भारत- पाक संबंधातील सध्याच्या तणावाचे पर्यवसान युद्धात झाले तर आणि आण्विक युद्ध छेडले गेले तर परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारतीय संरक्षण यंत्रणा सज्ज आहे. "नो फर्स्ट यूज'चे आश्वासन दिले असतानाही पाकिस्तानने आण्विक हल्ला केलाच तर महासंहारक किरणांपासून लोकांचे संरक्षण करण्यासाठी डीआरडीओने खास बंकर तयार केले आहे , अशी माहिती "डीआरडीओ'चे (संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे) मुख्य नियंत्रक डब्ल्यू सेल्वमुर्ती यांनी दिली.
आण्विक , जैविक किंवा रासायनिक , कोणत्याही प्रकारचा हल्ला परतावून लावण्यास भारताची संरक्षण यंत्रणा सज्ज असल्याचं सेल्वमुर्ती यांनी सांगितलं. आण्विक हल्ल्याच्या काळात जनतेसाठी छोटे छोटे निवारे , रेडिएशनपासून बचाव करण्याचे यंत्र आणि हवेतून पूर्वसूचना देणारी यंत्रणा विकसित करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं.
आपल्या दिशेनं येणारे मिसाइल ५० किलोमिटर लांब अंतरावर हवेतच नष्ट करण्याची क्षमता असलेले इंटरसेप्टिव मिसाईल सिस्टीम विकसित करण्यात आली आहेत. या यंत्रणेची पूर्वीच चाचणीसुद्धा झाली असल्याचं ते म्हणाले.
अत्याधुनिक अशा लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्टची दोन दिवसांपूर्वी लेहमध्ये शून्य तापमानात यशस्वी चाचणी झाल्याचेही त्यांनी सांगितले. २०१० पर्यंत एअर फोर्समध्ये २० लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट दाखल होतील अशी माहिती सेल्वमूर्ती यांनी दिली.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा