दाबोळी विमानतळाकडून थोड्याच अंतरावर असलेल्या महामार्गावर एक अज्ञात इसम रस्ता ओलांडत असताना त्यास मिनिबसने ठोकर दिल्याने तो पादचारी अपघातात ठार झाला. आज दुपारी अपघातात मरण पावलेल्या या व्यक्तीची उशिरा रात्रीपर्यंत ओळख पटलेली नसून सदर मयत इसम चाळीस वर्षाच्या आसपास असल्याची शक्यता वास्को पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
वास्को पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सदर अपघात घडला. दाबोळी विमानतळाच्या दिशेतून वेर्णा येथे जात असलेल्या मिनिबसच्या (क्रः जीए ०१ टी ९४६९) मध्येच एक अज्ञात पादचारी आल्याने बस चालकाचा ताबा स्टिअरिंगवरून सुटून त्याने त्याला धडक दिली. मिनिबसच्या धडकेमुळे गंभीररीत्या जखमी झालेल्या या अज्ञात पादचाऱ्याला यावेळी त्वरित बांबोळीच्या गो.मे.कॉ इस्पितळात उपचारासाठी नेण्यात आले असता येथे पोचण्यापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरकडून घोषित करण्यात आले. त्या अज्ञात मयताच्या मृतदेहाचा पंचनामा करून तो सध्या बांबोळीच्या शवागृहात ठेवण्यात आला आहे.
धडक दिलेली बस एका हॉटेलसाठी चालत असल्याची माहिती वास्को पोलिसांनी दिली. बसचालक दीपक गीर (राः खोर्ली, म्हापसा) यास ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. वास्को पोलीस स्थानकाचे निरीक्षक ब्राज मिनेझीस यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे.
Monday, 31 May 2010
मुरगाव तालुक्यात चार अपघाती मृत्यू
स्लॅबवरून पडून मुलगा ठार
चिखली येथील सह्याद्री इमारतीच्या स्लॅबवर आज संध्याकाळी येथील काही मुले खेळत असताना त्यापैकी सौरभ सरदेसाई (११ वर्षे) हा इमारतीवरून खाली कोसळल्याने त्याचे दुर्दैवी निधन झाले. सदर बालकाच्या मृत्यूमागे घातपाताचा प्रकार नसल्याची माहिती वास्को पोलिसांनी दिली असून स्लॅबवर खेळत असताना तो अपघाती खाली पडून मरण पावला.
आज संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास सदर घटना घडली. चिखली येथे असलेल्या विद्या मंदिर विद्यालयाच्या बाजूला असलेल्या सह्याद्री नावाच्या तीन मजली इमारतीच्या स्लॅबवर काही मुले बालक खेळत होती. खेळात रमलेल्या बालकांपैकी सौरभ सरदेसाई हा अचानक या इमारतीवरून खाली कोसळल्याचे यावेळी येथील लोकांच्या नजरेस येताच त्यांनी त्वरित त्यास चिखली येथे असलेल्या एका खासगी इस्पितळात उपचारासाठी नेले, मात्र येथे पोचण्यापूर्वी त्याचे निधन झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.
सौरभ खेळता खेळता स्लॅबच्या कठड्यावर चढला अशी माहिती वास्को पोलिसांना उपलब्ध झाली असून त्यावेळी त्याचा तोल गेला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, सौरभ याचा मृतदेह चिखलीच्या खासगी इस्पितळाच्या शवागृहात ठेवण्यात आल्याची माहिती वास्को पोलिसांनी दिली आहे.
चिखली येथील सह्याद्री इमारतीच्या स्लॅबवर आज संध्याकाळी येथील काही मुले खेळत असताना त्यापैकी सौरभ सरदेसाई (११ वर्षे) हा इमारतीवरून खाली कोसळल्याने त्याचे दुर्दैवी निधन झाले. सदर बालकाच्या मृत्यूमागे घातपाताचा प्रकार नसल्याची माहिती वास्को पोलिसांनी दिली असून स्लॅबवर खेळत असताना तो अपघाती खाली पडून मरण पावला.
आज संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास सदर घटना घडली. चिखली येथे असलेल्या विद्या मंदिर विद्यालयाच्या बाजूला असलेल्या सह्याद्री नावाच्या तीन मजली इमारतीच्या स्लॅबवर काही मुले बालक खेळत होती. खेळात रमलेल्या बालकांपैकी सौरभ सरदेसाई हा अचानक या इमारतीवरून खाली कोसळल्याचे यावेळी येथील लोकांच्या नजरेस येताच त्यांनी त्वरित त्यास चिखली येथे असलेल्या एका खासगी इस्पितळात उपचारासाठी नेले, मात्र येथे पोचण्यापूर्वी त्याचे निधन झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.
सौरभ खेळता खेळता स्लॅबच्या कठड्यावर चढला अशी माहिती वास्को पोलिसांना उपलब्ध झाली असून त्यावेळी त्याचा तोल गेला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, सौरभ याचा मृतदेह चिखलीच्या खासगी इस्पितळाच्या शवागृहात ठेवण्यात आल्याची माहिती वास्को पोलिसांनी दिली आहे.
ह्रद्य सोहळ्यात ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान
"राज्य कला गौरव' पुरस्कारांचे शानदार वितरण
पणजी, दि. ३० (प्रतिनिधी)- कला व सांस्कृतिक खात्यातर्फे देण्यात येणारे "राज्य कला गौरव पुरस्कार' आज एका ह्रद्य सोहळ्यात मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या हस्ते ५७ ज्येष्ठ कलाकारांना प्रदान करण्यात आले. कला अकादमीच्या मा. दीनानाथ मंगेशकर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात कलाकारांचा हा गौरव सोहळा पार पाडला. यावेळी व्यासपीठावर राज्याचे मुख्य सचिव संजय श्रीवास्तव, कला व सांस्कृतिक संचालक प्रसाद लोलयेकर, राज्य कला विकास समितीचे उपाध्यक्ष श्रीधर कामत बांबोळकर व निवड समितीचे अध्यक्ष विशाल पै काकोडे उपस्थित होते.
कलेतून उदरनिर्वाह होत नव्हता अशा ज्या काळात ज्या लोकांनी निरंतर कलेची सेवा करून ती जोपासली त्याची दखल घेऊन आज अशा कलाकारांचा सत्कार करण्यात येत असल्याचे श्री. कामत म्हणाले. या कलाकारांनी कलेद्वारे फारशी कमाई केली नसली तरी त्यांनी गोव्यासाठी अमौलिक योगदान दिले आहे. त्यांनी कलेची आराधना केली; व्यवहार केली नाही, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.
संगीत साधना करताना पुरस्कार, सत्कार यांची आस आम्ही कधीच धरली नव्हती. राज्य सरकार ग्रामीण भागातील अशा कलाकारांचा शोध घेऊन त्यांचा सत्कार करते हे उल्लेखनीय असल्याचे मनोगत डॉ. फ्रान्सिस कुलासो सर्व सत्कारमूर्तींच्या वतीने बोलताना व्यक्त केले.
मानपत्र, मानचिन्ह व पाच हजार रुपये रोख, शाल व श्रीफळ देऊन सर्व कलाकारांना गौरवण्यात आले. सरकारने आत्तापर्यंत २९५ ज्येष्ठ कलाकारांना गौरवल्याची माहिती काकोडे यांनी दिली.
यावेळी गुरुदास नवसो नाईक (नाटक), श्रीमती. शिलावती नार्वेकर (लोकसंगीत), लुईस जो दी कलंगुट (तियात्र), मच्छिंद्र र. मांद्रेकर (संगीत), पांडुरंग धर्माजी शिरोडकर (संगीत), जेम्स फ्रान्सिस ब्रागांझा (चित्रपट), चिको डिसोझा (संगीत), आनंद दामोदर गोरे (भजन), दत्ताराम स. शेटये (छायाचित्रीकरण), बाळू पुंडी वेळीप (नाटक), श्रीमती सीता पागी (लोकसंगीत), श्रीमती हिराबाई व्ही. बाळे (हस्तकला), बाळकृष्ण जी. अय्या (चित्रकला), प्रसाद तुकाराम सावंत (नाटक), डॉ. आनंद हेदे (संगीत), ह.भ.प रामचंद्र य. परांजपे (कीर्तन), रामकृष्ण जयदेव राऊत (नाटक), जगन्नाथ डी. नारोजी (कला), मनोहर पेडणेकर (लोकसंगीत), श्रीमती. कुंदा शाबा कामत (नाटक), नरेंद्र काशिनाथ कामत (साहित्य), रामराव आर. फडते (नाटक), श्रीमती जी. म्हार्दोळकर (संगीत), श्रीमती वासंती म्हार्दोळकर (संगीत), दत्ताराम काशिनाथ गावडे (लोककला), मधुकर वेलिंगकर (नाटक), यशोदा गोविंद गावडे (लोककला), सोनू पंढरी केरकर (लोककला), पांडुरंग बाबलो गावडे (लोककला), उमेश एच. गावडे बोरकर (भजन), महादेव व्ही. गावडे (लोककला), शिवराज तुकाराम फोंडेकर (संगीत), सीरिल डी. फर्नांडिस (तियात्र), दोराते आमान्सियो फर्नांडिस (तियात्र), रामा ऊर्फ आनंद रायकर (नाटक), जॉयल मास्करेन्हस (तियात्र), आल्बर्ट रॉड्रिगीस (तियात्र), रोमानो डायस (तियात्र), आतोनियो दोरादो (तियात्र), फ्रान्सिस झेवियर आल्मेदा (तियात्र), रघुनाथ बुधाळकर (नाटक), विश्वनाथ साळगावकर (नाटक), डॉ. फ्रान्सिस्को सी. कुलासो (संगीत), आदेल्द गिर्ल्बट डिसोझा (तियात्र), बाळकृष्ण आमोणकर (संगीत), गजानन वैद्य (नाटक), आरनॉल्ड डिकॉस्टा (चित्रपट), रामनाथ गणेश नाईक (भजन), श्रीपाद नारायण दामले (संगीत), वासुदेव पी. गावस (संगीत), कायतान फर्नांडिस (संगीत), डॉ. सखाराम बी. नाडकर्णी (संगीत), सौ. नीलिमा आंगले (साहित्य), रामकृष्ण जुवारकर (साहित्य), अर्जुन कुष्टा बाबरो (लोककला), पांडुरंग एम. शिरोडकर (लोककला) यांना कला गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. श्री. लोलयेकर यांनी आभार व्यक्त केले.
पणजी, दि. ३० (प्रतिनिधी)- कला व सांस्कृतिक खात्यातर्फे देण्यात येणारे "राज्य कला गौरव पुरस्कार' आज एका ह्रद्य सोहळ्यात मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या हस्ते ५७ ज्येष्ठ कलाकारांना प्रदान करण्यात आले. कला अकादमीच्या मा. दीनानाथ मंगेशकर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात कलाकारांचा हा गौरव सोहळा पार पाडला. यावेळी व्यासपीठावर राज्याचे मुख्य सचिव संजय श्रीवास्तव, कला व सांस्कृतिक संचालक प्रसाद लोलयेकर, राज्य कला विकास समितीचे उपाध्यक्ष श्रीधर कामत बांबोळकर व निवड समितीचे अध्यक्ष विशाल पै काकोडे उपस्थित होते.
कलेतून उदरनिर्वाह होत नव्हता अशा ज्या काळात ज्या लोकांनी निरंतर कलेची सेवा करून ती जोपासली त्याची दखल घेऊन आज अशा कलाकारांचा सत्कार करण्यात येत असल्याचे श्री. कामत म्हणाले. या कलाकारांनी कलेद्वारे फारशी कमाई केली नसली तरी त्यांनी गोव्यासाठी अमौलिक योगदान दिले आहे. त्यांनी कलेची आराधना केली; व्यवहार केली नाही, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.
संगीत साधना करताना पुरस्कार, सत्कार यांची आस आम्ही कधीच धरली नव्हती. राज्य सरकार ग्रामीण भागातील अशा कलाकारांचा शोध घेऊन त्यांचा सत्कार करते हे उल्लेखनीय असल्याचे मनोगत डॉ. फ्रान्सिस कुलासो सर्व सत्कारमूर्तींच्या वतीने बोलताना व्यक्त केले.
मानपत्र, मानचिन्ह व पाच हजार रुपये रोख, शाल व श्रीफळ देऊन सर्व कलाकारांना गौरवण्यात आले. सरकारने आत्तापर्यंत २९५ ज्येष्ठ कलाकारांना गौरवल्याची माहिती काकोडे यांनी दिली.
यावेळी गुरुदास नवसो नाईक (नाटक), श्रीमती. शिलावती नार्वेकर (लोकसंगीत), लुईस जो दी कलंगुट (तियात्र), मच्छिंद्र र. मांद्रेकर (संगीत), पांडुरंग धर्माजी शिरोडकर (संगीत), जेम्स फ्रान्सिस ब्रागांझा (चित्रपट), चिको डिसोझा (संगीत), आनंद दामोदर गोरे (भजन), दत्ताराम स. शेटये (छायाचित्रीकरण), बाळू पुंडी वेळीप (नाटक), श्रीमती सीता पागी (लोकसंगीत), श्रीमती हिराबाई व्ही. बाळे (हस्तकला), बाळकृष्ण जी. अय्या (चित्रकला), प्रसाद तुकाराम सावंत (नाटक), डॉ. आनंद हेदे (संगीत), ह.भ.प रामचंद्र य. परांजपे (कीर्तन), रामकृष्ण जयदेव राऊत (नाटक), जगन्नाथ डी. नारोजी (कला), मनोहर पेडणेकर (लोकसंगीत), श्रीमती. कुंदा शाबा कामत (नाटक), नरेंद्र काशिनाथ कामत (साहित्य), रामराव आर. फडते (नाटक), श्रीमती जी. म्हार्दोळकर (संगीत), श्रीमती वासंती म्हार्दोळकर (संगीत), दत्ताराम काशिनाथ गावडे (लोककला), मधुकर वेलिंगकर (नाटक), यशोदा गोविंद गावडे (लोककला), सोनू पंढरी केरकर (लोककला), पांडुरंग बाबलो गावडे (लोककला), उमेश एच. गावडे बोरकर (भजन), महादेव व्ही. गावडे (लोककला), शिवराज तुकाराम फोंडेकर (संगीत), सीरिल डी. फर्नांडिस (तियात्र), दोराते आमान्सियो फर्नांडिस (तियात्र), रामा ऊर्फ आनंद रायकर (नाटक), जॉयल मास्करेन्हस (तियात्र), आल्बर्ट रॉड्रिगीस (तियात्र), रोमानो डायस (तियात्र), आतोनियो दोरादो (तियात्र), फ्रान्सिस झेवियर आल्मेदा (तियात्र), रघुनाथ बुधाळकर (नाटक), विश्वनाथ साळगावकर (नाटक), डॉ. फ्रान्सिस्को सी. कुलासो (संगीत), आदेल्द गिर्ल्बट डिसोझा (तियात्र), बाळकृष्ण आमोणकर (संगीत), गजानन वैद्य (नाटक), आरनॉल्ड डिकॉस्टा (चित्रपट), रामनाथ गणेश नाईक (भजन), श्रीपाद नारायण दामले (संगीत), वासुदेव पी. गावस (संगीत), कायतान फर्नांडिस (संगीत), डॉ. सखाराम बी. नाडकर्णी (संगीत), सौ. नीलिमा आंगले (साहित्य), रामकृष्ण जुवारकर (साहित्य), अर्जुन कुष्टा बाबरो (लोककला), पांडुरंग एम. शिरोडकर (लोककला) यांना कला गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. श्री. लोलयेकर यांनी आभार व्यक्त केले.
सीबीआय की खास अधिकारी?
ड्रग प्रकरणी आज निर्णय शक्य
पणजी, दि. ३० (प्रतिनिधी) - पोलिस ड्रग पॅडलर प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवावे की राज्य पोलिस खात्यातीलच विशेष अधिकारी नेमावा, यावर उद्या होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचे आज मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी सांगितले. सदर प्रकरण "सीबीआय'कडे किंवा अन्य कोणत्याही स्वतंत्र तपास यंत्रणेकडे सोपवल्यास कटू सत्य बाहेर येण्याची भिती काहींना सतावत असल्याने याचे तपासकाम "सीबीआय'कडे जाऊ नये, यासाठी जोरदार प्रयत्न केला जात आहे. तसेच गृहमंत्रीही याचा तपास राज्य पोलिसांमार्फतच लावला जावा, यावर ठाम असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सध्या या प्रकरणात एक पोलिस निरीक्षक, एक उपनिरीक्षक व पाच पोलिस शिपाई निलंबित झाले आहे. तसेच या प्रकरणात आणखी काही पोलिस अधिकारी गुंतल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच गोवा पोलिस खात्यातीलच अधिकारी संशयाच्या घेऱ्यात सापडले असताना त्याचा त्याच पोलिसांमार्फत तपास केला जात असल्याने न्यायालयाने प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
गेल्यावेळी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात हे प्रकरण "सीबीआय'कडे सोपवण्यास अनुत्सूकता दाखवली होती. तसेच, सध्या असलेला तपास अधिकारी बदलून अन्य कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याकडे या प्रकरणाचे तपास काम सोपवण्यास तयार असल्याचे म्हटले होते. यावेळी न्यायालयाने ठोस काय तो निर्णय येत्या २ जून पर्यंत कळवण्याची सूचना सरकारला केली आहे. त्यामुळे या विषयावर पुन्हा एकदा उद्या मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांच्या उपस्थित होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
पणजी, दि. ३० (प्रतिनिधी) - पोलिस ड्रग पॅडलर प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवावे की राज्य पोलिस खात्यातीलच विशेष अधिकारी नेमावा, यावर उद्या होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचे आज मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी सांगितले. सदर प्रकरण "सीबीआय'कडे किंवा अन्य कोणत्याही स्वतंत्र तपास यंत्रणेकडे सोपवल्यास कटू सत्य बाहेर येण्याची भिती काहींना सतावत असल्याने याचे तपासकाम "सीबीआय'कडे जाऊ नये, यासाठी जोरदार प्रयत्न केला जात आहे. तसेच गृहमंत्रीही याचा तपास राज्य पोलिसांमार्फतच लावला जावा, यावर ठाम असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सध्या या प्रकरणात एक पोलिस निरीक्षक, एक उपनिरीक्षक व पाच पोलिस शिपाई निलंबित झाले आहे. तसेच या प्रकरणात आणखी काही पोलिस अधिकारी गुंतल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच गोवा पोलिस खात्यातीलच अधिकारी संशयाच्या घेऱ्यात सापडले असताना त्याचा त्याच पोलिसांमार्फत तपास केला जात असल्याने न्यायालयाने प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
गेल्यावेळी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात हे प्रकरण "सीबीआय'कडे सोपवण्यास अनुत्सूकता दाखवली होती. तसेच, सध्या असलेला तपास अधिकारी बदलून अन्य कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याकडे या प्रकरणाचे तपास काम सोपवण्यास तयार असल्याचे म्हटले होते. यावेळी न्यायालयाने ठोस काय तो निर्णय येत्या २ जून पर्यंत कळवण्याची सूचना सरकारला केली आहे. त्यामुळे या विषयावर पुन्हा एकदा उद्या मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांच्या उपस्थित होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
देशातील अकरा लाखांत "आर्यन'चा साईश अकरावा
अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा
मडगाव, दि. ३० (प्रतिनिधी)- अखिल भारतीय अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, देशातून या परीक्षेला बसलेल्या ११ लाख विद्यार्थ्यांमध्ये गोव्याचा साईश कापडी हा अकरावा आला आहे. साईश हा आर्यन स्टडी सर्कलमध्ये प्रशिक्षण घेतलेला विद्यार्थी असून, या यशाबद्दल त्याचे व संस्थाचालक व्यंकटेश प्रभुदेसाई यांचे अभिनंदन केले जात आहे.
रसायनशास्त्र, गणित आणि भौतिकशास्त्र या तीन विषयांसाठी होणाऱ्या परीक्षेचे गुण ४३२ असून, साईश कापडी याने ३८८ गुण मिळवून नेत्रदीपक यश मिळविले आहे. याच परीक्षेत निरज बोरकर हा १९० वा आला असून, त्यानेही आपली चमक दाखविली आहे. भार्गव जोशी, निखिल तावरा, निखिल सहकारी, साईश सरिन, अतुल हरिलाल, गणपती भट, अंतरिक्ष डिचोलकर, अमीत प्रभू या आर्यन स्टडी सर्कलच्या अन्य विद्यार्थ्यांनी याच परीक्षेत चांगले यश संपादन केले आहे.
मडगाव, दि. ३० (प्रतिनिधी)- अखिल भारतीय अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, देशातून या परीक्षेला बसलेल्या ११ लाख विद्यार्थ्यांमध्ये गोव्याचा साईश कापडी हा अकरावा आला आहे. साईश हा आर्यन स्टडी सर्कलमध्ये प्रशिक्षण घेतलेला विद्यार्थी असून, या यशाबद्दल त्याचे व संस्थाचालक व्यंकटेश प्रभुदेसाई यांचे अभिनंदन केले जात आहे.
रसायनशास्त्र, गणित आणि भौतिकशास्त्र या तीन विषयांसाठी होणाऱ्या परीक्षेचे गुण ४३२ असून, साईश कापडी याने ३८८ गुण मिळवून नेत्रदीपक यश मिळविले आहे. याच परीक्षेत निरज बोरकर हा १९० वा आला असून, त्यानेही आपली चमक दाखविली आहे. भार्गव जोशी, निखिल तावरा, निखिल सहकारी, साईश सरिन, अतुल हरिलाल, गणपती भट, अंतरिक्ष डिचोलकर, अमीत प्रभू या आर्यन स्टडी सर्कलच्या अन्य विद्यार्थ्यांनी याच परीक्षेत चांगले यश संपादन केले आहे.
Sunday, 30 May 2010
ज्ञानेश्वरी एक्सप्रेस अपघात बळीसंख्या ११५, तर २५० जखमी
झरग्राम (प. बंगाल), दि. २९ - मुंबईला निघालेल्या ज्ञानेश्वरी एक्सप्रेसला परवा मध्यरात्री झारग्रामजवळ उडवून दिल्यानंतर झालेल्या दुर्घटनेतील बळींची संख्या वाढतच असून ती आता ११५ च्या जवळ पोहोचली असून जखमींचीही संख्या आता २५० झाली आहे. आज सकाळी अपघातग्रस्त डब्यांतून आणखी काही प्रवाशांची प्रेते बाहेर काढण्यात आली. काल रात्रभर मदतकार्य सुरू होते.
यासंदर्भात अधिक माहिती देताना दक्षिण पूर्व रेेेेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, अपघातात जखमी झालेल्यांची संख्या आता २५० पर्यंत गेली आहे. यापैकी पाच गंभीर जखमींना उपचारासाठी कोलकाता येथे हलविण्यात आले आहे.
अपघातग्रस्त डब्यांतून आतापर्यंत ११५ प्रवाशांची प्रेते बाहेर काढण्यात आली आहेत. यापैकी १०८ जणांचे मृतदेह मिदनापूर येथील दवाखान्यात तर दोन मृतदेह खडगपूर येथील रेल्वेेेेेेेच्या दवाखान्यात ठेवण्यात आलेेेेेले आहेत, असे पश्चिम मिदनापूरचे पोलिस अधीक्षक मनोजकुमार वर्मा यांनी पीटीआयला सांगितले. यापैकी केवळ २५ जणांच्या मृतदेहांची ओेेळख पटली आहे तर ६० जणांचे पोस्टमार्टम झालेले आहे.
अपघातातील मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो कारण की दुर्घटनेत सर्वाधिक फटका बसलेल्या एस-५ व एस-६ या डब्यांना अद्याप कापण्यात आलेले नाही. दरम्यान, आज दुपारी साडेचारपर्यंत सुरू असलेल्या मदत कार्यात मालगाडीच्या इंजीनखाली पंधरा जणांचे मृतदेह आढळून आले, असे रेेेेेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. खेमासोली व सारदिया या रेल्वेस्थानकांच्या दरम्यान हावडा-कुर्ला लोकमान्य टिळक ज्ञानेश्वरी सुपर डिलक्स एक्सप्रेेस धावत असताना माओवाद्यांनी तिला उडवून दिले होते.
गरज भासल्यास डीएनए चाचणीही घेतली जाईल व त्यासाठी असे मृतदेह रुग्णालयात योग्य प्रकारे सांभाळून ठेेवण्यात येत आहेत, असेही हा अधिकारी म्हणाला.
मिदनापूर येथील दवाखान्यात दोन तात्पुरती शिबिरे स्थापन करण्यात आली असून तेथे मृतकांच्या तसेच जखमींच्या नातेवाईकांना माहिती मिळू शकते. याशिवाय मृतांची छायाचित्रेही मिदनापूर येथील दवाखान्यात लावण्यात आलेली आहेत. इतकेच नाही तर सरकारी वेबसाईटवरही ती टाकण्यात आलेली आहेत, असे वर्मा यांनी सांगितले.
दरम्यान ही अपघात स्फोटाच्या साह्याने घडवून आणण्यात आली की हा माओवाद्यांनी घडवून आणलेला घातपात होता यावर अद्यापही तर्कवितर्क केले जात असले तरी काही प्रवाशांचे म्हणणे आहे की, अपघात घडण्याच्या आधी आम्हाला कोणत्याही प्रकारचा स्फोटासारखा आवाज ऐकू आला नाही. रुळांना जोेडणारे सांधे काढून टाकण्यात आलेेले दिसून आले असून हा घातपाताचाच प्रकार आहे व तो माओवाद्यांनीच घडवून आणला आहे. चिदम्बरम् यांनीही हा घातपाताचा प्रकार असावा अशी शंका व्यक्त करीत अपघात घडवून आणताना स्फोटांचा वापर करण्यात आला होता की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, याकडेही केंद्रीय गृहमंत्र्यांनी लक्ष वेधले होते. तर दुसरीकडे रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी असे म्हटलेले आहे की अपघातस्थळी टीएनटी स्फोटके तसेच जिलेटीन कांड्या आढळून आल्या आहेत.
अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध
गुन्हे दाखल
मिदनापूर रेल्वे घातपात संदर्भात अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वरी एक्सप्रेसच्या ड्रायव्हरने दाखल केलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देताना दक्षिण पूर्व रेेेेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, अपघातात जखमी झालेल्यांची संख्या आता २५० पर्यंत गेली आहे. यापैकी पाच गंभीर जखमींना उपचारासाठी कोलकाता येथे हलविण्यात आले आहे.
अपघातग्रस्त डब्यांतून आतापर्यंत ११५ प्रवाशांची प्रेते बाहेर काढण्यात आली आहेत. यापैकी १०८ जणांचे मृतदेह मिदनापूर येथील दवाखान्यात तर दोन मृतदेह खडगपूर येथील रेल्वेेेेेेेच्या दवाखान्यात ठेवण्यात आलेेेेेले आहेत, असे पश्चिम मिदनापूरचे पोलिस अधीक्षक मनोजकुमार वर्मा यांनी पीटीआयला सांगितले. यापैकी केवळ २५ जणांच्या मृतदेहांची ओेेळख पटली आहे तर ६० जणांचे पोस्टमार्टम झालेले आहे.
अपघातातील मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो कारण की दुर्घटनेत सर्वाधिक फटका बसलेल्या एस-५ व एस-६ या डब्यांना अद्याप कापण्यात आलेले नाही. दरम्यान, आज दुपारी साडेचारपर्यंत सुरू असलेल्या मदत कार्यात मालगाडीच्या इंजीनखाली पंधरा जणांचे मृतदेह आढळून आले, असे रेेेेेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. खेमासोली व सारदिया या रेल्वेस्थानकांच्या दरम्यान हावडा-कुर्ला लोकमान्य टिळक ज्ञानेश्वरी सुपर डिलक्स एक्सप्रेेस धावत असताना माओवाद्यांनी तिला उडवून दिले होते.
गरज भासल्यास डीएनए चाचणीही घेतली जाईल व त्यासाठी असे मृतदेह रुग्णालयात योग्य प्रकारे सांभाळून ठेेवण्यात येत आहेत, असेही हा अधिकारी म्हणाला.
मिदनापूर येथील दवाखान्यात दोन तात्पुरती शिबिरे स्थापन करण्यात आली असून तेथे मृतकांच्या तसेच जखमींच्या नातेवाईकांना माहिती मिळू शकते. याशिवाय मृतांची छायाचित्रेही मिदनापूर येथील दवाखान्यात लावण्यात आलेली आहेत. इतकेच नाही तर सरकारी वेबसाईटवरही ती टाकण्यात आलेली आहेत, असे वर्मा यांनी सांगितले.
दरम्यान ही अपघात स्फोटाच्या साह्याने घडवून आणण्यात आली की हा माओवाद्यांनी घडवून आणलेला घातपात होता यावर अद्यापही तर्कवितर्क केले जात असले तरी काही प्रवाशांचे म्हणणे आहे की, अपघात घडण्याच्या आधी आम्हाला कोणत्याही प्रकारचा स्फोटासारखा आवाज ऐकू आला नाही. रुळांना जोेडणारे सांधे काढून टाकण्यात आलेेले दिसून आले असून हा घातपाताचाच प्रकार आहे व तो माओवाद्यांनीच घडवून आणला आहे. चिदम्बरम् यांनीही हा घातपाताचा प्रकार असावा अशी शंका व्यक्त करीत अपघात घडवून आणताना स्फोटांचा वापर करण्यात आला होता की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, याकडेही केंद्रीय गृहमंत्र्यांनी लक्ष वेधले होते. तर दुसरीकडे रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी असे म्हटलेले आहे की अपघातस्थळी टीएनटी स्फोटके तसेच जिलेटीन कांड्या आढळून आल्या आहेत.
अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध
गुन्हे दाखल
मिदनापूर रेल्वे घातपात संदर्भात अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वरी एक्सप्रेसच्या ड्रायव्हरने दाखल केलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
हेडलीच्या चौकशीसाठी भारतीय पथक आज जाणार
नवी दिल्ली, दि. २९ - मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील एक प्रमुख आरोपी डेव्हीड हेडलीची चौकशी करण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांचे एक पथक उद्या अमेरिकेेला रवाना होत आहे. मुंबईवर दहशतवादी हल्ला घडवून आणणाऱ्या लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेला हेडलीने मदत केल्याचा आरोप असून हेडली सध्या अमेरिकेची गुप्तचर संस्था एफबीआयच्या ताब्यात आहे.
अमेरिकेला जाणाऱ्या या पथकात "राष्ट्रीय चौकशी संस्था'(एनआयए)चे तीन सदस्य आहेत. एका कायदा अधिकाऱ्याचाही त्यात समावेश आहे. भारतीय चौकशी अधिकाऱ्यांचे एक पथक अमेरिकेेच्या कायदा विभागाच्या संपर्कात राहणार आहे. डेेेव्हीड हेडलीच्या वकिलालाही हे पथक भेेटणार आहे. हेडली व भारतीय पथकाच्या भेटीदरम्यान हेडलीचा वकीलही उपस्थित राहणार आहे. पण अजूनही हे स्पष्ट झालेले नाही की भारतीय पथक हेडलीची चौकशी किती तास किंवा किती दिवस करणार आहे.
भारताची आर्थिक राजधानी मुंबईवर लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्यांनी केेलेल्या हल्ल्यात १६६ जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याचा मास्टरमाईंड हा डेव्हीड हेडली असल्याचा हेडलीवर आरोप आहे. हेडलीला मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात अटक करण्यात आली होती. अमेरिकन न्यायालयाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमाफत चौकशी करण्यास भारतीय अधिकाऱ्यांना परवानगी दिली आहे.
अमेरिकेला जाणाऱ्या या पथकात "राष्ट्रीय चौकशी संस्था'(एनआयए)चे तीन सदस्य आहेत. एका कायदा अधिकाऱ्याचाही त्यात समावेश आहे. भारतीय चौकशी अधिकाऱ्यांचे एक पथक अमेरिकेेच्या कायदा विभागाच्या संपर्कात राहणार आहे. डेेेव्हीड हेडलीच्या वकिलालाही हे पथक भेेटणार आहे. हेडली व भारतीय पथकाच्या भेटीदरम्यान हेडलीचा वकीलही उपस्थित राहणार आहे. पण अजूनही हे स्पष्ट झालेले नाही की भारतीय पथक हेडलीची चौकशी किती तास किंवा किती दिवस करणार आहे.
भारताची आर्थिक राजधानी मुंबईवर लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्यांनी केेलेल्या हल्ल्यात १६६ जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याचा मास्टरमाईंड हा डेव्हीड हेडली असल्याचा हेडलीवर आरोप आहे. हेडलीला मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात अटक करण्यात आली होती. अमेरिकन न्यायालयाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमाफत चौकशी करण्यास भारतीय अधिकाऱ्यांना परवानगी दिली आहे.
कर्नाटकमधील भाजप सरकारची दोन वर्षे पूर्ण
बंगलोर, दि. २९ - कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदीयुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली सरकारने आज आपल्या कारकीर्दीची दोन वर्षे पूर्ण केली. दक्षिणेत प्रथमच भाजपाने राज्यात सत्ता प्राप्त केली.
दक्षिणेतील भाजपाच्या विजयाचे शिल्पकार म्हणून येदीयुरप्पा यांच्याकडे बघितले जात असले तरी त्यांनाही आतापर्यंत स्वपक्षातील सहकाऱ्यांबरोबरच विरोधकांचा विरोध सहन करीत राज्य हाकावे लागले आहे. कॉंगे्रस-जदएसने त्यांच्यावर सतत हल्ले करणे जारी ठेवले आहे तर त्यांच्या मंत्रिमंडळातील काही बंडखोरांनी बंडाचा झेंडा उभारला होता. यातून त्यांनी मार्ग काढत दोन वर्षांची कारकीर्द पूर्ण केली आहे. ३० मे २००८ रोजी कर्नाटकात भाजपाचे सरकार सत्तेवर आले होते. सत्तेवर आल्या आल्याच येेदीयुरप्पा यांना शेतकरी आंदोलनाला सामोरे जावे लागले होेते. यानंतर चर्चवरील हल्ल्यांच्या घटना घडल्या होत्या.
गेल्या सप्टेंबर महिन्यात त्यांना राजकीय स्थैर्य प्राप्त झाले व त्यांनी प्रशासकीय कारभार सुधारण्याच्या दिशेने पावले उचलली. यातच राज्यात आलेल्या पुराने सारे काही बिघडवून टाकले. त्यातूनही मुख्यमंत्री येदीयुरप्पा मार्ग काढत असतानाच मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांनी त्यांच्याविरोधात बंड पुकारलेे. हे बंडही त्यांनी योग्यप्रकारे मोेेेेडून काढीत राज्याच्या विकासाकडे आता लक्ष पुरविले आहे.
दक्षिणेतील भाजपाच्या विजयाचे शिल्पकार म्हणून येदीयुरप्पा यांच्याकडे बघितले जात असले तरी त्यांनाही आतापर्यंत स्वपक्षातील सहकाऱ्यांबरोबरच विरोधकांचा विरोध सहन करीत राज्य हाकावे लागले आहे. कॉंगे्रस-जदएसने त्यांच्यावर सतत हल्ले करणे जारी ठेवले आहे तर त्यांच्या मंत्रिमंडळातील काही बंडखोरांनी बंडाचा झेंडा उभारला होता. यातून त्यांनी मार्ग काढत दोन वर्षांची कारकीर्द पूर्ण केली आहे. ३० मे २००८ रोजी कर्नाटकात भाजपाचे सरकार सत्तेवर आले होते. सत्तेवर आल्या आल्याच येेदीयुरप्पा यांना शेतकरी आंदोलनाला सामोरे जावे लागले होेते. यानंतर चर्चवरील हल्ल्यांच्या घटना घडल्या होत्या.
गेल्या सप्टेंबर महिन्यात त्यांना राजकीय स्थैर्य प्राप्त झाले व त्यांनी प्रशासकीय कारभार सुधारण्याच्या दिशेने पावले उचलली. यातच राज्यात आलेल्या पुराने सारे काही बिघडवून टाकले. त्यातूनही मुख्यमंत्री येदीयुरप्पा मार्ग काढत असतानाच मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांनी त्यांच्याविरोधात बंड पुकारलेे. हे बंडही त्यांनी योग्यप्रकारे मोेेेेडून काढीत राज्याच्या विकासाकडे आता लक्ष पुरविले आहे.
राजभाषेचा गळा घोटणारे "नवेपर्व'
अधिकृत नियतकालिकात राजभाषेलाच डावलले
पणजी, दि. २९ (प्रतिनिधी) - गोवा घटक राज्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या माहिती व प्रसिद्धी खात्यातर्फे "नवेपर्व' या त्रैमासिक नियतकालिकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. राज्य सरकारचे अधिकृत नियतकालिक इंग्रजी भाषेतून प्रसिद्ध करून त्यात राजभाषेला पूर्णपणे डावलण्यात आल्याने अनेकांत संतापाची लाट पसरली आहे. सरकार दरबारी कोकणी व मराठीला डावलून इंग्रजीचे स्तोम माजवण्याची सवय तातडीने मोडून काढली नाही तर येत्या काळात गोव्याची अस्मिता संपण्याची शक्यता असल्याची संतप्त टीकागोवेकरांनी केली आहे.
राज्याच्या माहिती व प्रसिद्धी खात्यातर्फे प्रकाशित होणारे "नवेपर्व' हे नियतकालिक गेल्या काही काळापूर्वीच बंद पडले होते. या नियतकालिकाला घटक राज्यदिनाच्या पार्श्वभूमीवर नव्याने ऊर्जा प्राप्त करून देण्याच्या हेतूने सरकारने पावले उचलली व त्यासंबंधी संपादकीय मंडळ स्थापन करून नव्याने "नवेपर्व'चे प्रकाशन करण्यात आले. घटकराज्य दिनानिमित्त "नवेपर्व' नियतकालिकाचा अंक प्रकाशित झाला खरा; पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे सरकारचे अधिकृत नियतकालिक राजभाषेतून प्रसिद्ध होईल, अशी अनेकांची मनीषा होती. ती पूर्ण फोल ठरली आहे. विशेष म्हणजे या नियतकालिकात केवळ मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचा संदेशच कोकणी भाषेत आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रसिद्धी सल्लागार सुरेश वाळवे यांचा एक मराठी लेख वगळता इतर सर्व लिखाण इंग्रजीतूनच प्रसिद्ध करण्यात आले आहे.
कोकणी ही गोव्याची राजभाषा व मराठीला समान दर्जा या पायावरच गोव्याला घटक राज्याचा दर्जा बहाल करण्यात आला. घटक राज्य दिन साजरा करताना याचाच सरकारला विसर पडावा हे दुर्दैव असल्याची टीका अनेकांनी केली आहे. घटक राज्य व कोकणी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळवून देण्यात आपला सिंहाचा वाटा आहे, असा डंका पिटणारे राज्यसभा खासदार शांताराम नाईक यांचा या नियतकालिकात इंग्रजीतून लेख प्रसिद्ध झाला आहे. मराठीला राजभाषेचा समान दर्जा प्राप्त व्हावा यासाठी लढ्याचे नेतृत्व करणारे माजी केंद्रीय कायदामंत्री तथा विद्यमान कायदा आयोगाचे अध्यक्ष ऍड. रमाकांत खलप यांनीही इथे इंग्रजीतूनच लिहिणे पसंत केले आहे. प्रशासकीय पातळीवर राजभाषेचा वापर होणे गरजेचे आहेच, पण त्याला काही अवधी जाईल हे मानता येणे शक्य आहे. तथापि, ज्या ठिकाणी राजभाषेचा मान राखायलाच हवा तिथेही कोकणी व मराठीची खुलेआम अवहेलना होत असेल तर हा प्रकार गोमंतकीय कसे काय खपवून घेतील, असाही सवाल अनेकांनी केला. सरकारचे अधिकृत नियतकालिक हे मराठी व कोकणीतूनच प्रसिद्ध व्हावे. एखाद्या वरिष्ठ सनदी अधिकारी किंवा अन्य कुणी तज्ज्ञ या नियतकालिकात इंग्रजीतून लिखाण करीत असेल तर त्या लेखाचा स्थानिक भाषेत अनुवाद करून तो प्रसिद्ध करावा,अशीही मागणी करण्यात येत आहे.
महाराष्ट्र सरकारच्या माहिती व प्रसिद्धी खात्यातर्फे "लोकराज्य' हे सुंदर व दर्जेदार मासिक प्रसिद्ध करण्यात येते. पूर्णपणे मराठी भाषेतून प्रसिद्ध होणारे हे मासिक खऱ्या अर्थाने प्रशासनाचा चेहरा ठरला असून सरकारी योजना, विकासकामे व संपूर्ण प्रशासकीय माहिती सामान्य लोकांना त्यांच्या भाषेतून मिळवून देण्याचे कार्य हे मासिक करीत असते. गोवा सरकारनेही "लोकराज्य' च्या पावलावर पाऊल ठेवून "नवेपर्व' नियतकालिकाचे नियोजन करावे व खऱ्या अर्थाने हे नियतकालिक सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचेल याची सोय करावी, अशी आग्रही मागणी केली जात आहे.
पणजी, दि. २९ (प्रतिनिधी) - गोवा घटक राज्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या माहिती व प्रसिद्धी खात्यातर्फे "नवेपर्व' या त्रैमासिक नियतकालिकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. राज्य सरकारचे अधिकृत नियतकालिक इंग्रजी भाषेतून प्रसिद्ध करून त्यात राजभाषेला पूर्णपणे डावलण्यात आल्याने अनेकांत संतापाची लाट पसरली आहे. सरकार दरबारी कोकणी व मराठीला डावलून इंग्रजीचे स्तोम माजवण्याची सवय तातडीने मोडून काढली नाही तर येत्या काळात गोव्याची अस्मिता संपण्याची शक्यता असल्याची संतप्त टीकागोवेकरांनी केली आहे.
राज्याच्या माहिती व प्रसिद्धी खात्यातर्फे प्रकाशित होणारे "नवेपर्व' हे नियतकालिक गेल्या काही काळापूर्वीच बंद पडले होते. या नियतकालिकाला घटक राज्यदिनाच्या पार्श्वभूमीवर नव्याने ऊर्जा प्राप्त करून देण्याच्या हेतूने सरकारने पावले उचलली व त्यासंबंधी संपादकीय मंडळ स्थापन करून नव्याने "नवेपर्व'चे प्रकाशन करण्यात आले. घटकराज्य दिनानिमित्त "नवेपर्व' नियतकालिकाचा अंक प्रकाशित झाला खरा; पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे सरकारचे अधिकृत नियतकालिक राजभाषेतून प्रसिद्ध होईल, अशी अनेकांची मनीषा होती. ती पूर्ण फोल ठरली आहे. विशेष म्हणजे या नियतकालिकात केवळ मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचा संदेशच कोकणी भाषेत आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रसिद्धी सल्लागार सुरेश वाळवे यांचा एक मराठी लेख वगळता इतर सर्व लिखाण इंग्रजीतूनच प्रसिद्ध करण्यात आले आहे.
कोकणी ही गोव्याची राजभाषा व मराठीला समान दर्जा या पायावरच गोव्याला घटक राज्याचा दर्जा बहाल करण्यात आला. घटक राज्य दिन साजरा करताना याचाच सरकारला विसर पडावा हे दुर्दैव असल्याची टीका अनेकांनी केली आहे. घटक राज्य व कोकणी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळवून देण्यात आपला सिंहाचा वाटा आहे, असा डंका पिटणारे राज्यसभा खासदार शांताराम नाईक यांचा या नियतकालिकात इंग्रजीतून लेख प्रसिद्ध झाला आहे. मराठीला राजभाषेचा समान दर्जा प्राप्त व्हावा यासाठी लढ्याचे नेतृत्व करणारे माजी केंद्रीय कायदामंत्री तथा विद्यमान कायदा आयोगाचे अध्यक्ष ऍड. रमाकांत खलप यांनीही इथे इंग्रजीतूनच लिहिणे पसंत केले आहे. प्रशासकीय पातळीवर राजभाषेचा वापर होणे गरजेचे आहेच, पण त्याला काही अवधी जाईल हे मानता येणे शक्य आहे. तथापि, ज्या ठिकाणी राजभाषेचा मान राखायलाच हवा तिथेही कोकणी व मराठीची खुलेआम अवहेलना होत असेल तर हा प्रकार गोमंतकीय कसे काय खपवून घेतील, असाही सवाल अनेकांनी केला. सरकारचे अधिकृत नियतकालिक हे मराठी व कोकणीतूनच प्रसिद्ध व्हावे. एखाद्या वरिष्ठ सनदी अधिकारी किंवा अन्य कुणी तज्ज्ञ या नियतकालिकात इंग्रजीतून लिखाण करीत असेल तर त्या लेखाचा स्थानिक भाषेत अनुवाद करून तो प्रसिद्ध करावा,अशीही मागणी करण्यात येत आहे.
महाराष्ट्र सरकारच्या माहिती व प्रसिद्धी खात्यातर्फे "लोकराज्य' हे सुंदर व दर्जेदार मासिक प्रसिद्ध करण्यात येते. पूर्णपणे मराठी भाषेतून प्रसिद्ध होणारे हे मासिक खऱ्या अर्थाने प्रशासनाचा चेहरा ठरला असून सरकारी योजना, विकासकामे व संपूर्ण प्रशासकीय माहिती सामान्य लोकांना त्यांच्या भाषेतून मिळवून देण्याचे कार्य हे मासिक करीत असते. गोवा सरकारनेही "लोकराज्य' च्या पावलावर पाऊल ठेवून "नवेपर्व' नियतकालिकाचे नियोजन करावे व खऱ्या अर्थाने हे नियतकालिक सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचेल याची सोय करावी, अशी आग्रही मागणी केली जात आहे.
"गोमंत विभूषण' पुरस्कार माझ्यासाठी अविस्मरणीय
डॉ.अनिल काकोडकर यांचे भावोद्गार
पणजी, दि. २९ (प्रतिनिधी) - आपली संपूर्ण कारकीर्द गोव्याबाहेर गेली, तरीही आपल्या हातून घडलेल्या कार्याची दखल घेऊन प्रेम व जिव्हाळ्याने काठोकाठ भरलेला "गोमंत विभूषण' हा प्रतिष्ठेचा नागरी सन्मान आपल्या कुटुंबाचे मूळ असलेल्या गोव्याकडून व्हावा ही सर्वार्थाने अभिमानाची गोष्ट आहे. गोमंतकीयांनी भरभरून दिलेले प्रेम मी कधीच विसरू शकणार नाही. खरेच मी या राज्यासाठी काय योगदान देऊ शकतो, असे कृतज्ञतामयउद्गार जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी पहिला गोमंत विभूषण पुरस्कार स्वीकारल्यानंतर काढले.
गोवा राज्य कला आणि संस्कृती खात्यातर्फे आयोजित गोमंत विभूषण पुरस्कार सोहळा आज कला अकादमीच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर सभागृहात मोठ्या दिमाखात पार पडला. पश्चिम बंगालचे राज्यपाल तथा राष्ट्रीय सल्लागार मंडळाचे माजी अध्यक्ष एम. के. नारायणन यांच्या हस्ते डॉ. काकोडकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी मुख्यमंत्री दिगंबर कामत, सभापती प्रतापसिंग राणे, विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, लोकसभा खासदार फ्रान्सिस सार्दीन, राज्यसभा खासदार शांताराम नाईक व मुख्य सचिव संजय श्रीवास्तव हजर होते.
घोडेमोडणी पथकाने नृत्य व खास पारंपरिक ढोल ताशाच्या मिरवणुकीने तरंगाचा छत्राखाली डॉ.काकोडकर यांना व्यासपीठावर आणण्यात आले. श्री. नारायणन यांनी शाळ, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला; तर मुख्यमंत्री कामत यांनी त्यांना खास तयार करण्यात आलेले मानपत्र बहाल केले. गोमंत विभूषण पुरस्काराचे मानचिन्ह या नात्याने गोमंतकीय दिवजांची आकृती असलेली भव्य समई प्रदान करून त्यांना गौरवण्यात आले.
या भूमीने आत्तापर्यंत अनेक रत्ने देशाला दिली आहेत व यापुढेही ती चालूच राहतील. कोणतेही यश हे एका व्यक्तीचे नसून सांघिक कार्याचे असते. आपल्या यशात आपल्या संघ सहकाऱ्यांचे योगदान तेवढेच महत्त्वाचे आहे. या संघाचे नेतृत्व आपल्याकडे होते व त्यामुळेच या यशाचा मानकरी आपण ठरलो,असे प्रांजळ मतही यावेळी डॉ.काकोडकर यांनी व्यक्त केले.
अमेरिकेबरोबर केलेल्या अणुकराराबाबत बोलताना ते म्हणाले, या कराराचे दृश्य परिणाम आणखी काही वर्षांनंतर दिसून येतील. विकासाची गती कायम राखण्यासाठी भविष्यात मोठ्या प्रमाणात ऊर्जेची गरज भासणार आहे. या करारामुळे भारत पुढील गरज भागवण्यासाठी स्वयंपूर्ण असेल. आपल्या कार्याशी आपण प्रामाणिक राहणेच पसंत करतो, असेही ते म्हणाले.
प्रमुख पाहुणे या नात्याने हजर असलेले पश्चिम बंगालचे राज्यपाल एम. के.नारायणन यांनी आपल्या भाषणात डॉ.काकोडकर यांच्या कार्याचा आढावा घेतला. अणुशक्ती धारण करणारा शक्तिशाली देश अशी भारताला मिळालेली जागतिक पावती हे त्यांच्या कार्याचे फलित असल्याचे ते म्हणाले. अणुकरारावेळी अमेरिकेशी झालेली चर्चा व भारताचे सर्व अधिकार अबाधित ठेवून हा करार करण्यात मिळालेले यश हा त्यांची मुत्सद्देगिरी व कठोर प्रशासन यांचा विजय असल्याचेही श्री.नारायणन म्हणाले.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी डॉ.काकोडकर यांच्या सेवेचा या राज्यालाही काही प्रमाणात लाभ व्हावा,अशी इच्छा व्यक्त करून गोव्याच्या ऊर्जा भवितव्याचे धोरण ठरवण्यासाठी त्यांनी सल्लागारपदाची जबाबदारी स्वीकारावी, असे मुख्यमंत्री म्हणाले. गोवा विद्यापीठ व राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था यांच्या सहकार्याने गोव्यातही एखादे संशोधन केंद्र उभारता येणे शक्य आहे का, याचाही अभ्यास करावा,अशी सूचनाही कामत यांनी केली. डॉ.काकोडकर हे पहिले गोमंत विभूषण ठरल्याने या पुरस्काराची उंची वाढली आहे व ती अबाधित ठेवणे ही सरकारची जबाबदारी राहील, असा शब्दही कामत यांनी दिला.
याप्रसंगी खासदार शांताराम नाईक, फ्रान्सिस सार्दिन, प्रतापसिंग राणे व विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनीही आपले विचार मांडले. मुख्यमंत्री कामत यांनी डॉ.काकोडकर यांच्या मातोश्री श्रीमती कमला काकोडकर, पत्नी श्रीमती सुयेशा काकोडकर व भगिनी श्रीमती सुषमा गांगल यांचाही यावेळी गौरव केला. सुरुवातीस प्रवीण गावकर व साथीदार यांनी मनोहरराय सरदेसाई यांचे मराठीतील सुंदर गीत सादर करून सभागृहातील वातावरण प्रसन्न केले. कला व संस्कृती संचालक प्रसाद लोलयेकर यांनी स्वागत केले. उच्च शिक्षण संचालक भास्कर नायक यांनी मानपत्राचे वाचन केले. प्रा. नारायण देसाई यांनी सूत्रसंचालन केले. राज्याचे मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांनी आभार मानले.
संपूर्ण दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमाचे सकाळी "इस्रो'चे माजी अध्यक्ष डॉ. के.कस्तुरीरंगन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेचे संचालक डॉ.सतीश शेटये व मुख्य सचिव संजय श्रीवास्तव हजर होते. नंतर ज्ञानेश मोघे यांनी तयार केलेला डॉ. अनिल काकोडकर यांचा संपूर्ण जीवनपट उलगडून दाखवणारा "कर्मयोगी' हा माहितीपट प्रदर्शित करण्यात आला. डॉ. अजय वैद्य यांनी डॉ. काकोडकर व त्यांच्या कुटुंबीयांची घेतलेली प्रकट मुलाखत उत्तरोत्तर बहरली. "विज्ञान व समाज' या विषयावरील परिसंवादही रंगला. या परिसंवादात डॉ.अनिल काकोडकर यांच्यासह भाभा संशोधन केंद्राचे संचालक डॉ. श्रीकुमार बॅनर्जी, संरक्षण मंत्रालयाचे वैज्ञानिक सल्लागार डॉ. विजयकुमार सारस्वत, "एनआयओ'चे संचालक डॉ. सतीश शेट्ये, "इस्रो'चे माजी अध्यक्ष डॉ.के.कस्तुरीरंगन व प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. रवी ग्रोव्हर यांनी भाग घेतला.
पणजी, दि. २९ (प्रतिनिधी) - आपली संपूर्ण कारकीर्द गोव्याबाहेर गेली, तरीही आपल्या हातून घडलेल्या कार्याची दखल घेऊन प्रेम व जिव्हाळ्याने काठोकाठ भरलेला "गोमंत विभूषण' हा प्रतिष्ठेचा नागरी सन्मान आपल्या कुटुंबाचे मूळ असलेल्या गोव्याकडून व्हावा ही सर्वार्थाने अभिमानाची गोष्ट आहे. गोमंतकीयांनी भरभरून दिलेले प्रेम मी कधीच विसरू शकणार नाही. खरेच मी या राज्यासाठी काय योगदान देऊ शकतो, असे कृतज्ञतामयउद्गार जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी पहिला गोमंत विभूषण पुरस्कार स्वीकारल्यानंतर काढले.
गोवा राज्य कला आणि संस्कृती खात्यातर्फे आयोजित गोमंत विभूषण पुरस्कार सोहळा आज कला अकादमीच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर सभागृहात मोठ्या दिमाखात पार पडला. पश्चिम बंगालचे राज्यपाल तथा राष्ट्रीय सल्लागार मंडळाचे माजी अध्यक्ष एम. के. नारायणन यांच्या हस्ते डॉ. काकोडकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी मुख्यमंत्री दिगंबर कामत, सभापती प्रतापसिंग राणे, विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, लोकसभा खासदार फ्रान्सिस सार्दीन, राज्यसभा खासदार शांताराम नाईक व मुख्य सचिव संजय श्रीवास्तव हजर होते.
घोडेमोडणी पथकाने नृत्य व खास पारंपरिक ढोल ताशाच्या मिरवणुकीने तरंगाचा छत्राखाली डॉ.काकोडकर यांना व्यासपीठावर आणण्यात आले. श्री. नारायणन यांनी शाळ, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला; तर मुख्यमंत्री कामत यांनी त्यांना खास तयार करण्यात आलेले मानपत्र बहाल केले. गोमंत विभूषण पुरस्काराचे मानचिन्ह या नात्याने गोमंतकीय दिवजांची आकृती असलेली भव्य समई प्रदान करून त्यांना गौरवण्यात आले.
या भूमीने आत्तापर्यंत अनेक रत्ने देशाला दिली आहेत व यापुढेही ती चालूच राहतील. कोणतेही यश हे एका व्यक्तीचे नसून सांघिक कार्याचे असते. आपल्या यशात आपल्या संघ सहकाऱ्यांचे योगदान तेवढेच महत्त्वाचे आहे. या संघाचे नेतृत्व आपल्याकडे होते व त्यामुळेच या यशाचा मानकरी आपण ठरलो,असे प्रांजळ मतही यावेळी डॉ.काकोडकर यांनी व्यक्त केले.
अमेरिकेबरोबर केलेल्या अणुकराराबाबत बोलताना ते म्हणाले, या कराराचे दृश्य परिणाम आणखी काही वर्षांनंतर दिसून येतील. विकासाची गती कायम राखण्यासाठी भविष्यात मोठ्या प्रमाणात ऊर्जेची गरज भासणार आहे. या करारामुळे भारत पुढील गरज भागवण्यासाठी स्वयंपूर्ण असेल. आपल्या कार्याशी आपण प्रामाणिक राहणेच पसंत करतो, असेही ते म्हणाले.
प्रमुख पाहुणे या नात्याने हजर असलेले पश्चिम बंगालचे राज्यपाल एम. के.नारायणन यांनी आपल्या भाषणात डॉ.काकोडकर यांच्या कार्याचा आढावा घेतला. अणुशक्ती धारण करणारा शक्तिशाली देश अशी भारताला मिळालेली जागतिक पावती हे त्यांच्या कार्याचे फलित असल्याचे ते म्हणाले. अणुकरारावेळी अमेरिकेशी झालेली चर्चा व भारताचे सर्व अधिकार अबाधित ठेवून हा करार करण्यात मिळालेले यश हा त्यांची मुत्सद्देगिरी व कठोर प्रशासन यांचा विजय असल्याचेही श्री.नारायणन म्हणाले.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी डॉ.काकोडकर यांच्या सेवेचा या राज्यालाही काही प्रमाणात लाभ व्हावा,अशी इच्छा व्यक्त करून गोव्याच्या ऊर्जा भवितव्याचे धोरण ठरवण्यासाठी त्यांनी सल्लागारपदाची जबाबदारी स्वीकारावी, असे मुख्यमंत्री म्हणाले. गोवा विद्यापीठ व राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था यांच्या सहकार्याने गोव्यातही एखादे संशोधन केंद्र उभारता येणे शक्य आहे का, याचाही अभ्यास करावा,अशी सूचनाही कामत यांनी केली. डॉ.काकोडकर हे पहिले गोमंत विभूषण ठरल्याने या पुरस्काराची उंची वाढली आहे व ती अबाधित ठेवणे ही सरकारची जबाबदारी राहील, असा शब्दही कामत यांनी दिला.
याप्रसंगी खासदार शांताराम नाईक, फ्रान्सिस सार्दिन, प्रतापसिंग राणे व विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनीही आपले विचार मांडले. मुख्यमंत्री कामत यांनी डॉ.काकोडकर यांच्या मातोश्री श्रीमती कमला काकोडकर, पत्नी श्रीमती सुयेशा काकोडकर व भगिनी श्रीमती सुषमा गांगल यांचाही यावेळी गौरव केला. सुरुवातीस प्रवीण गावकर व साथीदार यांनी मनोहरराय सरदेसाई यांचे मराठीतील सुंदर गीत सादर करून सभागृहातील वातावरण प्रसन्न केले. कला व संस्कृती संचालक प्रसाद लोलयेकर यांनी स्वागत केले. उच्च शिक्षण संचालक भास्कर नायक यांनी मानपत्राचे वाचन केले. प्रा. नारायण देसाई यांनी सूत्रसंचालन केले. राज्याचे मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांनी आभार मानले.
संपूर्ण दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमाचे सकाळी "इस्रो'चे माजी अध्यक्ष डॉ. के.कस्तुरीरंगन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेचे संचालक डॉ.सतीश शेटये व मुख्य सचिव संजय श्रीवास्तव हजर होते. नंतर ज्ञानेश मोघे यांनी तयार केलेला डॉ. अनिल काकोडकर यांचा संपूर्ण जीवनपट उलगडून दाखवणारा "कर्मयोगी' हा माहितीपट प्रदर्शित करण्यात आला. डॉ. अजय वैद्य यांनी डॉ. काकोडकर व त्यांच्या कुटुंबीयांची घेतलेली प्रकट मुलाखत उत्तरोत्तर बहरली. "विज्ञान व समाज' या विषयावरील परिसंवादही रंगला. या परिसंवादात डॉ.अनिल काकोडकर यांच्यासह भाभा संशोधन केंद्राचे संचालक डॉ. श्रीकुमार बॅनर्जी, संरक्षण मंत्रालयाचे वैज्ञानिक सल्लागार डॉ. विजयकुमार सारस्वत, "एनआयओ'चे संचालक डॉ. सतीश शेट्ये, "इस्रो'चे माजी अध्यक्ष डॉ.के.कस्तुरीरंगन व प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. रवी ग्रोव्हर यांनी भाग घेतला.
Subscribe to:
Posts (Atom)