अजूनही पंचनामा नाही
पणजी, दि. ११ (प्रतिनिधी): बेकायदा खनिज उत्खनन प्रकरणी जितेंद्र देशप्रभू यांच्यावर अखेर गुन्हा नोंद झाला खरा; मात्र आता या प्रकरणाचे पुरावे नष्ट करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू झाल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणात अनेक बडे अधिकारीही गोवले जाण्याची शक्यता असल्याने या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे नष्ट केले जात आहेत. गुन्हा नोंद करूनही घटनास्थळाचा पंचनामा करण्यात गुन्हा अन्वेषण विभाग वेळकाढू धोरण अवलंबत असल्याने या संशयाला पुष्टीच मिळाली आहे.
काल दि. १० रोजी सकाळी जितेंद्र देशप्रभू तसेच, खाण संचालक, वाहतूक संचालक, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि स्थानिक सरपंच तथा सचिवांच्या विरोधात भ्रष्टाचार आणि फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्याचे पुरावे गोळा करण्यासाठी ज्या ठिकाणी हे बेकायदा खनिज उत्खनन करण्याचे आले त्याचा पंचनामा होणे अत्यंत गरजेचे आहे. या ठिकाणाहून ५० कोटी रुपयांचे खनिज काढण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास गुन्हा अन्वेषण विभागाचे उपअधीक्षक चंद्रकांत साळगावकर करीत आहेत.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा