० धुमसणाऱ्या आगीवर १८२ ट्रक माती
० आज सायंकाळपर्यंत पूर्णतः नियंत्रण
मडगाव, दि. १ (प्रतिनिधी): गेला आठवडाभर धुमसत असलेली सोनसोडो येथील कचरा यार्डातील आग नियंत्रणाखाली आणण्यात मडगाव नगरपालिकेला यश न आल्याने अखेर आजपासून येथील जिल्हा आपत्कालीन कक्षाच्या मार्गदर्शनाखाली हे ऑपरेशन कार्यरत झाले व आज एकाच दिवशी तब्बल १८२ ट्रक माती धुमसणाऱ्या कचऱ्यावर पसरविली गेली. उरलेले काम उद्या सायंकाळपर्यंत पूर्ण होईल, अशी खात्री व्यक्त केली जात आहे.
काल मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी जी. पी. नाईक यांनी सोनसोडोवर जाऊन तेथील ऑपरेशनचा आढावा घेतला असता नगरपालिकेच्या मोहिमेत नियोजन नसल्याचे आढळून आल्याने त्यांनी जिल्हा आपत्कालीन यंत्रणेस पुढाकार घेण्यास सांगितले व त्यानुसार आजचे ऑपरेशन पार पडले.
आज स्वतः जिल्हाधिकारी सोनसोडोवर उपस्थित होते. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनीही तेथे भेट दिली. कुडतरीचे आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स व नगराध्यक्ष साव्हियो कुतिन्हो यांनी आज बराच वेळ तेथे थांबून एकंदर ऑपरेशनवर लक्ष ठेवले . मुख्याधिकारी यशवंत तावडे व पालिकेचे अन्य अधिकारी तर सकाळी ८ वा. पासून सोनसोड्यावर ठाण मांडून राहिले ते सायंकाळी ७ वा. परतले.आजच्या मोहिमेमुळे ७० टक्के काम पूर्ण झाले असून उरलेले उद्या सायंकाळपर्यंत पूर्ण होईल, असे तावडे यांनी सांगितले.
आजच्या ऑपरेशनसाठी विविध खाण कंपन्यांकडून तसेच बांधकाम ठेकेदार आर्थर डिसोजा व संतोष जॉर्ज यांच्या कडून टिपरी उपलब्ध करण्यात आल्या व दिवसभर त्यांनी एकूण १८२ टिपरी माती आणली व त्यामुळे सोनसोडो भागाला खाणसदृश रूप आज आले होते. इतक्या मोठ्या संख्येतील टिपरी तेथे वाहतूक करणार असल्याने कुडतरी रस्त्यावर कोणतीही वाहतूक समस्या उद्भवून लोकांची गैरसोय होणार नाही, यासाठी तेथे खास वाहतूक पोलिस तैनात करण्याची तसेच आगीमुळे खंडित झालेला यार्डांतील वीजपुरवठा तत्काळ सुरू करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी काल आपल्या सोनसोडो भेटीच्यावेळी पोलिस व वीज खाते अभियंत्यांना दिल्या होत्या आज त्याची कार्यवाही झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आज बव्हंशी आग विझली आहे व उद्या सायंकाळपर्यंत आगीवर पूर्णतः नियंत्रण मिळेल अशी खात्री आहे.
Monday, 2 February 2009
Sunday, 1 February 2009
नवीन चावलांना हटवा मुख्य निवडणूक आयुक्तांची शिफारस पक्षपात करत असल्याचा अहवाल आयोगामध्ये अभूतपूर्व संघर्ष
नवी दिल्ली, दि.३१ : निवडणूक आयुक्त नवीन चावला यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात यावे, अशी शिफारस मुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी यांनी केली आहे. या घटनेमुळे निवडणूक आयोगात संघर्षाची अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली आहे.
गेल्या वर्षभरातील चावला यांच्या कार्यशैलीवरून ते काही विशिष्ट पक्षांबाबत भेदभावपूर्ण व्यवहार करतात, असा निष्कर्ष गोपालस्वामी यांनी काढून त्याचा सप्रमाण अहवाल सरकारला सादर केला. या संदर्भात उल्लेखनीय आहे की नवीन चावला हे कॉंग्रेसला अनुकूल आहेत व ते भेदभावाने काम करतात, असा आरोप भाजपनेही केला होता. याबाबत भाजपने एक याचिकाही निवडणूक आयोगाकडे दाखल केली होती.
याबाबत काहीही बोलण्यास नकार देताना गोपालस्वामी म्हणाले की, मी आपले काम केले. अहवाल सादर केला आहे.
गोपालस्वामी यांचा कार्यकाळ २० एप्रिल रोजी संपत आहे. नवीन चावला हे आयोगाचे वरिष्ठ सदस्य असल्याने ते मुख्य निवडणूक आयुक्तपदाचे स्वाभाविक उत्तराधिकारी मानले जात आहेत.
गोपालस्वामी यांच्या या शिफारसीमुळे तीन सदस्यांच्या निवडणूक आयोगातील मतभेद उघड झाले आहेत. गेल्यावर्षी कर्नाटकमध्ये विधानसभेची निवडणूक घेण्याला नवीन चावला यांनी आक्षेप घेतला होता. याचप्रमाणे २००७ मध्ये उन्हाळ्यात उत्तर प्रदेशात निवडणूक घेण्यालाही त्यांनी विरोध केला होता, असे कळते.
राजीनामा देणार नाही : चावला
गोपालस्वामी यांच्या शिफारसीबाबत मला काहीही माहिती नाही, असे सांगत नवीन चावला यांनी याबाबत कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. ते म्हणाले की मी राजीनामा देणार नाही. निवडणूक आयोग गेल्या कित्येक वर्षांपासून त्रुटिरहित निवडणुका घेत आहे व पुढेही असेच काम करेल. सध्या आयोगाची प्रतिष्ठा कायम राखणे आवश्यक आहे.
कायद्याचा गुंता : कॉंग्रेस
मुख्य निवडणूक आयुक्त गोपालस्वामी यांच्या नवीन चावला यांना हटविण्याच्या शिफारसीबाबत कायद्याबाबत पेचप्रसंग निर्माण झाला आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करताना कॉंग्रेसचे प्रवक्ते अभिषेक सिंघवी म्हणाले की मुख्य निवडणूक आयुक्तांना आपल्या सहकाऱ्याबाबत अशी कारवाई करता येते काय, हा मुद्दा आहे. गोपालस्वामी यांच्या शिफारसीबाबत आमच्याकडे कुठलीही अधिकृत नोटीस नाही. हे प्रकरण केन्द्र सरकारच्या अधिकारक्षेत्रात आहे. याबाबत सर्वंकष विचार केल्याशिवाय काहीही प्रतिक्रिया देणे योग्य होणार नाही.
-------------------------------------------------------
चावलांना हटवाच : भाजप
निवडणूक आयुक्त नवीन चावला यांना त्यांच्या पदावरून हटवावे, मुख्य निवडणूक आयुक्तांच्या शिफारसीवर ठोस कारवाई झाली पाहिजे अशी मागणी भाजपने केली आहे.
भाजपाचे प्रवक्ते राजीव प्रताप रूडी म्हणाले की मुख्य निवडणूक आयुक्तांनी आयोगाच्या एका सदस्याला पदावरून हटविण्याची शिफारस केल्याने आयोगाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामुळे देशाच्या लोकशाहीच्या चौकटीला धोका निर्माण झाला आहे. या शिफारसीवर कारवाई झाली नाही तर निवडणूक आयोगाची निष्पक्षता संशयास्पद ठरेल व लोकशाही आणि संविधानाला धोका निर्माण होईल.
-------------------------------------------------------------
संवैधानिक तरतूद
संवैधानिक तरतूदीनुसार कोणत्याही निवडणूक आयुक्ताला हटविण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांची शिफारस आवश्यक आहे. पण, मुख्य निवडणूक आयुक्तांच्या अशा शिफारसीवर सरकार अंमल करेल की नाही हे स्पष्ट नाही. निवडणूक आयोग सर्वसंमतीने काम करत असतो व मतभेदाच्या स्थितीत बहुमताच्या आधारे निर्णय घेण्यात येतो.
गेल्या वर्षभरातील चावला यांच्या कार्यशैलीवरून ते काही विशिष्ट पक्षांबाबत भेदभावपूर्ण व्यवहार करतात, असा निष्कर्ष गोपालस्वामी यांनी काढून त्याचा सप्रमाण अहवाल सरकारला सादर केला. या संदर्भात उल्लेखनीय आहे की नवीन चावला हे कॉंग्रेसला अनुकूल आहेत व ते भेदभावाने काम करतात, असा आरोप भाजपनेही केला होता. याबाबत भाजपने एक याचिकाही निवडणूक आयोगाकडे दाखल केली होती.
याबाबत काहीही बोलण्यास नकार देताना गोपालस्वामी म्हणाले की, मी आपले काम केले. अहवाल सादर केला आहे.
गोपालस्वामी यांचा कार्यकाळ २० एप्रिल रोजी संपत आहे. नवीन चावला हे आयोगाचे वरिष्ठ सदस्य असल्याने ते मुख्य निवडणूक आयुक्तपदाचे स्वाभाविक उत्तराधिकारी मानले जात आहेत.
गोपालस्वामी यांच्या या शिफारसीमुळे तीन सदस्यांच्या निवडणूक आयोगातील मतभेद उघड झाले आहेत. गेल्यावर्षी कर्नाटकमध्ये विधानसभेची निवडणूक घेण्याला नवीन चावला यांनी आक्षेप घेतला होता. याचप्रमाणे २००७ मध्ये उन्हाळ्यात उत्तर प्रदेशात निवडणूक घेण्यालाही त्यांनी विरोध केला होता, असे कळते.
राजीनामा देणार नाही : चावला
गोपालस्वामी यांच्या शिफारसीबाबत मला काहीही माहिती नाही, असे सांगत नवीन चावला यांनी याबाबत कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. ते म्हणाले की मी राजीनामा देणार नाही. निवडणूक आयोग गेल्या कित्येक वर्षांपासून त्रुटिरहित निवडणुका घेत आहे व पुढेही असेच काम करेल. सध्या आयोगाची प्रतिष्ठा कायम राखणे आवश्यक आहे.
कायद्याचा गुंता : कॉंग्रेस
मुख्य निवडणूक आयुक्त गोपालस्वामी यांच्या नवीन चावला यांना हटविण्याच्या शिफारसीबाबत कायद्याबाबत पेचप्रसंग निर्माण झाला आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करताना कॉंग्रेसचे प्रवक्ते अभिषेक सिंघवी म्हणाले की मुख्य निवडणूक आयुक्तांना आपल्या सहकाऱ्याबाबत अशी कारवाई करता येते काय, हा मुद्दा आहे. गोपालस्वामी यांच्या शिफारसीबाबत आमच्याकडे कुठलीही अधिकृत नोटीस नाही. हे प्रकरण केन्द्र सरकारच्या अधिकारक्षेत्रात आहे. याबाबत सर्वंकष विचार केल्याशिवाय काहीही प्रतिक्रिया देणे योग्य होणार नाही.
-------------------------------------------------------
चावलांना हटवाच : भाजप
निवडणूक आयुक्त नवीन चावला यांना त्यांच्या पदावरून हटवावे, मुख्य निवडणूक आयुक्तांच्या शिफारसीवर ठोस कारवाई झाली पाहिजे अशी मागणी भाजपने केली आहे.
भाजपाचे प्रवक्ते राजीव प्रताप रूडी म्हणाले की मुख्य निवडणूक आयुक्तांनी आयोगाच्या एका सदस्याला पदावरून हटविण्याची शिफारस केल्याने आयोगाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामुळे देशाच्या लोकशाहीच्या चौकटीला धोका निर्माण झाला आहे. या शिफारसीवर कारवाई झाली नाही तर निवडणूक आयोगाची निष्पक्षता संशयास्पद ठरेल व लोकशाही आणि संविधानाला धोका निर्माण होईल.
-------------------------------------------------------------
संवैधानिक तरतूद
संवैधानिक तरतूदीनुसार कोणत्याही निवडणूक आयुक्ताला हटविण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांची शिफारस आवश्यक आहे. पण, मुख्य निवडणूक आयुक्तांच्या अशा शिफारसीवर सरकार अंमल करेल की नाही हे स्पष्ट नाही. निवडणूक आयोग सर्वसंमतीने काम करत असतो व मतभेदाच्या स्थितीत बहुमताच्या आधारे निर्णय घेण्यात येतो.
मुंबई हल्ला प्रकरण पाकिस्तानची खुमखुमी अजूनही कायम : प्रणव
- कारवाईचे "नाटक' वठवले
- संभ्रम निर्मितीचा प्रयत्न
- वक्तव्यांत एकवाक्यता नाही
नवी दिल्ली, दि. ३१ : मुंबई हल्ल्यांसंदर्भात भारताने सादर केलेल्या पुराव्यांबाबत त्या देशाकडून अधिकृतपणे अद्याप आम्हाला कोणतीही माहिती न मिळाल्याचा स्पष्ट खुलासा परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज येथे केला. त्यामुळे याप्रकरणी पाकिस्तानची खुमखुमी अजूनही कायम असल्याचे व तो देश भारताच्या संयमाची "परीक्षा' घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आम्ही याबाबत अंतर्गत चौकशी पूर्ण केल्याचे प्रतिपादन पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी केले आहे.गेल्या गुरुवारी गृहमंत्री पी. चिदंबरम यांची भेट घेतली तेव्हा त्यांच्याकडे पाकिस्तानातील अंतर्गत चौकशीचा तपशील त्यांना सादर करण्यात आल्याचा दावा कुरेशी यांनी केला आहे. मात्र, त्यात अजिबात तथ्य नसल्याचा जाहीर खुलासा मुखर्जी यांनी केल्यामुळे पाकिस्तानची दुटप्पी नीती नव्याने उजेडात आली आहे.
या मुद्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान युसुफ रझा गिलानी, राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी हेही दिशाभूल करणारी विधाने करत आहेत.
त्याचबरोबर पाकिस्तानचे ब्रिटनमधील उच्चायुक्त वाहिद शमसुल हसन यांनी तर मुंबईवरील हल्ल्याचा कट पाकिस्तानात शिजलाच नव्हता, तो अन्य कोठे तरी रचला गेला असावा, असे धक्कादायक विधान करून आणखी गोंधळ उडवून दिला आहे. त्यावर गिलानी यांनी, अशा स्वरूपाचे वक्तव्य करण्याचा अधिकारच हसन यांना नसल्याचे म्हटले आहे. म्हणजेच सातत्याने या महत्त्वाच्या मुद्यावर वेगवेगळी वक्तव्ये करून भारताच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा डाव पाकिस्तानने टाकल्याचे दिसून येते. प्रणव मुखर्जी यांच्या स्पष्ट निवेदनामुळे यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या कटामागे आयएसआय या पाकिस्तानच्या लष्करी गुप्तचर संघटनेचा हात असल्याचे उजेडात येऊ नये यादृष्टीनेच पाकिस्तानची नव्याने धडपड सुरू झाली आहे. मुंबईवरील हल्ल्यांसंदर्भात भारताने पाकिस्तानकडे पुरेसे पुरावे सादर केले आहेत. त्यानंतर संबंधित अतिरेक्यांची धरपकड करण्यात आल्याचे नाटक काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने बेमालुमपणे वठवले होते. तसेच तपासकामी भारतीय तपास यंत्रणांचे सहकार्य घेण्याचे व भारताला साहाय्य करण्याचा साळसुद आव पाकिस्तानने आणला होता. कारण त्या काळात पाकवर युरोपीय देश आणि अमेरिकेकडून प्रचंड दबाव आणण्यात आला होता. तथापि, या दबावाचा पिळ किंचित ढिला झाल्यानंतर पाकिस्तानची गाडी पुन्हा पूर्वपदावर आल्याचे दिसून येते. या महत्त्वाच्या मुद्यावर पाकिस्तानचे तळ्यातमळ्यात सुरू झाले आहे. मुखर्जी यांनी संतप्त सुरात केलेले निवेदन म्हणजे त्याचेच निदर्शक ठरले आहे.
- संभ्रम निर्मितीचा प्रयत्न
- वक्तव्यांत एकवाक्यता नाही
नवी दिल्ली, दि. ३१ : मुंबई हल्ल्यांसंदर्भात भारताने सादर केलेल्या पुराव्यांबाबत त्या देशाकडून अधिकृतपणे अद्याप आम्हाला कोणतीही माहिती न मिळाल्याचा स्पष्ट खुलासा परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज येथे केला. त्यामुळे याप्रकरणी पाकिस्तानची खुमखुमी अजूनही कायम असल्याचे व तो देश भारताच्या संयमाची "परीक्षा' घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आम्ही याबाबत अंतर्गत चौकशी पूर्ण केल्याचे प्रतिपादन पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी केले आहे.गेल्या गुरुवारी गृहमंत्री पी. चिदंबरम यांची भेट घेतली तेव्हा त्यांच्याकडे पाकिस्तानातील अंतर्गत चौकशीचा तपशील त्यांना सादर करण्यात आल्याचा दावा कुरेशी यांनी केला आहे. मात्र, त्यात अजिबात तथ्य नसल्याचा जाहीर खुलासा मुखर्जी यांनी केल्यामुळे पाकिस्तानची दुटप्पी नीती नव्याने उजेडात आली आहे.
या मुद्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान युसुफ रझा गिलानी, राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी हेही दिशाभूल करणारी विधाने करत आहेत.
त्याचबरोबर पाकिस्तानचे ब्रिटनमधील उच्चायुक्त वाहिद शमसुल हसन यांनी तर मुंबईवरील हल्ल्याचा कट पाकिस्तानात शिजलाच नव्हता, तो अन्य कोठे तरी रचला गेला असावा, असे धक्कादायक विधान करून आणखी गोंधळ उडवून दिला आहे. त्यावर गिलानी यांनी, अशा स्वरूपाचे वक्तव्य करण्याचा अधिकारच हसन यांना नसल्याचे म्हटले आहे. म्हणजेच सातत्याने या महत्त्वाच्या मुद्यावर वेगवेगळी वक्तव्ये करून भारताच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा डाव पाकिस्तानने टाकल्याचे दिसून येते. प्रणव मुखर्जी यांच्या स्पष्ट निवेदनामुळे यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या कटामागे आयएसआय या पाकिस्तानच्या लष्करी गुप्तचर संघटनेचा हात असल्याचे उजेडात येऊ नये यादृष्टीनेच पाकिस्तानची नव्याने धडपड सुरू झाली आहे. मुंबईवरील हल्ल्यांसंदर्भात भारताने पाकिस्तानकडे पुरेसे पुरावे सादर केले आहेत. त्यानंतर संबंधित अतिरेक्यांची धरपकड करण्यात आल्याचे नाटक काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने बेमालुमपणे वठवले होते. तसेच तपासकामी भारतीय तपास यंत्रणांचे सहकार्य घेण्याचे व भारताला साहाय्य करण्याचा साळसुद आव पाकिस्तानने आणला होता. कारण त्या काळात पाकवर युरोपीय देश आणि अमेरिकेकडून प्रचंड दबाव आणण्यात आला होता. तथापि, या दबावाचा पिळ किंचित ढिला झाल्यानंतर पाकिस्तानची गाडी पुन्हा पूर्वपदावर आल्याचे दिसून येते. या महत्त्वाच्या मुद्यावर पाकिस्तानचे तळ्यातमळ्यात सुरू झाले आहे. मुखर्जी यांनी संतप्त सुरात केलेले निवेदन म्हणजे त्याचेच निदर्शक ठरले आहे.
सरकारला भाजप कोंडीत पकडणार
विधानसभा अधिवेशन उद्यापासून
पणजी, दि. ३१ (प्रतिनिधी): सोमवार २ फेब्रुवारीपासून विधानसभा अधिवेशन सुरू होत आहे. हे अधिवेशन केवळ पाच दिवसांचे असले तरी त्याचा पुरेपूर फायदा उठवून सरकारला पूर्णपणे नामोहरम करण्याची व्यूहरचना विरोधी भाजपने केल्याने अधिवेशन रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सोमवार २ रोजी राज्यपाल एस.एस.सिद्धू यांचे अभिभाषण होणार आहे.यंदा पहिल्यांदाच राज्यपालांचे स्वागत मुख्यमंत्री,सभापती व विरोधी पक्ष नेते करणार आहेत. राज्यपाल श्री.सिद्धु यांनी अद्याप निःपक्षपातीपणे आपली भूमिका वठवल्याने त्यांच्या भाषणात व्यतय आणण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे पर्रीकर यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसापासून सकाळी साडेअकरा वाजता प्रश्नोत्तर व शून्य प्रहराचा तास होईल व नंतर थेट तीन वाजता चर्चेला सुरुवात होईल. अधिवेशनाचा काळ कमी झाल्याने व चर्चेसाठी प्रश्न अधिक असल्याने अधिवेशन रात्री उशिरापर्यंत सुरू राहते व त्यामुळे सर्वांचीच गैरसोय होत असल्याने विरोधी भाजपने सकाळच्या वेळेचा वापर करण्याची मागणी यावेळी मान्य करण्यात आली आहे.
विद्यमान कॉंग्रेस सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरल्याचा आरोप करून या अधिवेशनात अनेक भानगडी उघड करण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे; तर जनतेसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजना व विकासकामांची माहिती या अधिवेशनानिमित्ताने लोकांपर्यंत पोहचवण्याचे सरकारने ठरवले आहे.सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव व कदंब महामंडळाचे अध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड लोरेन्सो यांच्यावरील अपात्रता याचिका,पांडुरंग मडकईकर यांच्या मंत्रिपदाचा मुद्दा,कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे मतभेद आदी विविध विषयांमुळे एक वेगळीच उत्सुकता लोकांना लागून राहिली असून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन भरवण्यात येत असल्याने त्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.सरकारच्या बेपर्वाईमुळे राज्यावर भीषण आर्थिक संकट ओढवण्याची भीती विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी वर्तविली असून येत्या अधिवेशनात त्याचा उलगडा करून दाखवण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले आहे. त्यामुळे सरकारची विलक्षण गोची होण्याची शक्यता आहे.
पणजी, दि. ३१ (प्रतिनिधी): सोमवार २ फेब्रुवारीपासून विधानसभा अधिवेशन सुरू होत आहे. हे अधिवेशन केवळ पाच दिवसांचे असले तरी त्याचा पुरेपूर फायदा उठवून सरकारला पूर्णपणे नामोहरम करण्याची व्यूहरचना विरोधी भाजपने केल्याने अधिवेशन रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सोमवार २ रोजी राज्यपाल एस.एस.सिद्धू यांचे अभिभाषण होणार आहे.यंदा पहिल्यांदाच राज्यपालांचे स्वागत मुख्यमंत्री,सभापती व विरोधी पक्ष नेते करणार आहेत. राज्यपाल श्री.सिद्धु यांनी अद्याप निःपक्षपातीपणे आपली भूमिका वठवल्याने त्यांच्या भाषणात व्यतय आणण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे पर्रीकर यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसापासून सकाळी साडेअकरा वाजता प्रश्नोत्तर व शून्य प्रहराचा तास होईल व नंतर थेट तीन वाजता चर्चेला सुरुवात होईल. अधिवेशनाचा काळ कमी झाल्याने व चर्चेसाठी प्रश्न अधिक असल्याने अधिवेशन रात्री उशिरापर्यंत सुरू राहते व त्यामुळे सर्वांचीच गैरसोय होत असल्याने विरोधी भाजपने सकाळच्या वेळेचा वापर करण्याची मागणी यावेळी मान्य करण्यात आली आहे.
विद्यमान कॉंग्रेस सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरल्याचा आरोप करून या अधिवेशनात अनेक भानगडी उघड करण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे; तर जनतेसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजना व विकासकामांची माहिती या अधिवेशनानिमित्ताने लोकांपर्यंत पोहचवण्याचे सरकारने ठरवले आहे.सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव व कदंब महामंडळाचे अध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड लोरेन्सो यांच्यावरील अपात्रता याचिका,पांडुरंग मडकईकर यांच्या मंत्रिपदाचा मुद्दा,कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे मतभेद आदी विविध विषयांमुळे एक वेगळीच उत्सुकता लोकांना लागून राहिली असून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन भरवण्यात येत असल्याने त्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.सरकारच्या बेपर्वाईमुळे राज्यावर भीषण आर्थिक संकट ओढवण्याची भीती विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी वर्तविली असून येत्या अधिवेशनात त्याचा उलगडा करून दाखवण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले आहे. त्यामुळे सरकारची विलक्षण गोची होण्याची शक्यता आहे.
धारगळच्या क्रीडा नगरीला शेतकऱ्यांचा कडवा विरोध
सरकारविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा
मोरजी, दि. ३१ (वार्ताहर) : धारगळ येथील नियोजित क्रीडा नगरीतून शेतजमिन व आंबाबागायती वगळली नाही तर सरकार विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा धारगळ क्रीडानगरी विरोधी जमीन बचाव समितीने दिला आहे.
या नगरीच्या नियोजित जागेत ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी, आंबा, काजू कोकम, फणस, सागवान अशा प्रकारची झाडे लावलेल्या जमिनींची पाहणी आज पणजी व स्थानिक पत्रकारांनी शेतकऱ्यांसोबत केली.
ही झाडे लावण्यासाठी किती परिश्रम घ्यावे लागले याची सविस्तर माहिती देताना कुठल्याही परिस्थितीत शेतजमीन व आम्राबागायती नगरीसाठी सरकारला संपादू देणार नाही. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा इशारा शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या धारगळ क्रीडानगरी विरोधी जमीन बचाव समितीद्वारे देण्यात आला.
येथील शेतकरी धोंडू परब, दुर्गादास परब, आपा परब, कृष्णनाथ परब, धोंडू पटेकर, प्रकाश पाळयेकर, गौरी परब, सोमनाथ परब, प्रदीप परब, अनिल परब व संतोष परब यांनी पत्रकारांना यासंदर्भात माहिती दिली. १५० कुटुंबे या आम्रबागायतीवर अवलंबून आहेत. पालये, आशेलबाग, व विर्नोडा, दाडाचीवाडी, पालये, ओशेलबाग व विर्नोडा या भागातील शेतकऱ्यांनी डोंगर माथ्यावर सायकलीला पाण्याच्या घागरी बांधून पाणी नेले व झाडे फुलवली. त्यात ५ लाख चौरस मीटर जागेत ही झाडे असून ही जागा सरकारने वगळावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. पावसाळ्यात याठिकाणी भात शेती, नाचणी, मुग, भुईमूग आदी पिकांचे उत्पन्न घेतले जाते, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
पाणी अडवा, पाणी जिरवा या योजनेद्वारे ओहळाला बांध घालून पाणी अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. दरम्यान या भागातून जी बागायत आहे त्याला जवळूनच तिलारी प्रकल्पाचा कालवा अडीच किलोमीटर लांबपर्यंत गेला आहे. आता तिळारीचे पाणी ऐन तोंडावर आले असताना सरकारने शेतजमिन मालकांना विश्वासात न घेता क्रीडा नगरीसाठी जागा जर संपादन करण्याचा प्रयत्न केला तर तो हाणून पाडला जाईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.
खडकाळ जागेची पाहणी
क्रीडामंत्री बाबू आजगावकर व क्रीडा अधिकारी यांनी नियोजित जागेची पाहणी केली होती. त्यावेळी मंत्री व अधिकाऱ्यांनी आपल्या गाड्या ओसाड व खडकाळ भागात पार्क करून ही जागा योग्य असल्याचा निर्वाळा दिला होता. तथापि, त्यांनी आम्रबाग आणि मोठ्या प्रमाणात बागायती असलेली जागा दाखवली नाही. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी स्वत: या जागेला भेट देऊन नंतरच क्रीडा नगरी उभारण्याचा निर्णय घ्यावा, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
२१ लाख चौरस मीटर जागा
या क्रीडा नगरीसाठी २१ लाख चौरस मीटर जागा हवीच कशाला, असा सवाल यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित करून आजपर्यंत या नगरीत कोणते प्रकल्प कोणत्या प्रकारचे रोजगार याविषयी सरकारने माहिती दिलेली नाही. यावरून कुठेतरी काळेबरे असल्याचा संशय शेतकऱ्यांनी व्यक्त करून ऑलॉपिंकसाठी जर ६ लाख चौरस मीटर जागा पुरेशी ठरते तर क्रीडा नगरीसाठी २१ लाख चौरस मीटर जागेची आवश्यकता का, खडा असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहे.
शेतकऱ्यांनी यापूर्वी क्रीडामंत्री बाबू आजगावकर यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला असता ते आमची कैफियत ऐकून घेत नाहीत, असा दावा शेतकऱ्यांनी केला. सरकारला जर क्रीडा नगरी उभारायची असेल तर खडकाळ जमीन शेतकरी द्यायला तयार आहे. मात्र लागवडीखालील जमीन कोणत्याही स्थितीत दिली जाणार नाही, असा इशारा देण्यात आला.
सरपंच फिरकलेच नाही
क्रीडा नगरीसाठी पेडणे तालुक्यातील काही सरपंच, उपसरपंच, पंच, जिल्हा सदस्य व इतर मंडळी क्रीडा नगरीसाठी हातवारे करून पाठिंबा देतात. त्या जबाबदार लोकांनी जी झाडांची बागायत आहे त्या ठिकाणी येऊन जागेची पाहणी करावी व नंतरच पाठिंबा द्यावा. प्रत्यक्षात त्यांनी अजूनही त्या जागेची पाहणीच केलेली नाही. त्यांनी ती करावी, असे आवाहन फोरमने केले आहे. दरम्यान या बागायतीची पाहणी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, खासदार श्रीपाद नाईक, आमदार दयानंद सोपटे व धारगळचे सरपंच भूषण ऊर्फ प्रदीप नाईक यांनी केलेली आहे.
नागरिकांची बैठक
दरम्यान, धारगळ क्रीडा नगरी विरोधी जमीन बचाव समितीची महत्त्वाची बैठक राष्ट्रोळी मंदिर दाडाचीवाडी धारगळ येथे झाली. त्यावेळी पत्रकारांना माहिती देताना समितीतर्फे लेखी निवेदन मुख्यमंत्री क्रीडामंत्री क्रीडाखाते, विरोधी पक्षनेते, खासदार, पंचायत, उपजिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले आहे. मात्र मुख्यमंत्री कामत यांनी अजूनपर्यंत या क्रीडा नगरीविषयी व जागा वगळण्याविषयी प्रतिक्रिया दिलेली नाही. यापुढे सरकारने जर जमीन संपादन करण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर संबंधित जमीन मालकांना लेखी नोटीस येतील. त्यावेळी प्रथम धडक मोर्चा पेडणे उपजिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात येईल, असे सांगितले. याप्रसंगी नवसो पालयेकर, मदन परब, चंद्रकांत नाईक, सावित्री पालयेकर, प्रकाश पालयेकर, दुर्गादास परब आदींनी आपले विचार मांडले.
मोरजी, दि. ३१ (वार्ताहर) : धारगळ येथील नियोजित क्रीडा नगरीतून शेतजमिन व आंबाबागायती वगळली नाही तर सरकार विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा धारगळ क्रीडानगरी विरोधी जमीन बचाव समितीने दिला आहे.
या नगरीच्या नियोजित जागेत ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी, आंबा, काजू कोकम, फणस, सागवान अशा प्रकारची झाडे लावलेल्या जमिनींची पाहणी आज पणजी व स्थानिक पत्रकारांनी शेतकऱ्यांसोबत केली.
ही झाडे लावण्यासाठी किती परिश्रम घ्यावे लागले याची सविस्तर माहिती देताना कुठल्याही परिस्थितीत शेतजमीन व आम्राबागायती नगरीसाठी सरकारला संपादू देणार नाही. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा इशारा शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या धारगळ क्रीडानगरी विरोधी जमीन बचाव समितीद्वारे देण्यात आला.
येथील शेतकरी धोंडू परब, दुर्गादास परब, आपा परब, कृष्णनाथ परब, धोंडू पटेकर, प्रकाश पाळयेकर, गौरी परब, सोमनाथ परब, प्रदीप परब, अनिल परब व संतोष परब यांनी पत्रकारांना यासंदर्भात माहिती दिली. १५० कुटुंबे या आम्रबागायतीवर अवलंबून आहेत. पालये, आशेलबाग, व विर्नोडा, दाडाचीवाडी, पालये, ओशेलबाग व विर्नोडा या भागातील शेतकऱ्यांनी डोंगर माथ्यावर सायकलीला पाण्याच्या घागरी बांधून पाणी नेले व झाडे फुलवली. त्यात ५ लाख चौरस मीटर जागेत ही झाडे असून ही जागा सरकारने वगळावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. पावसाळ्यात याठिकाणी भात शेती, नाचणी, मुग, भुईमूग आदी पिकांचे उत्पन्न घेतले जाते, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
पाणी अडवा, पाणी जिरवा या योजनेद्वारे ओहळाला बांध घालून पाणी अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. दरम्यान या भागातून जी बागायत आहे त्याला जवळूनच तिलारी प्रकल्पाचा कालवा अडीच किलोमीटर लांबपर्यंत गेला आहे. आता तिळारीचे पाणी ऐन तोंडावर आले असताना सरकारने शेतजमिन मालकांना विश्वासात न घेता क्रीडा नगरीसाठी जागा जर संपादन करण्याचा प्रयत्न केला तर तो हाणून पाडला जाईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.
खडकाळ जागेची पाहणी
क्रीडामंत्री बाबू आजगावकर व क्रीडा अधिकारी यांनी नियोजित जागेची पाहणी केली होती. त्यावेळी मंत्री व अधिकाऱ्यांनी आपल्या गाड्या ओसाड व खडकाळ भागात पार्क करून ही जागा योग्य असल्याचा निर्वाळा दिला होता. तथापि, त्यांनी आम्रबाग आणि मोठ्या प्रमाणात बागायती असलेली जागा दाखवली नाही. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी स्वत: या जागेला भेट देऊन नंतरच क्रीडा नगरी उभारण्याचा निर्णय घ्यावा, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
२१ लाख चौरस मीटर जागा
या क्रीडा नगरीसाठी २१ लाख चौरस मीटर जागा हवीच कशाला, असा सवाल यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित करून आजपर्यंत या नगरीत कोणते प्रकल्प कोणत्या प्रकारचे रोजगार याविषयी सरकारने माहिती दिलेली नाही. यावरून कुठेतरी काळेबरे असल्याचा संशय शेतकऱ्यांनी व्यक्त करून ऑलॉपिंकसाठी जर ६ लाख चौरस मीटर जागा पुरेशी ठरते तर क्रीडा नगरीसाठी २१ लाख चौरस मीटर जागेची आवश्यकता का, खडा असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहे.
शेतकऱ्यांनी यापूर्वी क्रीडामंत्री बाबू आजगावकर यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला असता ते आमची कैफियत ऐकून घेत नाहीत, असा दावा शेतकऱ्यांनी केला. सरकारला जर क्रीडा नगरी उभारायची असेल तर खडकाळ जमीन शेतकरी द्यायला तयार आहे. मात्र लागवडीखालील जमीन कोणत्याही स्थितीत दिली जाणार नाही, असा इशारा देण्यात आला.
सरपंच फिरकलेच नाही
क्रीडा नगरीसाठी पेडणे तालुक्यातील काही सरपंच, उपसरपंच, पंच, जिल्हा सदस्य व इतर मंडळी क्रीडा नगरीसाठी हातवारे करून पाठिंबा देतात. त्या जबाबदार लोकांनी जी झाडांची बागायत आहे त्या ठिकाणी येऊन जागेची पाहणी करावी व नंतरच पाठिंबा द्यावा. प्रत्यक्षात त्यांनी अजूनही त्या जागेची पाहणीच केलेली नाही. त्यांनी ती करावी, असे आवाहन फोरमने केले आहे. दरम्यान या बागायतीची पाहणी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, खासदार श्रीपाद नाईक, आमदार दयानंद सोपटे व धारगळचे सरपंच भूषण ऊर्फ प्रदीप नाईक यांनी केलेली आहे.
नागरिकांची बैठक
दरम्यान, धारगळ क्रीडा नगरी विरोधी जमीन बचाव समितीची महत्त्वाची बैठक राष्ट्रोळी मंदिर दाडाचीवाडी धारगळ येथे झाली. त्यावेळी पत्रकारांना माहिती देताना समितीतर्फे लेखी निवेदन मुख्यमंत्री क्रीडामंत्री क्रीडाखाते, विरोधी पक्षनेते, खासदार, पंचायत, उपजिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले आहे. मात्र मुख्यमंत्री कामत यांनी अजूनपर्यंत या क्रीडा नगरीविषयी व जागा वगळण्याविषयी प्रतिक्रिया दिलेली नाही. यापुढे सरकारने जर जमीन संपादन करण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर संबंधित जमीन मालकांना लेखी नोटीस येतील. त्यावेळी प्रथम धडक मोर्चा पेडणे उपजिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात येईल, असे सांगितले. याप्रसंगी नवसो पालयेकर, मदन परब, चंद्रकांत नाईक, सावित्री पालयेकर, प्रकाश पालयेकर, दुर्गादास परब आदींनी आपले विचार मांडले.
आता युवक कॉंग्रेसचा दक्षिण गोव्यावर दावा!
प्रतिमा कुतिन्हो,जनार्दन भांडारींची शिफारस
पणजी, दि. ३१ (प्रतिनिधी) : दक्षिण गोव्यात लोकसभेची निवडणूक कोण लढवणार यावरून कॉंग्रेसमध्ये सुंदोपसुंदी सुरू झालेली असतानाच आता युवक कॉंग्रेसने या शर्यतीत आपले घोडे पुढे दामटताना ऍड. प्रतिमा कुतिन्हो व जनार्दन भांडारी या दोन नावांची शिफारस केली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत निवडून येण्याची पात्रता व प्रत्यक्ष राजकारणात उतरण्याची क्षमता असलेल्या युवकांनी पुढे यावे,कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस राहुल गांधी अशा लोकांना उमेदवारी देण्यास इच्छुक आहेत,असे आवाहन राष्ट्रीय युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस तथा गोव्याचे प्रभारी चामला किरण रेड्डी यांनी केले.
आज पणजी येथील कॉंग्रेस भवनात बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष संकल्प आमोणकर व उपाध्यक्ष दिलीप धारगळकर हजर होते.राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक राज्यांत किमान ३० टक्के जागा युवकांना देण्याचे आवाहन केले आहे, त्यामुळे त्यांनी दिलेल्या प्रेरणेनुसार दक्षिण गोव्यासाठी युवक कॉंग्रेसच्या उपाध्यक्ष ऍड. प्रतिमा कुतिन्हो व जनार्दन भांडारी या दोन नावांची शिफारस केली जाणार असल्याची माहिती यावेळी संकल्प आमोणकर यांनी दिली. वालंका आलेमाव या युवक कॉंग्रेसच्या सदस्य नाहीत; परंतु त्यांना जर श्रेष्ठींकडून उमेदवारी देण्यात आली तर आपली तक्रार नसेल, असे सांगून विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन यांच्या उमेदवारीसही युवक कॉंग्रेसचा अजिबात विरोध नाही,अशी संभ्रम निर्माण करणारी भूमिका आमोणकर यांनी घेतली.
दरम्यान,राज्यातील युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना आपली ताकद दाखवण्यासाठी तसेच आपल्यामागे असलेल्या शक्तीचे प्रदर्शन करण्यासाठी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस तीन रॅलींचे आयोजन केले जाणार आहे. यापुढे युवक कॉंग्रेस समितीची निवड प्रत्यक्ष निवडणुकीतून होणार आहे. गट अध्यक्षांची निवड निवडणूकीव्दारे केली जाणार आहे. त्यानंतर सदर गट अध्यक्ष जिल्हा अध्यक्षांची निवड करतील व हे पदाधिकारी प्रदेश अध्यक्षांची निवड करतील,असेही यावेळी सांगण्यात आले.
यावेळी गोवा प्रदेश युवक कॉंग्रेसला लवकरच संकेतस्थळ तयार करण्याचे आदेश देण्यात आल्याचे रेड्डी यांनी सांगितले. येत्या ९ फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे युवक कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार असून त्यावेळी प्रदेश युवक कॉंग्रेस कार्यकारिणीने निवडलेली नावे दिल्लीत सादर केली जातील,असेही यावेळी सांगण्यात आले.
पणजी, दि. ३१ (प्रतिनिधी) : दक्षिण गोव्यात लोकसभेची निवडणूक कोण लढवणार यावरून कॉंग्रेसमध्ये सुंदोपसुंदी सुरू झालेली असतानाच आता युवक कॉंग्रेसने या शर्यतीत आपले घोडे पुढे दामटताना ऍड. प्रतिमा कुतिन्हो व जनार्दन भांडारी या दोन नावांची शिफारस केली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत निवडून येण्याची पात्रता व प्रत्यक्ष राजकारणात उतरण्याची क्षमता असलेल्या युवकांनी पुढे यावे,कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस राहुल गांधी अशा लोकांना उमेदवारी देण्यास इच्छुक आहेत,असे आवाहन राष्ट्रीय युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस तथा गोव्याचे प्रभारी चामला किरण रेड्डी यांनी केले.
आज पणजी येथील कॉंग्रेस भवनात बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष संकल्प आमोणकर व उपाध्यक्ष दिलीप धारगळकर हजर होते.राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक राज्यांत किमान ३० टक्के जागा युवकांना देण्याचे आवाहन केले आहे, त्यामुळे त्यांनी दिलेल्या प्रेरणेनुसार दक्षिण गोव्यासाठी युवक कॉंग्रेसच्या उपाध्यक्ष ऍड. प्रतिमा कुतिन्हो व जनार्दन भांडारी या दोन नावांची शिफारस केली जाणार असल्याची माहिती यावेळी संकल्प आमोणकर यांनी दिली. वालंका आलेमाव या युवक कॉंग्रेसच्या सदस्य नाहीत; परंतु त्यांना जर श्रेष्ठींकडून उमेदवारी देण्यात आली तर आपली तक्रार नसेल, असे सांगून विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन यांच्या उमेदवारीसही युवक कॉंग्रेसचा अजिबात विरोध नाही,अशी संभ्रम निर्माण करणारी भूमिका आमोणकर यांनी घेतली.
दरम्यान,राज्यातील युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना आपली ताकद दाखवण्यासाठी तसेच आपल्यामागे असलेल्या शक्तीचे प्रदर्शन करण्यासाठी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस तीन रॅलींचे आयोजन केले जाणार आहे. यापुढे युवक कॉंग्रेस समितीची निवड प्रत्यक्ष निवडणुकीतून होणार आहे. गट अध्यक्षांची निवड निवडणूकीव्दारे केली जाणार आहे. त्यानंतर सदर गट अध्यक्ष जिल्हा अध्यक्षांची निवड करतील व हे पदाधिकारी प्रदेश अध्यक्षांची निवड करतील,असेही यावेळी सांगण्यात आले.
यावेळी गोवा प्रदेश युवक कॉंग्रेसला लवकरच संकेतस्थळ तयार करण्याचे आदेश देण्यात आल्याचे रेड्डी यांनी सांगितले. येत्या ९ फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे युवक कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार असून त्यावेळी प्रदेश युवक कॉंग्रेस कार्यकारिणीने निवडलेली नावे दिल्लीत सादर केली जातील,असेही यावेळी सांगण्यात आले.
भारताच्या पुराव्यांवर पाकचे पुन्हा प्रश्नचिन्ह
नवी दिल्ली, दि. १ - कुठल्याही चौकशी यंत्रणेकडून गुन्ह्याची चौकशी ज्या पद्धतीने व्हावी त्याच पद्धतीने पाकिस्तानकडून मुंबई दहशतवादी हल्ल्याची चौकशी होत असून भारताने दिलेल्या पुराव्यांवर पाकिस्तानने काही पृच्छा केली असल्याची माहिती एका वरिष्ठ सरकारी सूत्राने दिली. पाकिस्तानने दोन वेगवेगळ्या संचात पाठवलेल्या प्रश्नावलींपैकी एका प्रश्नावलीची उत्तरे भारताने पाठविलीही आहेत, अशीही माहिती या सूत्राने दिली.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम. के. नारायणन यांनी, माझ्या माहितीनुसार भारताकडील पुरावे प्राप्त होताच पाक सरकारने त्यावर आम्हाला असंख्य प्रश्न विचारले होते आणि त्या प्रश्नांची सर्व उत्तरे त्यांना पाठविण्यात आली, असे सीएनएन-आयबीएन वाहिनीवरील करण थापर यांच्या "डेव्हिल्स ऍडव्होकेट' या कार्यक्रमात बोलताना सांगितले. पाकिस्तानचे ब्रिटनमधील उच्चयुक्त वाजिद शमसूल हसन यांनी त्यांच्या नुकत्याच दिलेल्या वक्तव्यात, मुंबई दहशतवादी हल्ल्याचा कट पाकिस्तानी भूमिवर शिजला नाही, असे म्हटले होते. वाजिद यांच्या वक्तव्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नारायणन यांनी वरील माहिती दिली.
दुसऱ्या संचात त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांना अजून प्राप्त झाली नसावीत असे मला वाटते. त्यामुळे पाकिस्तानचे उच्चायुक्त लंडनमध्ये कशाबद्दल बोलताहेत हे मी सांगू शकत नाही. त्यादेशात असंख्य बाबतीत बेबंदशाही आहे. तशीच याही बाबतीत ती असू शकते एवढेच मला म्हणता येईल, अशी प्रतिक्रिया नारायणन यांनी दिली.
भारताच्या पुराव्यांवरील पाकिस्तानी प्रतिक्रियेबद्दल तुम्ही समाधानी आहात काय या प्रश्नावर बोलताना, "समाधान' या शब्दाचा नेमका अर्थ मला कळत नाही परंतु ते नक्कीच गांभिर्याने वागत आहेत असे वाटते. कुठल्याही चौकशी यंत्रणेने ज्या पद्धतीने तपास पुढे न्यावा त्याचप्रमाणे ते तपास करित आहेत. दिलेल्या माहितीची पडताळणी आणि शहानिशा करणे, पुराव्यांवर प्रश्न उपस्थित करणे, ही गांभिर्याने चौकशी करण्याची लक्षणे आहेत, असे ते म्हणाले. त्यामुळे आमच्यादृष्टीने पाकने प्रश्न उपस्थित करणे, ही खुशखबर आहे. परंतु हे सर्व सोपस्कार झाल्यावर, त्यांच्याच श्रीमुखात हाणणारे सत्य ते स्वीकातील काय हे मला माहित नाही.
नारायण यांच्या वक्तव्याने गोंधळ :
मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या भारताने पाकला दिलेल्या पुराव्यांवर पाकने काही पृच्छा केल्याच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम. के. नारायणन यांच्या गौप्यस्फोटामुळे गोंधळ उडाला आहे. कारण, पाककडून काहीही अधिकृत प्रतिक्रिया आली नसल्याच्या आपल्या विधानावर परराष्ट्र व्यवहार मंत्री प्रणव मुखर्जी ठाम आहेत.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम. के. नारायणन यांनी, माझ्या माहितीनुसार भारताकडील पुरावे प्राप्त होताच पाक सरकारने त्यावर आम्हाला असंख्य प्रश्न विचारले होते आणि त्या प्रश्नांची सर्व उत्तरे त्यांना पाठविण्यात आली, असे सीएनएन-आयबीएन वाहिनीवरील करण थापर यांच्या "डेव्हिल्स ऍडव्होकेट' या कार्यक्रमात बोलताना सांगितले. पाकिस्तानचे ब्रिटनमधील उच्चयुक्त वाजिद शमसूल हसन यांनी त्यांच्या नुकत्याच दिलेल्या वक्तव्यात, मुंबई दहशतवादी हल्ल्याचा कट पाकिस्तानी भूमिवर शिजला नाही, असे म्हटले होते. वाजिद यांच्या वक्तव्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नारायणन यांनी वरील माहिती दिली.
दुसऱ्या संचात त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांना अजून प्राप्त झाली नसावीत असे मला वाटते. त्यामुळे पाकिस्तानचे उच्चायुक्त लंडनमध्ये कशाबद्दल बोलताहेत हे मी सांगू शकत नाही. त्यादेशात असंख्य बाबतीत बेबंदशाही आहे. तशीच याही बाबतीत ती असू शकते एवढेच मला म्हणता येईल, अशी प्रतिक्रिया नारायणन यांनी दिली.
भारताच्या पुराव्यांवरील पाकिस्तानी प्रतिक्रियेबद्दल तुम्ही समाधानी आहात काय या प्रश्नावर बोलताना, "समाधान' या शब्दाचा नेमका अर्थ मला कळत नाही परंतु ते नक्कीच गांभिर्याने वागत आहेत असे वाटते. कुठल्याही चौकशी यंत्रणेने ज्या पद्धतीने तपास पुढे न्यावा त्याचप्रमाणे ते तपास करित आहेत. दिलेल्या माहितीची पडताळणी आणि शहानिशा करणे, पुराव्यांवर प्रश्न उपस्थित करणे, ही गांभिर्याने चौकशी करण्याची लक्षणे आहेत, असे ते म्हणाले. त्यामुळे आमच्यादृष्टीने पाकने प्रश्न उपस्थित करणे, ही खुशखबर आहे. परंतु हे सर्व सोपस्कार झाल्यावर, त्यांच्याच श्रीमुखात हाणणारे सत्य ते स्वीकातील काय हे मला माहित नाही.
नारायण यांच्या वक्तव्याने गोंधळ :
मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या भारताने पाकला दिलेल्या पुराव्यांवर पाकने काही पृच्छा केल्याच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम. के. नारायणन यांच्या गौप्यस्फोटामुळे गोंधळ उडाला आहे. कारण, पाककडून काहीही अधिकृत प्रतिक्रिया आली नसल्याच्या आपल्या विधानावर परराष्ट्र व्यवहार मंत्री प्रणव मुखर्जी ठाम आहेत.
गोव्यात प्रथमच शिर्डी साईबाबांच्या पादुका
पणजीत २२ रोजी भव्य दर्शनसोहळा
पणजी, दि. १ (प्रतिनिधी) - तब्बल ९१ वर्षानंतर भक्तांना दर्शन घेण्यासाठी बाहेर काढल्या जाणाऱ्या शिर्डीतील साईबाबांच्या पादुकांचे दर्शन घेण्याचा पहिला मान गोव्यातील भक्तांना प्राप्त झाला आहे, ही साईभक्तांसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. ही संधी गोव्यातील "साईबाबा पादुका दर्शन सोहळा समिती'ने उपलब्ध केली असून दि. २२ फेब्रुवारी रोजी पणजीत हा पादुकादर्शन सोहळा होणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष अनिल खंवटे यांनी आज दिली.
पहाटे ४ वाजता साईंच्या आरत्या झाल्यानंतर रात्री १२ पर्यंत साईंच्या पादुका दर्शनासाठी उपलब्ध असणार आहेत. या सोहळ्यात सुमारे एक लाख भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता व्यक्त केली असून त्यासाठी खास व्यवस्था करण्यात येणार आहे. कला अकादमी ते कांपाल मैदानापर्यंत शामियाना उभारण्यात येणार आहे. यासाठी खास कोल्हापूर येथून शामियाना उभारणाऱ्या एका आस्थापनाला हे काम सोपवण्यात आले आहे. या शामियानात दर्शन घेण्यासाठी रांगेत राहणाऱ्या भक्तांना पिण्याच्या पाण्याची तसेच दर्शन घेण्यास तसेच अपंग भक्तांसाठी खास व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती श्री. खंवटे यांनी यावेळी दिली.
"गोवा मुक्त झाल्यापासून साईंच्या पादुका गोव्यात आणण्याचा विचार अनेकांच्या मनात होता. परंतु, त्यावेळी साईंच्या मनात नसल्याने ते शक्य झाले नाही. आता कित्येक वर्षानंतर गोव्यातील भक्तांना ही संधी उपलब्ध होत असून हे गोव्यातील साई भक्तांचे भाग्य' असल्याचे श्री. खंवटे म्हणाले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी जोरदार तयारी सुरू झाली असून देणगीच्या स्वरूपात मदत करण्याचे आवाहन साईभक्तांना करण्यात आले आहे. त्याप्रमाणे गोव्यात असलेल्या ५१ साई मंदिराच्या समित्यांशी संपर्क साधण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
पहाट ते रात्री या दरम्यान साईंच्या पारंपरिक चार आरत्या केल्या जाणार आहेत. त्याप्रमाणे साई भजनांचे आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गोव्यातील कोणत्याही भजन मंडळांना याठिकाणी साईंचे भजन करण्याची इच्छा असल्यास त्यांनी या समितीशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. देणगी देण्यासाठी तसेच अन्य माहितीसाठी अध्यक्ष अनिल खंवटे(९६२३४४७४०१), सचिव प्रदीप पालेकर (९६२३४४७४१०) व खजिनदार विवेक पार्सेकर (९६२३४४७४०२) यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. या सोहळ्याची माहिती देण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत समितीचे उपाध्यक्ष टोनी रोड्रिगीस, शेख मुस्ताफ कादर, रवी नायडू, सहसचिव गौरीश धोंड, सहखजिनदार संतोष नाईक, सदस्य दिनेश वाघेला, मार्क वाझ, सुरज लोटलीकर, धीरज नाईक गावकर, प्रसाद मांद्रेकर, प्रकाश कित्तूर, विजय भोसले व सुभाष नाईक उपस्थित होते.
पणजी, दि. १ (प्रतिनिधी) - तब्बल ९१ वर्षानंतर भक्तांना दर्शन घेण्यासाठी बाहेर काढल्या जाणाऱ्या शिर्डीतील साईबाबांच्या पादुकांचे दर्शन घेण्याचा पहिला मान गोव्यातील भक्तांना प्राप्त झाला आहे, ही साईभक्तांसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. ही संधी गोव्यातील "साईबाबा पादुका दर्शन सोहळा समिती'ने उपलब्ध केली असून दि. २२ फेब्रुवारी रोजी पणजीत हा पादुकादर्शन सोहळा होणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष अनिल खंवटे यांनी आज दिली.
पहाटे ४ वाजता साईंच्या आरत्या झाल्यानंतर रात्री १२ पर्यंत साईंच्या पादुका दर्शनासाठी उपलब्ध असणार आहेत. या सोहळ्यात सुमारे एक लाख भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता व्यक्त केली असून त्यासाठी खास व्यवस्था करण्यात येणार आहे. कला अकादमी ते कांपाल मैदानापर्यंत शामियाना उभारण्यात येणार आहे. यासाठी खास कोल्हापूर येथून शामियाना उभारणाऱ्या एका आस्थापनाला हे काम सोपवण्यात आले आहे. या शामियानात दर्शन घेण्यासाठी रांगेत राहणाऱ्या भक्तांना पिण्याच्या पाण्याची तसेच दर्शन घेण्यास तसेच अपंग भक्तांसाठी खास व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती श्री. खंवटे यांनी यावेळी दिली.
"गोवा मुक्त झाल्यापासून साईंच्या पादुका गोव्यात आणण्याचा विचार अनेकांच्या मनात होता. परंतु, त्यावेळी साईंच्या मनात नसल्याने ते शक्य झाले नाही. आता कित्येक वर्षानंतर गोव्यातील भक्तांना ही संधी उपलब्ध होत असून हे गोव्यातील साई भक्तांचे भाग्य' असल्याचे श्री. खंवटे म्हणाले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी जोरदार तयारी सुरू झाली असून देणगीच्या स्वरूपात मदत करण्याचे आवाहन साईभक्तांना करण्यात आले आहे. त्याप्रमाणे गोव्यात असलेल्या ५१ साई मंदिराच्या समित्यांशी संपर्क साधण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
पहाट ते रात्री या दरम्यान साईंच्या पारंपरिक चार आरत्या केल्या जाणार आहेत. त्याप्रमाणे साई भजनांचे आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गोव्यातील कोणत्याही भजन मंडळांना याठिकाणी साईंचे भजन करण्याची इच्छा असल्यास त्यांनी या समितीशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. देणगी देण्यासाठी तसेच अन्य माहितीसाठी अध्यक्ष अनिल खंवटे(९६२३४४७४०१), सचिव प्रदीप पालेकर (९६२३४४७४१०) व खजिनदार विवेक पार्सेकर (९६२३४४७४०२) यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. या सोहळ्याची माहिती देण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत समितीचे उपाध्यक्ष टोनी रोड्रिगीस, शेख मुस्ताफ कादर, रवी नायडू, सहसचिव गौरीश धोंड, सहखजिनदार संतोष नाईक, सदस्य दिनेश वाघेला, मार्क वाझ, सुरज लोटलीकर, धीरज नाईक गावकर, प्रसाद मांद्रेकर, प्रकाश कित्तूर, विजय भोसले व सुभाष नाईक उपस्थित होते.
"सोनसोडो ऑपरेशन' ७० टक्के फत्ते?
० धुमसणाऱ्या आगीवर १८२ ट्रक माती
० आज सायंकाळपर्यंत पूर्णतः नियंत्रण
मडगाव, दि. १ (प्रतिनिधी) : गेला आठवडाभर धुमसत असलेली सोनसोडो येथील कचरा यार्डातील आग नियंत्रणाखाली आणण्यात मडगाव नगरपालिकेला यश न आल्याने अखेर आजपासून येथील जिल्हा आपत्कालीन कक्षाच्या मार्गदर्शनाखाली हे ऑपरेशन कार्यरत झाले व आज एकाच दिवशी तब्बल १८२ ट्रक माती धुमसणाऱ्या कचऱ्यावर पसरविली गेली. उरलेले काम उद्या सायंकाळपर्यंत पूर्ण होईल, अशी खात्री व्यक्त केली जात आहे.
काल मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी जी. पी. नाईक यांनी सोनसोडोवर जाऊन तेथील ऑपरेशनचा आढावा घेतला असता नगरपालिकेच्या मोहिमेत नियोजन नसल्याचे आढळून आल्याने त्यांनी जिल्हा आपत्कालीन यंत्रणेस पुढाकार घेण्यास सांगितले व त्यानुसार आजचे ऑपरेशन पार पडले.
आज स्वतः जिल्हाधिकारी सोनसोडोवर उपस्थित होते. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनीही तेथे भेट दिली. कुडतरीचे आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स व नगराध्यक्ष साव्हियो कुतिन्हो यांनी आज बराच वेळ तेथे थांबून एकंदर ऑपरेशनवर लक्ष ठेवले . मुख्याधिकारी यशवंत तावडे व पालिकेचे अन्य अधिकारी तर सकाळी ८ वा. पासून सोनसोड्यावर ठाण मांडून राहिले ते सायंकाळी ७ वा. परतले.आजच्या मोहिमेमुळे ७० टक्के काम पूर्ण झाले असून उरलेले उद्या सायंकाळपर्यंत पूर्ण होईल, असे तावडे यांनी सांगितले.
आजच्या ऑपरेशनसाठी विविध खाण कंपन्यांकडून तसेच बांधकाम ठेकेदार आर्थर डिसोजा व संतोष जॉर्ज यांच्या कडून टिपरी उपलब्ध करण्यात आल्या व दिवसभर त्यांनी एकूण १८२ टिपरी माती आणली व त्यामुळे सोनसोडो भागाला खाणसदृश रूप आज आले होते. इतक्या मोठ्या संख्येतील टिपरी तेथे वाहतूक करणार असल्याने कुडतरी रस्त्यावर कोणतीही वाहतूक समस्या उद्भवून लोकांची गैरसोय होणार नाही, यासाठी तेथे खास वाहतूक पोलिस तैनात करण्याची तसेच आगीमुळे खंडित झालेला यार्डांतील वीजपुरवठा तत्काळ सुरू करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी काल आपल्या सोनसोडो भेटीच्यावेळी पोलिस व वीज खाते अभियंत्यांना दिल्या होत्या आज त्याची कार्यवाही झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आज बव्हंशी आग विझली आहे व उद्या सायंकाळपर्यंत आगीवर पूर्णतः नियंत्रण मिळेल अशी खात्री आहे.
० आज सायंकाळपर्यंत पूर्णतः नियंत्रण
मडगाव, दि. १ (प्रतिनिधी) : गेला आठवडाभर धुमसत असलेली सोनसोडो येथील कचरा यार्डातील आग नियंत्रणाखाली आणण्यात मडगाव नगरपालिकेला यश न आल्याने अखेर आजपासून येथील जिल्हा आपत्कालीन कक्षाच्या मार्गदर्शनाखाली हे ऑपरेशन कार्यरत झाले व आज एकाच दिवशी तब्बल १८२ ट्रक माती धुमसणाऱ्या कचऱ्यावर पसरविली गेली. उरलेले काम उद्या सायंकाळपर्यंत पूर्ण होईल, अशी खात्री व्यक्त केली जात आहे.
काल मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी जी. पी. नाईक यांनी सोनसोडोवर जाऊन तेथील ऑपरेशनचा आढावा घेतला असता नगरपालिकेच्या मोहिमेत नियोजन नसल्याचे आढळून आल्याने त्यांनी जिल्हा आपत्कालीन यंत्रणेस पुढाकार घेण्यास सांगितले व त्यानुसार आजचे ऑपरेशन पार पडले.
आज स्वतः जिल्हाधिकारी सोनसोडोवर उपस्थित होते. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनीही तेथे भेट दिली. कुडतरीचे आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स व नगराध्यक्ष साव्हियो कुतिन्हो यांनी आज बराच वेळ तेथे थांबून एकंदर ऑपरेशनवर लक्ष ठेवले . मुख्याधिकारी यशवंत तावडे व पालिकेचे अन्य अधिकारी तर सकाळी ८ वा. पासून सोनसोड्यावर ठाण मांडून राहिले ते सायंकाळी ७ वा. परतले.आजच्या मोहिमेमुळे ७० टक्के काम पूर्ण झाले असून उरलेले उद्या सायंकाळपर्यंत पूर्ण होईल, असे तावडे यांनी सांगितले.
आजच्या ऑपरेशनसाठी विविध खाण कंपन्यांकडून तसेच बांधकाम ठेकेदार आर्थर डिसोजा व संतोष जॉर्ज यांच्या कडून टिपरी उपलब्ध करण्यात आल्या व दिवसभर त्यांनी एकूण १८२ टिपरी माती आणली व त्यामुळे सोनसोडो भागाला खाणसदृश रूप आज आले होते. इतक्या मोठ्या संख्येतील टिपरी तेथे वाहतूक करणार असल्याने कुडतरी रस्त्यावर कोणतीही वाहतूक समस्या उद्भवून लोकांची गैरसोय होणार नाही, यासाठी तेथे खास वाहतूक पोलिस तैनात करण्याची तसेच आगीमुळे खंडित झालेला यार्डांतील वीजपुरवठा तत्काळ सुरू करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी काल आपल्या सोनसोडो भेटीच्यावेळी पोलिस व वीज खाते अभियंत्यांना दिल्या होत्या आज त्याची कार्यवाही झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आज बव्हंशी आग विझली आहे व उद्या सायंकाळपर्यंत आगीवर पूर्णतः नियंत्रण मिळेल अशी खात्री आहे.
अपहरणाच्या धमकीमुळे विमान दिल्लीत उतरविले
नवी दिल्ली, दि. १ - गोव्याहून निघालेले इंडिगो कंपनीचे ई-६६४ हे प्रवासी विमान आज अचानकपणे नवी दिल्ली विमानतळावर उतरविणे भाग पडले.गोव्याहून निघालेल्या विमानातील दोघा प्रवाशांनी अतिशय आक्रमणपणे वागून, विमानाचे अपहरण करण्याची धमकी दिली, त्यामुळे विमान तातडीने उतरावे लागले, असे स्पष्टीकरण रात्री उशिरा सरकारतर्फे करण्यात आले.
सर्व प्रकारची खबरदारी घेऊन विमान उतरविण्यात आले, असे नागरी विमान सचिव एम. माधवन यांनी पत्रकारांना सांगितले. सर्व काही सुरक्षित असल्याची खात्री ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी केल्यानंतरच दोन तासांनी प्रवाशांना विमानातून बाहेर जाण्यास संमती देण्यात आली, अशी माहिती त्यांनी दिली. त्या दोघा प्रवाशांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
राष्ट्रीय सुरक्षा रक्षक आणि दिल्ली पोलिसांनी तातडीने धाव घेतली तसेच सीमा सुरक्षा दलाच्या विमानांनाही सतर्क करण्यात आले. या विमानातील दोन प्रवाशांनी हुल्लडबाजी करीत आपल्याकडे चाकू असल्याची धमकी दिल्याने हा गोंधळ उडाला. मिळालेल्या माहितीनुसार वैमानिकाने हे विमान इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका बाजूला नेले, त्यावेळी कमांडोनी त्याला वेढा घातला. दोघा प्रवाशांनी अतिशय आक्रमकपणे शिवीगाळ करायला सुरवात केल्याने वैमानिकाने विमानतळ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यावेळी सर्वत्र विमानाचे अपहरण झाल्याची अफवा पसरली, तर एका दूरचित्रवाणी वाहिनीने अशा स्थितीत काय होऊ शकते ते पाहाण्यासाठी हा प्रयोग (मॉक ड्रिल) करण्यात आल्याची माहिती प्रसृत केली. तथापि सरकारने वस्तुस्थिती स्पष्ट करीत धोका टळला असल्याची माहिती रात्री दिली.
सर्व प्रकारची खबरदारी घेऊन विमान उतरविण्यात आले, असे नागरी विमान सचिव एम. माधवन यांनी पत्रकारांना सांगितले. सर्व काही सुरक्षित असल्याची खात्री ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी केल्यानंतरच दोन तासांनी प्रवाशांना विमानातून बाहेर जाण्यास संमती देण्यात आली, अशी माहिती त्यांनी दिली. त्या दोघा प्रवाशांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
राष्ट्रीय सुरक्षा रक्षक आणि दिल्ली पोलिसांनी तातडीने धाव घेतली तसेच सीमा सुरक्षा दलाच्या विमानांनाही सतर्क करण्यात आले. या विमानातील दोन प्रवाशांनी हुल्लडबाजी करीत आपल्याकडे चाकू असल्याची धमकी दिल्याने हा गोंधळ उडाला. मिळालेल्या माहितीनुसार वैमानिकाने हे विमान इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका बाजूला नेले, त्यावेळी कमांडोनी त्याला वेढा घातला. दोघा प्रवाशांनी अतिशय आक्रमकपणे शिवीगाळ करायला सुरवात केल्याने वैमानिकाने विमानतळ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यावेळी सर्वत्र विमानाचे अपहरण झाल्याची अफवा पसरली, तर एका दूरचित्रवाणी वाहिनीने अशा स्थितीत काय होऊ शकते ते पाहाण्यासाठी हा प्रयोग (मॉक ड्रिल) करण्यात आल्याची माहिती प्रसृत केली. तथापि सरकारने वस्तुस्थिती स्पष्ट करीत धोका टळला असल्याची माहिती रात्री दिली.
Subscribe to:
Posts (Atom)