पणजी, दि. १३ (प्रतिनिधी): मेरशी सुधारगृहातून पळालेल्या आठ तरुणी पळाल्या नसून त्यांना पळवण्यात आल्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या तरुणींचा शोध जुने गोवे पोलिस घेत असून अद्याप त्यांचा कोणता थांगपत्ता लागलेला नाही, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. गेल्या काही महिन्यात सुधारगृहातून अनेक तरुणी पळून गेल्या असून त्यांना पळून जाण्यासाठी कोण मदत करतो, याचा तपास करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
हा प्रश्न राज्य प्रशासनाने अद्याप गांभीर्याने घेतलेला नाही. तसेच सुधारगृह व्यवस्थापनाने याच्या विरोधात ठोस पावलेही उचललेली नाही, असे उघड झाले आहे. दि. ९ ऑगस्ट ०८ रोजी पळून गेलेल्या या तरुणींची माहिती सुरुवातीला गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. अखेर दि. १२ ऑगस्ट रोजी हा प्रकार सर्वांसमोर उघड झाला.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा