मुंबई, दि. १९ : मुंबई हल्ल्याच्या खटल्यादरम्यान आपले वेगवेगळे रंग दाखविणाऱ्या कसाबने आज हायकोर्टातील सुनावणीदरम्यान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या कॅमेऱ्यावरच थुंकण्याचा प्रताप केला.
कसाबच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्याच्या याचिकेवर सध्या मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. उच्च न्यायालयात कसाबला हजर करणे सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय जिकरीचे असल्याने त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कोर्टात सादर केले जात आहे. कालपासून ही सुनावणी सुरू झाली. काल कसाब कॅमेऱ्यावर सातत्याने स्मितहास्य करताना झळकला. पण, आज मात्र त्याचा मूड काही वेगळाच होता. त्याने कोर्टात जातीने हजर राहण्याची इच्छा न्यायमूर्तींसमोर व्यक्त केली. त्याची चिडचीड स्पष्टपणे दिसून येत होती. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगदरम्यान आवाजही नीट ऐकू येत नव्हता. त्यामुळे तो तेथे असणाऱ्या पोलिसावर चिडला आणि कॅमेऱ्यावरच थुंकला, हे दिसले. पण, तो नेमके काय बोलत होता, हे लक्षात आले नाही.
'मला अमेरिकेला पाठवून द्या'
दरम्यान, न्या. रंजना देसाई आणि न्या. आर. व्ही. मोरे भोजनासाठी निघून गेले. नंतर पुन्हा सुनावणी सुरू होताच कसाबने पोलिसांसोबत बाचाबाची सुरू केली. तो म्हणाला की, मला अमेरिकेला पाठवून द्या. मला बाहेरचे जग पाहायचे आहे. तुम्ही मला येथे का ठेवले आहे?
त्यावर न्यायमूर्ती म्हणाले की, अमेरिकेला जाण्याच्या आग्रहाविषयी तू आपल्या वकिलांशी बोल. नंतर कसाब पुन्हा चिडून व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सोडून जाताना दिसला. त्यावेळी न्यायमूर्तींनी कायद्यानुसार कसाब न्यायालयात उपस्थित राहणे गरजेचे नसल्याचे स्पष्ट केले.
जेवणाच्या सुटीदरम्यान कसाब कॅमेऱ्यावर थुंकल्याचे सांगताच न्यायमूर्ती म्हणाले की, त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. आता तो स्वत:हूनच निघून गेला तर त्यावर न्यायालय काहीही करू शकत नाही. आपल्या कृत्याचा काही पश्चात्ताप असल्याचे त्याचे कृतीवरून अजीबात दिसत नसल्याचेही न्यायमूर्ती म्हणाले.
Wednesday, 20 October 2010
वाळपईची मतमोजणी उद्या सकाळी पणजीत
निकाल ९ वाजेपर्यंतशक्य
पणजी, दि. १९ (प्रतिनिधी): दि. १८ रोजी झालेल्या वाळपई पोटनिवडणुकीची मतमोजणी परवा गुरुवार दि.२१ रोजी पणजी येथील "गोवा कॉलेज ऑफ होम सायन्स'च्या सभागृहात सकाळी ८ वाजता एक नंबरच्या कक्षात होणार आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संतोष हळदणकर व कॉंग्रेसचे उमेदवार आरोग्यमंत्री विश्र्वजित राणे यांच्यात ही लक्षवेधक लढत झाली असून दोन बलाढ्य पक्षातीत समोरासमोर झालेल्या या निवडणुकीच्या निकालाकडे तमाम जनतेचे लक्ष लागले आहे.
वाळपई मतदार संघातील एकूण २७ मतदान केंद्रावर १७,९२० मतदारांपैकी १४,८८४ मतदारांनी (८३.०८ टक्के) मतदान केले आहे.यात ७,६६४ पुरुष व ७,२२० महिलांनी मतदान केले आहे.दि.२१ रोजी उपजिल्हाधिकारी अँथनी डिसोझा यांच्या देखरेखीखाली ही मतमोजणी होणार असून मतदान यंत्राद्वारे मतदान झाले असल्याने मतमोजणी लवकर पूर्ण होऊन निकाल एका तासाभरातच मिळण्याची शक्यता आहे.पणजीतील गोवा कॉलेज ऑफ होम सायन्सच्या सभागृहात मतमोजणीच्या वेळी मोबाईल वा कॅमेरा वापरावर बंदी असून उपजिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी एस.पी. सिग्नापूरकर हे प्रसिद्धी माध्यमांना वेळोवेळी मतदानाबद्दल वृत्त देणार आहेत. मतमोजणी पणजीत होत असल्याने पणजी शहरातील दारू दुकाने दि.२१ रोजी बंद राहणार आहेत. बार व रेस्टॉरंट मालकांना आपल्या दुकानात फक्त खाद्य पदार्थ विकता येथील. मतमोजणीसाठी कडक सुरक्षा ठेवण्यात आली असून परिसरात मोठा पोलिसफाटा तैनात करण्यात येणार आहे.
पणजी, दि. १९ (प्रतिनिधी): दि. १८ रोजी झालेल्या वाळपई पोटनिवडणुकीची मतमोजणी परवा गुरुवार दि.२१ रोजी पणजी येथील "गोवा कॉलेज ऑफ होम सायन्स'च्या सभागृहात सकाळी ८ वाजता एक नंबरच्या कक्षात होणार आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संतोष हळदणकर व कॉंग्रेसचे उमेदवार आरोग्यमंत्री विश्र्वजित राणे यांच्यात ही लक्षवेधक लढत झाली असून दोन बलाढ्य पक्षातीत समोरासमोर झालेल्या या निवडणुकीच्या निकालाकडे तमाम जनतेचे लक्ष लागले आहे.
वाळपई मतदार संघातील एकूण २७ मतदान केंद्रावर १७,९२० मतदारांपैकी १४,८८४ मतदारांनी (८३.०८ टक्के) मतदान केले आहे.यात ७,६६४ पुरुष व ७,२२० महिलांनी मतदान केले आहे.दि.२१ रोजी उपजिल्हाधिकारी अँथनी डिसोझा यांच्या देखरेखीखाली ही मतमोजणी होणार असून मतदान यंत्राद्वारे मतदान झाले असल्याने मतमोजणी लवकर पूर्ण होऊन निकाल एका तासाभरातच मिळण्याची शक्यता आहे.पणजीतील गोवा कॉलेज ऑफ होम सायन्सच्या सभागृहात मतमोजणीच्या वेळी मोबाईल वा कॅमेरा वापरावर बंदी असून उपजिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी एस.पी. सिग्नापूरकर हे प्रसिद्धी माध्यमांना वेळोवेळी मतदानाबद्दल वृत्त देणार आहेत. मतमोजणी पणजीत होत असल्याने पणजी शहरातील दारू दुकाने दि.२१ रोजी बंद राहणार आहेत. बार व रेस्टॉरंट मालकांना आपल्या दुकानात फक्त खाद्य पदार्थ विकता येथील. मतमोजणीसाठी कडक सुरक्षा ठेवण्यात आली असून परिसरात मोठा पोलिसफाटा तैनात करण्यात येणार आहे.
सिंधुदुर्गातील खाण परवान्यांचा फेरआढावा घ्या : जयराम रमेश
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सूचना
मुंबई, दि. १९ : निसर्गसंपन्न सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोह व बॉक्साईटच्या खाणींसाठी ४९ लीज परवाने देण्याच्या निर्णयाचा राज्य सरकारने फेरविचार करावा, अशी सूचना केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री जयराम रमेश यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना केली आहे. या ४९ खाणींना जर खरोखरच अनुमती देण्यात आली तर त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वनसंपदा आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होऊ शकतात. ज्या ठिकाणी या खाणी होऊ घातल्या आहेत तेथील स्थानिकांनी यापूर्वीच अशा स्वरूपाचा इशारा दिला आहे. त्यामुळे मंत्री रमेश यांनी या मुद्याची गंभीर दखल घेतली आहे. एकदा का या खाणींचा विषारी विळखा सिंधुदुर्ग जिल्ह्याला पडला की, त्या चक्रव्यूहातून बाहेर पडणे तेथील भूमिपुत्रांना केवळ अशक्य होणार आहे. कारण, खाणींचे मालक जरी आरंभी पर्यावरणाचा तोल सांभाळण्याचे नाटक करून तसे आश्वासन देतात, तरी एकदा खाणीतून प्रचंड पैसा मिळू लागला की, त्यांना या आश्वासनांचा विसर पडतो. वृक्षारोपणासारखे कार्यक्रम फक्त नावापुरतेच केले जातात. अनेकदा जाहिरातींद्वारे अमूक एका क्षेत्रात प्रचंड वृक्षलागवड केल्याचे दावे करण्यात येतात. प्रत्यक्षातील अनुभव मात्र अत्यंत विदारक असतो. शिवाय या खाणींमुळे तेथील लोकवस्त्या जवळपास उद्ध्वस्त होतात. लोकांच्या आरोग्यावर भयंकर परिणाम होतात. पुढच्या पिढ्यांनाही त्याचे भयावह परिणाम सोसावे लागतात. गोव्यात वर्षानुवर्षे हेच चित्र दिसून येत आहे. आता त्या दिशेने सिंधुदुर्गची वाटचाल सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळेच तेथील जनतेत कमालीची अस्वस्थता जाणवू लागली आहे. यातून सुटका होण्यासाठीच सिंधुदुर्गवासीयांनी थेट केंद्र सरकारलाच साकडे घातले आहे.
मुंबई, दि. १९ : निसर्गसंपन्न सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोह व बॉक्साईटच्या खाणींसाठी ४९ लीज परवाने देण्याच्या निर्णयाचा राज्य सरकारने फेरविचार करावा, अशी सूचना केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री जयराम रमेश यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना केली आहे. या ४९ खाणींना जर खरोखरच अनुमती देण्यात आली तर त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वनसंपदा आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होऊ शकतात. ज्या ठिकाणी या खाणी होऊ घातल्या आहेत तेथील स्थानिकांनी यापूर्वीच अशा स्वरूपाचा इशारा दिला आहे. त्यामुळे मंत्री रमेश यांनी या मुद्याची गंभीर दखल घेतली आहे. एकदा का या खाणींचा विषारी विळखा सिंधुदुर्ग जिल्ह्याला पडला की, त्या चक्रव्यूहातून बाहेर पडणे तेथील भूमिपुत्रांना केवळ अशक्य होणार आहे. कारण, खाणींचे मालक जरी आरंभी पर्यावरणाचा तोल सांभाळण्याचे नाटक करून तसे आश्वासन देतात, तरी एकदा खाणीतून प्रचंड पैसा मिळू लागला की, त्यांना या आश्वासनांचा विसर पडतो. वृक्षारोपणासारखे कार्यक्रम फक्त नावापुरतेच केले जातात. अनेकदा जाहिरातींद्वारे अमूक एका क्षेत्रात प्रचंड वृक्षलागवड केल्याचे दावे करण्यात येतात. प्रत्यक्षातील अनुभव मात्र अत्यंत विदारक असतो. शिवाय या खाणींमुळे तेथील लोकवस्त्या जवळपास उद्ध्वस्त होतात. लोकांच्या आरोग्यावर भयंकर परिणाम होतात. पुढच्या पिढ्यांनाही त्याचे भयावह परिणाम सोसावे लागतात. गोव्यात वर्षानुवर्षे हेच चित्र दिसून येत आहे. आता त्या दिशेने सिंधुदुर्गची वाटचाल सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळेच तेथील जनतेत कमालीची अस्वस्थता जाणवू लागली आहे. यातून सुटका होण्यासाठीच सिंधुदुर्गवासीयांनी थेट केंद्र सरकारलाच साकडे घातले आहे.
नितीशकुमार सर्वांत 'समर्थ' मुख्यमंत्री
अडवाणींनी उधळली स्तुतिसुमने
बिहार विधानसभा निवडणूक
पाटणा, दि. १९ : बिहारला लाभलेला आतापर्यंतचा "सर्वांत समर्थ' मुख्यमंत्री अशी स्तुतिसुमने नितीशकुमार यांच्यावर उधळतानाच भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज एका प्रचार रॅलीत "युपीए'च्या अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी आणि पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर टीकेचा भडिमार केला. दरम्यान, आज पहिल्या टप्प्यातील जाहीर प्रचार समाप्त झाला.
बिहारी जनतेनेच नितीशकुमार यांना सर्वाधिक पसंती दिलेली असतानाच नितीशकुमार यांनी केंद्राच्या योजना राज्यात पूर्ण ताकदीनिशी राबवल्या नाहीत, असा आरोप डॉ. सिंग यांनी १६ ऑक्टोबर रोजी सीमाचल येथे केला होता. तसेच बिहारचा जो विकास झाला तो प्रामुख्याने केंद्राच्या विविध योजनांमुळेच, अशी पुस्तीदेखील डॉ. सिंग यांनी जोडली होती. श्रीमती सोनिया गांधी यांनीही पंतप्रधानांच्याच आरोपांची री ओढली होती. त्या आरोपांचा श्री. अडवाणी यांनी चांगलाच समाचार घेतला.
गेल्या पंधरा वर्षांत बिहारमध्ये जंगलराज राबवलेल्या मंडळींना जनता कधीच माफ करणार नाही, असे श्री. अडवाणी यांनी लालूप्रसाद यादव आणि रामविलास पासवान या जोडगोळीचे नाव न घेता सांगितले. कॉंग्रेसचे तर कोठेच नामोनिशाणही दिसून येत नाही. याच्या उलट नितीशकुमार आणि सुशीलकुमार मोदी यांनी बिहारला विकासाच्या एका नव्या वळणावर आणून ठेवले आहे. त्यामुळेच यापूर्वी जातीची समीकरणे मांडणाऱ्या मंडळींना आता विकासाच्या मुद्यावर बोलण्याची पाळी आली आहे, असा त्यांनी शालजोडीतून लगावला.
तसेच लोकसभेच्या निवडणुकांबरोबरच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकाही घेतल्या जाव्यात, या आपल्या भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केला. त्यामुळे जनतेचे कोट्यवधी रुपये वाचतील आणि हा पैसा विकासाच्या कामांकडे वळवता येईल, असे ते म्हणाले. जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या वादग्रस्त वक्तव्याला श्री. अडवाणी यांनी तीव्र आक्षेप घेतला. "एक देश मे दो विधान, दो प्रधान नही चलेंगे,' असे त्यांनी निक्षून सांगितले. परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांनी ओमर अब्दुल्ला यांच्या विधानांचे समर्थन केल्याबद्दल अडवाणी यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
पहिल्या टप्प्यातील प्रचार संपला
दरम्यान, २४३ विधानसभा जागांपैकी पहिल्या टप्प्यात येत्या २१ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठीचा प्रचार आज समाप्त झाला. या टप्प्यात ४७ जागांकरिता होणाऱ्या निवडणुकीत ६३५ उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत. त्यामध्ये सत्तारुढ जनता दल युनायटेड २६ तर भारतीय जनता पक्ष २१ जागा लढवत आहे. १.०६ कोटी मतदार मतदान करणार असून त्यासाठी १०४५४ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. बिहारमध्ये निवडणुका म्हटल्या की, प्रामुख्याने नक्षल्यांकडून हिंसाचार उफाळतोच. तसा तो यावेळी उफाळू नये यास्तव कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
------------------------------------------
पुन्हा जेडीयु -भाजपच
या निवडणुकीसंबंधी विविध वाहिन्यांनी घेतलेल्या मतदानपूर्व चाचणीत नितीशकुमार यांनाच सर्वोच्च पसंती दिली आहे. बिहारमध्ये पुन्हा "एनडीए'चेच (जेडीयु आणि भाजप) सरकार स्थापन होणार, असा निष्कर्ष या वाहिन्यांनी काढला आहे.
बिहार विधानसभा निवडणूक
पाटणा, दि. १९ : बिहारला लाभलेला आतापर्यंतचा "सर्वांत समर्थ' मुख्यमंत्री अशी स्तुतिसुमने नितीशकुमार यांच्यावर उधळतानाच भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज एका प्रचार रॅलीत "युपीए'च्या अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी आणि पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर टीकेचा भडिमार केला. दरम्यान, आज पहिल्या टप्प्यातील जाहीर प्रचार समाप्त झाला.
बिहारी जनतेनेच नितीशकुमार यांना सर्वाधिक पसंती दिलेली असतानाच नितीशकुमार यांनी केंद्राच्या योजना राज्यात पूर्ण ताकदीनिशी राबवल्या नाहीत, असा आरोप डॉ. सिंग यांनी १६ ऑक्टोबर रोजी सीमाचल येथे केला होता. तसेच बिहारचा जो विकास झाला तो प्रामुख्याने केंद्राच्या विविध योजनांमुळेच, अशी पुस्तीदेखील डॉ. सिंग यांनी जोडली होती. श्रीमती सोनिया गांधी यांनीही पंतप्रधानांच्याच आरोपांची री ओढली होती. त्या आरोपांचा श्री. अडवाणी यांनी चांगलाच समाचार घेतला.
गेल्या पंधरा वर्षांत बिहारमध्ये जंगलराज राबवलेल्या मंडळींना जनता कधीच माफ करणार नाही, असे श्री. अडवाणी यांनी लालूप्रसाद यादव आणि रामविलास पासवान या जोडगोळीचे नाव न घेता सांगितले. कॉंग्रेसचे तर कोठेच नामोनिशाणही दिसून येत नाही. याच्या उलट नितीशकुमार आणि सुशीलकुमार मोदी यांनी बिहारला विकासाच्या एका नव्या वळणावर आणून ठेवले आहे. त्यामुळेच यापूर्वी जातीची समीकरणे मांडणाऱ्या मंडळींना आता विकासाच्या मुद्यावर बोलण्याची पाळी आली आहे, असा त्यांनी शालजोडीतून लगावला.
तसेच लोकसभेच्या निवडणुकांबरोबरच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकाही घेतल्या जाव्यात, या आपल्या भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केला. त्यामुळे जनतेचे कोट्यवधी रुपये वाचतील आणि हा पैसा विकासाच्या कामांकडे वळवता येईल, असे ते म्हणाले. जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या वादग्रस्त वक्तव्याला श्री. अडवाणी यांनी तीव्र आक्षेप घेतला. "एक देश मे दो विधान, दो प्रधान नही चलेंगे,' असे त्यांनी निक्षून सांगितले. परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांनी ओमर अब्दुल्ला यांच्या विधानांचे समर्थन केल्याबद्दल अडवाणी यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
पहिल्या टप्प्यातील प्रचार संपला
दरम्यान, २४३ विधानसभा जागांपैकी पहिल्या टप्प्यात येत्या २१ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठीचा प्रचार आज समाप्त झाला. या टप्प्यात ४७ जागांकरिता होणाऱ्या निवडणुकीत ६३५ उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत. त्यामध्ये सत्तारुढ जनता दल युनायटेड २६ तर भारतीय जनता पक्ष २१ जागा लढवत आहे. १.०६ कोटी मतदार मतदान करणार असून त्यासाठी १०४५४ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. बिहारमध्ये निवडणुका म्हटल्या की, प्रामुख्याने नक्षल्यांकडून हिंसाचार उफाळतोच. तसा तो यावेळी उफाळू नये यास्तव कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
------------------------------------------
पुन्हा जेडीयु -भाजपच
या निवडणुकीसंबंधी विविध वाहिन्यांनी घेतलेल्या मतदानपूर्व चाचणीत नितीशकुमार यांनाच सर्वोच्च पसंती दिली आहे. बिहारमध्ये पुन्हा "एनडीए'चेच (जेडीयु आणि भाजप) सरकार स्थापन होणार, असा निष्कर्ष या वाहिन्यांनी काढला आहे.
Tuesday, 19 October 2010
वाळपईत विक्रमी ८३.१० टक्के मतदान
-हळदणकर व राणेंचे भवितव्य सीलबंद
-निकालाबाबत वेगवेगळे तर्कवितर्क
२१ रोजी निकाल
पणजी, वाळपई दि. १८ (प्रतिनिधी): वाळपई मतदारसंघासाठी आज झालेल्या पोटनिवडणुकीत ८३.१० टक्के मतदान झाले असून कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. भारतीय जनता पक्ष आणि कॉंग्रेस उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून त्याचा निकाल येत्या २१ ऑक्टोबर रोजी लागणार आहे. आज सकाळी ८ ते सायंकाळी ५ पर्यंत झालेल्या या मतदानात मुरमूणे या मतदान केंद्रात सर्वांत जास्त म्हणजे ९३.४४टक्के तर, वाळपई ५(अ) या मतदान केंद्रावर सर्वांत कमी ६४.३७ टक्के एवढे मतदान झाल्याची नोंद झाली आहे.
एकूण १७ हजार ९२० मतदारापैंकी १४ हजार ८८४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क यावेळी बजावला. यात ७ हजार ६६४ पुरुष तर, ७ हजार २२० महिलांनी मतदान केले.
सकाळी ८वाजल्यापासून सुरू होणाऱ्या या मतदानासाठी काही मतदान केंद्रावर सकाळी सात वाजल्यापासूनच रांगा लागल्याचे पाहायला मिळत होते. यात महिला मतदारांच्या रांगा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत होत्या. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात बंदूकधारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा जवानांना तैनात करण्यात आले होते.
अपक्ष म्हणून निवडून आलेल्या विश्वजित राणे यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्यासाठी २७ जुलै रोजी राजीनामा दिल्याने आज घेण्यात आलेल्या या पोट निवडणुकीत अनेकांनी या प्रकाराचा धिक्कार करून मतदान केले. ब्रम्हकरमळी या भागात मतदान करण्यासाठी रांगेत उभे राहिलेल्या लोकांना प्रतिक्रिया विचारली असता खाणीचे समर्थन करणाऱ्या उमेदवाराला आम्ही कदापिही मतदान करणार नाही, असेच अनेकांनी सांगितले. ही निवडणूक एकतर्फी होणार नसल्याचेही अनेकांचे म्हणणे होते. त्यामुळे येत्या २१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मतमोजणी वेळीच धक्कादायक चित्र स्पष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मतदान करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक मतदाराचे संगणकाद्वारे छायाचित्र घेतले जात होते. त्यानंतर अंगठ्याचा ठसा घेऊनच मतदान करण्याची परवानगी दिली जात होती. बोगस मतदान टाळण्यासाठी अशा प्रकारची पहिल्यांदाच काळजी घेण्यात आली होती. एका मतदाराचे छायाचित्र आणि अंगठ्याचा ठसा घेण्यासाठी एका मिनिटाचा अवधी लागत होता. सकाळपासूनच वाळपईत पावसाची रिपरिप सुरू होती. तरीही मोठ्या संख्येने मतदार मतदानासाठी बाहेर पडले होते. अनेक मतदान केंद्रावर मतदारांना आणण्यासाठी वाहनांचीही सोय ठेवण्यात आली होती. सकाळपासूनच दोन्ही उमेदवार मतदान केंद्रावर फिरताना दिसत होते. अनेक मतदान केंद्रावर दुपारी २.३० पर्यंत ५० टक्के मतदानाची नोंद झाली होती.
धावे प्राथमिक विद्यालयात मतदान केंद्रावर दुपारी जेवणाचा वेळ असूनही महिला मतदारांची मोठ्या संख्येने रांग पाहायला मिळत होती. सत्तरी युवा मोर्चाचे अध्यक्ष तसेच अन्य पदाधिकारीही गाड्या घेऊन मतदान केंद्राच्या आसपास फिरत असल्याचे दिसत होते. ""विश्वजित राणे यांनी मंदिरे बांधण्यासाठी पैसे दिले आहेत. मुलांना नोकऱ्या दिल्या आहेत. खाणींना आमचा विरोध नसला तरी, बेकायदेशीर सुरू असलेल्या खाणी बंद झाल्या पाहिजेत'' अशी प्रतिक्रिया गुळेलीचे जिल्हा पंच सदस्य हुमलो टी. गावडे यांनी व्यक्त केली. या मतदान केंद्रावर दुपारी १२ पर्यंत ५९० मतदारांपैकी ३३६ मतदारांनी मतदान केले होते.
उत्तर गोवा जिल्हाधिकारी मिहिर वर्धन, उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अरविंद गावस हे जातीने याठिकाणी लक्ष ठेऊन होते. सायंकाळी मतदानानंतर मतदान यंत्र कडक पोलिस पहाऱ्यात पणजी येथील होम सायन्स महाविद्यालयात हलवण्यात आल्या.
ज्येष्ठ मतदार यशवंत रामकृष्ण गाडगीळ
परवान्याचे नूतनीकरण करण्यांसाठीच लादलेली ही निवडणूक आहे. या देशात लोकशाही राहिलेली नाही. लोकांचा पाठिंबा पैशांना आहे. लोक पैसे घेऊन मतदान करीत आहेत. पैशांच्या बळामुळे सत्ताधारी पार्टीचाच जोर पाहायला मिळतो. वडील चांगले होते पण, विश्वजित राणेंचे हे राजकारण खतरनाक असून यापूर्वी असा प्रकार वाळपईत कधीच पाहिला नव्हता, अशी प्रतिक्रिया १९५१ पासून मतदानात मतदान करणारे श्री. गाडगीळ यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रातील नारायण राणेंचा मुलगा काय आणि या राणेंचा मुलगा काय सर्व एकच, अशी तिखट टिपणीही त्यांनी यावेळी केली.
विश्वजित राणेंची सावध भूमिका
प्रचार न करता भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराची आपण अनामत रक्कम जप्त करणार असल्याची डरकाळी फोडणारे कॉंग्रेस उमेदवार विश्वजित राणे यांना भाजप उमेदवार संतोष हळदणकर यांनी अक्षरशः घाम काढला. मतदानानंतर पत्रकारांशी बोलताना विश्वजित राणे यांनी आपणास विजयाची खात्री असल्याचा दावा करताना, निश्चित किती मताधिक्याने जिंकू हे सांगण्यास नकार दिला.
खाणीचा मुद्दा प्रभावी ः संतोष हळदणकर
मतदान यंत्रात सर्व काही बंद झालेले आहे. त्यामुळे येत्या २१ रोजी चित्र स्पष्ट होणार आहे. लोकांनी मला उदंड प्रतिसाद दिला. खाण विरोधाचा मुद्दा बराच प्रभावी ठरला असल्याचेही यावेळी श्री. हळदणकर यांनी सांगितले. खाणीला विरोध करणाऱ्याबरोबर आपण सतत राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
-निकालाबाबत वेगवेगळे तर्कवितर्क
२१ रोजी निकाल
पणजी, वाळपई दि. १८ (प्रतिनिधी): वाळपई मतदारसंघासाठी आज झालेल्या पोटनिवडणुकीत ८३.१० टक्के मतदान झाले असून कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. भारतीय जनता पक्ष आणि कॉंग्रेस उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून त्याचा निकाल येत्या २१ ऑक्टोबर रोजी लागणार आहे. आज सकाळी ८ ते सायंकाळी ५ पर्यंत झालेल्या या मतदानात मुरमूणे या मतदान केंद्रात सर्वांत जास्त म्हणजे ९३.४४टक्के तर, वाळपई ५(अ) या मतदान केंद्रावर सर्वांत कमी ६४.३७ टक्के एवढे मतदान झाल्याची नोंद झाली आहे.
एकूण १७ हजार ९२० मतदारापैंकी १४ हजार ८८४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क यावेळी बजावला. यात ७ हजार ६६४ पुरुष तर, ७ हजार २२० महिलांनी मतदान केले.
सकाळी ८वाजल्यापासून सुरू होणाऱ्या या मतदानासाठी काही मतदान केंद्रावर सकाळी सात वाजल्यापासूनच रांगा लागल्याचे पाहायला मिळत होते. यात महिला मतदारांच्या रांगा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत होत्या. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात बंदूकधारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा जवानांना तैनात करण्यात आले होते.
अपक्ष म्हणून निवडून आलेल्या विश्वजित राणे यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्यासाठी २७ जुलै रोजी राजीनामा दिल्याने आज घेण्यात आलेल्या या पोट निवडणुकीत अनेकांनी या प्रकाराचा धिक्कार करून मतदान केले. ब्रम्हकरमळी या भागात मतदान करण्यासाठी रांगेत उभे राहिलेल्या लोकांना प्रतिक्रिया विचारली असता खाणीचे समर्थन करणाऱ्या उमेदवाराला आम्ही कदापिही मतदान करणार नाही, असेच अनेकांनी सांगितले. ही निवडणूक एकतर्फी होणार नसल्याचेही अनेकांचे म्हणणे होते. त्यामुळे येत्या २१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मतमोजणी वेळीच धक्कादायक चित्र स्पष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मतदान करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक मतदाराचे संगणकाद्वारे छायाचित्र घेतले जात होते. त्यानंतर अंगठ्याचा ठसा घेऊनच मतदान करण्याची परवानगी दिली जात होती. बोगस मतदान टाळण्यासाठी अशा प्रकारची पहिल्यांदाच काळजी घेण्यात आली होती. एका मतदाराचे छायाचित्र आणि अंगठ्याचा ठसा घेण्यासाठी एका मिनिटाचा अवधी लागत होता. सकाळपासूनच वाळपईत पावसाची रिपरिप सुरू होती. तरीही मोठ्या संख्येने मतदार मतदानासाठी बाहेर पडले होते. अनेक मतदान केंद्रावर मतदारांना आणण्यासाठी वाहनांचीही सोय ठेवण्यात आली होती. सकाळपासूनच दोन्ही उमेदवार मतदान केंद्रावर फिरताना दिसत होते. अनेक मतदान केंद्रावर दुपारी २.३० पर्यंत ५० टक्के मतदानाची नोंद झाली होती.
धावे प्राथमिक विद्यालयात मतदान केंद्रावर दुपारी जेवणाचा वेळ असूनही महिला मतदारांची मोठ्या संख्येने रांग पाहायला मिळत होती. सत्तरी युवा मोर्चाचे अध्यक्ष तसेच अन्य पदाधिकारीही गाड्या घेऊन मतदान केंद्राच्या आसपास फिरत असल्याचे दिसत होते. ""विश्वजित राणे यांनी मंदिरे बांधण्यासाठी पैसे दिले आहेत. मुलांना नोकऱ्या दिल्या आहेत. खाणींना आमचा विरोध नसला तरी, बेकायदेशीर सुरू असलेल्या खाणी बंद झाल्या पाहिजेत'' अशी प्रतिक्रिया गुळेलीचे जिल्हा पंच सदस्य हुमलो टी. गावडे यांनी व्यक्त केली. या मतदान केंद्रावर दुपारी १२ पर्यंत ५९० मतदारांपैकी ३३६ मतदारांनी मतदान केले होते.
उत्तर गोवा जिल्हाधिकारी मिहिर वर्धन, उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अरविंद गावस हे जातीने याठिकाणी लक्ष ठेऊन होते. सायंकाळी मतदानानंतर मतदान यंत्र कडक पोलिस पहाऱ्यात पणजी येथील होम सायन्स महाविद्यालयात हलवण्यात आल्या.
ज्येष्ठ मतदार यशवंत रामकृष्ण गाडगीळ
परवान्याचे नूतनीकरण करण्यांसाठीच लादलेली ही निवडणूक आहे. या देशात लोकशाही राहिलेली नाही. लोकांचा पाठिंबा पैशांना आहे. लोक पैसे घेऊन मतदान करीत आहेत. पैशांच्या बळामुळे सत्ताधारी पार्टीचाच जोर पाहायला मिळतो. वडील चांगले होते पण, विश्वजित राणेंचे हे राजकारण खतरनाक असून यापूर्वी असा प्रकार वाळपईत कधीच पाहिला नव्हता, अशी प्रतिक्रिया १९५१ पासून मतदानात मतदान करणारे श्री. गाडगीळ यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रातील नारायण राणेंचा मुलगा काय आणि या राणेंचा मुलगा काय सर्व एकच, अशी तिखट टिपणीही त्यांनी यावेळी केली.
विश्वजित राणेंची सावध भूमिका
प्रचार न करता भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराची आपण अनामत रक्कम जप्त करणार असल्याची डरकाळी फोडणारे कॉंग्रेस उमेदवार विश्वजित राणे यांना भाजप उमेदवार संतोष हळदणकर यांनी अक्षरशः घाम काढला. मतदानानंतर पत्रकारांशी बोलताना विश्वजित राणे यांनी आपणास विजयाची खात्री असल्याचा दावा करताना, निश्चित किती मताधिक्याने जिंकू हे सांगण्यास नकार दिला.
खाणीचा मुद्दा प्रभावी ः संतोष हळदणकर
मतदान यंत्रात सर्व काही बंद झालेले आहे. त्यामुळे येत्या २१ रोजी चित्र स्पष्ट होणार आहे. लोकांनी मला उदंड प्रतिसाद दिला. खाण विरोधाचा मुद्दा बराच प्रभावी ठरला असल्याचेही यावेळी श्री. हळदणकर यांनी सांगितले. खाणीला विरोध करणाऱ्याबरोबर आपण सतत राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
वास्कोत दोन अपघातांत विवाहितेसह दोघे ठार
वास्को, दि. १८ (प्रतिनिधी): आज संध्याकाळी वास्को शहरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात मंागोरहिल येथील २३ वर्षीय नाझिया सय्यद नावाच्या विवाहित युवतीला व बिर्ला येथील चाळीस वर्षाच्या हरिश्चंद्र लमाणी यांना आपले प्राण गमवावे लागले. अपघातात मरण पावलेला लमाणी व नाझिया दुचाकीच्या मागे बसल्याचे उघड झाले असून दोन्ही अपघातांत दुचाकींना टेंपोने धडक दिली.
आज संध्याकाळी ६.३० च्या सुमारास सेंट अँन्ड्रु चर्चसमोर झालेल्या अपघातात हरिश्चंद्र लमाणी मरण पावला, तर रात्री ८.३० वाजता मंगोरहील येथील सेंट तेरेझा विद्यालयासमोर झालेल्या अपघातात नाझिया सय्यद ही तरुणी जागीच ठार झाली. हरिश्चंद्र लमाणी हा बिर्ला येथे राहणारा इसम दिलखूष मोरजकर (कुंकळ्ळी) याच्या " हिरो होंडा पॅशन' या दुचाकीमागे बसून येत असताना त्याच बाजूने येणाऱ्या टेंपोने त्यांना धडक देऊन झालेल्या अपघातात हरिश्चंद्र व त्याचा साथीदार रस्त्यावर फेकले गेले. सदर अपघातात हरिश्चंद्र गंभीररीत्या जखमी झाल्याने त्यास त्वरित चिखलीच्या एका खासगी इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र येथे तो मरण पावला. या अपघातानंतर दोन तासांनी मंगोरहिल येथे दुचाकी व टेंपो यांच्यात झालेल्या अपघातात नाझिया ही २३ वर्षीय युवती जागीच ठार झाल्याची माहिती वास्को पोलिसांना मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळावर दाखल होऊन अपघाताचा पंचनामा केला. पोलिसांनी माहितीनुसार नाझिया ही विवाहित युवती नझरुद्दीन शेख याच्या दुचाकीवर (होंडा ट्विस्टर क्रः जीए ०६ एच २२७८) मागे बसून मंगोरहिलच्या दिशेने जात होती. यावेळी याच दिशेने जाणाऱ्या "स्वराज माझदा' टेंपोने (क्रः जीए ०२ व्ही ७२८५) त्यांना मागून जबर धडक दिल्याने दुचाकीवरील अझरुद्दीन व नाझिया रस्त्यावर फेकली गेली व नाझिया जागीच ठार झाली.नाझिया विवाहित असून, तिला दोन मुले आहेत.
दोन्ही मृतदेह चिकित्सेसाठी मडगावच्या हॉस्पिसीयो इस्पितळात पाठविण्यात आले आहेत. वास्को पोलीस निरीक्षक ब्राज मिनेझीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक फिलोमीना कॉस्ता दोन्ही अपघातांबाबत तपास करीत आहेत. दोन्ही वाहनांचे चालक सुखरूप असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आज संध्याकाळी ६.३० च्या सुमारास सेंट अँन्ड्रु चर्चसमोर झालेल्या अपघातात हरिश्चंद्र लमाणी मरण पावला, तर रात्री ८.३० वाजता मंगोरहील येथील सेंट तेरेझा विद्यालयासमोर झालेल्या अपघातात नाझिया सय्यद ही तरुणी जागीच ठार झाली. हरिश्चंद्र लमाणी हा बिर्ला येथे राहणारा इसम दिलखूष मोरजकर (कुंकळ्ळी) याच्या " हिरो होंडा पॅशन' या दुचाकीमागे बसून येत असताना त्याच बाजूने येणाऱ्या टेंपोने त्यांना धडक देऊन झालेल्या अपघातात हरिश्चंद्र व त्याचा साथीदार रस्त्यावर फेकले गेले. सदर अपघातात हरिश्चंद्र गंभीररीत्या जखमी झाल्याने त्यास त्वरित चिखलीच्या एका खासगी इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र येथे तो मरण पावला. या अपघातानंतर दोन तासांनी मंगोरहिल येथे दुचाकी व टेंपो यांच्यात झालेल्या अपघातात नाझिया ही २३ वर्षीय युवती जागीच ठार झाल्याची माहिती वास्को पोलिसांना मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळावर दाखल होऊन अपघाताचा पंचनामा केला. पोलिसांनी माहितीनुसार नाझिया ही विवाहित युवती नझरुद्दीन शेख याच्या दुचाकीवर (होंडा ट्विस्टर क्रः जीए ०६ एच २२७८) मागे बसून मंगोरहिलच्या दिशेने जात होती. यावेळी याच दिशेने जाणाऱ्या "स्वराज माझदा' टेंपोने (क्रः जीए ०२ व्ही ७२८५) त्यांना मागून जबर धडक दिल्याने दुचाकीवरील अझरुद्दीन व नाझिया रस्त्यावर फेकली गेली व नाझिया जागीच ठार झाली.नाझिया विवाहित असून, तिला दोन मुले आहेत.
दोन्ही मृतदेह चिकित्सेसाठी मडगावच्या हॉस्पिसीयो इस्पितळात पाठविण्यात आले आहेत. वास्को पोलीस निरीक्षक ब्राज मिनेझीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक फिलोमीना कॉस्ता दोन्ही अपघातांबाबत तपास करीत आहेत. दोन्ही वाहनांचे चालक सुखरूप असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आमोणा प्रकल्पास परवानगी हा न्यायालयाचा अवमान
सरकारला नोटीस जारी
पणजी, दि. १८ (प्रतिनिधी): सेझा गोवा कंपनीला मांडवी नदीच्या काठावर आमोणा येथे "पिग आर्यन प्लांट' सुरू करण्यासाठी मान्यता दिल्याने राज्याचे मुख्य सचिव, उद्योग संचालनालयाचे संचालक व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिवाविरुद्ध अवमान याचिका का दाखल करू नये, याची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. नदी काठावर उद्योग स्थापन करण्यास निश्चित झालेली मार्गदर्शकतत्त्वे अधिसूचित केल्याशिवाय कोणालाही परवानगी दिली जाणार नाही, अशी हमी राज्य सरकारने गेल्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला दिली होती.
मात्र, याविषयीची याचिका न्यायालयात सुरू असतानाच सरकारने सेझा गोवा या खाण कंपनीला आमोणा येथे पिग आर्यन प्लांट नदीकाठावर सुरू करण्यास मान्यता दिल्याचा दावा करून ऍड. नॉर्मा आल्वरिस यांनी अवमान याचिका सादर केली. याची दखल घेऊन न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. तसेच, ही याचिका दाखल करून घेत याची सुनावणी एक सदस्यीय खंडपीठासमोर घेतली जाणार असल्याचेही न्यायालयाने आज दिलेल्या आदेशात नमूद केले.
नदीकाठावर कोणते उद्योग स्थापावे याचे निश्चित धोरण आखावे, असा आदेश यापूर्वी गोवा खंडपीठाने दिला होता. या आदेशानुसार केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, राज्य प्रदूषण मंडळ तसेच तसेच, या खटल्यातील आमेक्युस क्युरी यांच्या सूचनेप्रमाणे मार्गदर्शकतत्त्वे निश्चित करण्यात आली होती. ती तत्त्वे अद्याप अधिसूचित करण्यात आलेली नाही, हेही यावेळी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. ही मार्गदर्शन तत्त्वे का अधिसूचित करण्यात आली नाही, असा प्रश्न यावेळी राज्य सरकारला करण्यात आली त्यावेळी प्रादेशिक आराखडा २०२१ मध्ये त्याचा समावेश असून त्यात त्याचा समावेश केला जाणार असल्याचे यावेळी सरकारी वकिलाने सांगितले. तसेच, नदीकाठावर उद्योग स्थापन करण्यासाठी अर्ज आल्यास तुम्ही काय करणार, असाही प्रश्न खंडपीठाने राज्य सरकारला केला होता. त्यावेळी ही मार्गदर्शकतत्त्वे निश्चित झाल्या व्यतिरिक्त कोणत्याही कंपनीला उद्योग स्थापन करण्याची परवानगी दिली जाणार नाही, अशी स्पष्ट हमी ऍडव्होकेट जनरल सुबोध कंटक यांनी दिल्यानंतर या विषयीची याचिका निकालात काढण्यात आली होती.
तरही, सेझा गोवा कंपनीला परवानगी का देण्यात आली, असा प्रश्न आज न्यायालयाने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला केला असता ती हमी ऍडव्होकेट जनरल यांनी दिली होती. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला त्याची माहिती नव्हती, असा युक्तिवाद यावेळी ऍड. आत्माराम नाडकर्णी यांनी केला.
मात्र, ज्यावेळी न्यायालयाला राज्य सरकारने हमी दिली होती त्याच काळात सरकारने न्यायालयापासून माहिती लपवून या कंपनीला आमोणा येथे पीक आर्यन प्लांट सुरू करण्यास परवानगी दिल्याचे ऍड. आल्वरिस यांनी खंडपीठाच्या नजरेस आणून दिले. याची गंभीर दखल घेत न्यायालयाने अवमान याचिका दाखल करून घेत राज्य सरकारला नोटीस बजावली.
पणजी, दि. १८ (प्रतिनिधी): सेझा गोवा कंपनीला मांडवी नदीच्या काठावर आमोणा येथे "पिग आर्यन प्लांट' सुरू करण्यासाठी मान्यता दिल्याने राज्याचे मुख्य सचिव, उद्योग संचालनालयाचे संचालक व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिवाविरुद्ध अवमान याचिका का दाखल करू नये, याची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. नदी काठावर उद्योग स्थापन करण्यास निश्चित झालेली मार्गदर्शकतत्त्वे अधिसूचित केल्याशिवाय कोणालाही परवानगी दिली जाणार नाही, अशी हमी राज्य सरकारने गेल्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला दिली होती.
मात्र, याविषयीची याचिका न्यायालयात सुरू असतानाच सरकारने सेझा गोवा या खाण कंपनीला आमोणा येथे पिग आर्यन प्लांट नदीकाठावर सुरू करण्यास मान्यता दिल्याचा दावा करून ऍड. नॉर्मा आल्वरिस यांनी अवमान याचिका सादर केली. याची दखल घेऊन न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. तसेच, ही याचिका दाखल करून घेत याची सुनावणी एक सदस्यीय खंडपीठासमोर घेतली जाणार असल्याचेही न्यायालयाने आज दिलेल्या आदेशात नमूद केले.
नदीकाठावर कोणते उद्योग स्थापावे याचे निश्चित धोरण आखावे, असा आदेश यापूर्वी गोवा खंडपीठाने दिला होता. या आदेशानुसार केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, राज्य प्रदूषण मंडळ तसेच तसेच, या खटल्यातील आमेक्युस क्युरी यांच्या सूचनेप्रमाणे मार्गदर्शकतत्त्वे निश्चित करण्यात आली होती. ती तत्त्वे अद्याप अधिसूचित करण्यात आलेली नाही, हेही यावेळी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. ही मार्गदर्शन तत्त्वे का अधिसूचित करण्यात आली नाही, असा प्रश्न यावेळी राज्य सरकारला करण्यात आली त्यावेळी प्रादेशिक आराखडा २०२१ मध्ये त्याचा समावेश असून त्यात त्याचा समावेश केला जाणार असल्याचे यावेळी सरकारी वकिलाने सांगितले. तसेच, नदीकाठावर उद्योग स्थापन करण्यासाठी अर्ज आल्यास तुम्ही काय करणार, असाही प्रश्न खंडपीठाने राज्य सरकारला केला होता. त्यावेळी ही मार्गदर्शकतत्त्वे निश्चित झाल्या व्यतिरिक्त कोणत्याही कंपनीला उद्योग स्थापन करण्याची परवानगी दिली जाणार नाही, अशी स्पष्ट हमी ऍडव्होकेट जनरल सुबोध कंटक यांनी दिल्यानंतर या विषयीची याचिका निकालात काढण्यात आली होती.
तरही, सेझा गोवा कंपनीला परवानगी का देण्यात आली, असा प्रश्न आज न्यायालयाने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला केला असता ती हमी ऍडव्होकेट जनरल यांनी दिली होती. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला त्याची माहिती नव्हती, असा युक्तिवाद यावेळी ऍड. आत्माराम नाडकर्णी यांनी केला.
मात्र, ज्यावेळी न्यायालयाला राज्य सरकारने हमी दिली होती त्याच काळात सरकारने न्यायालयापासून माहिती लपवून या कंपनीला आमोणा येथे पीक आर्यन प्लांट सुरू करण्यास परवानगी दिल्याचे ऍड. आल्वरिस यांनी खंडपीठाच्या नजरेस आणून दिले. याची गंभीर दखल घेत न्यायालयाने अवमान याचिका दाखल करून घेत राज्य सरकारला नोटीस बजावली.
११ बंडखोरांचे भवितव्य अधांतरी
-हायकोर्ट न्यायमूर्तींमध्ये मतभेद
-उद्या दुसऱ्या न्यायासनासमोर सुनावणी
-५ अपक्षांचा निकाल २ नोव्हेंबरला
कर्नाटक प्रकरण
बंगलोर, दि. १८ : कर्नाटकमधील ११ भाजप बंडखोरांसह ५ अपक्षांच्या अपात्रतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर बहुप्रतीक्षित निकाल अधांतरीच राहिला. ११ भाजप आमदारांच्या याचिकेवर उच्च न्यायालयातील दोन सदस्यीय न्यायासनाचे एकमत होऊ न शकल्याने आता यावर दुसरे न्यायासन २० ऑक्टोबरला सुनावणी करणार असल्याचे वृत्त आहे. सोबतच ५ अपक्षांच्या याचिकेवर २ नोव्हेंबर रोजी सुनावणी होईल.
भाजपच्या ११ बंडखोर आमदारांसह १६ जणांना कर्नाटक विधानसभाध्यक्ष के.जी. बोपय्या यांनी अपात्र ठरविले होते. या त्यांच्या निर्णयाला आव्हान देणारी वेगवेळी याचिका १६ जणांनी कर्नाटक उच्च न्यायालयात दाखल केली होती. तत्पूर्वी राज्यपालांच्या आदेशानुसार येदीयुरप्पा सरकारने या १६ सदस्यांच्या अनुपस्थितीतच विश्वासमत प्राप्त केले. पण, तरीही १६ आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय होईपर्यंत विश्वासमताला अर्थ नाही, असे बोलले जात होते. त्यामुळे सर्वांचे लक्ष आजच्या या निर्णयाकडे लागले होते. आजची सुनावणी मुख्य न्यायमूर्ती केहर सिंग आणि न्या. एन. कुमार यांच्या दोन सदस्यीय न्यायासनासमोर झाली. त्यात मुख्य न्यायमूर्तींनी विधानसभाध्यक्षांच्या निर्णयाला योग्य मानले. पण, न्या. एन.कुमार यांनी मात्र यावर असहमती व्यक्त केली. दोघांचेही या विषयावर एकमत न झाल्याने ही याचिका सुनावणीसाठी अन्य न्यायासनाकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. आता हायकोर्टात दुसऱ्या न्यायासनासमोर याची सुनावणी २० ऑक्टोबर रोजी होणार आहे.
दरम्यान, पाच अपक्ष आमदारांविषयीदेखील दुसऱ्या न्यायासनासमोर सुनावणी घेण्याचा निर्णय हायकोर्टाने दिला. त्यांच्या याचिकेवर २ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. अपात्र ठरविण्यात आलेले भाजपा आमदार आणि अपक्ष यांनी वेगवेगळी याचिका दाखल केली होती. या दोहोंची सुनावणी आजच होणार होती. मात्र, आज निकाल न लागल्याने सर्वांचीच घोर निराशा झाली.
कॉंग्रेसचा आरोप
कर्नाटक उच्च न्यायालयात आज कोणताही निकाल न लागल्याने विरोधी पक्षांच्या कंपूत निराशेचे वातावरण होते. त्यातच कॉंग्रेसने सत्ताधारी भारतीय जनता पार्टीवर आमदारांची खरेदी करण्याचा आरोप लावला आहे. भाजपने आमचे आमदार विकत घेण्यासाठी ५० कोटी रुपये आणि मंत्रिपदाची लालूच दाखविल्याचा आरोप कर्नाटक कॉंग्रेसने केला आहे.
-उद्या दुसऱ्या न्यायासनासमोर सुनावणी
-५ अपक्षांचा निकाल २ नोव्हेंबरला
कर्नाटक प्रकरण
बंगलोर, दि. १८ : कर्नाटकमधील ११ भाजप बंडखोरांसह ५ अपक्षांच्या अपात्रतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर बहुप्रतीक्षित निकाल अधांतरीच राहिला. ११ भाजप आमदारांच्या याचिकेवर उच्च न्यायालयातील दोन सदस्यीय न्यायासनाचे एकमत होऊ न शकल्याने आता यावर दुसरे न्यायासन २० ऑक्टोबरला सुनावणी करणार असल्याचे वृत्त आहे. सोबतच ५ अपक्षांच्या याचिकेवर २ नोव्हेंबर रोजी सुनावणी होईल.
भाजपच्या ११ बंडखोर आमदारांसह १६ जणांना कर्नाटक विधानसभाध्यक्ष के.जी. बोपय्या यांनी अपात्र ठरविले होते. या त्यांच्या निर्णयाला आव्हान देणारी वेगवेळी याचिका १६ जणांनी कर्नाटक उच्च न्यायालयात दाखल केली होती. तत्पूर्वी राज्यपालांच्या आदेशानुसार येदीयुरप्पा सरकारने या १६ सदस्यांच्या अनुपस्थितीतच विश्वासमत प्राप्त केले. पण, तरीही १६ आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय होईपर्यंत विश्वासमताला अर्थ नाही, असे बोलले जात होते. त्यामुळे सर्वांचे लक्ष आजच्या या निर्णयाकडे लागले होते. आजची सुनावणी मुख्य न्यायमूर्ती केहर सिंग आणि न्या. एन. कुमार यांच्या दोन सदस्यीय न्यायासनासमोर झाली. त्यात मुख्य न्यायमूर्तींनी विधानसभाध्यक्षांच्या निर्णयाला योग्य मानले. पण, न्या. एन.कुमार यांनी मात्र यावर असहमती व्यक्त केली. दोघांचेही या विषयावर एकमत न झाल्याने ही याचिका सुनावणीसाठी अन्य न्यायासनाकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. आता हायकोर्टात दुसऱ्या न्यायासनासमोर याची सुनावणी २० ऑक्टोबर रोजी होणार आहे.
दरम्यान, पाच अपक्ष आमदारांविषयीदेखील दुसऱ्या न्यायासनासमोर सुनावणी घेण्याचा निर्णय हायकोर्टाने दिला. त्यांच्या याचिकेवर २ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. अपात्र ठरविण्यात आलेले भाजपा आमदार आणि अपक्ष यांनी वेगवेगळी याचिका दाखल केली होती. या दोहोंची सुनावणी आजच होणार होती. मात्र, आज निकाल न लागल्याने सर्वांचीच घोर निराशा झाली.
कॉंग्रेसचा आरोप
कर्नाटक उच्च न्यायालयात आज कोणताही निकाल न लागल्याने विरोधी पक्षांच्या कंपूत निराशेचे वातावरण होते. त्यातच कॉंग्रेसने सत्ताधारी भारतीय जनता पार्टीवर आमदारांची खरेदी करण्याचा आरोप लावला आहे. भाजपने आमचे आमदार विकत घेण्यासाठी ५० कोटी रुपये आणि मंत्रिपदाची लालूच दाखविल्याचा आरोप कर्नाटक कॉंग्रेसने केला आहे.
लादेनला आयएसआयचा पाहुणचार !
काबुल, दि. १८ : अमेरिका तसेच पाश्चिमात्य देशांविरुद्ध "यल्गार' करणाऱ्या ओसामा बिन लादेनला पाकिस्तानातील गुप्तहेर संघटना आयएसआयने आश्रय दिला असून, त्याची विशेष बडदास्त ठेवली जात असल्याची माहिती नाटो सेनेच्या एका कमांडरने समोर आणली आहे.
दहशतवादाला खतपाणी देण्याविषयी नेहमीच पाकिस्तान भारतासह संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायाशी खोटे बोलला आहे. सध्या अतिरेक्यांविरुद्ध कारवाईच्या नावाखाली पाकिस्तान अमेरिकेकडून आर्थिक तसेच सर्व प्रकारची मदत घेत आहे. पण, प्रत्यक्षात मात्र पाकने दहशतवादाला खतपाणी घालण्याचे कार्यक्रम सुरूच ठेवले आहे. अफगाणिस्तानात तैनात असणाऱ्या नाटो लष्कराच्या एका मुख्य कमाण्डरने दिलेल्या माहितीनुसार, लादेनला सुरक्षितपणे ठेवण्याचा प्रकार आयएसआयच करीत आहे. एवढेच नव्हे तर त्याची एखाद्या पाहुण्याप्रमाणे बडदास्त ठेवली जात आहे. पाकिस्तानच्या वायव्य प्रांतात आयएसआयने लादेनला लपवून ठेवले असल्याचेही या कमांडरचे म्हणणे आहे.
केवळ लादेनच नव्हे तर तालिबानी नेता मुल्ला उमर, अल जवाहिरी यांनीही आयएसआयकडेच आश्रय घेतला आहे. पाकिस्तान या सर्व अतिरेकी संघटनांना सर्वतोपरी सहकार्य करीत असतानाच लादेसारख्या अतिरेक्याला लपविण्याचेही काम करीत आहे. लादेन चिनी सीमेनजीकच्या चितरालपासून अफगाणिस्तानला लागून असणाऱ्या खुर्रम या डोंगराळ भागात लपून बसला होता. पण, आता तर तो पाकिस्तानातच आहे. हा भाग आदिवासीबहुल आहे. तेथे पाकिस्तानी सरकारचा कोणताही अंमल नाही. मुल्ला उमर मात्र कोणत्याही एका ठिकाणी लपत नाही. तो क्वेटा आणि कराची दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी लपून असतो, अशीही माहिती उघडकीस आली आहे.
दहशतवादाला खतपाणी देण्याविषयी नेहमीच पाकिस्तान भारतासह संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायाशी खोटे बोलला आहे. सध्या अतिरेक्यांविरुद्ध कारवाईच्या नावाखाली पाकिस्तान अमेरिकेकडून आर्थिक तसेच सर्व प्रकारची मदत घेत आहे. पण, प्रत्यक्षात मात्र पाकने दहशतवादाला खतपाणी घालण्याचे कार्यक्रम सुरूच ठेवले आहे. अफगाणिस्तानात तैनात असणाऱ्या नाटो लष्कराच्या एका मुख्य कमाण्डरने दिलेल्या माहितीनुसार, लादेनला सुरक्षितपणे ठेवण्याचा प्रकार आयएसआयच करीत आहे. एवढेच नव्हे तर त्याची एखाद्या पाहुण्याप्रमाणे बडदास्त ठेवली जात आहे. पाकिस्तानच्या वायव्य प्रांतात आयएसआयने लादेनला लपवून ठेवले असल्याचेही या कमांडरचे म्हणणे आहे.
केवळ लादेनच नव्हे तर तालिबानी नेता मुल्ला उमर, अल जवाहिरी यांनीही आयएसआयकडेच आश्रय घेतला आहे. पाकिस्तान या सर्व अतिरेकी संघटनांना सर्वतोपरी सहकार्य करीत असतानाच लादेसारख्या अतिरेक्याला लपविण्याचेही काम करीत आहे. लादेन चिनी सीमेनजीकच्या चितरालपासून अफगाणिस्तानला लागून असणाऱ्या खुर्रम या डोंगराळ भागात लपून बसला होता. पण, आता तर तो पाकिस्तानातच आहे. हा भाग आदिवासीबहुल आहे. तेथे पाकिस्तानी सरकारचा कोणताही अंमल नाही. मुल्ला उमर मात्र कोणत्याही एका ठिकाणी लपत नाही. तो क्वेटा आणि कराची दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी लपून असतो, अशीही माहिती उघडकीस आली आहे.
Monday, 18 October 2010
विश्वजित धास्तावले, डाव अंगलट येणार?
स्थानिक स्वाभिमान व खाणविरोधी मुद्यांवर आजच्या निवडणुकीचे भवितव्य ठरणार
पणजी, दि. १७ (प्रतिनिधी): वाळपईवासीयांना गृहीत धरून आमदारकीचा राजीनामा दिलेले आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना उद्याची पोटनिवडणूक चांगलीच जड जाणार असल्याची चिन्हे दिसत आहे. कारण नसताना लादलेल्या या पोटनिवडणुकीमुळे काहीशा अस्वस्थ बनलेल्या वाळपईच्या जनतेसाठी विश्वजित यांनी विकास हा निवडणुकीचा मुख्य मुद्दा बनवला असला तरी लोकांची पूर्वीप्रमाणे समजूत घालताना त्यांची प्रचंड दमछाक झाल्याचेच यावेळी दिसून आले. त्या पार्श्वभूमीवर उद्या सोमवारी होणारे मतदान महत्त्वाचे ठरणार आहे. कदाचित अतिमहत्त्वाकांक्षीपणा त्यांना महाग पडण्याचीही शक्यता आहे. भाजपने या निवडणुकीत उपस्थित केलेले स्वाभिमानजागृती व निसर्गसंपन्न सत्तरीच्या रक्षणासाठी खाण विरोध हे मुद्दे परिणामकारक ठरू लागल्याचेही प्रचारादरम्यान स्पष्ट झाले. साहजिकच संतोष हळदणकर व विश्वजित यांच्यात रंगणारा हा सामना अत्यंत चुरशीचा होईल, हे जवळपास स्पष्ट झाले आहे.
वाळपई मतदारसंघात सुरुवातीला भाजप उमेदवार संतोष हळदणकर यांचा प्रभाव कमी जाणवत होता. मात्र विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर व खासदार श्रीपाद नाईक यांनी प्रचारात हिरिरीने भाग घेतला. घरोघरी प्रचार केला. मतदारांच्या मनावरील दडपण कमी केले. त्यांना निर्भय बनवले. भाजपचे अन्य राज्यस्तरीय नेते दरम्यानच्या काळात अनेक दिवस वाळपईत ठाण मांडून होते. राजकीय दबावाविरोधात स्वाभिमान असा नारा पक्षाकडून दिला गेल्याने कधी नव्हे इतके कार्यकर्तेही सक्रिय झाले होते. त्यातच हळदणकर यांचा साधेपणा आणि स्वच्छ प्रतिमा ही त्यांची जमेची बाजू ठरल्याचेही प्रचारादरम्यान दिसून आले. सत्तरीच्या विनाशाला कारणीभूत ठरणाऱ्या खाणींना विश्र्वजित राणे यांचाच पाठिंबा आहे ही गोष्ट मतदारांच्या मनावर ठसवण्याचा भाजप नेत्यांनी सातत्याने प्रयत्न केला. या उलट विश्वजित या प्रचाराविरोधात ठोस भूमिका घेऊ शकले नाहीत. किंबहुना लोकांना हव्या असतील तर सत्तरीत खाणी येतील वगैरे स्वतःलाच अधिक अडचणीत आणतील अशी विधाने करून ते मोकळे झाले. त्यामुळे प्रस्थापित विश्वजित विरुद्ध साधे आणि सरळमार्गी संतोष हळदणकर असे या निवडणुकीचे स्वरूप बनले आहे.
विश्वजित यांच्यासाठी कॉंग्रेस पक्ष किंवा नेते म्हणावे तेवढ्या ताकदीने प्रचारात उतरल्याचे पाहायला मिळाले नाही. कदाचित आपण एकहाती हा सामना जिंकू, असा अतिआत्मविश्वास त्यांना असावा. आरोग्यमंत्र्यांच्या २०० कोटींच्या विकासातील फोलपणा दाखवून देण्यात भाजप नेते यशस्वी ठरल्याचेही चित्र दरम्यानच्या काळात पाहायला मिळाले. गेली २९ वर्षे हा भाग विकासापासून का मागास राहिला, या कालावधीत मतदारसंघाचा विकास का झाला नाही हे कळीचे मुद्दे भाजपने उपस्थित केले. आहे. विश्वजित भासवतात तो विकास केवळ कागदावरच झाला असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे.
वाळपई मतदारसंघातील नगरगाव, खोतोडे, सावर्डे, गुळेली व भिरोंडा या पंचायतीबरोबरच वाळपई नगरपालिका क्षेत्रातील मतदारांचा कानोसा घेतला असता यापूर्वी राजकारण किंवा निवडणुकीसंदर्भात खुलेआम न बोलणारे मतदार आता उघडपणे आपली प्रतिक्रिया देताना दिसत होते. हळदणकर हे स्थानिक म्हणून ही निवडणूक लढवत असल्याने त्याचाही त्यांना फायदा होईल, असे या लोकांचे म्हणणे पडले. भाजपच्या "स्थानिक उमेदवाराला मतदान करा' या मुद्यालाही लोकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे.
मतांचा झोका महत्त्वाचा
वाळपई मतदारसंघाच्या या निवडणुकीत १७९१२ जणांना मतदानाचा अधिकार असून २७ केंद्रांत मतदान होईल. २००७ च्या विधानसभा निवडणुकीत विश्वजित यांना ८५९० तर भाजपचे पुती गावकर यांना ५०४१ मते मिळाली होती. या निवडणुकीत खुद्द वाळपई शहराबरोबरच ग्रामीण भागातील मते निर्णायक ठरणार आहेत. प्रामुख्याने विरोधकांचा खाणीचा मुद्दा मतदार किती उचलून धरतात यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.
चार केंद्रे संवेदनशील
आजच्या मतदानासाठी १५० जणांना निवडणूक कामासाठी पाठवण्यात आले आहे. कडक बंदोबस्तासाठी ४५० पोलिस आणि "सीआयएसएफ'च्या दोन कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. वापळई मतदारसंघातील केंद्र क्रमांक २, ३, ४ आणि ५ संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. तसेच, कोणत्याही खाजगी वाहनातून मतदारांना मतदान केंद्रावर न आणण्याचा आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे. त्याचप्रमाणे, मतदान केंद्रात मोबाईलच्या वापरावरही बंदी घालण्यात आली आहे.
पणजी, दि. १७ (प्रतिनिधी): वाळपईवासीयांना गृहीत धरून आमदारकीचा राजीनामा दिलेले आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना उद्याची पोटनिवडणूक चांगलीच जड जाणार असल्याची चिन्हे दिसत आहे. कारण नसताना लादलेल्या या पोटनिवडणुकीमुळे काहीशा अस्वस्थ बनलेल्या वाळपईच्या जनतेसाठी विश्वजित यांनी विकास हा निवडणुकीचा मुख्य मुद्दा बनवला असला तरी लोकांची पूर्वीप्रमाणे समजूत घालताना त्यांची प्रचंड दमछाक झाल्याचेच यावेळी दिसून आले. त्या पार्श्वभूमीवर उद्या सोमवारी होणारे मतदान महत्त्वाचे ठरणार आहे. कदाचित अतिमहत्त्वाकांक्षीपणा त्यांना महाग पडण्याचीही शक्यता आहे. भाजपने या निवडणुकीत उपस्थित केलेले स्वाभिमानजागृती व निसर्गसंपन्न सत्तरीच्या रक्षणासाठी खाण विरोध हे मुद्दे परिणामकारक ठरू लागल्याचेही प्रचारादरम्यान स्पष्ट झाले. साहजिकच संतोष हळदणकर व विश्वजित यांच्यात रंगणारा हा सामना अत्यंत चुरशीचा होईल, हे जवळपास स्पष्ट झाले आहे.
वाळपई मतदारसंघात सुरुवातीला भाजप उमेदवार संतोष हळदणकर यांचा प्रभाव कमी जाणवत होता. मात्र विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर व खासदार श्रीपाद नाईक यांनी प्रचारात हिरिरीने भाग घेतला. घरोघरी प्रचार केला. मतदारांच्या मनावरील दडपण कमी केले. त्यांना निर्भय बनवले. भाजपचे अन्य राज्यस्तरीय नेते दरम्यानच्या काळात अनेक दिवस वाळपईत ठाण मांडून होते. राजकीय दबावाविरोधात स्वाभिमान असा नारा पक्षाकडून दिला गेल्याने कधी नव्हे इतके कार्यकर्तेही सक्रिय झाले होते. त्यातच हळदणकर यांचा साधेपणा आणि स्वच्छ प्रतिमा ही त्यांची जमेची बाजू ठरल्याचेही प्रचारादरम्यान दिसून आले. सत्तरीच्या विनाशाला कारणीभूत ठरणाऱ्या खाणींना विश्र्वजित राणे यांचाच पाठिंबा आहे ही गोष्ट मतदारांच्या मनावर ठसवण्याचा भाजप नेत्यांनी सातत्याने प्रयत्न केला. या उलट विश्वजित या प्रचाराविरोधात ठोस भूमिका घेऊ शकले नाहीत. किंबहुना लोकांना हव्या असतील तर सत्तरीत खाणी येतील वगैरे स्वतःलाच अधिक अडचणीत आणतील अशी विधाने करून ते मोकळे झाले. त्यामुळे प्रस्थापित विश्वजित विरुद्ध साधे आणि सरळमार्गी संतोष हळदणकर असे या निवडणुकीचे स्वरूप बनले आहे.
विश्वजित यांच्यासाठी कॉंग्रेस पक्ष किंवा नेते म्हणावे तेवढ्या ताकदीने प्रचारात उतरल्याचे पाहायला मिळाले नाही. कदाचित आपण एकहाती हा सामना जिंकू, असा अतिआत्मविश्वास त्यांना असावा. आरोग्यमंत्र्यांच्या २०० कोटींच्या विकासातील फोलपणा दाखवून देण्यात भाजप नेते यशस्वी ठरल्याचेही चित्र दरम्यानच्या काळात पाहायला मिळाले. गेली २९ वर्षे हा भाग विकासापासून का मागास राहिला, या कालावधीत मतदारसंघाचा विकास का झाला नाही हे कळीचे मुद्दे भाजपने उपस्थित केले. आहे. विश्वजित भासवतात तो विकास केवळ कागदावरच झाला असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे.
वाळपई मतदारसंघातील नगरगाव, खोतोडे, सावर्डे, गुळेली व भिरोंडा या पंचायतीबरोबरच वाळपई नगरपालिका क्षेत्रातील मतदारांचा कानोसा घेतला असता यापूर्वी राजकारण किंवा निवडणुकीसंदर्भात खुलेआम न बोलणारे मतदार आता उघडपणे आपली प्रतिक्रिया देताना दिसत होते. हळदणकर हे स्थानिक म्हणून ही निवडणूक लढवत असल्याने त्याचाही त्यांना फायदा होईल, असे या लोकांचे म्हणणे पडले. भाजपच्या "स्थानिक उमेदवाराला मतदान करा' या मुद्यालाही लोकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे.
मतांचा झोका महत्त्वाचा
वाळपई मतदारसंघाच्या या निवडणुकीत १७९१२ जणांना मतदानाचा अधिकार असून २७ केंद्रांत मतदान होईल. २००७ च्या विधानसभा निवडणुकीत विश्वजित यांना ८५९० तर भाजपचे पुती गावकर यांना ५०४१ मते मिळाली होती. या निवडणुकीत खुद्द वाळपई शहराबरोबरच ग्रामीण भागातील मते निर्णायक ठरणार आहेत. प्रामुख्याने विरोधकांचा खाणीचा मुद्दा मतदार किती उचलून धरतात यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.
चार केंद्रे संवेदनशील
आजच्या मतदानासाठी १५० जणांना निवडणूक कामासाठी पाठवण्यात आले आहे. कडक बंदोबस्तासाठी ४५० पोलिस आणि "सीआयएसएफ'च्या दोन कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. वापळई मतदारसंघातील केंद्र क्रमांक २, ३, ४ आणि ५ संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. तसेच, कोणत्याही खाजगी वाहनातून मतदारांना मतदान केंद्रावर न आणण्याचा आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे. त्याचप्रमाणे, मतदान केंद्रात मोबाईलच्या वापरावरही बंदी घालण्यात आली आहे.
Subscribe to:
Posts (Atom)