नवी दिल्ली, दि. ११ - रेल्वे प्रशासनाच्या कारभारामुळे माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव अडचणीत येण्याची शक्यता आहे. रेल्वेला ९० हजार कोटी रुपये फायदा झाला आहे, असे लालूंनी छातीठोकपणे सांगितले होेते. प्रत्यक्षात रेल्वेला झालेला नफा हा केेवळ ८,३६१ कोटी रुपये एवढाच आहे, असे स्पष्टीकरण रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी संसदेत केले होते. एवढेच नाही, तर गेल्या पाच वर्षांच्या काळात रेल्वे मंत्रालयातील कारभारावर आपण लवकरच श्वेतपत्रिका जारी करण्याच्या विचारात आहोत, अशी घोषणा ममता बॅनर्जी यांनी संसदेत केली होती.
ममता बॅनर्जी यांच्या या घोषणेला पंतप्रधान मनमोहनसिंग यांनीही दुजोरा दिला आहे. श्वेतपत्रिका जारी केल्याने रेल्वेची नेमकी स्थिती लोेेेकांसमोर येईल, असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे. पंतप्रधानांनी आता यावर असे बोलणे आश्चर्य मानले जात आहे. ते यासाठी की गेल्या पाच वर्षांच्या काळात पंतप्रधानांना रेल्वेच्या कारभारावर वा लालूंच्या वक्तव्यांवर शंका का आली नाही. पंतप्रधानांनी ममता बॅनर्जी यांंंच्या श्वेतपत्रिका जारी करण्याच्या वक्तव्याला दुजोरा दिला याचा अर्थ यात कुठेतरी पाणी मुरतंय, असे म्हणायला निश्चितच वाव आहे, असे बोलले जात आहे.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा