Saturday, 11 April 2009

भाजपच सर्वांत मोठा पक्ष ठरेल 'रालोआ'चे भवितव्य उज्ज्वल : अडवाणी

पाटणा, दि. १० : बिजू जनता दलाने (बिजद) राष्ट्रीय लोकशाही आघाडीची साथ सोडली असली, तरी आगामी लोकसभा निवडणूक निकालानंतर भाजप हाच सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येईल, असा ठाम विश्वास भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार व ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी तिसऱ्या आघाडीची जोरदार खिल्ली उडवली.
बिहारमधील बक्सर, सासाराम आणि नवादा येथील प्रचारसभांत भाषण करून नवी दिल्लीकडे रवाना होण्याआधी पाटणा विमानतळ परिसरात पत्रकारांसोबत बोलताना अडवाणी यांनी हा विश्वास व्यक्त केला. "बिजद'ने ओरिसातील आपल्या क्षमतेचे अयोग्य मोजमाप केले आणि रालोआची साथ सोडली. त्यांना आपल्या या चुकीच्या निर्णयाचा भविष्यात निश्चितच पश्चाताप होईल, असेही अडवाणी म्हणाले.
येत्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सर्वाधिक खासदार भाजपचे राहतील, याबाबत अडवाणी पूर्णत: आश्वस्त दिसून आले. विविध पक्षांनी एकत्र येऊन तयार केलेल्या तिसऱ्या आघाडीबाबत पत्रकारांनी विचारले असता अडवाणी म्हणाले की, ही तिसरी आघाडी लोकांमध्ये केवळ संभ्रम निर्माण करीत आहे. राजद, लोजपा आणि सपा या तीन पक्षांचीही जी आघाडी झाली आहे तोही एक मतदारांसोबत धोका आहे.
भारतीय राजकारणातील कॉंग्रेसचे वर्चस्व संपुष्टात आणण्यात भाजपचे योगदान मोठे आहे. आज भाजप ही एक मोठी शक्ती म्हणून समोर आली आहे. कॉंग्रेसप्रमाणेच भाजपच्या सहकार्याविना सरकार स्थापन करणे अशक्य आहे आणि हीच आमच्यासाठी मोठी उपलब्धीही आहे, असेही अडवाणी म्हणाले.
रालोआचे भविष्य उज्ज्वल असल्याचा दावा करून अडवाणी म्हणाले की, अवघ्या एक महिन्याच्या काळात ज्याप्रकारे संपुआमध्ये फूट पडली आहे व घटक पक्ष विखुरले आहेत ते पाहाता, त्याचा लाभ निश्चितच रालोआला मिळणार आहे, असाही विश्वास अडवाणी यांनी व्यक्त केला.
भाजपनेच निवडणुकीचा कार्यक्रम देऊन तो पूर्ण केला. काश्मीर प्रकरणी राष्ट्रीय सुरक्षा कार्यक्रम सादर केला. याचेही आम्हाला समाधान आहे, असेही अडवाणी म्हणालेे.
स्वच्छ व योग्य प्रशासन, विकास आणि राष्ट्रीय सुरक्षा हे रालोआचे या लोकसभा निवडणुकीतील प्रमुख मुद्दे आहेत. बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तरांचल या राज्यांनी आपल्यावर असलेला आजारी राज्यांचा डाग पुसून काढला आहे आणि ही राज्ये आज विकासात अग्रेसर आहेत, असेही अडवाणी यांनी सांगितले.
बिहारमध्ये गेल्या १५ वर्षांत राजदचे सरकार असताना सर्वत्र पसरलेली अव्यवस्था नितीश कुमारांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारने दूर केली आहे, असा दावाही अडवाणी यांनी केला.

1 comment:

  1. nice information

    Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

    Online Survey Website
    Free Survey Website
    Survey Websites in Canada
    Survey Websites in India
    Earn Money from Home
    Free Online Surveys

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया नोंदवा