रायपूर, दि.१६ - राजनांदगाव जिल्ह्यातील तेरेगावमध्ये नक्षलवाद्यांनी आज (रविवार) गावच्या सरपंचासह सहा जणांची हत्या केली. मनापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. हत्या करून संबंधितांचे मृतदेह गावाबाहेर फेकून दिले होते.
ग्रामस्थांच्या हत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांचे एक पथक घटनास्थळी तपासासाठी गेले होते. मात्र, तेथे काहीही आढळून आले नाही. सदर मृतदेह पूर्णत: ताब्यात घेतल्यानंतरच अधिक माहिती देता येईल, असे पोलिसांनी सांगितले.
राज्यातील राजनांदगाव जिल्हा नक्षलवाद्यांनी प्रभावित आहे. त्यामुळे या ठिकाणी नक्षलवाद्यांच्या कारवाया वारंवार सुरू असतात. एक वर्षापूर्वी नक्षलवाद्यांनी पोलिस दलावर हल्ला केला होता, ज्यात पोलिस अधिक्षक विनोद कुमार चौबे यांच्यासह २९ पोलिस कर्मचारी शहीद झाले होते.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा