१०० जण बेपत्ता
कोलकाता, दि. ३० : पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यामधील सागरी बेटानजीक बूढीगंगा नदीत शनिवारी प्रवाशांनी भरलेली एक नौका उलटल्यामुळे झालेल्या अपघातात अंदाजे ५० जण ठार झाले आहेत तर सुमारे १०० माणसे अजूनही बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. ५० जणांचे मृतदेह हाती लागले असून हा आकडा आणखीही वाढण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. बचावकार्यासाठी नौदल व हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येत आहे.
काकद्वीपचे पोलिस अधिकारी संजीत भट्टाचार्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, काकद्वीप येथे तीन नौका जात होत्या. त्यांतील एक नौका रोसुलपूर आणि घोडामारा यांच्याजवळ उलटली. या नौका पूर्वेकडील मेदिनीपूर जिल्ह्यातील हिजली शरीफकडून काकद्वीपला जात होत्या.
वरिष्ठ पोलिस महानिरीक्षक सुरजीत कार पुरकायस्थ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत ५० मृतदेह काढण्यात आले असून चार जणांना वाचवण्यात आले आहे. किती लोक बेपत्ता आहेत हे सध्या निश्चितपणे सांगता येणार नाही असे ते म्हणाले.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा