मुंबई, दि.१० : रिझर्व्ह बॅंकेने बाजारातील आर्थिक चणचण दूर करण्यासाठी रोख राखीव निधीत (सीआरआर) आणखी एक टक्क्याने कपात केली. यापूर्वी बॅंकेने अर्ध्या टक्क्याने कपात केली होती. आता ही एकूण दीड टक्क्यांची कपात झाली आहे.
सध्या अमेरिकेतील मोठ्या कंपन्या आर्थिक संकटात सापडल्याने त्याचा परिणाम जगभरातील बाजारांवर झाला आहे. अमेरिकेतील आर्थिक मंदीचा भारतालाही मोठा फटका बसला आहे. जगातील आणि भारतातील सध्याची आर्थिक स्थिती पाहता रिझर्व्ह बॅंकेने रोख राखीव निधीत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. बॅंकेच्या या निर्णयामुळे साठ हजार कोटी रुपये बॅंकांकडे उपलब्ध होणार आहेत. बाजारातील आर्थिक चणचण दूर करण्यासाठीही याचा फायदा होईल. रोख राखीव निधीत आतापर्यंत एकूण दीड टक्क्याने कपात करण्यात आली आहे. शनिवारपासून ही कपात अंमलात येणार आहे. कपातीनंतर आता सीआरआरचा नवा दर साडे सात टक्के राहणार आहे.
रिझर्व्ह बॅंकेने जाहीर केलेल्या कपातीमुळे आता गृहकर्ज स्वस्त होणार आहे. सोबतच बाजारात ६० हजार कोटी रुपये येतील.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा