Thursday, 9 October 2008

सर्व पालिकांना ४ आठवड्यांची अंतिम मुदत अन्यथा मुख्याधिकाऱ्यांना कोर्टापुढे उभे करणार

कचरा विल्हेवाट प्रकल्प
पणजी, दि. ८ (प्रतिनिधी) : कचरा विल्हेवाट प्रकल्प खटल्यात प्रतिवादी असलेल्या मुरगाव पालिकेने सर्व अटी पूर्ण केल्याने त्यांना या खटल्यातून वगळण्यात आले आहे. मात्र, अन्य पालिकांना या अटी पूर्ण करण्यासाठी चार आठवड्यांची अंतिम मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत या अटी पूर्ण न झाल्यास संबंधित पालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांना न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचा आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला. तसेच या अटी पूर्ण का झाल्या नाहीत, याचेही स्पष्टीकरणही प्रतिज्ञापत्राद्वारेसादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
यंदाच्या ९ जुलै रोजी न्यायालयाने सुचवलेल्या अटी पूर्ण करण्यासाठी सर्व पालिकांना ३० दिवसाची मुदत देण्यात आली होती. मात्र, मुरगाव पालिका सोडल्यास अन्य कोणत्याही पालिकेने या अटी पूर्ण न केल्याने याची गंभीर दखल न्यायालयाने घेतली आहे. वाळपई पालिका परिसरात केवळ ८ हजार लोकसंख्या असल्याने तेथे दोन कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी लागणारी जागा कलम ४ लावून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती खंडपीठास देण्यात आली. तसेच तेथे १२ वॉर्डमधील कचरा गोळा करण्यासाठी केवळ ५ कर्मचारी असल्याने अनेक अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले. पालिकेच्या आसपास चार गावे असल्याने त्याठिकाणी प्लॅस्टिक कचऱ्याची मोठी समस्या नाही. हे दोन्ही प्रकल्प उभे राहिल्यानंतर येत्या दोन महिन्यांत कचऱ्याची समस्या राहणार नसल्याची हमी वाळपई पालिकेने खंडपीठाला दिली. फोंडा पालिकेने दारात जाऊन कचरा गोळा करण्याचे काम सुरू केले असल्याची माहिती देण्यात आली.

1 comment:

  1. nice information

    Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making

    Money Online Now!

    Online Survey Website
    Free Survey Website
    Survey Websites in Canada
    Survey Websites in India
    Earn Money from Home
    Free Online Surveys

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया नोंदवा