Thursday, 11 February 2010

जिल्हा पंचायतीसाठी २०५ उमेदवार रिंगणात

पणजी, दि.१० (प्रतिनिधी): जिल्हा पंचायतींच्या एकूण ५० जागांसाठी आता प्रत्यक्षात २०५ उमेदवार रिंगणात राहिलेले आहेत. उत्तर गोव्यात १२८ व दक्षिणेत ७७ उमेदवार रिंगणात आहेत. दक्षिणेत कोलवा मतदारसंघातून नेली रॉड्रिगीस या एकमेव महिला उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची घोषणाही आज राज्य निवडणूक आयोगाने केली.
जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी उत्तरेत ७० व दक्षिणेत ४८ अर्ज मागे घेण्यात आले, त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांत मिळून एकूण २०५ उमेदवारी राहिलेले आहेत. येत्या ७ मार्च रोजी मतदान होणार आहे. आता उमेदवारांची अंतिम यादी निश्चित झाल्याने उमेदवारांच्या प्रचाराला जोर चढणार आहे.

No comments:

Post a Comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा