Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 4 September, 2008

राज्यात दीड दिवसांच्या गणेशोत्सवाची सांगता

पणजी, दि. ४ (प्रतिनिधी) : राज्यातील दीड दिवसांच्या गणपतींचे आज थाटात विसर्जन करण्यात आले. घुमट आरतींची साथ व फटाक्यांची आतषबाजी यांच्या जोडीने व पुढील वर्षी लवकर येण्याची प्रार्थना करीत श्रींना निरोप देण्यात आला.
राजधानी पणजीत मिरामार येथील समुद्र किनाऱ्यावर तसेच बेती फेरीबोट धक्क्यावर विसर्जनासाठी लोकांनी मोठ्याप्रमाणात उपस्थिती लावली होती. गोव्यात दीड,पाच,सात,नऊ,अकरा व एकवीस दिवसांचा गणेश चतुर्थी उत्सव साजरा केला जातो. राज्यातील शहरी भागांतील लोक जादाकरून दीड दिवसांचा उत्सव साजरा करतात तर विविध ग्रामीण भागांत मात्र जादाकरून पाच दिवसांचा उत्सव साजरा केला जातो.
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने राजधानी पणजीत शांतता पसरली असली तरी विविध गावांत मात्र उत्सवाला उधाण आले आहे. पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कार्यक्रमांना खऱ्या अर्थाने सुरुवात होत असते. नोकरी व्यवसायानिमित्ताने शहरात राहणारे लोक या उत्सवानिमित्ताने आपल्या मूळ गावी जात असल्याने शहरात सामसूम पसरली आहे.

No comments: