श्री श्री रविशंकर यांचा कानमंत्र
पणजी, दि. २४ (प्रतिनिधी)- नाते सदृश बनवायचे असेल अहंकार बाजूला ठेवून क्षमा मागणे तसेच क्षमा करणे या दोन गोष्टी आत्मसात केल्या पाहिजे, जेणेकरून आपुलकी वाढण्यास मदत होते, असे प्रतिपादन श्री श्री रविशंकर यांनी आज केले.
नानू बीच रिसॉर्ट येथे सुरू असलेल्या ४ दिवसीय "प्रगत ध्यान शिबिरा'त मार्गदर्शन करण्यासाठी ते गोव्यात दाखल झाले असून आज दुपारी ३.३० वाजता गो एअर विमानाने दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे दिल्ली येथून आगमन झाले. या शिबिरात देशभरातील सुमारे ६०० भक्त सहभागी झाले आहेत.
योग्य ज्ञान, ध्यान, भजन व सुदर्शन क्रिया यांच्या माध्यमातून वासना कमी करणे शक्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा