एकत्रितपणे मंदिर उभारू!
मोहनजी भागवत
""अयोध्येतील वादग्रस्त जागेच्या मालकीहक्काविषयी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने आपला निर्णय दिलेला आहे. या निर्णयानंतर आनंद व्यक्त होणे स्वाभाविक आाहे. परंतु, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखून, कुणाच्याही भावनांना धक्का न लागता, आनंद मर्यादित राखून सर्वांनी प्रतिक्रिया व्यक्त करावी. न्यायालयाच्या या निकालाचा आदर करावा. हा कुणाचाही जय-पराजय नाही. कोणीही भडक भाषणे देऊ नये. संपूर्ण जगासमोर बंधुत्वाचे उदाहरण ठेवण्याची हीच वेळ आहे. अयोध्येतील रामजन्मभूमीवर भव्य राममंदिर बनविण्याची गरज आहे. आपल्या राष्ट्र आस्थापनेचे नवे पर्व सुरू झालेले आहे. सर्वांनी बंधूभावाने एकत्रितपणे राहून निकालाचा आदर ठेवावा व अयोध्येत रामजन्मभूमीवर भव्य राममंदिराची निर्मिती करण्यासाठी मुस्लिमांसह सर्वांनीच योगदान द्यावे.''
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा