पणजी, दि. १७ (प्रतिनिधी) - अयोध्याप्रकरणाचा निवाडा येत्या २४ सप्टेंबर रोजी लखनौ न्यायालयात दिला जाणार असून या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतात दक्षतेचे आदेश देण्यात आले आहे. गोव्यातही दक्षता पाळली जाणार असल्याचे आज पोलिस खात्याचे प्रवक्ते तथा पोलिस अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी सांगितले.
गोव्यात कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नसली तरी संवेदनशील ठिकाणी पोलिस तैनात केले जाणार आहेत. यासाठी बाहेरून कोणत्याच सुरक्षा यंत्रणेला पाचारण करण्यात आले नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
निकाल जाहीर झाल्यानंतर कोणताही एक गट रस्त्यावर उतरण्याची शक्यता असल्याने यावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हा अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा