कोलकाता, दि. २ : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्या तृणमूलमध्ये समझोता झाला असून दोन्ही पक्ष मिळून ही निवडणूक लढविणार आहेत.
यासंदर्भात प्रणव मुखर्जी आणि ममता बॅनर्जी यांची काल रात्री उशिरापर्यंत बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. या समझोत्याचा पहिला टप्पा म्हणून कॉंग्रेसने दक्षिण कोलकाता येथून ममता बॅनर्जी यांच्या विरोधात आपला उमेदवार रिंगणात आणणार नसल्याची घोषणा करून टाकली. मात्र, दोन्ही पक्षांचे समान धोरण काय राहणार आणि किती जागा कोणाला मिळणार, याविषयी चर्चा व्हायची आहे. संपुआसाठी कायम वरदान ठरलेले प्रणव मुखर्जी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसमोर ममता बॅनर्जींना संपुआत आणणे, हे फार मोठे यश मानले जात आहे. पश्चिम बंगालच्या दृष्टीने या दोन पक्षांचे एकत्र येणे संपुआसाठी फायद्याचे ठरू शकते. पण, यामुळे डाव्या पक्षांच्या समस्या वाढणार आहेत. त्यांच्यासमोर कडवे आव्हान ठरलेल्या ममता बॅनर्जी आता कॉंग्रेसला जाऊन मिळाल्याने डाव्यांचा तिळपापड झाला आहे.
Tuesday 3 March, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment