Tuesday, 18 January 2011

केंद्रात राज्यमंत्रिपदी सार्दिन की शांताराम?

-केंद्रीय मंत्रिमंडळाची लवकरच फेररचना
नवी दिल्ली, दि. १७
चालू आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाची पुनर्रचना होण्याची शक्यता वर्तविली जात असतानाच पंतप्रधान मनमोहन सिंह आज (सोमवारी) संध्याकाळी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची भेट घेतली. मंत्रिमंडळ फेररचनेत यावेळी गोव्याला स्थान मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. फ्रांसिस सार्दिन अथवा शांताराम नाईक यांना राज्यमंत्रिपद दिले जाण्याची शक्यता आहे. गोव्याप्रमाणेच मणिपूर व छत्तीसगडच्या कॉंग्रेस खासदारांची मंत्रिपदी वर्णी लागेल. या तिन्ही राज्यांना सध्या मंत्रिमंडळात स्थान नाही.
ङ्गेब्रुवारीच्या तिसर्‍या आठवड्यात सुरू होणार्‍या अर्थसंकल्प अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा आपला प्रस्ताव पंतप्रधानांनी राष्ट्रपतींपुढे मांडला. गेल्या आठवड्यात दोनाहून अधिक वेळा कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मनमोहनसिंग यांच्याशी दीर्घ चर्चा केली. संयुक्त पुरोगामी आघाडीचा (युपीए) मे २००९ मध्ये दुसरा कार्यकाल सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच अशा प्रकारची पुनर्रचना होत आहे, त्यासंबधी गांधी व मनमोहनसिंग यांच्यात चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

छत्तीसगढ, गोवा आणि मणिपूर या तीन राज्यांचे प्रतिनिधीत्व करणारा कोणीही मंत्री केंद्रीय मंत्रिमंडळात नाही.

No comments:

Post a Comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा