पणजी, दि. १३ (प्रतिनिधी) - पोलिसांना शरण येणार असल्याचे सांगत आज फरार निलंबित पोलिस शिपाई संजय परब याच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात सादर केलेले अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतला. परंतु, रात्री उशिरापर्यंत संजय परब गुन्हा अन्वेषण विभागाला शरण आला नव्हता. संजय शरण आला नाही तर आम्ही त्याला अटक करणार. त्याला जे जे आसरा देऊ शकतील अशांवर आम्ही दबाव टाकत आहोत, अशी माहिती आज सायंकाळी पोलिस उपमहानिरीक्षक रवींद्र यादव यांनी दिली.
संजय याला ताब्यात घेणे गुन्हा अन्वेषण विभागासाठी एक मोठे आव्हान ठरले आहे. गेल्या दीड महिन्यापासून संजय गुन्हा अन्वेषण विभागाला गुंगारा देत आहे.
अटकपूर्व जामिनाच्या सुनावणीवेळी न्यायालयात उपस्थित राहिल्यास आपल्याला अटक होईल या भीतीने तो आजही न्यायालयात अनुपस्थित राहिला. परंतु, अर्जदार न्यायालयात उपस्थित राहत नाही, तोवर अर्ज सुनावणीसाठी घेतला जात नसल्याने अखेर आज त्याने आपला अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतला.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा