पाकमधील स्ङ्गोटात पाच अतिरेकी ठार
पेशावर, दि. १५ : पाकिस्तानच्या वायव्य सरहद्द प्रांताच्या कबाईल भागात आज झालेल्या भीषण स्ङ्गोटात पाच तालिबानी अतिरेकी ठार आणि अन्य चार जण जखमी झाले आहेत. हे सर्व अतिरेकी एका वाहनातून प्रवास करत असताना, त्यांचे वाहन अली शेरजई गावाजवळ जमिनीखाली पेरून ठेवलेल्या भूसुरूंगाच्या भीषण स्ङ्गोटात उडाले. या स्ङ्गोटात पाच अतिरेकी जागीच ठार झाले, अशी माहिती पोलिसांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले.
ओबामा-झरदारी यांच्यात चर्चा
वॉशिंग्टन, दि. १५ : दहशतवादाविरुध्दच्या लढाईचे प्रयत्न, अङ्गगाणिस्तानमधील स्थिती व पाकिस्तानमधील वादग्रस्त ईशनिंदा कायदा या प्रमुख मुद्यांवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा व पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष असिङ्ग अली झरदारी यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये चर्चा झाली.
अङ्गगाणिस्तान-पाकिस्तान विभागाचे अमेरिकेचे विशेष दूत असलेले रिचर्ड होलब्रुक यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी तसेच राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेण्यासाठी झरदारी अमेरिकेच्या दोन दिवसांच्या भेटीवर येथे आले आहेत. काल संध्याकाळी त्यांनी ओबामा यांच्याशी चर्चा केली. या दोघांच्या चर्चेत प्रामुख्याने दहशतवादाविरुध्द सुरू असलेल्या लढ्याचे प्रयत्न, विभागीय स्थिरतेला प्रोत्साहन देणे, अङ्गगाणिस्तान यावर जोर देण्यात आला. ही बैठक जवळपास अर्धा तास चालली. यावर्षी ओबामा पाकिस्तान दौर्यावर येण्याची शक्यता आहे.
हुरियतच्या बंदने जनजीवन विस्कळीत
श्रीनगर, दि. १५ : सईद अली शाह गिलानी यांच्या नेतृत्वाखालील हुरियत कॉन्ङ्गरन्सच्या कट्टरतावादी गटाने पुकारलेल्या बंदमुळे काश्मीरमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या उन्हाळ्यात खोर्यात उङ्गाळलेल्या हिंसेच्या काळात काही युवकांना अटक करण्यात आली होती. या अटकेच्या निषेधात हा बंद पुकारण्यात आला आहे.
गिलानी यांनी पुकारलेल्या या बंदच्या काळात खोर्यातील सर्व दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने, खाजगी कार्यालये पूर्णपणे बंद होती, असे अधिकार्यांनी सांगितले. सरकारी कार्यालयांमधील उपस्थिती नगण्य होती तर रस्त्यावर जवळपास शुकशुकाट दिसून येत होता. दरम्यान, आज खोर्यात काही भागात जोरदार बर्ङ्गवृष्टी झाल्याने तसेही लोक घराबाहेर पडले नाहीत, असे या सूत्राने सांगितले.
राष्ट्रकुल घोटाळा; महेंद्रू यांना जामीन
नवी दिल्ली, दि. १५ : राष्ट्रकुल घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले पदाधिकारी आणि आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांचे आणखी एक विश्वासू सहकारी संजय महेंद्रू यांनाही दिल्ली न्यायालयाने आज जामीन मंजूर केला आहे.
२००९ मध्ये लंडन येथे झालेल्या क्वीन्स बॅटनच्या कार्यक्रमात झालेल्या तथाकथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी महेंद्रू यांना अटक करण्यात आली होती. आयोजन समितीचे संयुक्त महासंचालक असलेल्या महेंद्रू आणि काल जामीन मंजूर झालेले टी. एस दरबारी यांना गेल्या वर्षीच्या १५ नोव्हेेंबरला अटक करण्यात आली होती. दरबारी यांच्याप्रमाणेच महेंद्रू यांच्या प्रकरणातही एङ्गआयआर दाखल करण्यात आल्यापासून निर्धारित ६० दिवसांत तपास पूर्ण करून आरोपपत्र दाखल करण्यात सीबीआयला अपयश आल्याने विशेष सीबीआय न्यायाधीश ओ. पी. सैनी यांनी महेंद्रू यांचा जामीन अर्ज मंजूर केला.
आयोजन समितीचे आणखी एका पदाधिकारी टी. एस. दरबारी यांना काल जामीन मंजूर करताना दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा संदर्भही न्या. ओ. पी. सैनी यांनी घेतला.
चीनहून आला अर्धा किलोचा एकेक कांदा
मुंबई, दि. १५ : देशात कांद्याच्या किमती आकाशाला भिडल्या असताना आणि पाकिस्तानने कांदा पाठविण्यास नकार दिला असताना देशातील कांद्याच्या उपलब्धतेत वाढ करण्यासाठी चीनमधील कांद्याचे मुंबईत आगमन झाले आहे. या चिनी कांद्याचे वैशिष्ट्य म्हणजे, या एक-एक कांद्याचे वजन अर्धा किलो आहे.
चीनमधून काल शुक्रवारी अकरा टन कांदा देशात उपलब्ध झाला. यामुळे देशातील कांद्याची टंचाई दूर होण्यात आणि कांद्याच्या किमती कमी होण्यात काही प्रमाणात मदत मिळेल, अशी अपेक्षा कांदा आणि टमाटर बाजारपेठेचे संचालक अशोक बाजूज यांनी व्यक्त केली.
या चिनी कांद्याची घाऊक बाजारपेठेतील किंमत ३२.५० ते ४० रुपये प्रति किलो आहे. हिंदुस्थान ट्रेडिंग या चीनमधील खाजगी कंपनीतर्ङ्गे हा कांदा भारतात पाठविण्यात आला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुंबईतील वाशी येथील गोदामात तो ठेवण्यात आलेला आहे.
प्रायोगिक तत्त्वावर सुरुवातीला अकरा टन कांद्याचा पुरवठा करण्यात आला असून, ग्राहकांकडून या कांद्याला कसा प्रतिसाद मिळतो, यावर पुढील मागणी अवलंबून राहणार आहे. दरम्यान, शहरातील पंचतारांकित हॉटेल्सतर्ङ्गे या चिनी कांद्याला चांगली मागणी मिळत असल्याचे ते म्हणाले.
काही ग्राहकांनी चिनी कांद्याचा दर्जा अतिशय चांगला असल्याचे सांगतानाच त्याची चव मात्र भारतीय कांद्यासारखी नसल्याचे म्हटले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा