भुवनेश्वर , दि. ११ - भाजपने पाठिंबा काढून घेतल्याने अल्पमतात आलेल्या बिजू जनता दलाच्या मुख्यमंत्री नवीन पटनाईक सरकारने आज ओरिसा विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. मतदानाच्या वेळी विधानसभा अध्यक्षांनी पक्षपाती भूमिका घेतल्याचा आरोप करीत भाजप व कॉंग्रेस आमदारांनी यावेळी जोरदार गदारोळ केला..
गेल्या ११ वर्षांची भाजप-बीजेडी युती तुटल्यानंतर सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी कम्युनिस्टांशी हातमिळवणी केली. भाजप व कॉंग्रेसच्या विरोधी आमदारांनी पटनाईक सरकार पाडण्याचे जोरदार प्रयत्न केले. परंतु आज विधानसभेत मांडण्यात आलेला विश्वासदर्शक ठराव गोंधळाच्या वातावरणात मंजूर करुन घेण्यात पटनाईक यशस्वी झाले. मतदानाच्यावेळी विधानसभा अध्यक्षांनी पक्षपाती भूमिका घेतली आणि विरोधकांना बोलू दिले नाही, असे आक्षेप विरोधकांनी घेतले.
भाजपशी असलेली युती तुटल्यानंतर मुख्यमंत्री पटनाईक यांनी आपल्या ७४ समर्थक आमदारांची राज्यपालांपुढे परेड केली होती. राज्यपालांनी त्यांना ११ मार्च रोजी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आज विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला होता.
Thursday 12 March, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment