tag:blogger.com,1999:blog-284232452024-02-19T21:09:07.042+05:30Goa Doot - Goa's Marathi NewsBreaking News Weblog, from Goa, IndiaUnknownnoreply@blogger.comBlogger7156125tag:blogger.com,1999:blog-28423245.post-1717976254471432442011-07-31T22:28:00.005+05:302011-12-07T17:51:21.769+05:30WWW.GOADOOT.INPlease visit our new website <br /><span style="font-weight:bold;">www.goadoot.in </span><br /><br /><br /><br /><br /><br /><br /><br /><br /><br />THANK YOU<div class="blogger-post-footer">दैनिक गोवादूत वृत्तवाहिनी</div>Unknownnoreply@blogger.com4tag:blogger.com,1999:blog-28423245.post-55804161897994419922011-07-31T02:32:00.000+05:302011-07-31T02:32:00.166+05:30जिल्हा इस्पितळ की हायवे?<span style="font-weight:bold;">इस्पितळाचा इच्छा प्रस्ताव म्हणजे <br />महामार्ग चौपदरीकरण ‘कॉपी पेस्ट’</span><br /><span style="font-weight:bold;">विश्वजित राणेंच्या अध्यक्षतेखालीच सल्लागार कंपनीची निवड</span><br />पणजी, दि. २९ (प्रतिनिधी): म्हापसा जिल्हा इस्पितळ ‘पीपीपी’च्या धर्तीवर चालवण्यासाठी आर्थिक सल्लागार निवडताना आरोग्य खात्याकडून संकेतस्थळावर उपलब्ध केलेला ‘आरएफपी’ अर्थात इच्छा प्रस्ताव दस्तऐवज हा चक्क राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण इच्छा प्रस्तावाची ‘कॉपी पेस्ट’ आहे, हे आता ढळढळीतपणे स्पष्ट झाले आहे. सल्लागार निवड समितीचे अध्यक्षपद आरोग्य सचिवांकडे असताना आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनीच बैठकांचे नेतृत्व करून सल्लागार कंपनीची निवड केली, याचाही उलगडा झाल्याने या एकूणच व्यवहारात विश्वजित राणे यांचे हित असल्याचे बिंग फुटले आहे.<br />म्हापसा जिल्हा इस्पितळाचे ‘पीपीपी’करण सर्वसामान्य व गरीब लोकांना चांगली व अद्ययावत आरोग्यसेवा पुरवण्यासाठी होते आहे, हा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचा दावा धादांत खोटा व दिशाभूल करणारा ठरला आहे. सध्याचे जीर्ण अवस्थेतील आझिलो इस्पितळ जनतेच्या खिशातून शेकडो कोटी रुपये खर्चून उभारलेल्या पेडे येथील नव्या जिल्हा इस्पितळ इमारतीत स्थलांतर करण्याची निकड असताना विश्वजित राणे यांना मात्र ‘पीपीपी’ने पछाडले आहे. आपल्या मर्जीतील खासगी कंपनीकडे या इमारतीचा ताबा देऊन ‘पीपीपी’ पद्धतीवर हे इस्पितळ चालवण्याचा त्यांचा आग्रह म्हणजे छुपे ‘डीलिंग’ असल्याचा उघड आरोप विरोधक करू लागले आहेत. <br />जिल्हा इस्पितळासाठी मागवलेला ‘आरएफपी’ प्रत्यक्षात चौपदरी महामार्गाचा दस्तऐवज आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी गत विधानसभा अधिवेशनातकेला होता. या आरोपांतील सत्यता पडताळून पाहण्यासाठी सरकारी संकेतस्थळावरून हा दस्तऐवज मिळवला असता पर्रीकरांचे आरोप शंभर टक्के खरे ठरले आहेत. १४३ पानांचा हा भला मोठा दस्तऐवज महामार्ग चौपदरीकरणाचा आहे. या दस्तऐवजात ‘हायवे’चे नाव बदलून तिथे ‘जिल्हा इस्पितळ’ हे नाव टाकण्याची करामत आरोग्य खात्याने केली आहे. ही दुरुस्ती करताना अनेक ठिकाणी ‘हायवे’चे नाव तसेच राहून गेल्याने अधिकार्यांच्या बेजबाबदारपणाचा पोलखोल झाला आहे. <br /><span style="font-weight:bold;">सल्लागार निवडसमितीचे अध्यक्ष कोण?</span><br />पेडे येथील ३०० खाटांचे हे इस्पितळ ‘पीपीपी’ धर्तीवर चालवण्यासाठी सल्लागार नेमणुकीसाठी हा इच्छाप्रस्ताव मागवला होता. सल्लागार नेमणूक समितीच्या अध्यक्षपदी आरोग्य सचिवांची नेमणूक करून इतर सदस्यांच्या नियुक्तीचा ‘नोट’ त्यांनी १३ ऑगस्ट २०१० रोजी तयार केला. याच दिवशी समितीची पहिली बैठक झाली पण विशेष म्हणजे या समितीशी काहीही संबंध नसताना या बैठकीच्या इतिवृत्तावर आरोग्यमंत्र्यांची सही सापडली आहे. याचाच अर्थ या बैठकीवर राणे यांचा वरचष्मा होता हे गुपित उघड झाले आहे. तदनंतर २३ व २५ ऑगस्ट २०१० रोजी प्रत्यक्ष सल्लागार कंपनीची निवड करण्यासाठी झालेल्या बैठकांचे अध्यक्षपद विश्वजित राणे यांनीच भूषवून आरोग्य सचिवांच्या अधिकारांवर अतिक्रमण करण्याची कृती केली. अनधिकृतरीत्या सल्लागार निवड समितीचे अध्यक्षपद भूषवून सल्लागार कंपनीची निवड करण्याचा हा प्रकार विश्वजित राणे यांच्या स्वार्थी हेतूचे दर्शन घडवणारा ठरला आहे.<br /><span style="font-weight:bold;">‘आरएफपी’चा घोळ</span><br />एकतर चौपदरी हायवेचा ‘आरएफपी’ दस्तऐवज जिल्हा इस्पितळासाठी जशास तसा वापरण्याची करामत आरोग्य खात्याने केली. या दस्तऐवजात ‘हायवे’चे नाव बदलून जिल्हा इस्पितळाचे नाव टाकण्यातही हलगर्जीपणा झाल्याने आरोग्य खात्याने स्वतःचे जाहीर हसेच करून घेतले आहे. ‘आरएफपी’ संबंधी स्पष्टीकरण किंवा हरकती मांडण्यासाठी २९ जुलै २०१० ही शेवटची तारीख दिली होती व निविदा सादर करण्याची अंतिम मुदत ३० जुलै २०१० होती. एखाद्या कंपनीने २९ रोजी हा दस्तऐवज मिळवला असेल तर त्यांना हरकती मांडण्याची अजिबात संधी या प्रक्रियेत मिळाली नसल्याचेच यावरून स्पष्ट होते. सुमारे १४३ पानी हा दस्तऐवज निविदेत सहभागी झालेल्या कंपन्यांकडूनही नजरेखाली घालण्यात आला नसल्याचीच जास्त शक्यता आहे. या दस्तऐवजात अनेक ठिकाणी ‘हायवे’चा उल्लेख तसाच राहिला आहे व राज्य आरोग्य खात्याचे मुख्यालय दिल्लीत असल्याची नोंद झाली आहे. हायवे अधिकारिणीचे कार्यालय दिल्लीत असल्याने तो उल्लेख तसाच राहिल्याचे यातून स्पष्ट झाले. पान क्रमांक ११० वरील तांत्रिक प्रस्ताव अर्जावरील सल्लागाराची नेमणूक चौपदरी हायवेसाठी होत असल्याचा उल्लेखही तसाच राहून गेला आहे. या दस्तऐवजातील पान ११५च्या पुढील भागांत इस्पितळाचा उल्लेख कुठेच दिसत नाही. अशा परिस्थितीत ‘आयमॅक्स सेंट्रम कॅपिटल लि.’ या कंपनीची ४२ लाख ५९ हजार २३५ रुपयांची बोली राज्य सरकारने सल्लागारपदासाठी मंजूर केली आहे.<div class="blogger-post-footer">दैनिक गोवादूत वृत्तवाहिनी</div>Unknownnoreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-28423245.post-81352667565290394692011-07-31T02:31:00.000+05:302011-07-31T02:31:00.070+05:30मातृभाषाप्रेमींच्या सभेवरून विश्वजित राणेंचा जळफळाट<span style="font-weight:bold;">उपस्थितांची यादी तयार करण्याचे फर्मान</span><br />वाळपई, दि. ३० (प्रतिनिधी): भारतीय भाषा सुरक्षा मंचातर्फे वाळपई येथे आयोजित जाहीर सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने वाळपईचे आमदार तथा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचा जळफळाट सुरू आहे. या सभेमुळे धाबे दणाणलेल्या विश्वजितनी वाळपई परिसरातील आपल्या समर्थक पंच सदस्यांना व इतर म्होरक्यांना पाचारण करून सभेला कोणकोण हजर होते, त्यांच्या नावांची यादीच तयार करण्याचे फर्मान सोडल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे.<br />भाषा माध्यमप्रश्नी इंग्रजी माध्यमाला अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुळात मातृभाषा समर्थक मंत्र्यांचे नेतृत्व करून आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे या प्रस्तावाला विरोध करतील, अशी येथील लोकांची धारणा होती. विश्वजित राणे यांनी मात्र मुकाट्याने या प्रस्तावाला मान्यता दिल्याने सत्तरीवासीय बरेच खवळले आहेत. एरवी सरकारात आपले वजन व दरारा असल्याचा टेंभा मिरवणारे आरोग्यमंत्री या निर्णयावेळी तोंडात बोळा घालून गप्प का बसले, असा सवाल येथील मातृभाषाप्रेमींनी केला आहे. विश्वजित राणे यांच्यावर आयकर खात्याचे छापे टाकून कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांचे तोंड कायमचे बंद केले की काय, अशीही जोरदार चर्चा या भागात सुरू आहे. <br />दरम्यान, भाषा माध्यम निर्णयाचा कोणताही परिणाम सत्तरीत होणार नाही, अशा गूर्मीत वावरणार्या विश्वजित राणेंचा लवकरच भ्रमनिरास होईल, असे भाकीत वाळपईतील भाजपचे नेते देमू गांवकर यांनी केले. २४ रोजी वाळपईतील निषेध सभेला मिळालेला प्रतिसाद हे त्याचे ज्वलंत उदाहरण असल्याचेही ते म्हणाले. मंत्रिमंडळ बैठकीवेळी मौन धारण केलेल्या विश्वजित राणे यांनी निदान आता तरी भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या आंदोलनात भाग घ्यावा व हा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडावे, असे आवाहनही त्यांनी केले. वाळपईतील जाहीर सभेला हजर राहिलेल्या मातृभाषाप्रेमींना अद्दल घडवण्याची भाषा ते करीत असतील तर बंडांचा इतिहास असलेले सत्तरीवासीय त्यांच्या विरोधात बंड करण्यासही मागे राहणार नाही याची याद त्यांनी राखावी, असा इशाराही त्यांनी दिला.<div class="blogger-post-footer">दैनिक गोवादूत वृत्तवाहिनी</div>Unknownnoreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-28423245.post-67854017224940919372011-07-31T02:30:00.001+05:302011-07-31T02:30:04.561+05:30उपनिरीक्षक वैभव नाईक याची कसून चौकशी<span style="font-weight:bold;">बनावट नोटा प्रकरण</span><br />वास्को, दि. ३० (प्रतिनिधी): कॅसिनोत बनावट नोटा घेऊन खेळण्यासाठी आलेल्या ‘त्या’ युवकांना वास्को पोलिस स्थानकातील उपनिरीक्षक वैभव नाईक याच्याकडूनच सदर नोटा देण्यात आल्याचे उघड झाल्याने सतत दोन दिवस त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. बनावट नोटांच्या प्रकरणात अटक केलेल्या आदित्य यादव याला उपनिरीक्षक वैभव नाईक याने याच महिन्यात ३ लाखांच्या बनावट नोटा दिल्या होत्या, अशी माहिती तपासात समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले. <br />बनावट नोटा प्रकरणात गोवा पोलिसांचे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. समोर येत असलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आणखी दोन पोलिसांचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले. उपनिरीक्षक वैभव नाईकची वरिष्ठ अधिकार्यांकडून दोन दिवस सतत चौकशी सुरू आहे. त्यामुळे त्याच्यावरील संशय वाढला आहे. आज वैभव नाईक याला तपासासाठी कळंगुट पोलिस स्थानकावरही नेण्यात आले होते, असे समजते. तेथे निरीक्षक मंजूनाथ देसाई यांनी त्याची चौकशी केली. मात्र कळंगुट पोलिसांनी याविषयी माहिती देण्यास टाळाटाळ केली. मात्र, जुलै महिन्यात आदित्य याला पोलिस स्थानकावर बोलवून वैभव नाईकने सदर नोटा त्याला दिल्या अशी माहिती समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले.<div class="blogger-post-footer">दैनिक गोवादूत वृत्तवाहिनी</div>Unknownnoreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-28423245.post-83303057755083261142011-07-31T02:30:00.000+05:302011-07-31T02:30:03.300+05:30.. तर आंदोलनाची गरज ‘उटाला’ भासणार नाही : पर्रीकरकाणकोण, दि. ३० (प्रतिनिधी): भाजप सरकार सत्तेवर आल्यास ‘उटा’च्या बहुतेक मागण्या मान्य केल्या जातील व त्यामुळे या समाजाला आंदोलन करण्याची गरजच भासणार नाही, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केले. आज खोतीगाव पंचायतीच्या मैदानावर आदर्श युवा संघ आयोजित अनुसूचित जमात अन्याय निषेध सभेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.<br />यावेळी व्यासपीठावर काणकोणचे आमदार विजय पै खोत, पैंगीणचे आमदार रमेश तवडकर, माजी मंत्री प्रकाश वेळीप, सरपंच तेजस्विनी दैयकर, ऍड. बाबुसो गावकर, माजी सरपंच विशांत गावकर, पंच उमेश वेळीप आदी मान्यवर उपस्थित होते. <br />आत्तापर्यंत अनुसूचित जमातींसाठी २५०० नोकर्या द्यायच्या राहून गेल्या आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळाने नुकतीच मान्यता दिलेल्या अकराशे नोकर्या, तसेच आरोग्य खात्यातील ४१६ जागांपैकी बहुतेक जागा अनुसूचित जमातींतील उमेदवारांतूनच भरल्या जाव्यात. आदिवासासींना त्यांचे हक्क मिळावे, यासाठी भाजप न्यायालयीन लढाई पुकारणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.<br />अनिर्बंध खाण व्यवसायामुळे आदिवासींच्या मुलांवर मोठे संकट कोसळणार आहे. असे सांगतानाच सध्याचे शैक्षणिक धोरण जर असेच राहिले तर ‘गाकुवेध’ समाजाची मुले शिक्षणात मागे राहतील असेही पर्रीकर म्हणाले.<br />उमेश गावकर यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले. विजय पै खोत, रमेश तवडकर आदींची यावेळी समयोचित भाषणे झाली. संजय तवडकर यांनी आभार मानले. या सभेला सुमारे एक हजार आदिवासी बांधवांची उपस्थिती लाभली होती.<div class="blogger-post-footer">दैनिक गोवादूत वृत्तवाहिनी</div>Unknownnoreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-28423245.post-12548264510241042372011-07-30T02:36:00.000+05:302011-07-30T02:36:00.130+05:30यंदाचा ‘इफ्फी’ उधळणार!<span style="font-weight:bold;">भारतीय भाषा सुरक्षा मंचातर्फे आक्रमक कार्यक्रम जाहीर</span><br />पणजी, दि. २९ (प्रतिनिधी): राज्यात मोठ्या धूमधडाक्यात साजरा होणार्या सार्वजनिक गणेशोत्सवात मातृभाषांचा जयघोष करण्याचे आवाहन भारतीय भाषा सुरक्षा मंचतर्फे करण्यात आले आहे. माध्यमप्रश्नी सरकारी निर्णयाच्या निषेधार्थ १५ ऑगस्ट रोजी पणजीत ‘महादिंडी’चे आयोजन करण्यात येणार असून वर्षअखेरीस साजरा होणारा यंदाचा ‘इफ्फी’ महोत्सव उधळून लावला जाईल, असा कडक इशारा मंचातर्फे देण्यात आला आहे. <br />आज इथे पत्रकार परिषदेत बोलताना मंचाच्या निमंत्रक तथा माजी मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांनी ही घोषणा केली. या प्रसंगी प्रा. सुभाष देसाई, स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली, प्रा. सुभाष वेलिंगकर, अरविंद भाटीकर, प्रा. पांडुरंग नाडकर्णी व किरण नाईक उपस्थित होते. श्रीमती काकोडकर पुढे म्हणाल्या की, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपापल्या उपक्रमांमध्ये मराठी व कोकणी भाषांवर सरकार व कॉंग्रेस पक्षाने केलेला आघात आणि अन्यायाविरुद्ध निषेध ठराव, जागृतीविषयक व्याख्याने आणि आरास व सजावट तसेच देखाव्यांच्या माध्यमांतून आपला निषेध प्रकट करून या आंदोलनाला बळकटी प्राप्त करून द्यावी. मातृभाषेवरील समर्पक श्लोकांचा व आशयाचा वापर करण्याचे आवाहनही गणेशभक्तांना करण्यात आले आहे.<br />५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता काणकोण येथे सुमारे एक हजार युवकांची जाहीर सभा होईल. ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता मडकई मतदारसंघातील दोन खांब, शंकर पाठशाळा येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. १५ ऑगस्ट रोजी राज्यातील सुमारे पाच हजार भजनी कलाकार मातृभाषेवरील अन्यायाविरुद्ध पणजीत ‘महादिंडी’ काढणार आहेत. भाषा माध्यमप्रकरणी दुटप्पी धोरण स्वीकारलेल्या कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या मंत्री व आमदारांना घेराव घालण्याची योजनाही आखण्यात आली आहे. ‘इफ्फी’ उद्घाटनावेळी पंधरा ते वीस हजार गोमंतकीय रस्त्यावर उतरून हा सोहळा उधळून लावतील, असेही शशिकलाताईंनी सांगितले.<br />भाषा माध्यम प्रश्नाची सांगड राजभाषा आंदोलनाशी घालून काही स्वार्थी लोकांनी चालवलेल्या अपप्रचाराला अजिबात बळी पडू नये, असे आवाहन मंचतर्फे करण्यात आले. भावी पिढीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मराठी व कोकणीचे रक्षण हा मंचाचा हेतू आहे व त्यामुळे या आंदोलनाला बदनाम करणार्या किंवा त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करणार्यांकडे दुर्लक्ष करणेच योग्य ठरेल, असा सल्लाही श्रीमती काकोडकर यांनी दिला.<br />----------------------------------------------------------------------<br /><span style="font-weight:bold;">‘केजी’त मातृभाषाच हवी!</span><br />पूर्व प्राथमिक संस्थांच्या नावाने ‘केजी’चे जाळे पसरवून मुलांना लहान वयातच इंग्रजीच्या मोहजाळ्यात अडकवण्याचा डाव हाणून पाडावा लागेल, असे मत प्रा. पांडुरंग नाडकर्णी यांनी व्यक्त केले. ‘केजी’ संस्थांवरील नियंत्रणासाठी कायदा करण्याची तयारी सुरू असताना तिथे फक्त मातृभाषेतूनच मुलांशी संवाद व्हावा, असेही ते म्हणाले. ‘केजी’च्या नावाने बालमनावर इंग्रजीचे संस्कार करून त्यांनी इंग्रजी हेच प्राथमिक शिक्षणाचे माध्यम म्हणून निवडावे, असा घाट घालण्यात येत आहे. हे कारस्थान वेळीच हाणून पाडावे लागेल, असेही ते म्हणाले.<br />-----------------------------------------------------------------------<br /><span style="font-weight:bold;">पुढील आंदोलनाचे टप्पे</span><br />- ५ ऑगस्ट : काणकोण येथे युवकांची जाहीर सभा.<br />- ६ ऑगस्ट : दोन खांब - मडकई येथे जाहीर सभा.<br />- १५ ऑगस्ट : भजनी कलाकारांतर्फे ‘महादिंडी’.<br />- ‘इफ्फी’चा उद्घाटन सोहळा उधळण्यासाठी सुमारे पंधरा ते <br /> वीस हजार मातृभाषाप्रेमी सज्ज. सर्व रस्ते रोखून धरले जातील.<div class="blogger-post-footer">दैनिक गोवादूत वृत्तवाहिनी</div>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-28423245.post-23408950447003695362011-07-30T02:34:00.001+05:302011-07-30T02:34:00.087+05:30सरकारकडून शिक्षणाचा खेळखंडोबा<span style="font-weight:bold;">विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणे थांबवा : प्रा. पार्सेकर</span><br />पणजी, दि.२९ (प्रतिनिधी): राज्यात सत्तेवर असलेल्या कॉंग्रेस सरकारने सर्वच क्षेत्रांत बजबजपुरी माजवली असून शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात अभद्र प्रयोग करून हे सरकार शिक्षणाची अक्षरशः खिल्ली उडवत आहे. शाळा सुरू होऊन दोन महिने लोटल्यानंतर आता दोन विषयांत नापास झालेल्या अकरावीच्या विद्यार्थ्यांना बारावीत प्रवेश देण्याचा सरकारने घेतलेला निर्णय ही शिक्षणाची क्रूर थट्टाच आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केली. आज भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत पक्षप्रवक्ते राजेंद्र आर्लेकर उपस्थित होते.<br />सरकारने १२ जुलै रोजी काढलेल्या नव्या आदेशानुसार, अकरावीत दोन विषयांत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना ‘एटीकेटी’ मिळून तो बारावीत बसू शकतो. यापूर्वी फक्त एका विषयात नापास झालेल्यांना ही संधी मिळत होती. मात्र उच्च माध्यमिक विद्यालये सुरू होऊन आज दोन महिने उलटले आहेत. नापास विद्यार्थ्यांनी अन्य अभ्यासक्रमांसाठी (आयटीआय इत्यादी) प्रवेश घेतला आहे. काहींनी शिक्षण सोडून नोकर्या धरल्या आहेत. त्यामुळे उशिराने हा आदेश काढण्याचे प्रयोजन काय, असा प्रश्न प्रा. पार्सेकर यांनी उपस्थित केला. सरकारच्या या मनमानी कारभारामुळे विद्यार्थी व पालकांचा शिक्षणावरचा विश्वास उडून या क्षेत्राचे अधःपतन होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. शिक्षणमंत्री आपल्या कुवतीप्रमाणे निर्णय घेत आहेत व मुख्यमंत्री त्यांना पाठीशी घालून शिक्षणाचा बाजार मांडत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.<br />प्रा. पार्सेकर यांनी यावेळी ‘अंतर्गत मूल्यमापन’ धोरणाबाबतही नाराजी व्यक्त केली व बदल करावयाचेच असतील तर ते शैक्षणिक वर्ष सुरू होण्याअगोदर करावेत, असा सल्ला दिला. माध्यान्ह आहार योजनेवर सरकारचे अजिबात लक्ष नसल्यामुळे या योजनेचा फज्जा उडाला असून मुलांचे जीव धोक्यात आले असल्याची टीका त्यांनी केली.<br /><span style="font-weight:bold;">बनावट नोटांप्रकरणी पोलिस<br />अधिकार्यास अटक करा : आर्लेकर</span><br />गोव्याचे पोलिस अमली पदार्थाच्या व्यवहारात गुंतल्याचे जगजाहीर होते; मात्र, आता पोलिस बनावट नोटा प्रकरणातही सामील असल्याने गोव्याची सुरक्षाव्यवस्था धोक्यात आली असल्याचे प्रतिपादन यावेळी राजेंद्र आर्लेकर यांनी केले. पकडलेल्या संशयितांना बनावट नोटा पुरवणार्या ‘त्या’ पोलिस अधिकार्याला त्वरित अटक करा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.<div class="blogger-post-footer">दैनिक गोवादूत वृत्तवाहिनी</div>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-28423245.post-49460369551521858442011-07-30T02:33:00.000+05:302011-07-30T02:33:00.463+05:30बनावट नोटा प्रकरणात गोवा पोलिसांचे ‘रॅकेट’?<span style="font-weight:bold;">आणखी दोन पोलिस गुंतल्याचे उघड</span><br />वास्को, दि. २९ (प्रतिनिधी): कळंगुट येथील कॅसिनोत बनावट नोटाघेऊन खेळण्यासाठी आलेल्या तीन युवकांना अटक केल्यानंतर वास्को पोलिस स्थानकातील एका अधिकार्यानेच या नोटा त्यांना पुरवल्याचे काल समोर आले होते. दरम्यान, या प्रकरणात आणखी दोघा पोलिसांचा समावेश असल्याचे आज उघडकीस आल्याने एकच खळबळ माजली आहे. अटक करण्यात आलेल्या हेमंत चोडणकर या संशयिताची गाडी आज संध्याकाळी कळंगुट पोलिसांनी चिखली, वास्को येथून महसूल मंत्री जुझे फिलिप डिसोझा यांच्या घरासमोरून जप्त केली.<br />बनावट नोटाप्रकरणी कळंगुट पोलिसांनी सावंतवाडी येथील सुदेश गौड व वास्कोतील हेमंत चोडणकर व आदित्य (चिंतामणी) यादव या युवकांना चार दिवसांपूर्वी अटक केली होती. त्यानंतर आदित्य याच्या फ्लॅटवर धाड घातली असता २ लाख ७७ हजार ५०० रुपयांच्या आणखी बनावट नोटा सापडल्या. या प्रकरणात वास्को पोलिस स्थानकातील एका अधिकार्याचा समावेश असल्याचे समजल्याने कळंगुट पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी त्यांची चौकशी केली होती. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आणखी दोन पोलिस गुंतले असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या अधिकार्यांची नावे उघड करण्यास नकार दिला.<br />महसूलमंत्र्यांच्या घरासमोरून गाडी जप्त<br />दरम्यान, आज संध्याकाळी कळंगुट पोलिसांनी संशयित हेमंत याने कॅसिनोत जाताना वापरलेली चारचाकी महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा यांच्या घरासमोरून जप्त केली. या घटनेमुळे अनेक प्रकारचे तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. याप्रकरणी ‘गोवादूत’च्या प्रतिनिधीने जुझे फिलिप यांना छेडले असता त्यांनी संशयित हेमंत आपल्याला भेटायला आला होता हे मान्य केले. मात्र, असे हजारो लोक आपल्याला रोज भेटण्यासाठी येत असतात, असेही ते म्हणाले.<div class="blogger-post-footer">दैनिक गोवादूत वृत्तवाहिनी</div>Unknownnoreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-28423245.post-4548855825486158682011-07-30T02:32:00.000+05:302011-07-30T02:32:00.457+05:30अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप<span style="font-weight:bold;">राज्य मंत्रिमंडळ बैठकीत विविध निर्णय</span><br />पणजी, दि. २९ (प्रतिनिधी): राज्यातील अकरावी व बारावीच्या सुमारे २५ हजार विद्यार्थ्यांना लॅपटॉपचे वितरण करण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुलीला जन्म देणार्या मातेला तात्काळ ५ हजार रुपयांची आर्थिक मदत देणारी ‘ममता’ योजना, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना वाढीव निवृत्ती योजना व केपेसाठी साहाय्यक सहकार निबंधकांची नियुक्ती आदी निर्णय या बैठकीत घेण्यात आले.<br />भाषा माध्यमप्रश्नी घेतलेल्या वादग्रस्त निर्णयानंतर आज तब्बल दोन महिन्यांनी ही मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली. बैठकीनंतर बोलावलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी वरील निर्णयांची माहिती दिली. केंद्र सरकारला पत्र पाठवून ‘एमपीटीला’ आपल्या सर्व सीमांचे नव्याने आरेखन करण्याची विनंती करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. केपे विभागातील बहुतांश सहकारी संस्थांची गैरसोय लक्षात घेऊन केपे साहाय्यक सहकार निबंधक कार्यालय सुरू करण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली. विविध सहकारी संस्थांना गोदाम व कार्यालय इमारत बांधण्यासाठीच्या योजनेचे नूतनीकरण करून ही मदत वाढवण्याचाही निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. संगणक व फर्निचर खरेदीसाठीही अर्थसाहाय्य देण्याचे ठरले. <br />मुलीला जन्म देणार्या मातांना तात्काळ ५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. तसेच मुलीच्या लग्नासाठी आता २५ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य देण्याची योजनाही चालीस लावण्यात आली आहे. अंगणवाडी सेविकांना दोन लाख व मदतनिसांना १ लाख रुपये निवृत्तीलाभ देण्यासही या बैठकीत मंजुरी मिळवण्यात आली. फर्मागुढी अभियांत्रिकी महाविद्यालयांत सेझा गोवा कंपनीच्या सहकार्याने चार वर्षांचा खाण अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करण्यासही मान्यता देण्यात आली. पाच वर्षांपर्यंतचा खर्च ही कंपनी करणार आहे, असे मुख्यमंत्री कामत यांनी जाहीर केले. कारागीर प्रशिक्षण संचालनालयातर्फे पश्चिम घाट विकास योजनेअंतर्गत १० संगणक प्रशिक्षण केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत.<div class="blogger-post-footer">दैनिक गोवादूत वृत्तवाहिनी</div>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-28423245.post-89611309048278451162011-07-30T02:28:00.000+05:302011-07-30T02:28:00.092+05:30आगशी अपघातात एक ठार, एक जखमीवास्को, दि. २९ (प्रतिनिधी): शुक्रवारी रात्री ८च्या सुमारास आगशी येथे कदंब व पल्सर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पल्सरवर मागे बसलेला मेहबूब (३८) हा मूळ कर्नाटक येथील इसम जागीच ठार झाला. पल्सरचालकाची स्थिती गंभीर असून त्याला गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे.<br />मिळालेल्या माहितीनुसार, जीए ०३ एक्स ०१५६ या क्रमांकाची कदंब बस मडगावहून पणजीला येत होती तर वरील दोघे पल्सरवरून पणजीच्याच दिशेने निघाले होते. आगशी येथील हमरस्त्यावर त्यांच्यात टक्कर झाली असता पल्सरच्या मागे बसलेला मेहबूब रस्त्यावर फेकला गेला व त्यात त्याचे जागीच निधन झाले. या अपघातात पल्सरचालक गंभीर जखमी झाला असून त्याला गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. त्याचे नाव समजू शकले नव्हते. आगशी पोलिस पुढील तपास करत आहेत.<div class="blogger-post-footer">दैनिक गोवादूत वृत्तवाहिनी</div>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-28423245.post-29013428191623170682011-07-30T02:27:00.000+05:302011-07-30T02:27:00.916+05:30होय.. विश्वजितसारखा पैसा केला नाही हे खरे!<span style="font-weight:bold;">आमदार दयानंद मांद्रेकरांचा टोला</span><br />म्हापसा, दि. २९ (प्रतिनिधी): शिवोलीचे आमदार या नात्याने दयानंद मांद्रेकर यांनी गेल्या तीन कार्यकाळांत काहीच केले नाही, असा आरोप आरोग्यमंत्री विश्वजित राणे करीत आहेत. विश्वजित राणेंच्या या आरोपांना आमदार दयानंद मांद्रेकर यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. आरोग्यमंत्री म्हणतात ते सत्य असून त्यांच्याप्रमाणे राजकारणात आपण पैसा केला नाही हे अगदी खरे आहे, अशी कोपरखळी मारून त्यांनी विश्वजित राणे यांना घायाळ केले आहे. <br />प्रादेशिक आराखड्याच्या नावाने येथील भूखंडांची विक्री करून कोट्यवधी रुपयांची दलाली आपण मिळवली नाही, ‘सेझ’च्या नावाने शेतकर्यांच्या जमिनी बड्या उद्योगांना कवडीमोल दरांत विकण्याचे पाप आपल्या हातून घडले नाही, ‘पीपीपी’च्या नावाने सरकारी मालमत्ता खाजगी कंपनीच्या घशात घालून तिथेही दलाली उकळण्याचा घोटाळा आपण केलेला नाही, जनतेच्या कष्टाच्या पैशांवर चैन करण्याचे महापाप आपल्या कुटुंबाकडून कधी घडले नाही, अशी उपहासगर्भ टिप्पणी करून, या सर्व बाबतीत आपण निष्क्रियच ठरलो हा विश्वजित राणेंचा आरोप खराच असल्याचा टोला आमदार मांद्रेकर यांनी हाणला. <br />शिवोली मतदारसंघाच्या विकासासाठी व येथील सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी आमदार दयानंद मांद्रेकर यांनी कोणते योगदान दिले याची पोचपावती जनताजनार्दन देईल. विश्वजित राणे यांच्याप्रमाणे आत्मस्तुती करण्याची सवय आपल्याला नाही. ‘पैसा कुठून येतो हे विचारू नका, मिळतो तर घेत राहा’, अशी भाषा वापरणारे नेते गोव्याचे काय भले करणार आहेत याचा बोध आत्तापासूनच जनतेने घ्यावा, असा सल्लाही आमदार मांद्रेकर यांनी दिला. शिवोलीतील जनता भोळीभाबडी जरूर आहे, पण आपला आत्मसन्मान तिने राखून ठेवला आहे. पैसा फेकून राजकीय तमाशा करू पाहणार्यांना शिवोलीकर अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वासही आमदार दयानंद मांद्रेकर यांनी बोलून दाखवला.<div class="blogger-post-footer">दैनिक गोवादूत वृत्तवाहिनी</div>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-28423245.post-49980541281263461952011-07-29T02:58:00.000+05:302011-07-29T02:58:00.659+05:30येडीयुराप्पांचा राजीनामा<span style="font-weight:bold;">नव्या नेत्याची आज निवड</span><br />नवी दिल्ली, दि. २८ : कर्नाटकातील कथित खाण घोटाळाप्रकरणी लोकायुक्तांनी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील काही सदस्यांवर ठपका ठेवल्यानंतर भाजप संसदीय मंडळाने आज येडीयुराप्पा यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा तात्काळ सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार येडीयुराप्पा यांनी तात्काळ आपला राजीनामा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना पाठविला. भाजप विधिमंडळ पक्षाचा नवा नेता उद्या शुक्रवारी निवडला जाणार आहे.<br />येडीयुराप्पा यांच्या राजकीय भवितव्याचा ङ्गैसला काय होणार, याविषयी राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चा होती. भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी आज या चर्चेला विराम देत येडीयुराप्पा यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले. पक्षाच्या आदेशाचे पालन करीत येडीयुराप्पा यांनी भाजपाध्यक्षांकडे ङ्गॅक्सद्वारे राजीनामा पाठविला आहे. तथापि, ते ३१ जुलै रोजी आपला औपचारिक राजीनामा राज्यपालांकडे सादर करणार आहेत.<br />लोकायुक्तांचा अहवाल सादर होताच भाजप विधिमंडळ पक्षाची आज तातडीची बैठक बोलावण्यात आली. पक्षाची राष्ट्रीय स्तरावर प्रतिमा जोपासण्यासाठी, भाजपने भ्रष्टाचाराविरोधात छेडलेला लढा बळकट करण्यासाठी कर्नाटकात नेतृत्वबदलाची गरज आहे आणि यासाठी आपण तात्काळ राजीनामा द्यायला हवा, अशी सूचना या बैठकीत येडीयुराप्पा यांना करण्यात आली. नवा नेता निवडण्यासाठी कर्नाटक भाजप विधिमंडळ पक्षाची उद्या शुक्रवारी बैठक होत असून, या बैठकीला केंद्रीय निरीक्षक म्हणून भाजपचे वरिष्ठ नेते अरुण जेटली आणि राजनाथसिंग उद्याच बंगलोरला रवाना होणार आहेत, अशी माहिती भाजपचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली. या बैठकीत भाजपचे मार्गदर्शक लालकृष्ण अडवाणी, लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली, राजनाथसिंग आणि व्यंकय्या नायडू उपस्थित होते. <br />दरम्यान, येडीयुराप्पा यांचे उत्तराधिकारी म्हणून भाजपचे खासदार आणि माजी प्रदेशाध्यक्ष सदानंद गौडा, विद्यमान प्रदेशाध्यक्ष के. एस. ईश्वराप्पा, राज्याचे उच्च शिक्षण मंत्री व्ही. एस. आचार्य, विधिमंत्री सुरेश कुमार आणि गृहमंत्री आर. अशोक यांच्यापैकी एकाची निवड होणार असल्याचे वरिष्ठ गोटातून सांगण्यात आले.<div class="blogger-post-footer">दैनिक गोवादूत वृत्तवाहिनी</div>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-28423245.post-20236137005214582372011-07-29T02:57:00.000+05:302011-07-29T02:57:00.630+05:30कुडतरी येथे १२ विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहारातून विषबाधामडगाव, दि. २८(प्रतिनिधी): वास्को येथे माध्यान्ह आहाराने माजवलेला हलकल्लोळ ताजा असतानाच आज कुडतरी येथील एका शाळेत माध्यान्ह आहारातून विषबाधा होऊन १२ मुले आजारी पडली. त्यांना तेथील सरकारी प्राथमिक आरोग्यकेंद्रात दाखल करण्यात आले. पैकी सात जणांना प्रथमोपचारानंतर घरी पाठविण्यात आले तर पाच विद्यार्थी उपचार घेत आहेत. तथापि, ही अन्न विषबाधा नेमकी कशामुळे घडली ते सायंकाळपर्यंत उघड झाले नव्हते. <br />कुडतरी येथील अवर लेडी ऑफ कार्मेल हायस्कूलमध्ये पाचवीच्या वर्गात हा प्रकार घडला. सकाळी १० वा. या शाळेतील मुलांना नेहमीप्रमाणे दिकरपाल-नावेली येथील श्रीगणेश स्वयंसेवी गटाने माध्यान्ह आहार पुरविला. त्यातील भाजी मुलांनी खाल्ल्यावर साधारण तासाभराने म्हणजे ११ वाजण्याच्या सुमारास ६ मुले व ६ मुली यांनी पोटात दुखत असल्याची तक्रार केली. वर्गशिक्षकाने लगेच ही बाब मुख्याध्यापक फालेरो यांच्या लक्षात आणून दिली असता त्या सर्वांना कुडतरी प्राथमिक आरोग्यकेंद्रात नेण्यात आले. दरम्यानच्या काळात काहींनी संडासाला होत असल्याच्याही तक्रारी केल्या.<br />हा प्रकार लगेच अन्न व औषध नियंत्रकांच्या लक्षात आणून दिल्यावर त्यांनी आहाराचे नमुने गोळा केले. तसेच तालुका शिक्षणाधिकार्यांनीही शाळेला भेट देऊन चौकशी केली. मुख्याध्यापक फालेरो यांनी सांगितले की, मुलांना देण्यापूर्वी सदर अल्पोपाहार शिक्षकांनी खाऊन पाहिला होता. तसेच ही १२ मुले वगळता इतरांना काहीच त्रास झालेला नाही.<br />तपासणीसाठी नेलेल्या नमुन्याबाबतचा अहवाल सायंकाळपर्यंत उपलब्ध झाला नव्हता. सदर स्वयंसेवी गटाच्या अध्यक्षा रेखा गुंजीकर यांनी शाळेत येऊन आपली बाजू मांडली. या प्रकारामुळे कुडतरी परिसरात आज काहीसे घबराटीचे वातावरण होते.<div class="blogger-post-footer">दैनिक गोवादूत वृत्तवाहिनी</div>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-28423245.post-2056298301216177002011-07-29T02:55:00.000+05:302011-07-29T02:55:00.222+05:30लोकपाल विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी<span style="font-weight:bold;">पावसाळी अधिवेशनात संसदेत सादर होणार</span><br />नवी दिल्ली, दि. २८ : सरकारी लोकपाल विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. पंतप्रधान, उच्च न्यायव्यवस्था आणि संसदेतील खासदारांची वागणूक या तीन महत्त्वाच्या बाबी लोकपालच्या कक्षेपासून दूर ठेवणारे हे विधेयक संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात सादर करण्यात येणार आहे. दरम्यान, सरकारचे लोकपाल विधेयक म्हणजे, देशाची निव्वळ ङ्गसवणूक असल्याचा आरोप करतानाच, १६ ऑगस्टपासून आपण बेमुदत उपोषण करणार असल्याचे अण्णा हजारे यांनी जाहीर केले.<br />अण्णा हजारे यांच्या चमूने सुचविलेल्या काही सूचना या विधेयकात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. कोणत्याही केंद्रीय मंत्र्याची, प्रथम श्रेणीच्या किंवा त्यापेक्षा वरच्या दर्जाच्या अधिकार्याची चौकशी सरकारच्या मंजुरीशिवाय करण्याचे अधिकार लोकपालला देण्याची महत्त्वाची सूचना अण्णांच्या चमूने केली होती. ती सरकारने मान्य केली आहे. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या अध्यक्षतेत झालेल्या केंेद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधानांनी आपले कार्यालय लोकपालच्या कक्षेत आणण्याचा बराच आग्रह केला होता. पण, मंत्रिमंडळाने तो अमान्य केला, अशी माहिती सूचना व प्रसारण मंत्री अंबिका सोनी यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.<br /><span style="font-weight:bold;">केंद्राने केली क्रूर थट्टा!<br />१६ ऑगस्टपासून अण्णांचे बेमुदत उपोषण</span> <br />नवी दिल्ली, दि. २८ : ‘‘केंद्र सरकारने कार्पोरेटवर डोळा ठेवून अखेर ‘ङ्ग्रॅक्चर’ लोकपाल विधेयकच संमत करण्याची मनमानी केली आणि देशातील अब्जावधी जनतेला मूर्ख बनविले. देशाच्या जनतेशी केंद्र सरकारने केलेली ही क्रूर थट्टाच आहे. सद्य:स्थितीतील लोकपाल विधेयकाच्या चौकटीतून पंतप्रधान कार्यालय वगळण्यात आलेले आहे. हे विधेयक जर संसदेने संमत केले तर त्याला आम्ही आव्हान देऊ. हे विधेयक मागे घेण्याच्या मागणीसाठी आम्ही १६ ऑगस्टपासून पुन्हा बेमुदत उपोषणावर बसू,’’असे भ्रष्टाचाराविरुद्ध रान उठविणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि त्यांच्या सहकार्यांनी स्पष्ट केले आहे. <br />‘‘राजधानी दिल्लीतील ‘जंतर मंतर’ येथे १६ ऑगस्टपासून मी बेमुदत उपोषणावर बसणार आहे. संपूर्ण देश माझ्यासोबत निषेध करेल. हा निषेध एकट्या अण्णा हजारे यांचा नसेल तर संपूर्ण देशाचा असेल. आपल्या स्वातंत्र्याचा दुसरा संग्राम म्हणून जनतेने याकडे पाहावे. सक्षम लोकपाल विधेयकासाठी जनतेने संपूर्ण ताकदीनिशी रस्त्यांवर उतरावे,’’असे आवाहन अण्णा हजारे यांनी ‘राळेगण सिद्धी’ येथून केले.<div class="blogger-post-footer">दैनिक गोवादूत वृत्तवाहिनी</div>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-28423245.post-73039166101210942332011-07-29T02:54:00.000+05:302011-07-29T02:54:00.096+05:30मडगावात चोरांचा धुमाकूळ<span style="font-weight:bold;">दोन सराफी दुकाने, एक चर्च फोडली - ८ लाखांवर डल्ला</span><br /><span style="font-weight:bold;">- तिजोरी टाकून दिल्याने मोठा ऐवज वाचला</span><br />मडगाव, दि. २९ (प्रतिनिधी): मडगावात काल एकाच रात्री चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालताना तीन ठिकाणी चोर्या करून तब्बल आठ लाखांचा ऐवज लुटला. येथील दोन सराफी दुकानात व जुन्या बाजारांतील होली स्पिरिट चर्चमध्ये त्यांनी डल्ला मारला. तथापि, एका जवाहिर्याच्या दुकानातून पळविलेली तिजोरी लोकांनी हटकताच चोरांनी तेथेच टाकून दिल्यामुळे त्यातील मोठा ऐवज बचावला. अशा प्रकारे दुकानांतील तिजोरीच उचलून नेण्याचा हा पहिलाच प्रकार असून तिन्ही चोर्यांची पद्धत पाहिली तर त्यामागे एकच टोळी असावी असा संशय व्यक्त केला जात आहे.<br />मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री अडीचच्या सुमारास एका मोटरसायकलवरून दोघेजण एक पेटी घेऊन जात असल्याचे पाहून काजाराचा कार्यक्रम आटोपून शिरवडे येथे आपल्या घरी परतणार्या काही तरुणांनी त्यांना हटकले असता ती वस्तू व मोटरसायकलही तेथेच टाकून ते पसार झाले. त्यामुळे संशय येऊन त्या तरुणांनी त्यांचा पाठलाग केला असता शिरवडे येथील मलनिस्सारण प्रकल्पाच्या आवार भिंतीवरून आत उडी टाकून ते पसार झाले. त्यानंतर त्या तरुणांनी तेथील सुरक्षा रक्षकाला उठवून एकंदर प्रकार सांगितला व त्यांच्या मदतीने आत सर्वत्र शोध घेतला; पण त्यांचा पत्ता लागला नाही.<br />त्यानंतर त्यांनी मडगाव पोलिसांना वर्दी दिली असता पोलिसांनी येऊन मोटरसायकल व तिजोरी ताब्यात घेतली. परिसरात शोध घेतला असता शिरवडे मशिदीजवळच्या रामनाथ रायकर यांचे सोन्या चांदीचे दुकान फोडलेले आढळून आले. दुकानात येऊन रायकर यांनी पाहणी केली असता ती तिजोरी त्यांचीच असल्याचे दिसून आले. चोरट्यांनी तेथून साधारण ७ लाखांचे दागिने पळविल्याचे आढळून आले. तिजोरीत मोठ्या प्रमाणात असलेला ऐवज मात्र सुदैवाने हाती लागला. तिजोरीचे हँडल मोडलेले होते. त्यावरून त्यांनी तिजोरी उघडण्याचा प्रयत्न केला होता व तो साध्य न झाल्याने त्यांनी ती घेऊनच पळ काढला होता, असा कयास आहे.<br />दरम्यान, आज सकाळी येथील जगन्नाथ बिल्डिंगमधील कृष्णदास रायकर यांचे सोन्याचांदीचे दुकानही फोडल्याचा प्रकार उघडकीस आला. या दुकानातून दीड किलो चांदी चोरीस गेली. त्याची किंमत एक लाख रुपये होते. ते दुकानही शिरवडे प्रमाणेच कुलूप कापून फोडले होते. तेथे कागदात गुंडाळलेल्या दोन नव्याकोर्या ऍक्सो ब्लेड्स व स्क्रू ड्रायव्हरही आढळून आला. पोलिसांनी या वस्तू जप्त केल्या आहेत.<br /><span style="font-weight:bold;">होली स्पिरिट चर्चलाही दणका</span><br />जुन्या बाजारातील होली स्पिरिट चर्चकडेही काल रात्री चोरट्यांनी मोर्चा वळविला व खिडकीचे गज कापून आत शिरकाव केला. तेथील दोन फंडपेट्या फोडून साधारण दोन ते तीन हजारांची रक्कम त्यांनी पळविली अशी तक्रार फादर अविनाश रिबेलो यांनी केली आहे. तेथील सायबिणीची प्रतिमा असलेली व चबुतर्यावर असलेली पेटी उपटण्याचा प्रयत्नही चोरट्यांनी केला, पण त्यात त्याचे हँडल तुटले व त्यांनी तो प्रयत्न सोडून दिला असावा.<br />या तीन चोर्यांनी आज शहरात खळबळ माजली. नंतर पोलिस अधीक्षक वामन तारी, उपअधीक्षक गुरुप्रसाद म्हापणे व निरीक्षक संतोबा देसाई यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. चोरट्यांचा तपास करण्यासाठी श्वानपथकाचीही मदत घेण्यात आली.<div class="blogger-post-footer">दैनिक गोवादूत वृत्तवाहिनी</div>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-28423245.post-54272833090299420432011-07-29T02:53:00.000+05:302011-07-29T02:53:00.050+05:30बनावट नोटांच्या व्यवहारात वास्कोचा पोलिस अधिकारी?पणजी, दि. २८ (प्रतिनिधी): ड्रग्ज व्यवहारात गुंतल्याने आधीच विश्वासार्हता गमावून बसलेल्या गोवा पोलिसांचा आता बनावट नोटा पुरवण्याच्या व्यवहारातही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. कॅसिनोंत बनावट नोटा खपवण्याच्या इराद्यात असलेली एक टोळी कळंगुट पोलिसांच्या तावडीत सापडली असता त्यांनी चौकशीवेळी या नोटा वास्को पोलिस स्थानकातील एका अधिकार्याने आपल्याला पुरवल्या, असा खुलासा करून खळबळ उडवून दिली आहे. <br />कळंगुट येथील कॅसिनोत ५०० रुपयांच्या बनावट नोटा (सुमारे दोन लाखांच्या) खपवण्याच्या प्रयत्नात असलेल्या वास्को व सावंतवाडी येथील तिघांना मंगळवारी अटक करण्यात आली होती. सुदेश गौड (सावंतवाडी), हेमंत चोडणकर (बायणा, वास्को) व आदित्य यादव (मंगोरहील, वास्को) अशी त्यांची नावे आहेत. या तिघांची चौकशी केली असता, त्यांनी वास्को येथील एका पोलिस अधिकार्याकडून या बनावट नोटा आपण मिळवल्याचे जबानीत सांगितल्याची माहिती समोर आली आहे. आज (दि. २८) मध्यरात्री कळंगुट पोलिसांच्या एका पथकाने या बनावट नोटांप्रकरणी सदर पोलिस अधिकार्याची चौकशी केली असता आरोपींच्या जबानीत तथ्य असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, ‘त्या’ पोलिस अधिकार्याचे नाव जाणून घेण्यासाठी कळंगुट पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी मौन बाळगणेच पसंत केले.<div class="blogger-post-footer">दैनिक गोवादूत वृत्तवाहिनी</div>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-28423245.post-64778322204158127282011-07-29T02:52:00.000+05:302011-07-29T02:52:00.039+05:30युवक कॉंग्रेस अध्यक्षपदी प्रतिमा कुतिन्हो<span style="font-weight:bold;">मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष व चर्चिलना जबरदस्त शह</span><br />पणजी, दि. २८ (प्रतिनिधी): खुद्द मुख्यमंत्री दिगंबर कामत, प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष सुभाष शिरोडकर व सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांचा पाठिंबा लाभलेले झेवियर फियेलो यांचा ५ मतांनी पराभव करत प्रतिमा कुतिन्हो यांनी गोव्यात अनेक वर्षांनी झालेली कॉंग्रेस युवक अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. प्रतिमा कुतिन्हो यांना ३४० मते मिळाली तर झेवियर फियेलो यांच्या पारड्यात ३३५ मते पडली.<br />चर्चिलकन्या वालंका आलेमाव हिला या निवडणुकीत अपात्र ठरवल्यामुळे प्रतिमा कुतिन्हो व झेवियर फियेलो यांच्यातच सरळ लढत होणार हे निश्चित होते. मात्र, प्रतिमा कुतिन्हो मडगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी समर्थन दिलेल्या उमेदवाराचा पराभव करून निवडून आल्या होत्या व त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे त्यांच्याशी अंतर्गत वैर होते. प्रतिमा कुतिन्हो युवा अध्यक्ष होणे हा आपला नैतिक पराभव ठरणार असल्यामुळे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी प्रदेश कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर, प्रचारप्रमुख माविन गुदिन्हो व कन्येच्या निलंबनामुळे दुखावलेले चर्चिल आलेमाव यांना हाताशी धरून प्रतिमा कुतिन्हो यांच्या पाडावासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली. त्यासाठी कुंभारजुवे येथील युवा उमेदवार झेवियर फियेलो यांच्या मागे त्यांनी आपली सर्व शक्ती उभी केली. परंतु, राज्यातील युवा कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी वरील चौकडीचे मनसुबे धुळीला मिळवत युवा कॉंग्रेससाठी गेली बारा वर्षे काम केलेल्या मडगावच्या नगरसेविका प्रतिमा कुतिन्हो यांना विजयी केले.<br /><span style="font-weight:bold;">दबाव भरपूर, तरीही विजयी : प्रतिमा कुतिन्हो</span><br />पणजीत मतमोजणीनंतर बोलताना प्रतिमा कुतिन्हो यांनी सांगितले की, आपणास पराभूत करण्यासाठी अनेकांनी भरपूर प्रयत्न केले. पण कॉंग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी दबाव झुगारून आपले कार्य पाहून आपणास मते दिली. फातोर्डाचे विजय सरदेसाई, युवा अध्यक्ष संकल्प आमोणकर व पती सावियो कुतिन्हो यांच्या पाठिंब्यामुळेच आपण निवडून आलो, असे त्या म्हणाल्या.<br />अध्यक्षपदासाठीच्या उमेदवारांना मिळालेली मते : अहमद निनावले ४३, गौरी शिरोडकर ६४, गौतम भगत ६३, गोकुळदास सावंत ६२, जितेश कामत ८५, मुल्ला उर्फान २०, स्नेहा खोर्जुवेकर ०२, प्रतिमा कुतिन्हो ३४०, सुमंगल गावस ०३, सुनील नाईक ०३, सुनील शेट्ये ५६, ओबालिनो डायस ३७ व झेवियर पीटर फियेलो ३३५.<div class="blogger-post-footer">दैनिक गोवादूत वृत्तवाहिनी</div>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-28423245.post-87704208220923147872011-07-28T03:55:00.000+05:302011-07-28T03:55:00.321+05:30...तर चर्चिलविना निवडणुकीस सज्ज राहाकॉंग्रेस श्रेष्ठींच्या स्थानिक नेत्यांना स्पष्ट सूचना<br /><br />मडगाव, दि. २७ (प्रतिनिधी)<br />वालंकाच्या अपात्रतेवरून राजीनामानाट्य रचलेले आलेमावबंधू जरी श्रेष्ठींनी आपणास विविध आश्वासने दिल्याच्या फुशारक्या मारत असले तरी प्राप्त माहितीनुसार, आलेमावबंधूंच्या कुटुंबकेंद्रित राजकारणाचा कॉंग्रेस श्रेष्ठींना वीट आला आहे. ही मंडळी आपल्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊन पक्षाला अडचणीत आणण्याची शक्यता श्रेष्ठींनी पूर्वीच्या अनुभवांवरून गृहीत धरली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आलेमावबंधू पक्षात असले तर ठीक; नपेक्षा त्यांच्याविना निवडणुकीस सामोरे जाण्याच्या तयारीला लागा, अशा स्पष्ट सूचना स्थानिक नेत्यांना मिळाल्याचे खास गोटातून सांगण्यात आले.<br />युवा कॉंग्रेस निवडणुकीतून वालंका हिला अपात्र ठरविण्यावरून आलेमावबंधूंनी केलेला थयथयाट व त्यातून मंत्रिपदाचा व कॉंग्रेस पक्षाचाही त्याग करण्यापर्यंत त्यांची गेलेली मजल शेवटी त्यांच्याच अंगलट आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्यक्षात त्यांना श्रेष्ठींकडून कोणतेच आश्वासन देण्यात आलेले नाही. उलट, ‘मुकाट गोव्यात चला व राजीनामे मागे घ्या; अन्यथा मंत्रिपदालाही मुकाल’, अशी तंबी त्यांना मिळाली आहे व त्यामुळेच ते रिकाम्या हाताने गोव्यात परतले आहेत.<br />मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारच्या घडामोडींनंतर तातडीने दिल्लीस गेलेल्या मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याशी झालेल्या खास बैठकीत एकंदर घटनाक्रमावर गंभीरपणे चर्चा झाली. त्यावेळी कामत यांनी आलेमावबंधूंनी पक्षाशी फारकत घेतली तर कॉंग्रेसला सासष्टीत निवडणुका जड जातील; त्यामुळे त्यांच्याशी सामोपचाराने वागणेच योग्य होईल, अशी भूमिका घेतली. त्यावर, सामोपचाराने घेतले तरी आगामी निवडणुकांत ही मंडळी कॉंग्रेसबरोबर राहतील याची हमी कोण घेतोय, असा उलट सवाल श्रेष्ठींनी मुख्यमंत्र्यांना केला व या लोकांची खुशामत करण्याचे बंद करा, अशी समज त्यांना दिली. त्यानंतर कामत यांनी आणखी शोभा नको, असा विचार करून आलेमाव यांचे समर्थन करणे बंद केले व रविवारी रात्री थांबून ते सोमवारी तडक गोव्यात परतले.<br />सूत्रांनी असेही सांगितले की, चर्चिल यांच्याबाबत कॉंग्रेसने आता कडक धोरण स्वीकारले आहे. ते आहेत त्या स्थितीत पक्षात राहिले तर ठीक; न राहिले तर त्यांच्याविना निवडणुकांना सामोरे जाण्याच्या तयारीला आत्तापासूनच लागण्याच्या सूचना स्थानिक नेतृत्वाला दिल्या गेल्या आहेत. तसेच यापुढे चर्चिलचे कोणतेही फाजील लाड केले जाऊ नयेत असेही बजावण्यात आले आहे.<br />मिळालेल्या माहितीनुसार, एका कुटुंबातील एकापेक्षा अधिक जणांना उमेदवारी दिली जाऊ नये या नियमास अजूनही श्रेष्ठी चिकटून आहेत. मात्र, एकवेळ सध्याची (एका कुटुंबातील दोघांना उमेदवारी) स्थितीही कायम ठेवली जाईल. पण, कोणत्याही परिस्थितीत एका कुटुंबातील चौघांना उमेदवारी मिळणे शक्य नाही व तसे कोणतेही आश्वासन आलेमावबंधूंना दिले गेलेले नाही. वालंकाला युवा कॉंग्रेसच्या राष्ट्रीय समितीवर घेण्याबाबत या सूत्रांनी सांगितले की, तसे आश्वासन केवळ युवा कॉंग्रेस नेते राहुल गांधीच देऊ शकतात. पण, सद्यःस्थितीत तसे आश्वासनही दिले गेलेले नाही.<br />आलेमाव कुटुंबाने कॉंग्रेसला दिलेले योगदान जरी मोठे असले तरी त्यांच्या करणीमुळे पक्षाच्या प्रतिमेला बसलेला हादराही मोठा असून त्याची भरपाई कोणत्याही पद्धतीने होणे शक्य नसल्याचे आता श्रेष्ठींना कळून आले आहे. त्यामुळे प्रथमच कॉंग्रेसने चर्चिल यांच्या संदर्भात कठोर पावले उचलली आहेत. यापूर्वी दोन वेळा चर्चिल यांनी कॉंग्रेसला ‘हात’ दाखविलेला असून या वेळीही ते तशीच पावले उचलतील, अशी चर्चा सुरू असतानाच युवा कॉंग्रेस निवडणुकीचे निमित्त करून राजीनाम्याचे अस्त्र उगारून चर्चिल बंधूंनी या चर्चेला एका प्रकारे पुष्टीच दिली आहे. त्यामुळेच कॉंग्रेस श्रेष्ठींनी आता सावधगिरी बाळगण्याचा निर्णय घेतलेला आहे, असे समजते.<div class="blogger-post-footer">दैनिक गोवादूत वृत्तवाहिनी</div>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-28423245.post-16349355879070916932011-07-28T03:45:00.001+05:302011-07-28T03:45:00.390+05:30मिश्रा, हांडे यांना ‘मॅगसेसे’ पुरस्कारमनिला, दि. २७<br />जळगावमध्ये महिलांना स्वयंपूर्णतेचा वसा देणार्या नीलिमा मिश्रा, तसेच सौरदिव्यांमध्ये क्रातिकारी संशोधन करणारे हरीश हांडे या दोन भारतीयांना ‘आशियाचे नोबेल’ म्हणून ओळखला जाणारा प्रतिष्ठेचा ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्कार जाहीर झाला आहे.<br />जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील साडेचार हजार लोकवस्तीचे बहादरपूर या गावाचा चेहरामोहराच नीलिमा मिश्रा यांच्या कार्याने बदलला. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवीत नीलिमाताईंनी येथे अक्षरशः क्रांती घडवली. <br />भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान निकेतन संस्था स्थापन करून बहादरपूर येथे २००३ मध्ये पहिला बचत गट स्थापन करण्यात आला. या बचत गटाच्या माध्यमातून गावातील सुमारे ३०० पेक्षा जास्त महिलांना रोजगार मिळाला बचत गटाच्या माध्यमातून केलेल्या कार्याने बचत गट हीच आज बहादरपूरची खरी ओळख बनली आहे. या कार्याचा गौरव करण्यासाठीच रॅमन मॅगसेसे ङ्गाउंडेशनने २०११ च्या पुरस्कारांसाठी त्यांची निवड केली. <br />सौरदिव्यांमध्ये क्रांती<br />सौरदिव्यांच्या माध्यमातून सुमारे सव्वालाख घरे उजळणार्या हरीश हांडे या ४४ वर्षीय भारतीय अभियंत्यालाही या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ज्या गावात दिव्यांचा प्रकाश पोहोचला नव्हता अशा गरीब गावांमध्ये सौरऊर्जा पोचवण्यासाठी हांडे यांनी स्वतःची सौरऊर्जा कंपनी सुरू केली. त्यामुळे अनेक खेड्यांमध्ये प्रकाशासोबत विकासही पोहोचला. <br />मिश्रा आणि हांडे यांच्यासह इंडोनेशियाच्या मुंपुनी, कंबोडियाचे कॉल पान्हा, इंडोनेशियाचे हसानेन ज्युईनी आणि ङ्गिलिपिन्सची ऑल्टरनेटिव्ह इंडिजिनिअस डेव्हलपमेंट ङ्गाउंडेशन यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. ३१ ऑगस्ट रोजी मनिला येथे होणार्या भव्य सोहळ्यात या विजेत्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख बक्षीस असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. १९५७ मध्ये विमान अपघातात मृत्युमुखी पडलेले ङ्गिलिपाइन्सचे अध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या नावे हा पुरस्कार दिला जातो. <br /><br />या आधी आचार्य विनोबा भावे, पांडुरंगशास्त्री आठवले, सी. डी. देशमुख, बाबा आमटे, जयप्रकाश नारायण, आर. के. लक्ष्मण, मदर तेरेसा, अरुण शौरी, टी. एन. शेषन, किरण बेदी, जे.एम.लिंगडोह, एम. एस. सुब्बालक्ष्मी, मणीभाई देसाई, एल. सी. जैन, बानू कोयाजी, महेश मेहता, व्ही. शांता, व्हर्गिस कुरिअन, दारा खुर्दोई, त्रिभुवनदास पटेल, कमलादेवी चटोपाध्याय, एम. एस. स्वामिनाथन, इला भट्ट, मेबेल एरोल, रजनीकांत एरोल, प्रमोद सेठी, सी. पी. भट्ट, अरुणा रॉय, राजेंद्र सिग, शांता सिन्हा, प्रकाश-मंदाकिनी आमटे, दीप जोशी, अमिताभ चौधरी, सत्यजित रे, बी. जी. व्हर्गिस, शंभू मित्र, जी. के. घोष, के. वी. सब्बाण, रवी शंकर, महाश्वेतादेवी, पी. साईनाथ, जोकिन आर्पुथम, लक्ष्मीनारायण रामदास, संदीप पांडे, अरविंद केजरीवाल यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.<div class="blogger-post-footer">दैनिक गोवादूत वृत्तवाहिनी</div>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-28423245.post-65703110369851179872011-07-28T03:45:00.000+05:302011-07-28T03:45:01.011+05:30खनिज वाहतुकीसाठी ठोस शिस्तीचा कार्यक्रम आखाहायकोर्टाची सरकारला दोन आठवड्यांची मुदत <br /><br /><br />पणजी, दि. २७ (प्रतिनिधी)<br />बेशिस्त खनिज वाहतुकीमुळे भर रस्त्यावर सांडत असलेले खनिज, त्यातून इतर वाहनचालकांना व खास करून दुचाकीचालकांना उद्भवणारा धोका व खनिज मालाची प्रमाणापेक्षा जास्त वाहतूक आदींवर निर्बंध आणण्यासाठी ठोस उपाययोजना असलेला कार्यक्रम दोन आठवड्यांत सादर करा, असे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सरकारला दिले.<br />बेदरकार खनिज वाहतुकीमुळे उद्भवणारे अनेक प्रश्न, त्यातून होणारे रस्ता अपघात, प्रदूषण व वाहतूक नियमांचे सर्रासपणे होणारे उल्लंघन यावर ऍड. नॉर्मा आल्वारीस यांनी आज न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला. विविध खनिज ट्रक कशा पद्धतीने कायद्याचे उल्लंघन करतात हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी काही छायाचित्रेही न्यायालयासमोर सादर केली. खनिज वाहतुकीवर निर्बंध आणण्यासाठी उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या आदेशांची कशा पद्धतीने पायमल्ली होते आहे व या निर्बंधांचाही दुरुपयोग कसा होतो हे देखील ऍड. नॉर्मा यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. <br />खनिजाची गळती रस्त्यावर होऊ नये यासाठी प्रत्येक खनिज ट्रकाच्या मागील भागाला लाकडी पट्टी लावण्याची सक्ती केली होती. मुळात ही पट्टी खनिजाची गळती टाळण्यासाठी आहे; पण या पट्टीचा फायदा घेऊन ट्रकचालक अतिरिक्त खनिज माल भरतात,असा युक्तिवाद ऍड. आल्वारीस यांनी केला. मुळात ही पट्टी वाहतूक नियमांत अजिबात बसत नाही. टीप्पर ट्रकांच्या सध्याच्या मागील केसमध्ये खनिज भरताना वरील ९ इंचाचा भाग रिकामा असावा, असा नियम आहे; पण त्याची पूर्तता होत नसल्याचेही सांगण्यात आले.<br />दरम्यान, खनिज ट्रकांच्या या बेशिस्तीला खाण कंपनींनाही जबाबदार धरण्यात येईल, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले. वाहतूक खाते व खाण खाते यांनी संयुक्तरीत्या खनिज वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी ठोस कार्यक्रमाची आखणी करावी, असे सांगतानाच दोन आठवड्यांत हा कार्यक्रम न्यायालयासमोर सादर करा, असेही न्यायालयाने सुनावले आहे.<div class="blogger-post-footer">दैनिक गोवादूत वृत्तवाहिनी</div>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-28423245.post-30432965382578978812011-07-28T03:25:00.000+05:302011-07-28T03:25:00.061+05:30इरादा पत्र म्हणजे कंत्राट नव्हे<span style="font-weight:bold;">जिल्हा इस्पितळ ‘पीपीपी’ प्रकरणी सरकारचा दावा</span><br /><br />पणजी, दि. २७ (प्रतिनिधी)<br />म्हापसा जिल्हा इस्पितळ प्रकरणी राज्य सरकारने रेडियंट हेल्थकेअर कंपनीला फक्त इरादा पत्र दिले आहे. इरादा पत्र सादर करणे म्हणजे कंत्राट देणे ठरत नाही. प्रत्यक्ष करारनाम्याची वेळ येईल तेव्हा या प्रस्तावाला वित्त खात्याची मान्यता घेण्यात येईल, असा युक्तिवाद ऍडव्होकेट जनरल सुबोध कंटक यांनी आज उच्च न्यायालयात केला. <br />जिल्हा इस्पितळ ‘पीपीपी’ प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात जोरदार युक्तिवाद झाला. न्यायमूर्ती शरद बोबडे व न्यायमूर्ती फिलोमेनो रेईस यांच्या खंडपीठासमोर सुमारे चार तास ऍडव्होकेट जनरल सुबोध कंटक यांनी सरकारची बाजू मांडली. म्हापशाचे आमदार ऍड. फ्रान्सिस डिसोझा यांनी जनहित याचिका सादर करून जिल्हा इस्पितळाच्या ‘पीपीपी’करणाला आव्हान दिले आहे, तर निविदा प्रक्रियेतून बाद ठरवल्याने शालबी इस्पितळ कंपनीने आपल्यावर अन्याय झाल्याची याचिका दाखल केली आहे. या सर्व याचिकांवर सध्या एकत्र सुनावणी सुरू आहे. <br />म्हापसा जिल्हा इस्पितळाचे ‘पीपीपी’करण जनतेच्या हिताचे नाही व या सरकारी जिल्हा इस्पितळाचे ‘पीपीपी’करण करणे गैर आहे, असा दावा ऍड. फ्रान्सिस डिसोझा यांचे वकील ऍड. थळी यांनी केला. शालबी इस्पितळाच्या वतीने ऍड. आत्माराम नाडकर्णी यांनी ‘पीपीपी’ प्रक्रिया कामकाज नियमांना डावलून पार पाडल्याचे तसेच या प्रस्तावाला वित्त खात्याची मान्यताच नसल्याची भूमिका घेतली. शालबी कंपनीचा प्रस्ताव बाद ठरवून रेडियंट इस्पितळाचे कंत्राट स्वीकारण्याचा निर्णय आरोग्यमंत्र्यांच्या पातळीवर झाला, असा युक्तिवाद ऍड. नाडकर्णी यांनी केला.<br />याचिकादारांनी केलेल्या आरोपांचे खंडन करण्यासाठी ऍड. कंटक यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निवाड्यांचा आधार घेत प्रतिवादी कंपनीचा दावा कसा फोल आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. एखाद्या प्रस्तावाचे आर्थिक परिणाम असल्यास तसेच अर्थसंकल्पात या प्रस्तावाला आर्थिक तरतूद नसल्यास त्यासाठी वित्त खात्याची मंजुरी मिळवणे गरजेचे आहे, असे कामकाज नियमांत स्पष्ट केले आहे. जिल्हा इस्पितळाच्या बाबतीत हे नियम लागू होत नाहीत, असा दावा करताना त्यांनी या इस्पितळाच्या ‘पीपीपी’करणासाठी सादर केलेल्या ‘आरएफपी’ निविदेचा उल्लेख केला. या निविदेत एखाद्या कंपनीची निवड केल्यानंतर सुरुवातीला या कंपनीला इरादा पत्र सादर केले जाईल. या इरादा पत्रांवरील सर्व अटींची पूर्तता करून कंपनीकडून परत सरकारला पत्र पाठवण्यात येईल. या अटींची पडताळणी करून झाल्यानंतर व सरकार या अटींबाबत समाधानी झाल्यानंतर प्रत्यक्ष करार प्रस्ताव सादर करेल. या करार प्रस्तावावेळी सरकार वित्त खात्याची मान्यता घेईल, अशी भूमिका त्यांनी घेतली. इरादा पत्र सादर करणे म्हणजे कंत्राट बहाल करणे होत नाही व त्यामुळेच इरादा पत्रावेळी वित्त खात्याची मान्यता हवीच असे अजिबात होत नाही, असा युक्तिवाद त्यांनी यावेळी केला.<br />दरम्यान, यासंबंधी उद्या २८ रोजी युक्तिवाद पुढे चालू राहणार आहेत. शालबी इस्पितळाच्या वतीने ऍड. आत्माराम नाडकर्णी उद्या आपला युक्तिवाद करणार असून ऍड. जनरलांनी केलेले दावे ते खोडून काढणार आहेत.<br /><br />भाषा माध्यम प्रकरण सोमवारी? <br />जिल्हा इस्पितळ प्रकरणाची सुनावणी लांबल्याने भाषा माध्यम प्रकरण आजही सुनावणीसाठी येऊ शकले नाही. दरम्यान, जिल्हा इस्पितळ प्रकरणाची सुनावणी संपल्यानंतरच भाषा माध्यम प्रकरण सुनावणीसाठी घेण्याचे न्यायालयाने ठरवल्याने कदाचित ही सुनावणी आता थेट सोमवार १ ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.<div class="blogger-post-footer">दैनिक गोवादूत वृत्तवाहिनी</div>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-28423245.post-56969115394460950432011-07-28T03:20:00.000+05:302011-07-28T03:20:00.909+05:30जिल्हा इस्पितळ ‘पीपीपी’ प्रकरण<span style="font-weight:bold;">सरकारी अधिकार्यांवर तूर्त ‘एफआयआर’ नाही<br /><br />सत्र न्यायालयाच्या आदेशाला<br />हायकोर्टाची अंतरिम स्थगिती</span><br /><br />पणजी, दि. २७ (प्रतिनिधी)<br />म्हापसा सत्र न्यायालयाने जिल्हा इस्पितळ ‘पीपीपी’ प्रकरणी सरकारी अधिकार्यांवर ‘एफआयआर’ नोंदवण्याच्या दिलेल्या आदेशाला आज उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. आरोग्य सचिव राजीव वर्मा यांनी या संबंधीची आव्हान याचिका दाखल केली होती.<br />म्हापसा जिल्हा इस्पितळाच्या ‘पीपीपी’ प्रकरणात कोट्यवधींचा घोटाळा झाल्याची तक्रार काशिनाथ शेटये व इतरांनी म्हापसा पोलिस स्थानकात केली होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास हयगय केल्याने तक्रारदाराने सत्र न्यायालयात धाव घेतली असता सत्र न्यायालयाने चोवीस तासांत संबंधितांवर ‘एफआयआर’ दाखल करण्याचे आदेश जारी केले होते. या तक्रारीत आरोग्य सचिव राजीव वर्मा, आरोग्य संचालिका डॉ. राजनंदा देसाई, आरोग्य संयुक्त सचिव, ‘पीपीपी’चे संचालक अनुपम किशोर तथा रेडियंट कंपनीचा समावेश होता. आरोग्य सचिव राजीव वर्मा यांनी सर्व सरकारी अधिकार्यांविरोधात ‘एफआयआर’ नोंदवण्याच्या या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले असता न्यायालयाने त्याला अंतरिम स्थगिती दिली.<div class="blogger-post-footer">दैनिक गोवादूत वृत्तवाहिनी</div>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-28423245.post-47040683669672757802011-07-28T03:00:00.000+05:302011-07-28T03:00:00.833+05:30नेत्रावळी अभयारण्य पूर्ववत होणार?<span style="font-weight:bold;">खाणक्षेत्राचे पुनर्वसन करण्याचे न्यायालयाचे सरकारला आदेश <br /></span><br />पणजी, दि. २७ (प्रतिनिधी)<br />केंद्रीय उच्चाधिकार समितीच्या आदेशावरून नेत्रावळी अभयारण्य क्षेत्रातील बंद पाडण्यात आलेल्या खाणी बुजवून तिथे पुन्हा नैसर्गिक परिस्थिती निर्माण करण्यासाठी (पुनर्वसन) राज्य सरकारने ठोस उपाययोजना आखावी, असे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सरकारला दिले. यासंबंधी दोन आठवड्यात भूमिका स्पष्ट करा, असेही न्यायालयाने सरकारला सांगितले आहे.<br />गोव्यातील सर्वांत मोठे अभयारण्य क्षेत्र म्हणून नेत्रावळीची घोषणा झाली आहे. या अभयारण्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात खाण उद्योग सुरू असल्याचा दावा करून गोवा फाउंडेशनतर्फे केंद्रीय उच्चाधिकार समितीकडे याचिका दाखल केली होती. केंद्रीय उच्चाधिकार समितीने केलेल्या चौकशीत या याचिकेत तथ्य असल्याचे जाणवताच या सर्व खाणी बंद करण्याचे आदेश २००३ साली जारी करण्यात आले. गोवा सरकारने केंद्रीय उच्चाधिकार समितीच्या आदेशांची अंमलबजावणी करताना नेत्रावळी अभयारण्य क्षेत्रातील सर्व खाणींचे व्यवहार बंद करण्याचे आदेश जारी केले.<br />दरम्यान, गोवा फाउंडेशनतर्फे ऍड. नॉर्मा आल्वारीस यांनी आज युक्तिवाद केला. अभयारण्य क्षेत्राचे संरक्षण व्हावे या उद्देशानेच खाणी बंद केल्या हे जरी खरे असले तरी या खाणींची सध्याची स्थिती या क्षेत्राला अधिकच धोकादायक ठरत आहे. सुरू असलेल्या खाणी अचानक बंद झाल्याने त्या तशाच पडून आहेत व त्यामुळे अभयारण्य क्षेत्राचे नुकसान होत आहे. या सर्व खाणींची जागा ताबडतोब पूर्ववत नैसर्गिक स्थितीत आणण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, जोपर्यंत या खाणी बुजवून जागा पूर्ववत केली जात नाही, तोपर्यंत सदर खाण कंपन्यांना इतरत्र व्यवहार करण्यास मज्जाव करणे शक्य आहे काय, अशी पृच्छा न्यायालयाने केली.<br />दरम्यान, नेत्रावळी अभयारण्य क्षेत्रातील मुख्य अभयारण्य वॉर्डनच्या नेतृत्वाखाली या सर्व खाण जमिनीचे पुनर्वसन करण्यासाठी खास कार्यक्रम आखण्याची गरज आहे, असे ऍड. नॉर्मा अल्वारीस यांनी सांगितले असता न्यायालयाने ही मागणी मान्य केली व तसे आदेश सरकारला दिले. दोन आठवड्यांत या संबंधीचा कार्यक्रम न्यायालयाला सादर करा, असेही बजावण्यात आले आहे.<div class="blogger-post-footer">दैनिक गोवादूत वृत्तवाहिनी</div>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-28423245.post-77172169204257400672011-07-27T03:55:00.000+05:302011-07-27T03:55:00.041+05:30बिठ्ठोणात ३१ लाखांची चोरीपणजी, दि. २६ (प्रतिनिधी)<br />राज्यात चोर्या, खून, दरोडे यांचे सत्र सुरूच असून आज अज्ञात चोरट्यांनी बिठ्ठोण येथे मोठा डल्ला मारला. खारीवाडा - बिठ्ठोण येथील गजेंद्र राताबोली यांच्या घरात शिरून चोरट्यांनी २८ लाखांच्या रोकडीसह एकूण ३१ लाख हातोहात पळवले.<br />पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खारीवाडा - बिठ्ठोण येथील रहिवासी गजेंद्र राताबोली हे नेहमीप्रमाणे आज सकाळी ९.३० वाजता घरातून बाहेर पडले. ते पणजी येथील आयुर्विमा <br />कार्यालयात काम करतात. राताबोेली यांची मुले सकाळी शाळेला गेली होती. गजेंद्र राताबोली हे दुपारी आपल्या घरी परतले असता त्यांना पुढील दाराची कडी तोडलेली व दरवाजा सताड उघडा असलेला आढळून आला. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता, कपाटात ठेवलेली २८ लाख रुपयांची रोकड, ८३ हजार रुपयाची चिट फंडाची प्रमाणपत्रे व सुमारे २ लाखांचे सोन्याचे दागिने मिळून एकूण ३१ लाख रुपयांची चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. श्री. राताबोली यांनी त्वरित पर्वरी पोलिस स्थानकात या बाबत तक्रार नोंदवली. त्यानुसार, पर्वरी पोलिस निरीक्षक देवेंद्र गाड यांनी घटनास्थळी जाऊन घराची पाहणी केली व अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद केला. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. <br />दरम्यान, राज्यात अलीकडे गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना विलक्षण वाढीस लागल्या असून पोलिस खात्यात राजकारण्यांच्या होत असलेल्या हस्तक्षेपामुळे पोलिसांचे मनोबल खच्ची झाले आहे. त्याचाच फायदा चोर उठवत असल्याचे बोलले जात आहे. या आधी शहरी भागातच मोठ्या चोर्या होत होत्या. मात्र पोलिसांना त्यांचा छडा लावण्यात अपयश येत असल्याने आता चोरट्यांनी आपला मोर्चा ग्रामीण भागांकडेही वळवला आहे.<div class="blogger-post-footer">दैनिक गोवादूत वृत्तवाहिनी</div>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-28423245.post-25684274815701435782011-07-27T03:45:00.000+05:302011-07-27T03:45:01.537+05:30वालंका, युरीच्या उमेदवारीवर ‘हायकमांड’ विचार करणार<span style="font-weight:bold;">आश्वासनामुळे राजीनामे मागे - चर्चिल<br /></span><br /><br />पणजी, दि. २६ (प्रतिनिधी)<br />वालंका आलेमाव हिला बाणावलीची तर युरी आलेमाव याला सांगेची उमेदवारी देण्याबाबत गंभीरपणे विचार करू, असे आश्वासन कॉंग्रेस श्रेष्ठींनी दिले आहे. आलेमाव कुटुंबीय हा कॉंग्रेसचा आधार आहे व पक्ष त्यांचा नेहमीच ऋणी राहील, अशा शब्दांत श्रेष्ठींनी समजूत काढल्यानेच आपण राजीनामे मागे घेत आहोत, असे स्पष्टीकरण सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांनी आज दाबोळी विमानतळावर आगमन होताच पत्रकारांशी बोलताना केले. <br />युवक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडणुकीतून वालंका आलेमाव हिला अपात्र केल्याने चवताळलेल्या आलेमावबंधूंची कॉंग्रेस श्रेष्ठींनी दिल्लीत समजूत काढण्यात अखेर यश मिळवले. श्रेष्ठींशी झालेल्या चर्चेअंती अखेर त्यांनी माघार घेण्याचे ठरवले. दरम्यान, आलेमावांकडून वेळोवेळी कॉंग्रेस पक्षाला वेठीस धरण्याचे राजकारण केले जात असल्याने त्यांना श्रेष्ठींनी चांगलेच खडसावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.<br />आज चर्चिल, ज्योकीम व वालंका आलेमाव गोव्यात परतले. वालंका आलेमाव हिला पक्षाचे काम करू दे; योग्य वेळ आल्यावर तिला पक्षात स्थान मिळवून देण्याचे श्रेष्ठींनी सांगितल्याचीही खबर आहे. चर्चिल आलेमाव यांनी मात्र गोव्यात परतल्यावर केलेल्या वक्तव्यावरून आता पक्षात अधिकच धुसफुस होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वालंका आलेमाव हिला बाणावलीची उमेदवारी देण्याचे मान्य करतानाच सांगे मतदारसंघात कुणाही कॉंग्रेस नेत्याचा वावर नाही की दावाही नाही; त्यामुळेच पुढील विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने युरी याला ‘आगे बढो’ असा संदेश दिल्याचे चर्चिल म्हणाले.<br />दरम्यान, याप्रसंगी वालंका आलेमाव हिने स्वतः श्रेष्ठींपुढे आपली भूमिका स्पष्ट केली, असेही चर्चिल म्हणाले. अखिल भारतीय युवक कॉंग्रेसचे सरचिटणीसपद किंवा गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे महत्त्वाचे पद देण्याचेही श्रेष्ठींनी मान्य केले होते. पण वालंका हिने ते स्पष्टपणे नाकारले, अशी माहितीही चर्चिल यांनी दिली. वालंका हिने गोव्यात कॉंग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठीच आपण वावरत असल्याचेही श्रेष्ठींना पटवून दिले. श्रेष्ठींनी दिलेल्या आश्वासनानंतर आमच्या मनातील सर्व संशय दूर झाला असून त्यामुळेच राजीनामे मागे घेण्याचे ठरवले, असेही त्यांनी स्पष्ट केले.<div class="blogger-post-footer">दैनिक गोवादूत वृत्तवाहिनी</div>Unknownnoreply@blogger.com0