Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 28 December, 2008

सागरी अणुहल्ल्याची पाकिस्तानला चिंता

दिल्ली, दि. २७ - चीन व दक्षिण कोरियाकडून मिळविलेल्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या बळावर पाक कितीही तोरा मिरवित असला तरी समुद्रातून अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम धनुष्य आणि सुपरसोनिक वेगाने मार्गातील अडथळ्यांना हुलकावणी देत लक्ष्यावर अचूक मारा करणारे भारताचे क्रूझ क्षेपणास्त्र ब्राह्मोसचे पाककडे कोणतेही उत्तर नाही.
पाक उत्तर व मध्य भारतावर हल्ला करण्यास सक्षम आहे. मात्र दक्षिणेपर्यंत मजल मारण्याची त्याची क्षमता नाही. तेथेच फारच कमी क्षेत्रफळ असलेल्या पाकिस्तानच्या कोणत्याही ठिकाणांवर भारत अगदी सहज क्षेपणास्त्र हल्ला करू शकतो.
सध्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांऐवजी अत्यंत वेगाने मारा करणारी सुपरसोनिक क्षेपणास्त्रे अधिक प्रभावी ठरतील, असे मत रणनितीकारांनी व्यक्त केले आहे. भारताकडे असलेले ब्राह्मोस सुपरसोनिक वेगाने हल्ला करते. तेथेच पाककडे बाबर हे सुपरसोनिक वेगवाने मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. असे असले तरी ब्राह्मोसला रोखण्याचे सामर्थ्य पाककडे नाही. ब्राह्मोस क्षेपणास्त्रे जून महिन्यातच लष्कराच्या स्वाधीन करण्यात आलीत. आता नौदलाच्या आयएनएस राजपूतवरही ते तैनात आहे. याशिवाय सुखोई ३० व आयएल-३८ या लढाऊ विमानांवर तैनात करण्यासाठी चाचण्या सुरू आहेत.
भारत समुद्रातून पाकवर अण्वस्त्र हल्ला करू शकतो. हीच पाकपुढे सर्वात मोठी चिंता आहे. मागच्या वर्षी आयएनएस सुभद्रा व आयएनएस सुवर्णा लढाऊ जहाजांवर धनुष क्षेपणास्त्र प्रणाली बसविण्यात आली. ५०० कि.मी.मारक क्षमता असलेले धनुष अगदी सहज ५०० कि.ग्रॅ.वजनाचे अण्वस्त्र वाहून नेऊ शकते. आम्ही समुद्रातून सर्वप्रकारचे हल्ले करण्यास सक्षम आहोत अशी दर्पोक्ती पाकने काही दिवसांपूर्वी केली होती. मात्र तज्ज्ञांना यात फारसा दम वाटत नाही. प्रत्यक्षात पाककडे अशी प्रणालीच नाही. वायुसेनेबद्दल विचार केल्यास पाक येथेही भारताच्या बराच मागे आहे.
भारत-पाक क्षेपणास्त्र क्षमता तुलना
भारत पाक
पृथ्वी -१ , क्षमता १५० कि.मी. एम-११, क्षमता २८० कि.मी.
पृथ्वी -२ , क्षमता २५० कि.मी. हत्फ-१, क्षमता १०० कि.मी.
अग्नी -१ , क्षमता ७०० कि.मी. शाहीन-१, क्षमता ७५० कि.मी.
अग्नी -२ , क्षमता २००० कि.मी. शाहीन -२, क्षमता २००० कि.मी.
अग्नी -३ , क्षमता ३००० कि.मी. घोरी-१, क्षमता १३०० कि.मी.
ब्रह्मोस(सुपरसोनिक)क्षमता २९० कि.मी. बाबर (सुपरसोनिक) ७०० कि.मी.
धनुष , मारक क्षमता ५०० कि.मी.
(समुद्रावरून जमिनीवर)
.............
भारत-पाकने तणाव कमी करावा : चीन
वृत्तसंस्था
इस्लामाबाद, २७ डिसेंबर
दक्षिण आशियात शांती व स्थैर्य कायम करण्यासाठी भारत व पाकने तणाव कमी करावा असे आवाहन चीनचे विदेशमंत्री यांग जिएची यांनी केले आहे.
भारत व पाकने मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावाला कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करायला हवी तसेच दहशतवादाविरुद्ध संयुक्तपणे कारवाई करायला हवी असे मत जिएची यांनी पाकिस्तानचे विदेशमंत्री शाह महेमूद कुरेशी यांच्याशी दूरध्वनीवरून बोलताना व्यक्त केल्याचे वृत्त दैनिक "द न्यूज'ने दिले आहे.
पाकिस्तान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा प्रस्ताव १२६७ नुसार कारवाई करीत असून मुंबईवरील हल्लाप्रकरणी संयुक्त चौकशीकरिताही तयार असल्याचे आश्वासन कुरेशी यांनी चीनला दिले आहे.
............
भारत व पाकने संयम राखावा : अमेरिका
वृत्तसंस्था
वॉशिंग्टन, २७ डिसेंबर
मुंबईवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत आपल्यावर हल्ला चढविणार या चिंतेने पाकिस्तान त्रस्त असून त्यांनी पूर्वेकडील सीमेवर हजारो सैनिक तैनात केले आहेत. पाकची स्थिती बघता दक्षिण आशियातील शेजारी देशांनी संयम राखावा असे आवाहन अमेरिकेने केले आहे.
भारत व पाकदरम्यान सध्या तणाव तसेच युद्धसदृश स्थितीही निर्माण झाली आहे. म्हणूनच अमेरिकन अधिकारी दोन्ही देशांसोबत संपर्क ठेवून असल्याची माहिती व्हाईट हाऊसचे प्रवक्ते गोर्डन जानड्रो यांनी दिली आहे.
दोन्ही शेजारी देशांनी मुंबईवरील हल्ल्याच्या चौकशीत एकमेकांना मदत करावी व दहशतवादाचा समूळ नाश करण्यासाठी एकत्र यावे असे आम्ही वारंवार सांगत आहोत. उभय देशांमध्ये आणखी तणाव वाढेल असे काहीच घडू नये म्हणून आम्ही प्रयत्न करीत आहोत असेही ते म्हणाले.
पाकने पूर्वेकडील सीमेवर हजारो सैनिक तैनात केले असतानाच भारताने त्यांच्या नागरिकांना पाकमध्ये न जाण्याचा सल्ला दिला आहे. सद्यस्थितीतीत भारतीयांनी पाकमध्ये जाणे सुरक्षित नाही. २००१ नंतर सध्या उभय देशांदरम्यान सर्वाधिक तणावपूर्ण वातावरण आहे. २००१ मध्ये काश्मिरी दहशतवाद्यांनी संसदेवर हल्ला केला होता. त्यावेळी भारताने पाकमधील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबावर या हल्ल्याचा आरोप केला होता. मुंबईवरील हल्ल्यासाठीही लष्करलाच भारताने जबाबदार धरताना पाक कोणतीही ठोस कारवाई करीत नसल्याचा आरोप केला आहे. तेथेच पाकने हा आरोप नेहमीप्रमाणेच यावेळीही फेटाळून लावला आहे. अशा आरोप प्रत्यारोपांमुळेच तणाव वाढत असल्याची प्रतिक्रिया गोर्डन यांनी दिली आहे.

1 comment:

Unknown said...

nice information

Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

Online Survey Website
Free Survey Website
Survey Websites in Canada
Survey Websites in India
Earn Money from Home
Free Online Surveys