Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 4 February, 2008

मनाचे व्यवस्थापन जीवनात यश देतेः श्री श्री रविशंकर
मडगाव, दि. 3 (प्रतिनिधी)- मनाचे व्यवस्थापन जीवनात यश देत असते. माणूस संयमी बनून एकमेकांशी सलोख्याने वागू शकतो, असे श्री श्री रविशंकर यांनी फातोर्डा स्टेडियमच्या सराव मैदानावरील भरलेल्या आनंदोत्सवात सांगितले.
आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत आनंदोत्सवाचे आयोजन केले होते. त्या आनंदोत्सवात पाच हजार लोकांनी भाग घेतला. त्यावेळी श्री श्री रविशंकर यांनी योग्य व ध्यान श्वासोश्र्वासाचे महत्त्व विषद केले.
मन हे शरीरावर काबू ठेवते, पाण्यात मासळी आनंदाने विहार करते तसे माणसाला हवेची आवश्यकता असते. खोल श्वास घेऊन बाहेर सोडण्याच्या क्रियेमुळे माणसाचे जीवनात निरोगी राहते. उपासनेतून एकाग्रता निर्माण होते. नेहमी समाधानी, आनंदी राहिला, कितीही मोठ्या तणावातून मुक्तता मिळू शकते. भारतीय संस्कृती विशाल असून माणसावर योग्य संस्कार या संस्कृतीतून होत असतात, असे सांगून श्री श्री रविशंकर आपल्या प्रवचनात म्हणाले, माणूस हा नारळाप्रमाणे आहे नारळाचा बाहेरील काथा महत्त्वाचे काम करतो, तसे माणूस सहन शक्तीने वागतो.
यावेळी भजने गाऊन प्राणामय व योगाचे महत्त्व रविशंकर यांनी सांगितले. दोन तासपर्यंत उपस्थितांना त्यांनी खिळवून ठेवले. तत्पूर्वी गोव्याच्या पोप गायिका हेमा सरदेसाई यांनी गीते गाऊन उपस्थितांचे मनोरंजन केले व वातावरण तयार केले. आयोजन समितीचे अध्यक्ष श्री. आर. एस. कामत, प्रवास नायक, डॉ. व्यंकटेश हेगडे व आर्ट ऑफ लिव्हिंगच्या परिवाराने आयोजन केले.
दि. 4 रोजी सकाळी 10.30 वाजता बोर्डा येथील श्री श्री रविशंकर मॅनेजमेंट महाविद्यालयांत विद्यार्थ्यांसमोर त्यांचे व्याख्यान होणार आहे, त्यानंतर दुपारी ते बेळगावला रवाना होतील.

No comments: