घटनेच्या ३७१ व्या कलमातील तरतुदीनुसार गोव्याबाहेरील लोकांना इथे जमीन खरेदी करण्यास निर्बंध घालण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्राने तात्काळ मान्यता द्यावी, असे आवाहन सत्कारमूर्ती एदुआर्द फालेरो यांनी आपले मनोगत व्यक्त करताना केले. गोव्यातील जमिनींचे दर वाढत चालल्याने येथील भूमिपुत्रच भूमिहीन बनण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे इतर काही राज्यांप्रमाणे गोव्यातही बाहेरील लोकांना जमीन विक्रीवर निर्बंध घालायला हवे, असे ते म्हणाले. गोव्याचा विकास करताना पुढील २५ वर्षांच्या विचार करूनच नियोजन व्हावे. पर्यटन धोरण निश्चित करून त्या दृष्टीने पर्यटनाचा विस्तार झाला पाहिजे. तसेच माहिती तंत्रज्ञानाच्या साहाय्यानेच गोव्यातील युवा पिढीला नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे शक्य आहे व त्याचा गांभीर्याने विचार व्हावा,असेही ते म्हणाले.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा