्षेत ग्राह्य धरले जाणार आहेत.
--------------------------------
क्रीडा धोरणाचा ११३ विद्यार्थ्यांना लाभ
राज्य सरकारने लागू केलेल्या क्रीडा धोरणाचा ११३ विद्यार्थ्यांना लाभ मिळाला आहे. यात २७ विद्यार्थिनींचाही समावेश आहे.
---------------------------------------
सरकारी विद्यालयांची विशेष कामगिरी...
राज्यातील वीस विद्यालयांनी शंभर टक्के निकाल लावण्याचा मान मिळवला असून त्यांचे मंडळातर्फे अभिनंदन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या वीस विद्यालयांमध्ये चक्क सात सरकारी माध्यमिक विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. त्याचप्रमाणे बोरी येथील मतिमंद मुलांसाठी असलेल्या विद्यालयाचाही निकाल शंभर टक्के लागला आहे. याचे श्रेय शालान्त मंडळाने त्या विद्यालयातील शिक्षकांना दिले आहे.
----------------------------------
शून्य टक्के निकाल...
शिक्षण क्षेत्रात अग्रस्थानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्यात दोन विद्यालयांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. चंद्रनाथ एज्युकेशन सोसायटी असोल्डा, चांदर या विद्यालयातील ४ पैकी ३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सेंट ऍन्थनी विद्यालय असोल्णा, सासष्टी या विद्यालयातील ९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील एकाच विद्यार्थ्याला "एटीकेटी' मिळाली.
------------------------------------------------
शंभर टक्के निकाल लागलेली विद्यालये...
शिवाजी राजे माध्यमिक विद्यालय, खोलपावाडी साळ
सरकारी माध्यमिक विद्यालय, गवळ- खोला, काणकोण
सेंट तेरेझा माध्यमिक विद्यालय, वास्को
लोकमान्य टिळक विद्यालय, कवळे-फोंडा
सेंट मेरी माध्यमिक विद्यालय, फोंडा
डॉ. सखाराम गुडे विद्यालय, वजनगाळ शिरोडा
सरकारी माध्यमिक विद्यालय, गांजे -उजगाव
श्री नवदुर्गा एज्युकेशन व कल्चरल सोसायटी विद्यालय
लोकविश्वास प्रतिष्ठान मिडल विद्यालय ढवळी, फोंडा
सरकारी माध्यमिक विद्यालय, शेल्डे केपे
सरकारी माध्यमिक विद्यालय मायणा, केपे
सरकारी माध्यमिक विद्यालय आंबावली, केपे
फातिमा कॉन्व्हेंट माध्य. विद्यालय, मडगाव
श्री दामोदर विद्यालय, मडगाव
प्रेझेंटेशन कॉन्व्हेंट माध्यमिक विद्यालय, मडगाव
अवर लेडी ऑफ सुकूर माध्यमिक विद्यालय, वेर्णा मडगाव
असुमप्ता कॉन्व्हेंट माध्य. विद्यालय, सारझोर- चिंचीणी सासष्टी
सरकारी माध्य. विद्यालय नेत्रावळी, सांगे
सरकारी माध्य. विद्यालय, शेळप- सत्तरी
अवर लेडी ऑफ रोझरी विद्यालय करंझाळे, दोनापावला
------------------------------------------
दोन विषयात नापास विद्यार्थ्यांना 'एटीकेटी'
या वर्षीपासून पहिल्यांदाच दोन विषयांत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना "एटीकेटी' देण्यात आली आहे. त्यामुळे दोन विषयांत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावीच्या वर्गात प्रवेश घेता येणार आहे. परंतु, त्यांना ऑक्टोबर किंवा मार्च महिन्यात त्या दोन विषयांत उत्तीर्ण होणे गरजेचे आहे, अन्यथा त्यांना बारावीच्या परीक्षेला बसता येणार नाही. एका विषयात नापास झालेल्या ४२७ विद्यार्थ्यांना "एटीकेटी' तर दोन विषयांत नापास झालेल्या ५८६ विद्यार्थ्यांना "एटीकेटी'चा लाभ मिळाला आहे.
पणजी, दि. २७ (प्रतिनिधी): गोवा शालान्त आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च ते एप्रिल महिन्यात २३ केंद्रांतून घेतलेल्या दहावी परीक्षेचा निकाल यंदा ८३.५० टक्के लागला असून गेल्या सात वर्षाच्या तुलनेत ही सर्वांत जास्त टक्केवारी आहे. परीक्षेला बसलेल्या १५ हजार ८०८ विद्यार्थ्यांपैकी १३ हजार २०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात मुलांनी बाजी मारली असून ७९.४१ टक्के विद्यार्थी तर, ७८.२४ टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांचा निकाल जास्त लागला असला तरी विशेष श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्यांत मुलीच पुढे असल्याचे दिसून आले आहे. ९७९ मुली तर, ७१३ मुले विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
यावर्षी राज्यात पहिल्या क्रमांकावर नंदन नागेश पै काकोडे (९५.५० टक्के, महिला नुतन इंग्लिश विद्यालय, मडगाव), दुसऱ्या क्रमांकावर नेहा दरोचा (९५.१६ टक्के, दोना लियोनोर्र माध्य. विद्यालय, पर्वरी), तिसऱ्या क्रमांकावर ऐश्वर्या उगम उजगावकर (९४.६६ टक्के मुष्टिफंड माध्यमिक विद्यालय, पणजी) यांनी बाजी मारली आहे. २००४ साली ६३.५३ टक्के, २००५ मध्ये ५९ टक्के, २००६ साली ६९.५१ टक्के, २००७ मध्ये ७३.६३ टक्के, २००८ साली ६९.९४ टक्के तर, २००९ साली ७७.११ टक्के निकाल लागला होता. या परीक्षेत वीस विद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला, तर दोन विद्यालयांचा शून्य टक्के निकाल लागला आहे.
या परीक्षेला १५,८२४ विद्यार्थ्यांची नोंदणी झालेल्यांपैकी एकूण १५,८०८ विद्यार्थी बसले होते. त्यातील १३,२०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. परीक्षेला बसलेल्या ९ हजार ६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ८ हजार ७२६ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. फेरपरीक्षेला बसलेल्या १ हजार ९८४ विद्यार्थ्यांपैकी ८२६ जण उत्तीर्ण झाले आहेत. फेरपरीक्षेचा निकाल ४१.६३ टक्के लागला आहे.
उत्तर पत्रिकेच्या फोटो प्रतीसाठी शेवटची मुदत २४ जून आहे, तर फेरतपासणीसाठी लागणारा विनंती अर्ज शालान्त मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून विद्यार्थी तो तेथून डाऊनलोड करून घेऊ शकतात. मात्र तो अर्ज विद्यालयाच्या प्रमुखांच्या सहीसह पर्वरी येथील मंडळाच्या कार्यालयात द्यावा लागणार आहे, अशी माहिती शालान्त मंडळाचे अध्यक्ष मॅवरिन डिसोझा यांनी दिली.
दहावीची परीक्षा घेण्यात आलेल्या २३ केंद्रांमध्ये फोंडा केंद्राने बाजी मारली तर दुसऱ्या क्रमांकावर पर्वरी केंद्र आहे. फोंडा केंद्राचा ९१.६६ टक्के निकाल लागला आहे. तर, पर्वरी ९०.३२ टक्के निकाल लागला आहे. तसेच पणजी ८५.६३, मडगाव ८५.२३, म्हापसा ८६.६७, वास्को ८५.५०, डिचोली ८१.९१, काणकोण ७२,४, कुंकळ्ळी ७५.१४, कुडचडे ८१.९३, केपे ८३.६४, माशेल ८५.११, मंगेशी ८५.५५, पेडणे ६७.०९, पिलार ८०.८९, सांगे ७९.६७, साखळी ७६.८८, शिरोडा ७०.९०, शिवोली ७९.६२, तिस्क धारबांदोडा ७०.६६, वाळपई ७१.४७, नावेली ९३.०१, तर मांद्रे केंद्राचा ७८.९३ टक्के निकाल लागला.
-----------------------------------------------------------
या वर्षापासून श्रेणी पद्धती...
२०११ सालापासून दहावीच्या विद्यार्थ्यांना श्रेणी पद्धती लागू केली जाणार आहे. त्यामुळे "डिस्टिंक्शन',"फर्स्ट क्लास', "सेकंड क्लास' असे वर्ग नसतील. याविषयीची मान्यता राज्य सरकारने दिली असून दोन दिवसांपूर्वीच या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे श्री. डिसोझा यांनी सांगितले. "ए' ते "आय' पर्यंत ही श्रेणी असणार आहे. "ए' ते "जी' पर्यंत श्रेणी मिळवणारे विद्यार्थीच उत्तीर्ण होणार आहेत तर, उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयात ३० टक्के गूण मिळवणे गरजेचे आहे. यापूर्वी उत्तीर्ण होण्यासाठी ३५ टक्के गूण मिळणे महत्त्वाचे होते. तसेच, विद्यालयात होणाऱ्या परीक्षा विद्यार्थी गांभीर्याने घेत नसल्याचे लक्षात आल्यानेही त्या परीक्षांचे गुण तसेच, विविध प्रकल्प व उपक्रमाचे असे २० टक्के गूण अंतिम परीक्षेत ग्राह्य धरले जाणार आहेत.
--------------------------------
क्रीडा धोरणाचा ११३ विद्यार्थ्यांना लाभ
राज्य सरकारने लागू केलेल्या क्रीडा धोरणाचा ११३ विद्यार्थ्यांना लाभ मिळाला आहे. यात २७ विद्यार्थिनींचाही समावेश आहे.
---------------------------------------
सरकारी विद्यालयांची विशेष कामगिरी...
राज्यातील वीस विद्यालयांनी शंभर टक्के निकाल लावण्याचा मान मिळवला असून त्यांचे मंडळातर्फे अभिनंदन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या वीस विद्यालयांमध्ये चक्क सात सरकारी माध्यमिक विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. त्याचप्रमाणे बोरी येथील मतिमंद मुलांसाठी असलेल्या विद्यालयाचाही निकाल शंभर टक्के लागला आहे. याचे श्रेय शालान्त मंडळाने त्या विद्यालयातील शिक्षकांना दिले आहे.
----------------------------------
शून्य टक्के निकाल...
शिक्षण क्षेत्रात अग्रस्थानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्यात दोन विद्यालयांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. चंद्रनाथ एज्युकेशन सोसायटी असोल्डा, चांदर या विद्यालयातील ४ पैकी ३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सेंट ऍन्थनी विद्यालय असोल्णा, सासष्टी या विद्यालयातील ९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील एकाच विद्यार्थ्याला "एटीकेटी' मिळाली.
------------------------------------------------
शंभर टक्के निकाल लागलेली विद्यालये...
शिवाजी राजे माध्यमिक विद्यालय, खोलपावाडी साळ
सरकारी माध्यमिक विद्यालय, गवळ- खोला, काणकोण
सेंट तेरेझा माध्यमिक विद्यालय, वास्को
लोकमान्य टिळक विद्यालय, कवळे-फोंडा
सेंट मेरी माध्यमिक विद्यालय, फोंडा
डॉ. सखाराम गुडे विद्यालय, वजनगाळ शिरोडा
सरकारी माध्यमिक विद्यालय, गांजे -उजगाव
श्री नवदुर्गा एज्युकेशन व कल्चरल सोसायटी विद्यालय
लोकविश्वास प्रतिष्ठान मिडल विद्यालय ढवळी, फोंडा
सरकारी माध्यमिक विद्यालय, शेल्डे केपे
सरकारी माध्यमिक विद्यालय मायणा, केपे
सरकारी माध्यमिक विद्यालय आंबावली, केपे
फातिमा कॉन्व्हेंट माध्य. विद्यालय, मडगाव
श्री दामोदर विद्यालय, मडगाव
प्रेझेंटेशन कॉन्व्हेंट माध्यमिक विद्यालय, मडगाव
अवर लेडी ऑफ सुकूर माध्यमिक विद्यालय, वेर्णा मडगाव
असुमप्ता कॉन्व्हेंट माध्य. विद्यालय, सारझोर- चिंचीणी सासष्टी
सरकारी माध्य. विद्यालय नेत्रावळी, सांगे
सरकारी माध्य. विद्यालय, शेळप- सत्तरी
अवर लेडी ऑफ रोझरी विद्यालय करंझाळे, दोनापावला
------------------------------------------
दोन विषयात नापास विद्यार्थ्यांना 'एटीकेटी'
या वर्षीपासून पहिल्यांदाच दोन विषयांत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना "एटीकेटी' देण्यात आली आहे. त्यामुळे दोन विषयांत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावीच्या वर्गात प्रवेश घेता येणार आहे. परंतु, त्यांना ऑक्टोबर किंवा मार्च महिन्यात त्या दोन विषयांत उत्तीर्ण होणे गरजेचे आहे, अन्यथा त्यांना बारावीच्या परीक्षेला बसता येणार नाही. एका विषयात नापास झालेल्या ४२७ विद्यार्थ्यांना "एटीकेटी' तर दोन विषयांत नापास झालेल्या ५८६ विद्यार्थ्यांना "एटीकेटी'चा लाभ मिळाला आहे.
साडेतीन लाखांचा चरस डिचोली छाप्यात जप्त
पणजी, दि. २७ (प्रतिनिधी): डिचोली येथील शानभाग हॉटेलच्याबाहेर काल मध्यरात्री टाकलेल्या छाप्यात अमली पदार्थ विरोधी पथकाने साडेतीन लाख रुपयांचा ३ किलो ५१० ग्राम चरस जप्त केला. यात मूळ नेपाळ येथे राहणारे रामपाल वासुदेव पटेल व विश्वनाथ शीतल प्रसाद या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून वरील अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. आज या दोघांना सायंकाळी डिचोली प्रथम वर्ग न्यायालयात हजर करून ७ दिवसांची पोलिस कोठडी मिळवण्यात आली आहे. दोन्ही संशयित अट्टल गुन्हेगार असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्यांच्याविरोधात अन्य राज्यात पोलिस स्थानकांत किंवा गोव्यात गुन्हे नोंद आहेत का, याची पाहणी केली जात असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
अधिक माहितीनुसार डिचोली येथे अमली पदार्थाची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार बनावट ग्राहक बनवून या दोघांना ताब्यात घेण्यासाठी सापळा रचण्यात आला होता. त्यानुसार त्या दोघांकडे अमली पदार्थाची मागणी करून त्यांना काल भेटण्यासाठी बोलावले होते. मध्यरात्री रामपाल व विश्वनाथ ठरल्यानुसार चरस घेऊन विक्रीसाठी आले असता आधीच दबा धरून बसलेल्या अमली पदार्थविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले. यावेळी दोघांची झडती घेतली असता रामपाल याच्याकडे १ किलो ५४५ ग्राम तर विश्वनाथ याच्याकडे १ किलो ९६५ ग्राम चरस सापडला, अशी माहिती या पथकाचे पोलिस अधीक्षक वेनू बन्सल यांनी दिली.
सदर छापा श्री. बन्सल व उपअधीक्षक नरेश म्हामल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील गुडलर, पोलिस शिपाई ईमय्या गुरय्या, श्रीनीवासदो पिदूगो, नागेश पार्सेकर, समीर वारखंडेकर व सदाशिव गावडे यांनी टाकला. या विषयीचा अधिक तपास उपनिरीक्षक गुडलर करीत आहेत.
अधिक माहितीनुसार डिचोली येथे अमली पदार्थाची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार बनावट ग्राहक बनवून या दोघांना ताब्यात घेण्यासाठी सापळा रचण्यात आला होता. त्यानुसार त्या दोघांकडे अमली पदार्थाची मागणी करून त्यांना काल भेटण्यासाठी बोलावले होते. मध्यरात्री रामपाल व विश्वनाथ ठरल्यानुसार चरस घेऊन विक्रीसाठी आले असता आधीच दबा धरून बसलेल्या अमली पदार्थविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले. यावेळी दोघांची झडती घेतली असता रामपाल याच्याकडे १ किलो ५४५ ग्राम तर विश्वनाथ याच्याकडे १ किलो ९६५ ग्राम चरस सापडला, अशी माहिती या पथकाचे पोलिस अधीक्षक वेनू बन्सल यांनी दिली.
सदर छापा श्री. बन्सल व उपअधीक्षक नरेश म्हामल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील गुडलर, पोलिस शिपाई ईमय्या गुरय्या, श्रीनीवासदो पिदूगो, नागेश पार्सेकर, समीर वारखंडेकर व सदाशिव गावडे यांनी टाकला. या विषयीचा अधिक तपास उपनिरीक्षक गुडलर करीत आहेत.
Subscribe to:
Posts (Atom)