विविध वाहिन्या आणि संस्थांनी निकालासंबंधी वेगवेगळे अंदाज व्यक्त केले असले तरी ते विश्वासार्ह नाहीत कारण ते शास्त्रशुद्ध पद्धतीने बनविले गेलेले नाहीत, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते रवीशंकर प्रसाद यांनी आज व्यक्त केली. भाजपने केलेल्या पाहणीनुसार १६६ जागांवरील विजय निश्चित आहे, असे सांगून रालोआची संख्या २१८ वर जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्वाधिक जागा मिळविणारा पक्ष भाजपच ठरेल असे त्यांनी सांगितले. मोठा पक्ष आणि मोठी आघाडी आमचीच असल्याने अन्य पक्षांच्या मदतीने भाजप सरकार बनवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा