Friday, 10 October 2008

बजरंग दलावर बंदी घालून दाखवाच

राष्ट्रीय निमंत्रक प्रकाश शर्मा यांचे केंद्राला आव्हान
नवी दिल्ली, दि. ९ : बजरंग दलावर बंदी घालून दाखवाच आणि खरोखरच बंदी घातल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, असा जळजळीत इशारा या संघटनेने केंद्र सरकारला दिला आहे. दलावर बंदी घातल्यास आम्ही त्याविरुद्ध लढा देऊ व जनतेच्या दरबारात जाऊन अन्यायाविरुद्ध दाद मागू. सार्वत्रिक निवडणूक जवळ येत असून सरकारला दलावरील बंदी महागात पडेल, असे या दलाचे राष्ट्रीय निमंत्रक प्रकाश शर्मा यांनी म्हटले आहे.
ओरिसा आणि कर्नाटकात ख्रिश्चनांवर झालेल्या हल्ल्यांसंदर्भात बजरंग दलावर ठपका ठेवून दलावर बंदी घालण्याची चाल केंद्र सरकार खेळण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर बजरंग दलाने सरकारला हे आव्हान दिले आहे.
बजरंग दलाचा हिंसेवर विश्वास नाही, हिंदूंची बाजू घेत लोकनियुक्त सरकारवर लोकशाही मार्गाने दडपण आणणे हीच आमची कार्यपद्धत आहे. ओरिसातील ३५ ख्रिश्चनांच्या मृत्युमागे बजरंग दलाचा हात असल्याचा त्यांनी इन्कार केला. प्रसारमाध्यमे बजरंग दलाबद्दल चुकीची माहिती प्रसिद्ध करीत असून सत्याचा विपर्यास केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

1 comment:

  1. nice information

    Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making

    Money Online Now!

    Online Survey Website
    Free Survey Website
    Survey Websites in Canada
    Survey Websites in India
    Earn Money from Home
    Free Online Surveys

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया नोंदवा