मुंबई, दि. २२ - २६ नोव्हेंबर रोजी मुंबईवर करण्यात आलेल्या हल्ल्यातील एकमेव जिवंत अतिरेकी मोहम्मद अजमल अमीर इमान कसाबने आपण पाकिस्तानी असून, ठार झालेले अन्य सर्वजण पाकिस्तानी असल्याचे म्हटले आहे. कसाव याने पाकिस्तानी दुतावासाला यासंबंधात पत्र लिहिले आहे.हे पत्र भारतीय परराष्ट्र खात्याच्या अधिकाऱ्यांनी आज नवी दिल्ली येथे पाक उच्च्यायुक्तांना पाचारण करून त्यांना दिले.कसाबने कायद्याच्या मदतीसाठी आपण उच्चायुक्तांना भेटू इच्छितो असे पत्रात म्हटले असून, आपल्या सोबतच्या नऊ पाक साथीदारांना मरण आल्याचे पत्रात नमूद केले आहे.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा