Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 29 December, 2008

पैसे घेऊन मत न विकण्याचा संकल्प

डिचोलीत विराट हिंदू धर्मजागृती सभा


टाळ्यांच्या गजरात या धर्मसभेत संमत झालेले संकल्प असे ः
मी ढोंगी हिंदुत्ववाद्यांना माझे मत देणार नाही.
मी हिंदुत्वासाठी कार्य करणाऱ्यालाच माझे मत देणार.
मी नववर्ष फक्त गुढीपाडव्यालाच साजरे करेन.
मी देवतांचे चित्र असलेले कपडे वापरणार नाही.


डिचोली, दि. २८ (प्रतिनिधी) -मी पैसे घेऊन माझे बहुमूल्य मत विकणार नाही यासह अनेक महत्त्वपूर्ण संकल्प करून, हिंदू जनजागृती समितीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज मैदान डिचोली येथे आयोजित हिंदू धर्मजागृती सभा आज हजारो हिंदूभिमान्यांच्या उपस्थितीत पार पडली. या धर्मसभेला मार्गदर्शन करण्यासाठी व्यासपीठावर तपोभूमीचे पीठाधीश प. पू. ब्रह्मेशानंदाचार्य महाराज, प्राचार्य सुभाष वेलींगकर, गोव्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघचालक संगम बोरकर, धर्मशक्ती सेना, मदन सावंत, सनातन संस्था, हिंदू जनजागृती समितीचे संघटक जयेश थळी आदी मान्यवर उपस्थित होते.
गिरजय प्रभूदेसाई, शुभांगी गावडे यांनी स्वागत केले. वेदमंत्रपठणाने दीपप्रज्वलन करून हिंदू धर्मसभेचे विधीवत उद्घाटन करण्यात आले. वक्त्यांचा व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांचे व विदेशातील साधकांचे स्वागत तसेच "सनातन प्रभात'चे अभिजात नाडकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. नाडकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. सदाशिव धोंड्यांनी हिंदू जनजागृती समितीची ओळख करून दिली व धर्मकार्याचा आढावा घेतला.
ब्रह्मेशानंद स्वामी यांनी आशीर्वचनात सांगितले, की आज आपल्या हिंदू समाजाचे संतुलन बिघडविण्याचे षडयंत्र रचले जात आहे. धर्माबद्दल तिरस्कार अधर्मी, शिक्षणाद्वारे विकृतीकरण होत आहे. या पार्श्वभूमीवर हिंदू धर्मजागृती सभांचे आयोजन महत्त्वपूर्ण असून, आपल्या संस्कृतीचे, धर्माचे रक्षण करण्यासाठी साऱ्यांनी कटिबद्ध झाले पाहिजे. आपली मठ, मंदिरे ही शक्तिकेंद्र बनून भावी पिढीच्या रक्षणासाठी सज्ज व्हावीत यासाठी तरूणांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली पाहिजे. आपल्या मुलांना धर्माचे शिक्षण द्या. भगवंत हा सर्वश्रेष्ठ आहे. आम्ही त्याची लेकरे आहोत. एकमेकांवर प्रेम करा, चांगल्या गुणांची कदर करा व धर्माचे रक्षण केले तरच धर्म आपले रक्षण करील हे लक्षात ठेवून धर्माचरण करून भावी पिढी, भावी गोमंतक शांत व सुंदर बनवा.
सुभाष वेलिंगकर याप्रसंगी म्हणाले, आपला विशाल आणि विस्तृत असा हिंदू समाज आज डायनासोरप्रमाणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. डायनासोर हा प्राणी अजस्त्र असला तरी संवेदनाशून्य असल्यामुळे नष्ट झाला. हिंदूंवर ज्या तीन शक्ती केंद्रातून संस्कार झाले पाहिजेत ती घर, शाळा, मंदिर आज संस्कार संवेदनक्षमता हरवून बसली आहेत. वैफल्यग्रस्त, संस्कारहिन विकृत प्रवाह घराघरांत पोहचल्यामुळे पाश्चिमात्यांचे अनुकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. भ्रष्टाचारी व स्वार्थांध कॉंग्रेस सरकार हिंदू दहशतवाद नावाचे नवे षडयंत्र पुढे आणत मुसलमानांचे लागूंलचालन करत आहे. निद्रिस्त संवेदनाहीन हिंदू आताच जागा झाला नाही तर नामशेष होईल.अन्याय सहन करू नका व हिंदू समाजाच्या राष्ट्राच्या उत्थानासाठी कार्यरत राहा.
साध्वी प्रज्ञासिंगाची अमानवीय चौकशी अफजल गुरूला मात्र फाशीची शिक्षा होऊनही फाशी देण्यात येत नाही हे या देशाचे दुर्दैव आहे.

संगम बोरकर, मदन सावंत, जयेश थळी यांचीही या धर्मसभेत भाषणे झाली.

No comments: