केंद्राकडून टोलवाटोलवी सुरूच
नवी दिल्ली, दि. २१ : संसदेवरील हल्ल्याचा मुख्य आरोपी अफझल गुरू याच्या दयेच्या अर्जावर गृहमंत्रालयाला निर्णय घ्यायचा असल्याचे प्रतिपादन दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी केले आहे.
गुरुच्या दयेच्या अर्जाबाबत दिल्ली सरकारकडून टोलवाटोलवीची उत्तरे मिळत आहेत. त्यातच आज शीला दीक्षित म्हणाल्या की, आम्ही अफझल गुरूची फाईल नायब राज्यपालांकडे पाठविली होती. ते या फाईलवर आपला शेरा मारून गृहमंत्रालयाकडे पाठवतील. अखेरचा निर्णय गृहमंत्रालयालाच घ्यायचा आहे.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा